Home Blog Page 568

मुळा मुठा नद्यांमधील जलपर्णी तातडीने हटविली जाईल

-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – मुळा आणि मुठा नद्यांमधील बोपोडी आणि येरवडा भागातील जलपर्णी तातडीने हटविली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुळा आणि मुठा नदीत येरवडा, बोपोडी भागात जलपर्णीचा उद्रेक झाला आहे. ती हटविण्यासाठी आमदार शिरोळे यांनी महापालिकेचे पर्यावरण संवर्धन अधिकारी मंगेश दिघे यांच्या समवेत बैठक घेतली. जलपर्णी हटविण्यासाठी १५ मार्च रोजी ठेकेदार नेमण्यात आले आहेत. त्या ठेकेदारांमार्फत भाऊ पाटील रोड एकता सोसायटी आणि येरवडा येथे फोफावलेली जलपर्णी तातडीने हटविली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना दिले. तसेच होळकर पूल येथील पुलाखालील नदीतील जलपर्णी हटविण्याचे काम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

औंध जलतरण तलाव लवकर खुला करणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – नागरिकांच्या मागणीनुसार औंध येथील जलतरण तलाव लवकरच खुला केला जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले.छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील औंध भागातील महापालिकेचा जलतरण तलाव बंद आहे, अशी तक्रार औंध मधील नागरिकांनी वारंवार केली होती. तसेच तलाव बंद असल्याने जलतरणाचा सराव करता येत नाही, त्यामुळे गैरसोय होते, असे खेळाडूंचे म्हणणे होते. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जलतरण तलावांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

औंध येथील जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली. जलतरण तलावाचा डागडुजीचा आढावा घेतला व किरकोळ कारणामुळे बंद असलेले अन्य तलाव लवकरात लवकर सुरू करावेत, असे आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

जलतरण तलावात शिकण्यासाठी येणाऱ्या किंवा सरावासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेकरीता लाईफ गार्ड किती आहेत, तसेच पाण्याची स्वच्छता आणि अन्य उपाययोजना या विषयीची माहिती आमदार शिरोळे यांनी घेतली.

हॉस्पिटल्स चालविण्याबाबत महापालिकेने धोरण ठरवावे:-आमदार सिद्धार्थ शिरोळे

विशेष वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत

पुणे – महापालिकेची हॉस्पिटल्स सुसज्ज यंत्रणेनिशी सुरळित चालविली जावीत, यासाठी निश्चित धोरण ठरविले जावे, हॉस्पिटल्समध्ये वैद्यकीय तज्ज्ञ (स्पेशल डॉक्टर्स) नेमले जावेत, अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख नीना बोराडे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली आणि छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने चर्चा केली.

या बैठकीत होमी भाभा हॉस्पिटल, बोपोडीतील संजय गांधी हॉस्पिटल, खेडेकर हॉस्पिटल, शेवाळे हॉस्पिटल आणि दळवी हॉस्पिटल येथील सुधारणांसंदर्भात चर्चा झाली. होमी भाभा हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे काम येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण झाले असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांना दिली.

महापालिकेच्या संजय गांधी हॉस्पिटल मधील मॅटर्निटी वॉर्ड लवकर सुरू व्हावा, अशी आग्रही मागणी आ.शिरोळे यांनी केली. तसेच दळवी हॉस्पिटल मधील अडचणी सोडवून तेथील मॅटर्निटी वॉर्डही सुरळीत चालावा याबाबतही चर्चा करण्यात आली. या खेरीज खेडेकर हॉस्पिटल आणि शेवाळे हॉस्पिटल येथील अडचणी सोडविण्यासाठी चर्चा करून त्यावरच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
आरोग्य प्रमुख तसेच आरोग्य अधिकारी डॉ .नीना बोरुडे, डॉ.कल्पना बळीवंत, डॉ. संजीव वावरे,डॉ कोलते मॅडम, हे अधिकारी उपस्थित होते.तसेच दत्ता खाडे, शैलेश बडदे, सुनील पांडे,सचिन वाडेकर, सुनीता वाडेकर, आनंद छाजेड, वसंत जुनवणे, प्रकाश सोळंकी, अपर्णा कुऱ्हाडे, सुजित गोठेकर, बंडू ढोरे, सुप्रीम चोंधे, रविराज यादव, बिरू खोमणे, अनिल भिसे, नीलिमा खाडे, सूरज शिंदे, हे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

चंदननगरमधील झोपडपट्टीत भीषण आग:10 गॅस सिलिंडरचा स्फोट

पुणे- नगर रस्त्यावरील चंदननगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत बुधवारी पहाटे भीषण आग लागली. पहाटे पाचच्या सुमारास लागलेल्या या आगीची माहिती मिळताच रहिवासी तात्काळ बाहेर पळाले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच 15 बंब आणि टँकर घटनास्थळी पोहोचले. आगीदरम्यान झोपड्यांमधील दहा गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग अधिक भडकली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली 80 जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

आगीत 50 पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या. वसाहतीतील रस्त्यावर उभ्या असलेल्या चार-पाच दुचाकीही जळाल्या. जवानांनी झोपड्यांमधून 100 पेक्षा जास्त गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी अनेक कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. आगीत झोपड्यांमधील सर्व गृहोपयोगी वस्तू जळाल्या. डोळ्यादेखत संसार जळाल्याने रहिवाशांचे अश्रू अनावर झाले. आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लाकडी वाड्याला आगछत्रपती शिवाजी रस्त्यावरील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारी असलेल्या जुन्या लाकडी वाड्याला मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. लाकडी वाडा पेटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने भीती पसरली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या काका हलवाई मिठाईच्या दुकानातून जवानांनी प्रवेश करून इमारतीतून पाण्याचा मारा केला. लाकडी वाड्याच्या तळमजल्यावर दोन दुकानांनी आगीच झळ पाेहोचली.जुन्या वाड्यातील आठ ते दहा रहिवासी आग लागल्यानंतर बाहेर पडल्याने बचावले. 50 जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत केला हाेता. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी

पुणे, दि. २३: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी १४८ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवार, ३० एप्रिल आणि शुक्रवार, २ मे २०२५ होणार आहे. या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगाराच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.

अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
0000

परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी गणेश परिधान करणे अनिवार्य

पुणे, दि. 23: महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करीत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करण्यासोबतच ओळखपत्र प्रदर्शित करणे अनिवार्य आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा, टॅक्सी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज करताना गणवेश परिधान करुन आपली गैरसोय टाळावी.

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी आपल्या वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित कलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही श्री. भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे, दि. २३ एप्रिल २०२५: महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा वीजग्राहकांना भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आला आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव ही मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

उदाहरणार्थ वीजग्राहकाचे वार्षिक सरासरी वीजबिल ५०० रुपये असल्यास त्याच्या दुप्पट म्हणजे एक हजार रुपयांची सुरक्षा ठेव असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा ठेवीचे ८५० रुपये जमा असल्यास संबंधित ग्राहकास १५० रुपयांचे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम वीजबिलात दरमहा नमूद करण्यात येत आहे.  

वीजग्राहकांना माहे एप्रिल / मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत १४ लाख ३९ हजार लघुदाब वीजग्राहकांना ३९० कोटी ३८ लाख रुपयांच्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लघुदाब वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वर्ल्डबुक अँड कॉपीराईट डे  उत्साहात साजरा….

पुणे- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वर्ल्डबुक अँड कॉपीराईट डे  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचे प्रतिमा पूजनाने झाली. ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी यांनी या प्रसंगी  वर्ल्डबुक अँड कॉपीराईट दिवसाचा इतिहास, महत्व सांगून जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचे साहित्याविषयी मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी  डिजिटल लायब्ररी च्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वाचनासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून दिली. वर्ल्डबुक अँड कॉपीराईट दिनाची विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. ग्रंथालयात आलेल्या नवीन पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा.गणेश कोंढाळकर,ग्रंथपाल प्रा.तानाजी माळी, सर्व  विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन  ग्रंथपाल प्रा. तानाजी माळी यांनी केले. महाविद्यालयाने हा उपक्रम राबविल्या बद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 

पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत,अमित शाह म्हणाले,बदला लिया जायेगा …

0

जम्मू आणि काश्मीर सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपये देण्यात येतील.गृह मंत्री अमित शाह म्हणाले,-भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.
आज त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली. भारत दहशतीसमोर झुकणार नाही. या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्राथमिक तपासात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. तपासात असे दिसून आले आहे की चार दहशतवादी सैन्यासारखा गणवेश (कॅमफ्लाज ड्रेस) घालून बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचले होते. त्यांच्याकडे अमेरिकन एम४ कार्बाइन रायफल आणि एके-४७ सारखी धोकादायक शस्त्रे होती. मंगळवारी संध्याकाळपर्यंत घटनास्थळावरून ५० ते ७० गोळीबाराचे काडतुसे जप्त करण्यात आले. पीडित आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी प्रथम पर्यटकांना बंदुका दाखवून थांबवले. त्यांनी महिला आणि मुलांना बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर लोकांना त्यांची ओळख विचारल्यानंतर त्याने जवळून गोळ्या झाडल्या आणि नंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी:गुप्तचर यंत्रणांनी सांगितले- लष्करचा दहशतवादी सूत्रधार पाकिस्तानात


मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले.लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही.मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची नावे विचारली आणि त्यांना कलमा म्हणायला लावला. त्यापैकी एक उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदी होता, ज्याला त्याचे नाव विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी मारली. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला.हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ते आता बेअर्सन व्हॅलीमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून भारतात परतले. ते सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतील.१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने याची जबाबदारी घेतली होती.

रूपाली ठोंबरे पाटील पती, कुटुंबासह जम्मू काश्मीरमध्ये अडकल्या..

पुणे-अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे या देखील केले जम्मू-काश्मीरला गेलेल्या आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आम्ही सर्वजण सुखरुप असल्याचे त्यांनी सांगितला आहे. तसेच अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्र येण्यासाठी तात्काळ सोय करण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे.या संदर्भात रूपाली ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपण जम्मू-काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी देखील आम्ही जाऊन आलो आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले. आमच्या सोबत नाशिक मधील देखील काही पर्यटक आहोत. मात्र, आम्ही सर्व सुरक्षित असलो तरी आम्हाला इथून निघण्यासाठी विमानाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या ठिकाणची परिस्थिती आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या परिस्थितीचा आम्ही विचारही करू शकत नाही. येथे हल्ला झाला असला तरी या ठिकाणी काम करणाऱ्या स्टाफ मध्ये अनेक मुस्लिम बांधव आहेतच. या दरम्यान आम्हाला आदील नावाच्या एका व्यक्तीने मोठी मदत केली आहे. ते आजही आम्हाला भेटण्यासाठी आले असल्याचे रूपाली ठोंबरे यांनी सांगितले. मात्र, सरकारने जी कारवाई करायची त्यांनी करावी. मात्र आधी पर्यटकांना त्यांच्या घरी तातडीने पोहोचवावे. येथील परिस्थितीत बिकट आहे, असे देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

आमच्या सोबत अनेक लहान मुले आहोत. आम्ही सर्वजण सेफ नाहीत. माझे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलत झाले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून त्यांनी विमानाची सोय करून द्यावी, अशी विनंती त्यांना केली आहे. तसेच ही सर्व मदत तातडीने करून पर्यटकांना लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू-काश्मीरला फिरायला आलो होतो. आजचा हल्ला झाला त्यानंतर आम्ही प्रचंड घाबरलेलो आहोत. काही पर्यटक आजच आलेले आहेत. तर काही जणांच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाईटचे तिकीट आहे. माझे महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे. इथे पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना तात्काळ महाराष्ट्रात येण्याची व्यवस्था करण्यात यावी. इथे सर्वत्र प्रचंड दहशत पसरलेली आहे. सर्व पर्यटक आपल्याला लहान मुलांसोबत फिरायला आलेले असल्याचे देखील रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.

9370960061 पुण्यातील पर्यटकांसाठी प्रशासनाचा क्रमांक:264 पुणेकर पुलगावमध्ये अडकले; सर्वांना सुखरूप आणणार -मोहोळ

पुणे-जम्मू-काश्मिरातील अडकलेल्या सर्व पर्यटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत सर्व पर्यटकांना मुंबई आणि पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पर्यटकांनी काळजी करू नये, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे देखील ते म्हणाले. यासाठी श्रीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले असून त्यासाठी एक मदत कक्ष क्रमांक देखील त्यांनी जाहीर केला. या सर्व पर्यटकांनी 9370960061 या किंवा 020-26123371 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

पुणे कलेक्टर ऑफिस ने सुरु केलेल्या हेल्प लाइनवर आतापर्यंत कश्मीर मध्ये अडकलेल्या 264 जणांनी संपर्क साधला आहे. हा आकडा आणखीन वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

​​​​​​पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेलेल्या 67 पर्यटकांचा एक ग्रुप पुलगावमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठी आवाहन केले आहे. या संदर्भात प्रशासन देखील अडकलेल्या सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भीतीचे वातावरण आहे. आम्ही रात्रभर संपर्कात आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महाराष्ट्रातील लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी आज दुपारी व्हाया मुंबई पुण्याला एक स्पेशल विमान येणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुण्यातील तीन-चार मोठे ग्रुप तेथे अडकले आहेत. या सर्वांशी आम्ही संपर्कात असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. या नागरिकांसाठी मुंबई मार्गे पुण्यात आणण्यासाठी स्पेशल विमान बुक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी देखील माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रातील जे नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये अडकली आहेत त्या सर्व नागरिकांना परत आणण्याची व्यवस्था आपण करत आहोत. अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीती आहे, ती आता निश्चितपणे कमी होत आहे. आम्ही त्या सर्व नागरिकांच्या संपर्कात आहोत, असे देखील मोहोळ यांनी सांगितले. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा झाली असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. आपले कोणी नातेवाईक किंवा मित्रपरिवार अडकलेले असतील तर त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन मोहोळ यांनी केले आहे.

पुण्यातील असंख्य पर्यटक काश्मीर मध्ये अडकले, महाराष्ट्र सरकारकडे परतण्यासाठी आवाहन,पहा नावांची यादी

पुणे- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेलेले सांख्य पर्यटक पुलगावमध्ये अडकले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठी आवाहन केले आहे.या शिवाय आदित्य जनार्दन खटाटे, हडपसर पुणे येथील रहिवासी असून त्यांनी सांगितले कि मी व इतर शिरूर दौंड इत्यादी ठिकाणातील रहिवासी असे एकूण ६५ लोक श्रीनगर येथे Hotel Mountain येथे आहोत.

आज दिनांक २२/०४/२०२५ रोजी पहेलगाम वरून श्रीनगर येथे सुखरूप पोहोचलो आहोत.

तरी आम्हाला श्रीनगर येथून सुखरूप आपल्या जिल्ह्यात म्हणजेच पुणे येथे पोहोचवावे हीच प्रशासनास विनंती.

आम्ही रहिवासी खालील प्रमाणे:

1. Jyoti Zurunge (9860596889)

2. Aditya Janardan Khatate (9552729057)

3. Janardan Baban Khatate

4. Manisha Janardan Khatate

5. Kajal Aditya Khatate

(Kajal Ramesh Pore)

6. Dnyaneshwar Jawalkar

7. Sadhana Jawalkar

8. Nilesh Umbarkar

9. Jyoti Umbarkar

10. Aarya Umbarkar

11. Bhumi Umbarkar

12. Prasad Sawant

13. Deepa D Sawant

14. Deepa P Sawant

15. Rakesh Takale

16. Ashwini Takale

17. Siddhant takale

18. Sunil Nikam

19. Rekha Nikam

20. Dipali Gaikwad

21. Vaishanavi Gaikwad

22. Tejashree Gaikwad

23. Manisha gaikwad

24. Nirmala Adak

25. Vaishali Dhagate

26. Kiran Wagmode

27. Samsher Shaikh

28. Shain Shaikh

29. Siddhik Shaikh

30. Shirish Deshmukh

31. Bhagyashree Deshmukh

32. Prajwal Kulal

33. Ashwini Futane

34. Nasir Shaikh

35. Vinod Yadav

36. Komal Yadav

37. Amol Hambir

38. Mona Hambir

39. Arohi Hambir

40. Govind Yadav

41. Jyoti Yadav

42. Kaivalya Yadav

43. Amol Mhaske

44. Swapnali Mhaske

45. Varsha Kanchan

46. Aarya Kanchan

47. Yuvraj Hole

48. Tejashree Hole

49. Tanishk Hole

50. Chitraksh Hole

51. Savita Lonkar

52. Satish Gaikwad

53. Darshana Gaikwad

54. Prrajwal kutwal

55. Sandhya Dedge

56. Shaunak Dedge

57. Rohini Gaikwad

58. Aditya Gaikwad

59. Prathamesh Zurunge

60. Shalini nagekar

61. Shraddha Kale

62. Sai Kale

63. Sheha Kulal 64. Alka kudale

65. Klapna gaykwad

66. Sushma shindi

67. Rupali tambe

68. Dipali lokhande

हाफिज सईदचा सहकारी सैफुल्ला खालिद पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ने घेतली आहे. जी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक आघाडी आहे. जम्मू आणि काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांमागे दहशतवादी
हाफिज सईदच्या खूप जवळचा
सैफुल्ला खालिद या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचे म्हटले जात आहे.
लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद हा सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जातो. तो भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदच्या खूप जवळचा आहे. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव घेतले गेले आहे. तो नेहमीच आलिशान गाड्यांमधून प्रवास करतो. लष्कराचे दहशतवादी नेहमीच त्याच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असतात. पाकिस्तानमधील त्याचा प्रभाव एवढा आहे कि त्याठिकाणचे लष्करी अधिकारीही त्याच्यावर पुष्पवृष्टी करतात. तो पाकिस्तानी सैन्याच्या सैनिकांना भडकवण्याचे काम करते.

ताज्या दहशतवादी हल्ल्याच्या फक्त दोन महिने आधी, सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूर याठिकाणी पोहोचला होता, जिथे पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन आहे. तिथे पाकिस्तानी सैन्याचे कर्नल जाहिद जरीन खट्टक यांनी त्यांना जिहादी भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. तो त्याठिकाणी पोहोचल्यानंतर कर्नलने स्वतः त्याच्यावर फुले उधळली. यानंतर, त्यांनी पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध जोरदार चिथावणी दिली. त्याने असेही म्हटले की “जितके जास्त भारतीय सैनिक ते मारतील तितके जास्त अल्लाह त्यांना बक्षीस देईल.”

पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा याठिकाणी झालेल्या बैठकीत त्याने भारताविरुद्ध विष ओकले होते. त्यावर लिहिले होते, “मी वचन देतो की आज २ फेब्रुवारी २०२५ आहे.” २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आम्ही काश्मीर काबीज करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आमचे मुजाहिदीन त्यांचे हल्ले तीव्र करतील. आम्हाला आशा आहे की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर मुक्त होईल.” ही बैठक आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराने संयुक्तपणे आयोजित केली होती. त्याचे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी जमले होते.

एका गुप्तचर अहवालानुसार, गेल्या वर्षी शेकडो पाकिस्तानी मुलांनी अबोटाबादच्या जंगलात आयोजित केलेल्या दहशतवादी छावणीत भाग घेतला होता. हे लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखा पीएमएमएल आणि एसएमएलने आयोजित केले होते. यामध्ये सैफुल्लाह कसुरी देखील उपस्थित होता. त्याने या छावणीतील मुलांना दहशतवादी हल्ल्यांसाठी निवडले होते, ज्यांना नंतर लक्ष्य हत्या करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. इथेही सैफुल्लाहने भारताविरुद्ध भडकाऊ भाषण देऊन तिथे उपस्थित असलेल्या मुलांना भडकवले होते.

या मुलांना दहशतवादी प्रशिक्षण दिल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने त्यांना सीमेपलीकडून घुसखोरी करण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संविधानात सुधारणा करून जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आले. यानंतर, आयएसआयने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना कव्हर करण्यासाठी टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ ची स्थापना केली. पाकिस्तानी सैन्य या दहशतवादी संघटनेला मदत करते. लष्कराच्या निधीच्या माध्यमांचा वापर केला जातो.

गृह मंत्रालयाने राज्यसभेत असेही सांगितले होते की, “द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची एक आघाडी संघटना आहे.” टीआरएफ २०१९ मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून ते जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत दहशतवादी हल्ले करत आहे. टीआरएफचे ‘हिट स्क्वॉड’ आणि ‘फाल्कन स्क्वॉड’ येत्या काळात काश्मीरमध्ये मोठे आव्हान निर्माण करू शकतात. या दहशतवादी मॉड्यूलला लक्ष्य हत्या करण्याचे आणि जंगलात आणि उंच भागात लपण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मोदींबाबत अपशब्द वापरत गोळीबार

दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबूत शिरलो. त्यांनी माझे ५४ वर्षीय वडील संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले. त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना डोक्यात, पाठीत व कानात गोळ्या घातल्या असे २६ वर्षीय आसावरी जगदाळे यांनीPTI या वृत्तसंस्थेला हल्ल्याच्या वेळचा अनुभव सांगितला.तसेच तुम्ही मोदींना पाठिंबा देता असे सांगत गोळ्या झाडल्याचे त्यांनी नमूद केले.

पुण्यातील उद्याोजक संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसला. वडील जमिनीवर कोसळल्यावर त्यांच्या शेजारी असलेल्या काकांनाही गोळ्या घातल्या. आम्ही पाच जण होतो. आसावरी या मनुष्यबळ विकास संसाधन क्षेत्रात कार्यरत आहेत. स्थानिक पोलिसांप्रमाणे हल्लेखोरांचा वेश होता. संरक्षणासाठी आम्ही शेजारच्या तंबूत गेल्याचे आसावरी यांनी नमूद केले. आमच्याप्रमाणे सहा ते सात पर्यटक देखील पडून राहिले. आम्हाला सुरुवातीला दहशतवादी व सुरक्षारक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे असे वाटले. दहशतवाद्यांच्या गटाने सुरुवातीला शेजारच्या तंबूत येत गोळीबार केला. त्यानंतर आमच्या तंबूकडे येत माझ्या वडिलांना चौधरी तू बाहर आ जा असे दरडावल्याचे आसावरी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल शेरेबाजी केली. पाठोपाठ काश्मिरी दहशतवादी निरपराध महिला व मुलांना ठार नाहीत असा दावा केला. नंतर माझ्या वडिलांना कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितले. त्यात अपयश आल्यावर तीन गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. अनेक पुरुषांना त्यांनी गोळ्या घातल्या. तेथे मदतीसाठी कोणीही नव्हते. पोलीस किंवा लष्कराचे जवान २० मिनिटांनी आल्याचे आसावरी यांनी सांगितले.

ज्या व्यक्ती आम्हाला तेथे घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला परतण्यास मदत केली. आमची वैद्याकीय तपासणी करण्यात आली. आम्हाला पहेलगाम क्लब येथे हलविण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला. मात्र पाच तासांनंतर माझे वडील किंवा काकांबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही, असे आसावरी यांनी सांगितले.पनवेल येथील निसर्ग ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून ३९ पर्यटकांचा एक चमू पहेलगाम येथील दहशतवाद्यांच्या गोळीबारात सापडला. यात नवीन पनवेल येथे राहणारे दिलीप देसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक हे दाम्पत्यदेखील जखमी झाले आहे. माणिक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.