दूध उत्पादकांसाठी मोफत चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन व प्रकल्प भेटीचे आयोजन
पाणी कपातीचं भुत खोटं हि राजकीय स्टंटबाजी -सभागृहनेता भिमाले (व्हिडीओ)
पुणे- पाणी कपात बिपात काही नाही अशी भूमिका घेत ,या संदर्भात विरोधी पक्ष करीत असलेली आंदोलने म्हणजे निव्वळ राजकीय स्टंटबाजी बाजी आहे असे स्पष्टीकरण आज महापालिकेतील सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी केलं .
आज पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करायची म्हणून खडकवासला धरणातून पुण्याला पाणी देणारे दोन पंप बंद करण्यात आल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे .
पुण्याचं पाणी- मंत्री शिवतारेंची गोची -म्हणाले ,१३५० पेक्षा जास्त पाणी पुण्यानं घेऊ नयेच (व्हिडीओ)
पुणे : कालवा समितीच्या बैठकीत पालिकेस 1150 एमएलडी पाणी मंजूर झाले असतानाही पालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाकडून आज पालिकेस दिले जाणारे पाणी कमी करण्यासाठी 2 पंप बंद करण्यात आल्याच्या बातमीने गदारोळ उठविला आणि याचवेळी महापालिकेत आलेल्या जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घ्यावी कि घेवू नये ? या पेचात न पडता पत्रकार परिषद घेतली .
काय म्हणाले ,मंत्री शिवतारे
1)आज सर्व अधिकारी कालवा फुटी प्रकरणी हायकोर्टात ,तिथे त्यांना फोन घेता येत नाही ,पण मी अशाप्रकारे पुण्याच पाणी कमी केलंय काय याची माहिती घेतो .
2)पुण्याने १३५० एमएल डी पर डे पेक्षा जास्त पाणी कुठल्याही परिस्थितीत उचलू नये .
3)खरे तर पुण्याला ४० लाख लोकांना ८.2 टीएमसी एवढ्याच पाण्याची आवश्यक्यता आमी १३५० एम एलडी पर डे म्हणजे १४ ते साडे चौदा टीएमसी पाणी देतो ,मग १६५० टीएमसी पाणी हवंय कशाला ?
4)शिस्त हवीच ,नियम पाळायला हवेत ,आणि जागतिक धोराहून अधिक पाणी वापरता कामा नये .
5)खरे तर धरणे बांधली तेव्हा ,ती शेती साठी बांधली गेली ,आता लोकसंख्या वाढली तर लोकांना पाणी देणेही आवश्यक आहेच .
6)शिवसेना पाणीकपात करू नये म्हणून मोर्चे काढते आणि तुम्ही शिवसेनेचे मंत्री एकप्रकारे पुण्याची पाणी कपात मान्य करता हि दुटप्पी भूमिका नाही काय ? या प्रश्नावर म्हणाले , टीआरपी साठी प्रश्न नकोत ,मी पाणी कपातीचे समर्थन करत नाही .पण पाणी जपून वापरलेच पाहीजे.
रिटेलमधील परकीय गुंतवणुकीविरोधातील रथ यात्रेचे पुण्यात स्वागत
संपूर्ण क्रांती रथ यात्रेद्वारा देशभरातील रिटेल व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती
पुणे, दि. 10 : अमेझॉन, वॉलमार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या एफडीआयच्या माध्यमातून रिटेल व्यवसायात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे देशातील रिटेल व्यापारी उध्वस्त होणार आहे. याचा विरोध म्हणून काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट)च्या वतीने देशभर संपूर्ण क्रांती रथ यात्रा काढण्यात आली. हा यात्रा रथ पुण्यात दाखल झाला असून त्याचे स्वागत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले.
सिंहगड रस्त्यावरील परिणय मंगल कार्यालयात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि कैट यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांना रिटेल व्यवसायातील अडचणी व परकीय गुंतवणुकीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य संकटांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कैटचे प्रभारी वीरेंद्र सिंह वालीया, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, पश्चिम विभागीय प्रभारी अजित सेटिया, दिलीप कुंभोजकर, अमरसी कारीया, सुनिल गेहलोत, नवनाथ सोमसे, अजित चंगेडीया, सारंग राडकर, रामभाऊ दोडके, नितीन पंडित, उमेश यादव, भोनाराम चौधरी, कमलेश शहा, विनोद चौधरी, मिश्रीलाल चौधरी, ढगलाराम चौधरी, सोनुसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
वॉलमार्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या किरकोळ क्षेत्रात आल्यास भारतीय रिटेल व्यापारी धोक्यात येऊ शकतो. याविषयी किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी संपूर्ण क्रांती रथ यात्रा चे आयोजन केले आहे. ही यात्रा देशभरात २२ हजार किमी चा प्रवास करत २८ राज्ये १५० ते २०० शहरातून प्रवास करणार आहे. 15 डिसेंबर रोजी ही रथ यात्रा दिल्लीत दाखल होईल. 16 डिसेंबरला देशभरातील रिटेल व्यापारी दिल्लीत येणार असून परकीय गुंतवणुकीच्या विरोधात मोठा मोर्चा निघणार आहे, असे वीरेंद्रसिंह वालिया म्हणाले.
अमेझॉन, वॉलमार्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या रिटेल व्यापाऱ्यासमोर बलाढ्य शत्रू म्हणून उभ्या आहेत. या कंपन्या परदेशातून कमी टक्के व्याजाने भांडवल उभे करून भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. आम्हला शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. हे आमच्यावरील मोठे संकट आहे. या संकटाविरोधात आम्ही एकत्र येऊन समर्थपणे लढा उभारणार आहोत. येणाऱ्या दिवाळी सणाला ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आम्हाला योग्य दरात माल देणार नाहीत त्या कंपन्यांवर आम्ही बहिष्कार टाकण्यात येईल. स्वदेशी कंपन्यांना माल खरेदीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे सचिन निवंगुणे यांनी सांगितले.
स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइटसह ऑनलाईन अन्नपदार्थ पुरवणाऱ्या ११३ आस्थापनांना बजावल्या नोटीसा
मुंबई :-स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइट अशा ऑनलाईन अन्नपदार्थ ग्राहकांना पुरवण्याऱ्या ११३ आस्थापना या विनापरवाना सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली .
ई कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात आता अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या ऑनलाईन ऍप आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून अन्नपदार्थ पुरवण्याऱ्या कंपन्यांच्या आस्थापना विनापरवाना आणि अनारोग्य परिस्थितीत सुरू असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीतून समोर आली आहे. यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. बृहन्मुंबई विभागात केलेल्या या पाहणीत प्रशासनाने ११३ आस्थापना या विनापरवाना सुरू असल्याचे शोधून काढले आहे. अशा आस्थापनांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसात ऑनलाईन वस्तूंप्रमाणे ऑनलाईन अन्नपदार्थ ऑर्डर करून ते घरपोच मिळवण्याची सुविधा काही कंपन्यांनी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र अशा खाद्यपुरवणाऱ्या आस्थापनांमधून कोणत्या प्रकारे खाद्य निर्मिती केली जाते, त्यांसाठी विविध परवानगी घेतल्या गेल्या आहेत का अशा पद्धतीचा सखोल अभ्यास आणि तपासणी २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात बृहन्मुंबई विभागात करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या सूचनेनुसार व अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शखाली अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबत ही कारवाई केली. या मोहिमेत २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीच एकूण ३४७ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात ११३ आस्थापना अन्न सुरक्षा माणद कायद्यांअंतर्गत परवाना आणि नोंदणी नसताना सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइट अशा ऑनलाईन ऍपद्वारे आणि साईटद्वारे ग्राहकांना अन्नपदार्थ पुरवण्याऱ्या कंपन्यांचाशी संबंधित आस्थापनांचा समावेश आहे. या मोहिमेत या कंपन्या विनापरवाना आणि अनारोग्य वातावरणात सुरू असल्याचे समोर आल्याने त्यांना स्टॉप बिझनेस नोटीस देण्यात आली आहे. यात ८५ आस्थापना या स्विगी, ५० आस्थापना झोमॅटो, ३ आस्थापना फुडपांडा आणि २ आस्थापना या उबरइट या ऑनलाईन ऍपधारक संलग्न आहेत.
त्यामुळे अशा आस्थापनांवर अन्न सुरक्षा माणदे कायदा अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली असून त्यांच्या उत्तरानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) भारतातील पहिल्या यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून नियुक्ती
पुणे-‘किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) भारतातील शाश्वत विकास ध्येये (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स – एसडीजी) कार्यक्रमाच्या पहिल्या ‘यंग बिझनेस चॅम्पियन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाला भारतात चालना देण्याची जबाबदारी मानसी किर्लोस्कर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
उदयोन्मुख तरुण व्यवसाय नेतृत्व असलेल्या मानसी किर्लोस्कर यांच्याकडे शाश्वत विकास ध्येयधोरणांवरील संवादाचा आणि व्यवसाय जबाबदाऱ्यांचा आपल्या सहकाऱ्यांमध्ये विस्तार करण्याची, तसेच या कामी इतर तरुण उद्योजकांना स्वयंसक्रिय बनवण्यासाठी प्रेरणा देण्याची अद्वितीय क्षमता आहे. याखेरीज विकासात उद्योगाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करुन संयुक्त राष्ट्रांसमवेत हवामान बदल, प्लास्टिकमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण या विषयांवरही त्या काम करणार आहेत. ‘यूएन-इंडिया बिझनेस फोरम’च्या (यूएनआयबीएफ) उद्दिष्ट्यांना चालना देण्यातही त्या महत्त्वाची भूमिका बजावतील.
संयुक्त राष्ट्रांसोबत त्यांची पहिली यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी स्फूर्तिदायक बहुमान असल्याची भावना व्यक्त करुन मानसी म्हणाल्या, “शाश्वत विकास ध्येधोरणे (एसडीजी) हा कार्यक्रम उद्योगांना भारताच्या भावी विकासात सहभागी होण्याची अनोखी संधी आहे. शाश्वत विकासाला गती देण्याचे सुप्त सामर्थ्य उद्योगांमध्ये आहे. माझ्या कामातून मी नवउद्योगांतील नोकरदार अथवा मालक अशा सर्व तरुण नेतृत्वांमध्ये हाच संदेश पोचवणार आहे.”
मानसी यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना भारतातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक युरी अफनासेव म्हणाले, “ही नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. शाश्वत विकास ध्येयांना चालना देण्यात एखादे तरुण व्यवसाय नेतृत्व किती समर्पित असू शकते, याचे मानसी उत्तम उदाहरण आहेत. पृथ्वी अधिकाधिक शाश्वत राहावी या उद्दिष्ट्यात उद्योगांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत आम्ही मानसी यांच्या मदतीने प्रबोधन घडवू.”
शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात विधीवत घटस्थापना
पुणे : शारदीय नवरात्री निमित्त शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष, नगरसेवक आबा बागुल आणि सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. श्री. होतीलाल शर्मागुरुजी आणि श्रीकांत रामचंद्र दंडवतेगुरुजी यांनी पौरोहित्य केले. सनई चौघडा वादनाचे मंगल स्वर आणि बँडवर वाजविलेली भक्ती गीते अशा वातावरणात हा सोहळा झाला. यावर्षी देवीसाठी सोन्याचा मुकूट आणि सोन्याची साखळी बनविण्यात आली. बागुल यांच्या हस्ते आज हे दागिने देवीला अर्पण करण्यात आले. सकाळपासून भाविक दर्शनासाठी येत होते. नवरात्रीनिमित्त मंदिर आणि परिसराची नेत्रदीपक सजावट करण्यात आली आहे.
टेबल टेनिस स्पर्धेत मनुष शाह याला दुहेरी मुकुट ; मुलींच्या गटात प्राप्ती सेनला विजेतेपद
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
विजय फणशीकर आणि रमेश पतंगे यांना
लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई, दि. 10 : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा 2016 आणि 2017 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विकास वार्तांकनासाठी 2016 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. पुढारी, रत्नागिरीचे राजेश जोष्ठे यांना तर 2017 साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलावडे, दै. सकाळ, कोल्हापूरचे बातमीदार यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे. तर 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे इतर सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या विविध पुरस्कारांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ते पुरस्कार खालीलप्रमाणे
वर्ष-2016 –
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) – महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी ऑब्झर्वर, नांदेड
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) – वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) कपिल श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव
छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) प्रज्ञेश कांबळी, छायाचित्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई – सकाळ, कोल्हापूर
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरूण भारत, सातारा.
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर- (51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक, दै. लोकमत, लातूर
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे
शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे
ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग – अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर
वर्ष-2017 –
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) -लुमाकांत नलावडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) – राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) – खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा. व ज.) (राज्यस्तर) डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी , नाशिक
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) – कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) – दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) – मनीष झिमटे, छायाचित्रकार, अमरावती
सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) – संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) – मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग – अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे – 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) – जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद
आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग – जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई
नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर
शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी
ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स ,गोंदिया
2016 व 2017 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत 2016 साठी पत्रकार राजीव कुलकर्णी, प्रवीण मुळ्ये, पांडुरंग मस्के, राजकुमार सिंग, निलेश खरे, रमाकांत दाणी, राहुल पांडे, बबन वाळके, नितीन तोटेवार यांचा तर 2017 च्या निवड समितीत पत्रकार विजय सिंह, क्लॅरा लुईस, सिद्धेश्वर डुकरे, उमेश कुमावत, भालचंद्र पिंपळवाडकर, शैलेंद्र तनपुरे, सत्यजित जोशी, विलास तोकले, कृष्णा शेवडीकर यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी केली ‘सॅटेलाईट’ची निर्मिती
नृत्यनाट्य अविष्कार कार्यक्रमात उलगडणार ज्ञानदेवांचे अभंग आणि जीवनपट
मीनल कुलकर्णी या सृजन नृत्यालयाच्या संस्थपाक- अध्यक्ष आहेत. त्यांनी गुरु स्वाती दैठणकर यांच्या कडून शिक्षण घेऊन ‘भरतनाट्यम अलंकार’ पदवी प्राप्त केली आहे.
” सायकल चालवा इंधन वाचवा ” सायकल रॅली
पुणे-पूना कछि जैन युवा मंडळाच्यावतीने ” सायकल चालवा इंधन वाचवा ” हा सामाजिक संदेश समाजात पोहचविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजित करण्यात आली होती . रेसकोर्सजवळील एम्प्रेस गार्डन येथील या सायकल फेरीस नगरसेवक प्रशांत जगताप यांच्याहस्ते ध्वज उंचावून या सायकल रॅलीस सुरुवात करण्यात आली . या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने श्री पूना कछि जैन युवा मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते . यावेळी श्री पूना कछि जैन युवा मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश फुरीया , उपाध्यक्ष सोनल देढिया , सचिव हिरेन गाला , सहसचिव पियुष घंगर , निलेश देढिया , किरण गाला , धीरज गाला , हिरेन गादा , किंजल गाला , पथिक शाह आदी मान्यवर उपस्थित होते .
हि सायकल रॅली एम्प्रेस गार्डन येथून सुरुवात होऊन माणकेशा रोड , कौन्सिल हॉल चौक , पूना क्लब , तारापोर रोड , कोयाजी रोड , बिशप शाळा रोड , पुणे सोलापूर महामार्ग यामार्गे काढून एम्प्रेस गार्डन येथे समाप्त करण्यात आली .
या सायकल रॅलीमध्ये इंधन वाचवा सायकल चालवा या विषयावर समाज जनजागृतीपर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली . यामध्ये सायकल चालवा , पृथ्वी वाचवा , सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे , प्रदुर्षण थांबवा , सायकल चालवा , कार चालवून लठ्ठ होण्यापेक्षा सायकल चालवून तंदुरुस्त रहा अशा घोषवाक्य स्पर्धाचे फलक सायकलचालकांनी लावले होते . यावेळी उत्कृष्ट घोषवाक्य तयार करणाऱ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले . सर्वाना अल्पोपहार देण्यात आला .
सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. पाटील यांच्या हस्ते व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचा सत्कार
पुणे – व्यंगचित्र क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून व्यंगचित्रकार व पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
दिवा प्रतिष्ठान आणि कराडवैभव चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील दिवाळी अंकांच्या संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन व स्व. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील कराड येथे संपन्न झाला.
दिवाळी अंक हे मराठी भाषेचे अनोखे वैशिष्ट्य असून या अंकांचे महत्त्व आणि गोडी कायम राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. यावेळी आमदार आनंदराव पाटील, दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाध्ये, चंद्रकांत शेवाळे, अॅड. धनंजय सिंहासने, शिवाजी धुरी, दीपक अरबुणे हे उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी दिवाळी अंकांचे महत्त्व विशद करतांना सांगितले की, मराठी ही एकमेव अशी भाषा आहे की ज्या भाषेचे साहित्य संमेलन होते, नाट्य संमेलन होते, काव्य संमेलन होते. एखाद्या सणानिमित्त विशेष अंक प्रकाशित करण्याची शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा मराठी भाषेत आहे. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आक्रमणातही दिवाळी अंकांचे महत्त्व आणि गोडी अबाधित राहिली पाहिजे, यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जावेत. दिवाळी अंक वाचकांची सेवा करण्याचे काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिवाळी अंकांमध्ये समाजाचे मन दिसते, असे नमूद करुन डॉ. पाटील यांनी जाहिरात ही एक कला असून ती मिळवणे हे कौशल्यपूर्ण काम असल्याचे सांगितले.
डॉ. पाटील यांच्या हस्ते धुंडीराज जोशी, मेधा जोग, विष्णू शेटकर या वाचकांचा तसेच सुनील गायकवाड, प्रभाकर दिघेवार यांचा दिवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राजाभाऊ देशपांडे, आण्णासाहेब जाधव, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात, अरुण सावळेकर, श्रीकांत हिडकल, उदय किरपेकर, डॉ. योगेश कुमार, मीनल ढापरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन प्राचार्य गणपतराव कणसे यांनी केले. कार्यक्रमास ज्ञानेश्वर जराड, महेंद्र देशपांडे, भारतभूषण पाटकर, विवेक मेहेत्रे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, शारदा धुळप, सन्ना मोरे, विजय सामंत, उल्हास पाटकर, मारुती विश्वासराव, राजेंद्र गोसावी, दगडू चौधरी, गौरव कुलकर्णी, शिवाजीराव यादव, शहाजीराव जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दुपारच्या सत्रात ‘दिवाळी अंक काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, महेंद्र देशपांडे, डॉ. बसवेश्वर चेणगे, विनायकराव जाधव, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, महादेव साने यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




