Home Blog Page 566

शाश्वततेसाठी विज्ञानाचे समन्वय’ विषयावर राष्ट्रीय परिसंवादतीन दिवसीय परिसंवाद कोथरूड येथील डब्ल्यूपीयू कॅम्पसमध्ये सुरू

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विज्ञान आणि पर्यावरण अभ्यास शाळेतील बायोसायन्सेस आणि तंत्रज्ञान विभागातर्फे ‘शाश्वततेसाठी विज्ञानाचे समन्वय स्वच्छ ऊर्जा, लवचिक शेती आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय परिसंवाद २४ ते २६ एप्रिल दरम्यान कोथरूड येथील डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमधील चाणक्य बिल्डिंगमधील तोरणा हॉल मध्ये होणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेते दिली.
या परिसंवादाचे उद्घाटन राष्ट्रीय विज्ञानाचे अध्यक्ष पद्मश्री प्रा.डॉ. गणपती डी.यादव यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड हे असतील. तसेच समारोप २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी आयसीएआर-डीआयएफआरचे संचालक डॉ.के.व्ही. प्रसाद आणि जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स चे मेजर विशाल कराड उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मार्गदर्शात संपन्न होत आहेे.
या परिसंवादात परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, हवामान-लवचिक शेती, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक संसाधने आणि नैसर्गिक उत्पादने आणि कार्यात्मक अन्न या चार विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये खरगपूर आयआयटीचे डॉ. आदिपुण्य मित्र, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. भरत काळे, एसपीपीयूचे डॉ. विठ्ठल बरवकर, आयसीएआर-एनआरसीजीचे डॉ. सुजॉय साहा, माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मालती वेंकटेशन, आयसीजीईबीचे डॉ. शशी कुमार रोड, बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे डॉ. राजश्री जोशी, आयडब्ल्यूएमआयच्या डॉ. मानसी त्रिपाठी, सायरिओचे डॉ. समथा मॅथ्यू, डॉ. आनंद घोसाळकर, आयसीएआर एनआरसीजीचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, बिट्स पिलानीचे डॉ. उत्पल रॉय, लोयोला कॉलेजच्या डॉ. किरण कुमारी आणि आयसीटीच्या डॉ. रेखा सिंघल हे विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आंतरविद्याशाखीय सहकार्यांना व नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणे आणि शाश्वत भविष्यासाठी प्रभावी भागीदारी निर्माण करणे हे आहे.
येथे तळागळातील उदयोन्मुख नवोपक्रम आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे संशोधन विद्वान आणि तरूण शास्त्रज्ञांचे मौखिक आणि पोस्टर सादरीकरण देखील असेल.
या परिसंवादात शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, उद्योग तज्ञ आणि तरूण वैज्ञानिक विचारांना आणि काही सर्वात महत्वाच्या शाश्वत आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक संगम म्हणून कार्य करणार आहे.
या कार्यक्रमाला भारत सरकारच्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनचे पाठबळ आहे. तसेच शाश्वत ग्रामीण विकास, स्वच्छ ऊर्जा आणि वर्तुळाकार जैव अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी अग्रणी असलेल्या बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनची भागीदारी आहे. नेक्स्ट जेन सायन्सेस हे उद्योग प्रायोजक आहे.
या पत्रकार परिषदेत डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ सायन्स अँड एर्न्व्हामेंटल स्टडीजचे डीन इनचार्ज डॉ. अनुप काळे, डॉ. शिल्पा चापडगावकर आणि सहयोगी प्रा. डॉ. मानसी मिश्रा उपस्थित होत्या.

आपण खऱ्या अर्थाने आजही धर्मनिरपेक्ष झालो नाही-राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे 

‘लोकपरंपरा पुरस्कार’ शिवाजीराव गोपाळे यांना प्रदान

शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिर : ‘वीर’ परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान

पुणे :  आपण खऱ्या अर्थाने आजही धर्मनिरपेक्ष झालो नाही. शिक्षा आणि पुरस्कार हे धर्म बघूनच दिले जातात. मणिपूर मध्ये हिंसाचार झाला तेव्हा अनेक जण बोलत होते परंतु आज पश्चिम बंगाल मधल्या हिंसाचाराबद्दल ते लोक बोलत नाहीत. मुस्लिम मेले तर संविधान संकटात येते हिंदू मेले तर येत नाही का? , असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली.

शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे पेशवे काळापासून सुरू असलेली आणि आजही अखंडपणे जपली जाणारी कीर्तन परंपरा यंदाही हनुमान जयंतीपासून अक्षयतृतीया पर्यंत सलग १८ दिवस साजरी होत आहे. महाराष्ट्रातील सलग १८ दिवस कीर्तन उत्सव सुरु असणारे हे बहुधा एकमेव मारुती मंदिर मानले जाते. 

‘शनिवार वीर मारुती उत्सव मंडळा’च्या पुढाकाराने आणि गुरुवर्य श्री श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘लोकपरंपरा पुरस्कार’ शिवाजीराव गोपाळे यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांच्या हस्ते शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे प्रदान करण्यात आला. यावेळी राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी व सहकारी मंडळी उपस्थित होते.

ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे म्हणाले, पानिपतचे युद्ध मराठ्यांनी जिंकावे यासाठी मारुतीला नवस करण्यात आला. ज्या ज्या वीरांच्या कुटुंबीयांनी नवस केला ते शनिवार पेठेतील मंदिरात आजही येतात. अशा वीरांच्या कुटुंबाचे संकलन शिवाजीराव गोपाळे यांनी केले, त्यांचे काम मोठे आहे. तब्बल २५ वर्षापेक्षा जास्त काळ ते झटले आणि २०० सरदारांची नावे पुढच्या पिढीपर्यंत दिली, अशा तपोवृद्ध माणसाचा सन्मान करायला मिळणे हा आमचा सन्मान आहे, अशी भावना आफळे यांनी व्यक्त केली.

राम दहाड म्हणाले, कीर्तन उत्सवाच्या या पावन परंपरेत चारुदत्त बुवा आफळे, वासुदेव बुवा बुरसे, मकरंद बुवा दीक्षित यांसारख्या नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला असून, आजही ही परंपरा अखंड सुरू आहे.  हा उत्सव कोणतीही वर्गणी न घेता, लोकवर्गणीतून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या परंपरांना जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना ‘लोकपरंपरा पुरस्कार’ देण्यात येतो.  

ही परंपरा अधिक जिवंत राहावी म्हणून राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी व सहकारी मंडळी ही उत्साहाने प्रयत्नशील आहेत.

पश्चिम भारतातील 87% लोक डासांमुळे त्रस्त ; जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवरगुडनाईट सर्वेक्षण

–      सर्व वयोगटांतील सुमारे 61% प्रौढांनी डासांचा त्रास याला अस्वस्थ झोपेसाठीच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हटले आहे

–      प्रौढ दररोज रात्री 2 तासांपर्यंतची झोप गमावतात; मुलं जवळजवळ 4 तास झोप गमावतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजाराचा धोका वाढतो

–      उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतातील 87% आणि दक्षिण भारतातील 86% लोक याच मताशी सहमत

मुंबई: झोपेमधील अडथळे, विशेषतः मुलांना झोपेत येणारा व्यत्यय त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर थेट परिणाम करत आहे अशी पश्चिम भारतातील 87% लोकांची खात्री आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या (25 एप्रिल) पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)च्या गुडनाईट या भारतातील आघाडीच्या घरगुती कीटकनाशक ब्रँडने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. गुडनाईटने ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ या नावाने सादर केलेले हे अखिल भारतीय सर्वेक्षण YouGov या मार्केट रिसर्च फर्मकडून राबविण्यात आले. यात जनतेची मतं आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांचा धोका याचे मूल्यमापन केले गेले. सर्वच भागांमध्ये ही चिंता व्यक्त करण्यात आली. उत्तर, पूर्व भारतात 87% आणि दक्षिणेत 86% प्रतिसादकर्ते याच मताशी सहमत आहेत.

या अभ्यासानुसार, झोपेची कमतरता हा भारतीय घरांमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. रोज रात्री प्रौढ लोक सुमारे 2 तास झोप गमावतात, तर मुलांची झोप त्यांना गरजेच्या असलेल्या वेळेपेक्षा जवळपास 4 तास कमी होते. ही सततची झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करते, तणावाची पातळी वाढवते आणि विशेषतः मलेरिया व डेंग्यूसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांप्रती संवेदनशीलता वाढवते.

पश्चिम भारतातील प्रौढांमध्ये डास हे झोपेच्या व्यत्ययाचे एक प्रमुख कारण ठरले आहेत. विविध वयोगटांमध्ये सुमारे 61% लोकांनी डासांच्या प्रादुर्भावाला अस्वस्थ झोपेसाठी जबाबदार धरले आहे. मुलांमध्ये याचा परिणाम अधिक तीव्र असून, पालक सांगतात की डास चावणे व सतत त्यांची कानाशी होणारी भूणभूण हे झोपेमधील अडथळ्याचे प्रमुख कारण बनले आहे. हे आजार किंवा अभ्यासाच्या तणावापेक्षाही अधिक ठरते.

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अश्विन मूर्ती म्हणाले, “गुडनाईटचा ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ हा एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण अहवाल असून तो जनतेच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करतो आणि डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या धोक्याचे मूल्यमापन करतो. अशा उपक्रमांद्वारे आमचे उद्दिष्ट म्हणजे भारतात डासांच्या समस्येबाबत जनजागृती वाढवणे, कुटुंबांना डासांचा अटकाव करण्यासाठी कृती करण्याकरता सक्षम बनवणे आणि देशासाठी परवडणाऱ्या पण नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करणे हे आहे. भारतात दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक नागरिक मलेरिया, डेंग्यूसारख्या डासांमुळे होणाऱ्या रोगांनी ग्रासतात. आजारामुळे काम, शाळा, सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपासून लांब राहावे लागते, सक्तीची रजा घ्यावी लागते. आरोग्यसेवेसाठी खर्च करावा लागतो आणि उत्पादकतेत घट होते. हे सर्व आर्थिक नुकसानीचे कारण ठरतात. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि जीडीपी टिकवण्यासाठी एक सक्षम आणि निरोगी कामकाज करणारा वर्ग आवश्यक असतो. डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या वाढत्या प्रमाणावर मात करण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे हे प्रश्न वेळेवर सोडवणे.”

फक्त थकवा नाही, तर झोपेच्या अभावाचे परिणाम दूरगामी असतात. वैद्यकीय तज्ज्ञ चेतावणी देतात की झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकते. त्यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांसह अनेक संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो. याचा भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणाव वाढतो, चिडचिड वाढते आणि दिवसभर एकाग्रता कमी होते.

गुडनाईटच्या अहवालावर भाष्य करताना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या, “एक डास देखील प्राणघातक रोग पसरवण्याची क्षमता ठेवतो हे समजणे अत्यावश्यक आहे. हे लहानसे कानाशी भूणभूण करणारे कीटक डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक रोगांच्या फैलावामागचे धोकादायक कारण आहेत. ते रोगप्रतिकारक शक्ती दुर्बल करतात. त्यामुळे इतर रोग होण्याची शक्यता वाढते. ही सततची भीती आपल्या आरोग्याला धोका पोहोचवते आणि निरोगी व उत्पादक जीवन जगण्याची क्षमता बाधित करते. डासांमुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ती आपली आणि आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”

गुडनाईटने फ्लॅश वेपोरायझर, अगरबत्त्या आणि अ‍ॅडव्हान्स फास्ट कार्ड यांसारख्या नाविन्यपूर्ण डास प्रतिबंधक उपाययोजना सादर करत एक दीर्घकालीन परंपरा जपली आहे. अलीकडच्या काळात बेकायदेशीर, अनियमित व चीनी घटक असलेल्या कीटकनाशकांमुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) मधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या भागीदारांसोबत मिळून ‘Renofluthrin’ हे भारतातील पहिले देशी बनावटीचे व पेटंट केलेले मॉलिक्यूल विकसित केले आहे. डास नियंत्रणासाठी हे सर्वात प्रभावी लिक्विड वॅपोरायझर फॉर्म्युलेशन तयार करते. GCPL हे घरगुती कीटकनाशक क्षेत्रात आघाडीवर असून  त्यांनी हे Renofluthrin फॉर्म्युलेशन त्यांच्या नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझरमध्ये सादर केले आहे. हे भारतातील सर्वात प्रभावी लिक्विड वेपोरायझर आहे. Renofluthrin वापरून तयार केलेले हे नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझर भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोंदणीकृत लिक्विड वेपोरायझर फॉर्म्युलेशनच्या तुलनेत 2 पट अधिक प्रभावी आहे.

सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचे अभिनंदन

मुंबई-शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या आतापर्यंतच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीस अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर, राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार, प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले, मा. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे व सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी तसेच सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी योजनेच्या अधिक गतिमान अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचा आढावा घेतला आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्राधान्याने अडचणी दूर करण्याची सूचना केली. 

सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील विलंबाबद्दल तक्रार केली जाते. तथापि, अचूक धोरण आणि निश्चित अंमलबजावणी असेल तर सरकारी योजनासुद्धा गतीने अंमलात आणली जाते याचे ही योजना उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

या योजनेच्या अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्याच्या आधारे सर्व कृषी फीडर चालविण्यात येणार आहेत. आतापर्यंत राज्यात १३५९ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामुळे २ लाख १४ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागला आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात १५,२८४ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे काम चालू आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. 

सध्या शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी दिवसा आणि रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरठा होतो. केवळ दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी या योजनेमुळे पूर्ण होणार आहे. सप्टेंबर २०२६ पर्यंत योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईल.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये या योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर अल्पावधीत सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी ४० हजार एकर जमीन उपलब्ध करणे, सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठीची टेंडर काढून खासगी विकासकांना कार्यादेश देणे, नव्याने निर्माण होणारी वीज कृषी पंपांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचविण्यासाठी वीज जाळे बळकट करणे अशी कामे गतीने सुरू आहेत. या योजनेत सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणार आहे व ग्रामीण क्षेत्रात ७०,००० रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये महावितरणला सरासरी तीन रुपये प्रती युनिट इतक्या किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कृषी पंपांना मोफत वीज देण्यासाठी राज्य सरकारकडून द्याव्या लागणाऱ्या अनुदानात मोठी कपात होईल. तसेच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा हटविणे शक्य होणार आहे. एकूणच कृषी आणि उद्योग क्षेत्रांसाठी ही गेमचेंजर योजना आहे. 

केंद्र सरकारने या योजनेची प्रशंसा केली असून अन्य राज्यांना तिचे अनुकरण करण्याची सूचना केली आहे. या योजनेसाठी महावितरणला इंडियन स्मार्ट ग्रीड फोरमचा राष्ट्रीय पुरस्कार, स्कोच ॲवॉर्ड असे राष्ट्रीय स्तरावरील सुमारे २० पुरस्कार मिळाले आहेत.

महावितरणचा लकी डिजिटल पहिला ड्रॉ जाहीर २३० वीजग्राहकांना स्मार्ट फोन, स्मार्टवॉच मिळणार

मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते बक्षिसांचे प्रातिनिधिक वितरण

पुणे, दि. २५ एप्रिल २०२५सलग तीन किंवा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरु केली आहे. यात पहिल्या ड्रॉमध्ये पुणे परिमंडलातील २३० वीजग्राहकांना बक्षिसे जाहीर झाली आहे. गुरुवारी (दि. २५) मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ वीजग्राहकांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

‘लकी डिजिटल ग्राहक योजने’त प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे असून एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. प्रत्येक उपविभागासाठी प्रथम – एक स्मार्ट फोन, द्वितीय – दोन स्मार्ट फोन आणि तृतीय बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे परिमंडलातील ४६ उपविभागांसाठी एकूण २३० बक्षिसांसाठी पहिला लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ एप्रिलला काढण्यात आला. या योजनेतील प्रातिनिधिक विजेते अनिल माने, मारूती मगर, छगनलाल सोळंकी, विद्या देशपांडे, एनरीच एनर्जी लिमिटेड यांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच बक्षिसांचे वितरण करण्यात आले. उर्वरित विजेत्यांना विभाग व उपविभागस्तरावर बक्षिस वितरीत करण्यात येत आहे.

ग्राहकांना येत्या दि. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची १० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.

या योजनेत यापुढे मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाईटवर जाहीर होईल. तसेच संबंधित विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बक्षिस जिंकल्याची माहिती देण्यात येईल. किंवा विजेते ग्राहक देखील तीन दिवसांच्या आत जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट अधिक माहिती उपलब्ध आहे.

पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल,दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे-PM मोदी

मधुबनी-
पहलगाम हल्ल्यानंतर गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पहलगामच्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल.’दहशतवादी हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जीवनसाथी गमावला.’ त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड, काही गुजराती, तर काही बिहारचे होते. आज, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल जगाला संदेश देण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावरून इंग्रजीत म्हटले, ‘आम्ही त्यांना पृथ्वीच्या शेवटच्या कोपऱ्यात हाकलून लावू.’ दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा होईल.‘न्याय सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’ या संकल्पात संपूर्ण देश एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या जनतेचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी ज्या प्रकारे निष्पाप लोकांना मारण्यात आले. संपूर्ण देश यामुळे त्रस्त आहे. त्यांच्या दुःखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.’सध्या उपचार घेत असलेले लोक लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.’ मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हल्लेखोरांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना तुम्ही कल्पना करू शकत नाही त्यापेक्षाही वाईट शिक्षा मिळेल.

पंचायती राज कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी मंचावरून मृतांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘माझे भाषण सुरू करण्यापूर्वी, मी तुम्हा सर्वांना एक प्रार्थना करू इच्छितो.’तुम्ही कुठेही असलात तरी, तुमच्या जागी बसून, २२ तारखेला गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांची आठवण आपण करू शकतो. आपण त्याला श्रद्धांजली अर्पण करू. यानंतर मी माझे भाषण सुरू करेन.

पंचायती राज कार्यक्रमात सहभागी झालेले पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज, पंचायती राज दिनानिमित्त, संपूर्ण देश मिथिलाशी, बिहारशी जोडलेला आहे. आज, देशातील बिहारच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन येथे करण्यात आले.आज राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर सिंह यांचीही पुण्यतिथी आहे.’ मी त्यांना सलाम करतो. बिहार ही ती भूमी आहे जिथून बापूंनी त्यांचा सत्याग्रह सुरू केला होता. त्यांचे विचार असे होते की जोपर्यंत खेड्यांचा विकास होत नाही तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही.’अलिकडच्या काळात, पंचायतींना बळकटी देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. २ लाखांहून अधिक पंचायती इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. गावांमध्ये ५.५ लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे बांधण्यात आली. यामुळे, आता अनेक कागदपत्रे सहज उपलब्ध आहेत.

ग्रामपंचायतींमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे जमिनीचा वाद. यावर उपाय म्हणून, जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन केले जात आहे. बिहार हे देशातील पहिले राज्य होते जिथे महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले.मी नितीशजींचे अभिनंदन करतो. आज दलित, मागास आणि अत्यंत मागासलेल्या समाजातील मुली मोठ्या संख्येने सेवा देत आहेत. लोकशाहीतील हा सर्वात मोठा सहभाग आहे.

सुरत आयएनएस युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी:भारतीयांना पाकिस्तानला न जाण्याचे निर्देश;रशियन मीडियाचा दावा- काहीतरी मोठे होणार आहे

भारताने पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा सेवा स्थगित केली:भारतीयांना पाकिस्तानला न जाण्याचे निर्देश; रशियन मीडियाचा दावा- काहीतरी मोठे होणार आहेपहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित केल्या.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांनी भारत सोडावा. ज्यांना वैद्यकीय व्हिसा मिळाला आहे त्यांना २९ एप्रिल २०२५ पर्यंत भारत सोडावा लागेल.

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांनाही पाकिस्तानचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

गुरुवारी दुपारी आयएनएस सुरत युद्धनौकेवरून भारताने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. चाचणी यशस्वी झाली. जमिनीवरून समुद्रात हल्ला करण्याची चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

यापूर्वी, भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने, पाकिस्तानने २४-२५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्यावरील त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची अधिसूचना जारी केली होती.

पाकिस्तानी हवाई दलाने संपूर्ण रात्र भीतीच्या सावटाखाली घालवली. कराची एअरबेसवरून भारताच्या सीमेवरील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर १८ लढाऊ विमाने पाठवण्यात आली आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी घटनेवर सरकारने संसद भवनात सायंकाळी ६ वाजता सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. राहुल गांधीही यात सामील होतील.
रशिया टुडे या रशियन माध्यमाने दावा केला आहे की सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठे करणार आहे.
भारत सरकारने अटारी सीमा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर, व्हिसावर भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील अटारी चेकपोस्टवरून परत जात आहेत.
केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारच्या एक्स हँडलवर भारतात बंदी घातली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांना जम्मू आणि काश्मीरला न जाण्याचा सल्ला देणारा एक सल्लागार जारी केला आहे.
पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीनगरमधील दुकानदारांनी काळे झेंडे दाखवले आहेत.

पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक संपली
पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक संपली आहे. तथापि, या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दोन तास चाललेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ होते. या बैठकीला लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासह अनेक उच्च अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. काल रात्री भारतात झालेल्या सीसीएस बैठकीनंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.

पर्यटकांच्या रक्षणासाठी आतंकवाद्यांना विरोध करता करता मरण पावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह ला सरकारने मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करावे- संजय सोनवणी

0

पुणे-पर्यटकांच्या रक्षणासाठी आतंकवाद्यांना विरोध करता करता मरण पावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह ला सरकारने मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी केली आहे. त्यांनी या सय्यद हुसेन शह च्या कामाबाबत जागरण , ANI आणि विविध हिंदी दैनिकांनी घेतलेली दखल सरकारने लक्षात घ्यावी असेही म्हटले आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेला एका मुस्लिम तरुणाची स्टोरी माध्यमे आणि सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. तो तेथील स्थानिक घोडेस्वार सय्यद आदिल हुसेन शाह या नावाचा युवक आहे. (Syed adil Hussain Shah) ज्याला पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद आदिल हुसेन शाहला जीव गमवावा लागला आहे. तो दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती समोर आली आहे.

त्याने निर्दोष पर्यटकांना मारु नये अशी विनंती दहशतवाद्यांना केली तसेच पर्यटक हे काश्मिरी लोकांचे पाहुणे आहे, त्यांची सेवा करणे आमचे काम आहे आणि कामाचे दुसरे नाव जिंदगी आहे , त्यांना मारु नका असं देखील तो म्हणत होता.सय्यद आदिल हुसेन शाह घोडेस्वार होता आणि तो त्याच्या कुटुंबात एकमेव कमावणारा होता. सय्यद आदिल हुसेन शाह याच्या मृत्यूनंतर माध्यमांशी बोलताना त्याची आई भडभडून रडत होती . सय्यद आदिल हुसेन शाहच्या आईने सांगितले की, आदिल कुटुंबातील एकमेव कमावणारा पुरुष होता. तो आमचा एकमेव आधार होता. तो घोडेस्वारी करून कुटुंबाचा खर्च चालवत होता. आता आम्हाला दुसरा कोणी नाही. असं रडक्या आवाजात आदिलच्या आईने माध्यमांना सांगितले.दैनिक जागरणने काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, सय्यद आदिल हुसेन शाह पर्यटकांना फिरायला घेऊन घोड्यावरून बैसरनला गेला होता मात्र जेव्हा हल्ला सुरु झाला तेव्हा त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हे काश्मीरचे पाहुणे आहेत. निर्दोष आहे. त्यांना मारू नका.अशी विनंती आदिल दहशतवाद्यांना करत होता. त्यानंतर त्यांने दहशतवाद्यांची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावरच गोळीबार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला.

माँसाहेब, शिवराय आणि शंभूराजांच्या जयघोषात बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात

पुणे : ‌‘जय जिजाऊ‌’, ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’, ‌‘छत्रपती संभाजी महाराज की जय‌’ अशा घोषणा देत आणि रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून बालकुमार चित्रपट महोत्सवाचा आज (दि.24) शुभारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‌‘शिवरायांचा छावा‌’ या चित्रपटाद्वारे मुलांनी वीरश्रीची अनुभूती घेतली.
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 24 ते बुधवार, दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट गृहात बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी प्रतिथयश युवा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर, प्रकाश चाफळकर, कावरे आईस्क्रीमचे राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर, प्रसाद मिरासदार यांची उपस्थिती होती. या महोत्सवात लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेले पाच चित्रपट दाखविण्यात येत असल्याने त्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष आहे.

भविष्यात नवीन दिग्पाल दिसेल..
उद्घाटनप्रसंगी चित्रपट महोत्सवाच्या आठवणी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, लहानपणापासून मी हा बालचित्रपट महोत्सव अनुभवला आहे. सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करणे कठीण आहे. परंतु आम्हा बालगोपाळांना या चित्रपट महोत्सवातून उत्तमोत्तम चित्रपट दरवर्षी पहायला मिळत गेले आणि त्यातूचन माझ्यातील कलावंत-दिग्दर्शक घडला. हा महोत्सव वर्षांनुवर्षे अखंडितपणे बालकुमारांना आनंद देईल आणि यातूनच नवीन दिग्पाल उदयास आलेला दिसेल.

प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, बालगोपाळांसाठी त्यांच्या वयाला रुचतील असे चित्रपट दर्शविण्याचे काम कावरे आईस्क्रीम आणि कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या वर्षी चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच एकाच दिग्दर्शकाचे पाच चित्रपट दाखविण्यात येत आहे याचा आनंद आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वैभवशाली इतिहास मुलांना कळावा या हेतूने ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात येत आहेत.

सुरुवातीस विद्या भोपे हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती विशद केली. मान्यवरांचे स्वागत राजूशेठ कावरे आणि सुनील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

समारोपाला ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती..
शुक्रवार, दि. 25 रोजी ‌‘पावनखिंड‌’, शनिवार, दि. 26 रोजी ‌‘फर्जंद‌’, रविवार, दि. 27 रोजी ‌‘फत्तेशिकस्त‌’, सोमवार, दि. 28 रोजी ‌‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज‌’, मंगळवार, दि. 29 रोजी ‌‘तेंडल्या‌’, बुधवार, दि. 30 रोजी ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ हे चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत. समारोप समारंभास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक प्रवीण बढेकर, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर तसेच ‌‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई‌’ या चित्रपटातील कलावंतांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पाकचे २ तुकडे होण्याची शक्यता:ज्योतिर्विद सिद्धेश्वर मारटकर यांचा अंदाज

जुलै पर्यंत अतिरेकी कारवायांचा धोका

पुणे :’पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईला  प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून मोठी कारवाई पाकिस्तानवर तसेच अतिरेक्यांच्या  ठिकाणावर करण्याची शक्यता असून पाकिस्तानचे २ तुकडे होण्याची शक्यता वाटते’, असे पुण्यातील ज्येष्ठ ज्योतिर्विद व ‘ज्योतिषज्ञान’ मासिकाचे संपादक सिध्देश्वर मारटकर  यांनी सांगितले

‘एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ मध्ये मंगळ-प्लूटो प्रतियोगामुळे देशावर आपत्ती,अतिरेकी कारवाया होण्याच्या शक्यता असल्याचे भाकीत मागील वर्षी २०२४ च्या दिवाळी अंकात केले होते’,असा दावा पुण्यातील ज्येष्ठ ज्योतिर्विद व ‘ज्योतिषज्ञान’ मासिकाचे संपादक सिध्देश्वर मारटकर यांनी केला आहे.अतिरेकीविरोधी कारवाईची तीव्रता ६ जून २०२५ पर्यंत राहील.जुलैपर्यंत अतिरेकी मारले जातील,असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे.सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ज्योतिषशास्त्रानुसार देशाची,प्रदेशाची कुंडली मांडून मारटकर यांनी हे भविष्य वर्तवले आहे.२०२४ च्या ‘ज्योतिष ज्ञान’ दिवाळी अंकात ते प्रसिद्ध झाले आहे. ‘पोलीस,मिलिटरीसाठी हा काळ प्रतिकूल ठरेल.गुन्हेगारी वाढीस लागेल.अतिरेकी कारवाया वाढतील.काश्मीर,उत्तर प्रदेश,दिल्ली याठिकाणी स्फोटक घटना संभवतात.शेजारील देशात अशांतता निदर्शनास येईल’,असे त्यांनी या अंकात लिहिले होते.

‘पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईला  प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून मोठी कारवाई पाकिस्तानवर तसेच अतिरेक्यांच्या  ठिकाणावर करण्याची शक्यता असून पाकिस्तानचे २ तुकडे होण्याची शक्यता वाटते’, असे मारटकर  यांनी सांगितले संक्रमण पोर्णिमा,अमावस्या,कुंडलीनुसार देशाचे भविष्य घातपात,दुर्घटना,युद्ध यांचा विचार करता येतो आणि अंदाज बांधता येतो.दर वर्षी दिवाळी अंकात हे भविष्य वर्तवले जाते.मारटकर हे सामाजिक,राजकीय परिस्थितीचे भाकीत वर्तवत असतात.त्यांची क्रिकेट  स्पर्धा,निवडणूक निकाल,दुर्घटना विषयक अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत.  

मृतदेह घरी येताच पत्नीला अश्रू अनावर,शरद पवारांनी केले गणबोटे- जगदाळे कुटंबाचे सांत्वन

संगीता गणबोटे यांनी सांगितला थरारक अनुभव….गणबोटे- जगदाळे यांच्यात गेल्या 25 वर्षांपासून मैत्री

पुणे- पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात दाखल झाले आहे. संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटून निघाले होते. मी काश्मीरला फिरायला जातोय, लवकर परत येईल, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र जगदाळे यांचा मृतदेह घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यांच्या पत्नी धाय मोकलून रडत होत्या.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कर्वे नगर येथे जगदाळे कुटुंबाला भेटण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शरद पवार यांच्यासमोर जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी ही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

काश्मीर मधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृतदेह सकाळी पुण्यात दाखल झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी नेण्यात आला. या वेळी घरातील सर्व नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. जगदाळे यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संताेष जगदाळे आणि काैस्तुभ गनबाेटे या दाेघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यासमाेर अतिरेक्यांनी गाेळ्या घालून ठार केले. या दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री हाेती आणि फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली हाेती. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मैत्रीचा करुण शेवटही एकत्रच झाला. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबाेटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे दुर्दैवी मृत्युमुखी पडले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाचे राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. गणबोटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत गणबोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांच्या समोर कौस्तुभ यांची पत्नी यांनी घडलेला सर्व थरारक अनुभव सांगितला.“तिथं एकही सुरक्षा रक्षक नव्हता. रक्तात पडलेली आमची माणसं होती. आम्ही कोणाला आवाज देणार तिथं? आम्ही खूपच घाबरलो होतो. ते बंदूक घेऊन आले आणि त्यांनी गोळ्या मारायला सुरुवात केली. त्यांनी काहीच बघितलं नाही. डोक्यात, डोळ्यात, छातीत गोळ्या मारल्या. ते सहा ते सात लोक होते आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी येऊन गोळ्या झाडल्या व निघून गेले,” काळजाचा थरकाप उडवणारा असा हा प्रसंग संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं शरद पवारांना सांगितला.

मुलगा पित्याचा मृतदेह आणण्यास गेला; घरात फक्त सून, नातू होते

गनबोटेंची पुण्यात फरसाणची १६ दुकाने आहेत. काेंढवा परिसरातील सुखसागरमधील साईनगर येथे दाेनमजली गनबाेटे फरसाणचा बाेर्ड येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. घराशेजारीच फरसाण बनवण्याचे युनिट आहे. ताजे फरसाण मिळण्याचे ठिकाण म्हणून इथे गर्दी असते. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गनबाेटे फरसाणची तब्बल १६ दुकाने असल्याने व्यवसाय एकदम व्यवस्थितरीत्या सुरू हाेता. मात्र, बुधवारी या ठिकाणी फरसाण कारखान्यातील कामगार घरातील मदतीसाठी झटत हाेते, तर काैस्तुभ गनबाेटेंचा मुलगा कुणाल सकाळच्या विमानाने श्रीनगरला रवाना झाल्याने घरी केवळ सून व नातू हाेते. लाडक्या नातवाचे बारसे मित्राला धूमधडाक्यात करण्याची इच्छा हाेती. परंतु त्यापूर्वीच देवाने त्याला हिरावून नेल्याचे सांगत गनबाेटेंचे मित्र प्रवीण कुलकर्णी म्हणाले, तो मलाही सहलीला साेबत चल म्हणाला हाेता, परंतु मी यापूर्वी काश्मीरला जाऊन आलाे असल्याने त्यास नकार दिला हाेता. आज मी बचावलाे आहे. मात्र, माझ्या मित्राच्या कुटुंबावर आज दु:खाचा डाेंगर काेसळल्याचे ते म्हणाले.

#pahalgamterrorattack#jammukashmirattack#kaustubhganbote

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव पहाटे सव्वाचार वाजता पुण्यात …

पुणे:पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव आज पहाटे विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी केंद्रीय मंत्री, मुरलीधर मोहोळ राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे, कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बाप्पू पठारे आणि प्रशासकीय अधिकारी समवेत होते.

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी वाहतूक मार्ग होणे गरजेचे

आमदार बापूसाहेब पठारे यांची महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पर्यायी मार्गांची पाहणी

पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा तसेच इतर वाहतूक संदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पर्यायी रस्त्यांची पाहणी केली. यात प्रामुख्याने, नदीपात्रालगतचा खराडी-शिवणे रस्ता, ५०९ चौक ते धानोरी जुना जकात नाका तसेच विमानतळ ते रामवाडी यांचा समावेश होता.महानगरपालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता संजय धारव, राजेश भुतकर, अजित सुर्वे, मकरंद वाडेकर आदि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सद्यस्थितीनुसार वाहतूकीचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचा विचार करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. पुणे-नगर रस्त्याची वाहतूक कोंडी मार्गी लावण्यासाठी नदीपात्रालगतचा खराडी-शिवणे रस्ता महत्त्वाचा मानला लागतो. जो की भूसंपादनामुळे रखडला आहे. तसेच, पुणे विमानतळाचा रन-वे वाढवल्यामुळे ५०९ चौक ते लोहगाव हा एअर फोर्स हद्दीतील रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. पर्यायी मार्ग म्हणून ५०९ चौक ते धानोरी जुना जकात नाका तसेच विमानतळ ते रामवाडी हे रस्ते होणे क्रमप्राप्त आहे.

पाहणीदरम्यान, सदर रस्ते येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले आहे. पठारे यांनी अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खराडी-शिवणे रस्त्याच्या भूसंपादनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यावर प्रशासकीय मार्गाने तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.


लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना सहन करावा लागणारा वाहतुकीचा गंभीर प्रश्न सोडवण्याकरिता सातत्याने विविध मध्यमातून व विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिक बांधव यातून सुटकेचा नि:श्वास घेतील, ही खात्री आहे.

बापूसाहेब पठारे (आमदार, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ)

दहशतवादा विरोधात “तेरी जान,मेरी जान, हिंदुस्थान”चा नारा देत काश्मीरी सारे रस्त्यावर…

Pahalgam Terror Attack:

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उमटत आहेत. काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले. खुद्द काश्मीर मध्येही लोक दहशतवाद विरोधात रस्त्यावर आले आहेत. आणि हिंदू मुस्लिम यांच्यात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काश्मिरी लोक करू लागले आहेत.

अनेक ठिकाणी केंडल मार्च निघत असून, मिडिया ने हिंदू मुस्लीम यात दुराव्याचे वातावरण होईल असे वृत्त देऊ नये असे येथील लोक सांगत आहेत.

या शिवाय गेल्या 3 वर्षात पर्यटन स्थळावरील सिक्युरिटी हटविल्याचे सांगण्यात येते.पूर्वी पहलगाम,गुलमर्ग , सोनमर्ग या स्थळी मोठी सिक्युरिटी असत ती रहिली नव्हती.


दरम्यान या भ्याड हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. हा हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोन जण पाकिस्तानी असल्याचे समजले असून बाकीचे दोघे स्थानिक असल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी या दहशतवाद्यांनी माहिती देणाऱ्यांसाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे.


दहशतवाद्यांची माहिती द्या, बक्षीस मिळवा.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांनी मोठी घोषणा केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सुरक्षा दलांना आणि संस्थांना दहशतवाद्यांची ओळख, त्यांचा ठावठिकाणा किंवा इतर कोणतीही विश्वसनीय माहिती देणाऱ्या लोकांना हे बक्षीस दिले जाणार आहे. हल्ल्याचा तपास जलदगतीने करणे आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे या उद्देशाने काश्मीर पोलिसांनी हे पाऊल उचलण्यात आले
पहलगाममधील बैसरन येथे एकूण चार दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर आणखी तीन दहशतवादी हे त्यांच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघेजण पश्तून भाषेत बोलत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी सुमारे १५ ते २० मिनिटे एके-४७ च्या माध्यमातून गोळीबार करत पर्यटकांना टिपून टिपून लक्ष्य केल्याचंही समोर आले आहे.

पहलगाम हल्ला, पाक संरक्षणमंत्री म्हणाले,आमचा संबंध नाही, लष्कर-ए-तैयबाच्या सैफुल्लानेही केला इन्कार

पहलागमजवळ दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केलं.तसंच,भारतच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा आरोप त्यांनी भारतवार केला. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.एवढेच काय तर लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याने ही या हल्ल्यात आपला संबंध विनाकारण जोडत असल्याचा दावा केला आहे.त्याचा व्हिडिओ रात्री उशिरा त्यागी यांच्या x अकाऊंट वर पोस्ट करण्यात आला आहे, या व्हिडीओमध्ये सैफुल्ला याने भारताने हा ड्रामा रचल्याचा उलटा आरोप केला.

सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी असलेले संरक्षण मंत्री आसिफ यांनी हल्ल्याची जबाबदारी फेटाळून लावताना या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे.

Pahalgam Terror Attack Updates

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “पाकिस्तानचा या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही. (भारतातील) देशातील लोकांचाच यात समावेश आहे. भारतातील अनेक राज्यांत सरकारविरोधात रोष आहे. तिथे नागालँडपासून काश्मीर आणि साऊथमध्ये छत्तीसगड, मणिपूरमध्ये लोक सरकारविरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या हक्कांवर गदा आणत आहे. त्यांचं शोषण करत आहे. अल्पसंख्यांकांचं शोषण होत आहे. याविरोधात लोक उभे राहिले आहेत. आमचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही दहशतवादी कृत्यांचं समर्थन करत नाही. कोणत्याही स्थानिक संघर्षात निष्पाप लोकांना लक्ष्य करू नये”, असं ते म्हणाले. ते लाईव्ह ९२ चॅनेलशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “आपल्या राष्ट्रीय धोरणात सामान्य लोकांना लक्ष्य करण्याची परवानगी नाही यात शंका नाही, परंतु जर लष्कर किंवा पोलिस भारतात सामान्य माणशांवर शस्त्रे उचलत असतील तर पाकिस्तानला दोष देणे सोपे आहे.”
“आमच्याकडे जवळजवळ दररोज असे पुरावे गोळा होतात जे आम्ही दिले आहेत. एकदा नाही तर अनेक वेळा दिलेत की भारत बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या इतर भागात अशांततेला प्रोत्साहन देत आहे. ते अफगाणिस्तानात किंवा इतर कुठूनही पाकिस्तानात अशांतता पसरवत आहे, याचा मोठा इतिहास आहे”, असंही ते म्हणाले. दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.