Home Blog Page 1558

आयझॅक ल्‍यूक्‍सकडून पुण्‍यामध्‍ये लीवो सलोनचे उद्घाटन

लीवोने पुण्‍यामध्‍ये नवीन स्किन अॅण्‍ड अॅण्‍टी-एजिंग सेंटरचे उद्घाटन करण्‍यासाठी आयझॅक ल्‍यूक्‍ससोबत सहयोग केलाब्रॅण्‍ड क्‍लायण्‍ट्सना उच्‍च दर्जाची सेवा व निष्‍पत्ती देण्‍याप्रती त्‍याच्‍या कटिबद्धतेसाठी ओळखला जातो. नवीन सेंटरच्‍या उद्घाटनासह ते त्‍यांच्‍या क्‍लायण्‍ट्सना अद्वितीय व लक्‍झरीअस अनुभव देत राहतील.

पुणेकोरेगाव पार्कपुणे येथील प्रीमियर लक्‍झरी स्‍पा लीवो सलोनला प्रतिष्ठित स्किनकेअर व अॅण्टी-एजिंग ब्रॅण्‍ड आयझॅक ल्‍यूक्‍ससोबत सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. सहयोगाने आम्‍ही लीवो सलोनच्‍या परिसरात नवीन आयझॅक स्किन अॅण्‍ड अॅण्‍टी-एजिंग सेंटरचे उद्घाटन करत आहोतजे क्‍लायण्‍ट्सना सौंदर्याप्रती सर्वसमावेशक तृतीय श्रेणीचा दृष्टिकोन देत आहेते दीर्घकालीन निष्‍पत्ती व एकूण स्‍वास्‍थ्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासह उपचारप्रतिबंध व देखभाल यावर भर देतात.

नवीन सेंटरमध्‍ये दोन विश्‍वांच्‍या सर्वोत्तम गोष्‍टींचा समावेश आहे – आयझॅक ल्‍यूक्‍सची अपवादात्‍मक सेवा आणि लीवो सलोनची लक्‍झरीअस सेटिंग. हे सेंटर सिग्‍नेचर फेशियल्‍सप्रगत स्किन रिज्‍यूवेनेशन ट्रीटमेंट्सलेझर हेअर रिमूव्‍हलस्लिमिंग ट्रीटमेंट्स अशा अनेक सेवा देईल. आयझॅक ल्‍यूक्‍सची अनुभवी व पात्र एस्‍थेटिशियन्‍स व टेक्निशियन्‍सची टीम अद्वितीय निष्‍पत्ती देण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व टेक्निक्‍सचा वापर करेल. आयझॅक सोबतचा सहयोग त्‍यांच्‍या क्‍लायण्‍ट्सना त्‍यांच्‍या अपवादात्‍मक सेवेशी पूरक लक्‍झरीअस सेटिंग देईलज्‍यामधून क्‍लायण्‍ट्सना सर्वांगीण व संस्‍मरणीय अनुभवाची खात्री मिळेल. 

आयझॅक ल्‍यूक्‍स ही क्लिनिक्‍सची ब्‍युटी व एस्‍थेटिक्‍स साखळी आहेजिची भारतभरात उपस्थिती असण्‍यासोबत सेलिब्रिटी कॉस्‍मेटोलॉजिस्‍ट डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता यांनी स्‍थापना केली आहे. क्षेत्रात दशकाहून अधिक काळाचा अनुभव असलेल्‍या डॉ. गीतिका यांनी क्‍लायण्‍ट्सना अत्‍याधुनिक उपचार देण्‍यासह त्‍यांच्‍या सर्व डर्माटोलॉजी व केसासंबंधित गरजांकरिता सर्वसमावेशक व सर्वांगीण सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी आयझॅक ल्‍यूक्‍सची स्‍थापना केली. आयझॅक ल्‍यूक्‍सला सर्वोत्तम झी नॅशनल हेल्‍थकेअर लीडरशीप अवॉर्ड मिळाला आहे आणि आधुनिक विशेष तंत्रज्ञानाचा वापर करतेजे एफडीएद्वारे मान्‍यताकृत आहे.  

परिभाषित लक्‍झरीसाठी गंतव्‍य लीवो सलोनने २०२२ मध्‍ये स्‍थापनेपासून पुण्‍यात आपले नावलौकिक केले आहे. प्रणिता बावेजा यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत लीवो हे अद्वितीय लक्‍झरी स्‍पा व सलोन आहेजे सौंदर्यस्‍टाइल व आकर्षकतेच्‍या साराला परिभाषित करते. लीवो एकाच छताखाली आंतरराष्‍ट्रीय हेअर डिझाइनिंगसह मेक-अपनेल आर्टआय-लॅश एक्‍स्‍टेन्‍शन्‍समायक्रो-ब्‍लेडिंग आणि सेमी-परमनंट मेक-अप अशा इतर संबंधित सेवा देतेज्‍यांची उच्‍च प्रशिक्षितअनुभवी व समर्पित स्‍टायलिस्‍ट्सटेक्निशियन्‍स व थेरपीस्‍ट्सद्वारे हाताळणी केली जाते.

पुणेकरांना दिलेल्‍या वचनांचे पालन करत प्रणिता यांना लीवो सलोन व आयझॅक ल्‍यूक्‍स या दोन बाजारपेठ प्रमुखांच्‍या सहयोगाचा आनंद होत आहेया सहयोगाचा गाहक अनुभव वाढवण्‍याचा मनसुबा आहे. ‘‘लीवोमध्‍ये आम्‍ही विशिष्‍ट एलानसह रिफाइनमेंटरिस्‍टोरेशन व पोषणाचे वचन देतो. आमचा २०१३ पासून आयझॅक ल्‍यूक्‍ससोबत दीर्घकालीन संबंध आहे आणि पुण्‍यातील हे लाँच हा अनोखा सामंजस्‍य करार आहेज्‍याचा आम्‍हाला अत्‍यंत अभिमान आहे,’’ असे प्रणिता म्‍हणाल्‍या.

‘‘आयझॅक ल्‍यूक्‍सला क्‍लायण्‍टसना किमान किंवा विना डाऊनटाइमसह सर्वोत्तम कॉस्‍मेटिक व नॉन-इन्‍वेसिव्‍ह प्रक्रिया देण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्‍ज असण्‍याचा अभिमान आहे. आमचे लक्ष्‍य ग्राहक प्रामुख्‍याने व्‍यस्‍त महिला व पुरूष आहेतजे त्‍यांच्‍या गतीशील जीवनाशी सामावून जाणाऱ्या वैयक्तिकृतगुणकारी व सुरक्षित स्किनकेअर आणि हेअर सोल्यूशन्‍सना महत्त्व देतात,’’ असे डॉ. गीतिका म्‍हणाल्‍या. ‘‘आयझॅक ल्‍यूक्‍स वैयक्तिकृत केअरनवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञानदीर्घकालीन ब्‍युटी ट्रीटमेंट्स आणि आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना देत असलेला तणाव-मुक्‍त अनुभव यावर लक्ष केंद्रित करण्‍याच्‍या माध्‍यमातून प्रतिस्‍पर्धींपेक्षा वरचढ आहे,’’ असे त्‍या पुढे म्‍हणाल्‍या.

लीवो सलोनच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रणिता बावेजा

आंत्रेप्रीन्‍युअर ऑफ द इअर २०२२ प्रणिता बावेजा या हुशार उद्योजिकाकुशल प्रशासक आणि उद्योग व्‍यावसायिक आहेत. नवोदित उद्योजिका असलेल्या त्‍या ट्रॅव्‍हल सर्विसेस इंटरनॅशनलच्‍या सीओओ म्‍हणून त्‍यांच्‍या कौटुंबिक व्‍यवसायामध्‍ये सामील झाल्‍या आणि कंपनीच्‍या ऑफलाइन व्‍यवसायाला त्‍यांनी ऑनलाइन मॉडेलमध्‍ये बदलले. त्‍यांच्‍या अथक प्रयतनांमुळे कंपनीने भारतमध्‍य पूर्व व आग्‍नेय आशियामध्‍ये लक्षणीय विकास संपादित केला. प्रवास व्‍यवसायामध्‍ये व्‍यापक अनुभव प्राप्‍त करत त्‍यांनी सौंदर्य उद्योगामधील आपल्‍या क्षमता वाढवल्‍या. त्‍यांनी २०१९ मध्‍ये लीवो सलोनचा भार सांभाळण्‍यापासून त्‍याची लोकप्रियता व नफा वाढला आहेतसेच हा सलोन अग्रणी लक्‍झरी ब्रॅण्‍ड बनला आहे.  

आयझॅक ल्‍यूक्‍सच्‍या संस्‍थापक डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता

डॉ. गीतिका मित्तल गुप्‍ता या अनुभवी सेलिब्रिटी कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजिस्‍ट आणि दिल्‍ली-एनसीआरमधील कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजीच्‍या प्रवर्तकांपैकी एक आहेत. कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजीच्‍या क्षेत्रात १० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेल्‍या त्‍या २०१० मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेले प्रीमियम स्किन क्लिनिक आयझॅक ल्‍यूक्‍स – स्किन अॅण्‍ड अॅण्‍टी-एजिंग सेंटरच्‍या वैद्यकीय संचालक आहेत. हे सेंटर डर्माटोलॉजीअॅण्‍टी-एजिंगबॉडी शेपिंग व अॅण्‍टी-हेअर लॉसच्‍या क्षेत्रात सेवा देतेज्‍यामुळे हे उत्‍कृष्‍टतेचे कॉस्‍मेटोलॉजी सेंटर आहे.

आणि झर्ना धर, आयझॅक ल्‍यूक्‍सचे CEO, 20 वर्षांहून अधिक अनुभवासह, इंडस्ट्रीबद्दल भरपूर ज्ञानाचा खजिना टेबलवर आणतात आणि लोकांना त्यांचे सर्वोत्कृष्ट दिसण्यात आणि अनुभवण्यात मदत करण्याची आवड आहे. पुण्यातील त्यांचे नवीन क्लिनिक त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नावीन्य, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेची बांधिलकी दर्शवते.

एअर इंडिया आणि विस्ताराचा इंटरलाइन भागीदारीत प्रवेश

गुरुग्राम, ०३ मे २०२३: भारतातील अग्रगण्य एअरलाइन्सपैकी एक आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने पूर्ण-सेवा कॅरियर विस्तारा (टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा संयुक्त उपक्रम) सोबत इंटरलाइन भागीदारी केली आहे.

या भागीदारीमुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना विस्ताराच्या रूट नेटवर्कवर एअर इंडियाच्या विस्तृत देशांतर्गत आणि जागतिक नेटवर्कमध्ये ८० पेक्षा जास्त ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येणे शक्य आहे.

दोन एअरलाइन्समधील कराराच्या व्याप्तीमध्ये इंटर एअरलाइन थ्रू चेक-इन (आयएटीसीआय) अंमलबजावणीचा समावेश आहे. त्यामुळे अतिथींना एकाच तिकिटावर सर्व प्रवासी क्षेत्रांसाठी प्रस्थानाच्या पहिल्या टप्प्यावर त्यांचे बोर्डिंग पास मिळू शकतात आणि त्यांच्या प्रवासाच्या अंतिम स्थानापर्यंत त्यांच्या सामानाची तपासणी करता येते. एअर इंडिया आणि विस्तारा भारतातील बहुतांश प्रमुख विमानतळांवर एकाच टर्मिनलवर काम करतात. त्यामुळे इंटरलाइन प्रवास कार्यक्रमांसह पाहुण्यांसाठी प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव सुलभ होतो.

एअर इंडिया आणि विस्ताराने ‘इंटरलाइन कन्सिडरेशन्स ऑन इररेग्युलर ऑपरेशन्स (IROPS)’ किंवा ‘डिसरप्शन हस्तांतरण’ कार्यक्षमता देखील लागू केली आहे. यामुळे विमानाला उशीर होणे, रद्द होणे, दुसरीकडे वळवणे इ. यांसारख्या कार्यात्मक व्यत्ययांच्या बाबतीत दोन्ही विमानकंपन्या प्रवाशांना एकमेकांच्या पहिल्या उपलब्ध पर्यायी फ्लाइटमध्ये विनाअडथळा प्रवेश देऊ शकतात आणि त्यांच्या पाहुण्यांची होणारी गैरसोय कमी करू शकतात.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले: “आम्ही विस्तारासोबतच्या आमच्या इंटरलाइन भागीदारीबद्दल खूश आहोत. यामुळे आमच्या विस्तारित मार्ग नेटवर्कवर भारतात आणि भारता बाहेर प्रवास करणाऱ्या आमच्या संयुक्त ग्राहकांना अधिक कनेक्टिव्हिटी आणि सुविधा मिळेल. सुरक्षितता आणि ग्राहक सेवेतील उत्कृष्टता याबद्दल आमची समान वचनबद्धता या  भागीदारीमध्ये अग्रस्थानी आहे. आम्ही विस्ताराच्या ग्राहकांना अमेरिका, युरोप, अति पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वमधील एअर इंडियाच्या गंतव्यस्थानांवर अतिरिक्त प्रवास पर्यायांसह सेवा देण्यासाठी उत्सुक आहोत.”

विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कन्नन म्हणाले, “ही भागीदारी भारतातील दोन आघाडीच्या विमानकंपन्यांना आमच्या संयुक्त नेटवर्कवर प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक सुविधा आणि वर्धित कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एकत्र आणते.  जगभर उड्डाण करण्याचा सर्वात चांगला आणि सर्वाधिक सोयीस्कर मार्ग आमच्या ग्राहकांना सादर करण्याच्या आमच्या खोलवर रुजलेल्या बांधिलकीचे हे प्रतिबिंब आहे. एअर इंडियासोबतचे आमचे संबंध अधिक दृढ करताना आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये नवीन स्थळांशी जोडताना आम्हाला आनंद होत आहे.”


विस्तारासोबत एअर इंडियाची इंटरलाइन भागीदारी १०० हून अधिक इंटरलाइन करार आणि ५० च्या जवळपास चेक-इन करार यात घातलेली भर आहे. त्यात लुफ्थांसा, युनायटेड एअरलाइन्स, एअर कॅनडा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांसारख्या जागतिक स्तरावर भागीदार विमानकंपन्या आहेत.

अलिकडेच, एअर इंडियाने ‘विहान.एआय’ (एअर इंडियाची ५ वर्षीय परिवर्तन योजना) मध्ये ‘टेक ऑफ’ टप्प्यात प्रवेश केल्याची घोषणा केली असून उत्कृष्टतेच्या दिशेने बांधणी करण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म, प्रक्रिया आणि प्रणाली विकसित करण्यावर केंद्रित आहे.

न्यूजमेकर्स अचिव्हर्स राष्ट्रीय पुरस्कार राजा माने यांना प्रदान!

आशा पारेख, अंजन श्रीवास्तव, डॉ.निलेश साबळे यांचाही गौरव
मुंबई-
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना न्यूजमेकर्स अचिव्हर्स राष्ट्रीय पुरस्कार येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या प्रदान करण्यात आला.

अफ्टरनून व्हॉइस माध्यम समुहाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून समुहाच्या प्रमुख डॉ.वैदेही मातन यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात.या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख,”वागळे की दुनिया फेम” अंजन श्रीवास्तव,लेखक ईकबाल दुर्राणी यांना जीवनगौरव गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. “चला हवा येऊ द्या” निर्माता दिग्दर्शक डॉ.निलेश साबळे, पद्मश्री गुलाबो पसार, आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डर गौरी, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील साक्षी जोशी, जितेंद्र जोशी, राजकारणातील खा.ईम्तियाज जलील,आ.भारती लव्हेकर यांना भरत दाभोळकर, डॉ.बात्रा,नादिरा बब्बर,अभिनेते प्रदीप वेलणकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नदी पुनरुज्जीवनाच्या कामासाठी काढण्यात येणारे वृक्ष सुबाभूळ, कुबाभूळ प्रजातीची_युवराज देशमुखांचा दावा

अधिक्षक अभियंता यांचा व्हिडिओ प्रसारित

पुणे: पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना नदी लगत असणारी ६ ते ७ हजारांपेक्षा जास्त वृक्ष तोडली जाणार असल्याची सध्या चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. मात्र, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाच्या वतीने एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित करण्यात आला आहे.


पुणे महानगरपालिकेच्या अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये नदी सुधार प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. देशमुख यांचा व्हिडिओही महानगरपालिकेने प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये देशमुख यांनी सांगितले आहे की, ‘नदी सुधार प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही. नदी सुधार प्रकल्पांतर्गत सुरुवातीला दहा किलोमीटरचा नदी काठ विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये तीन हजार झाडे काढण्यात येणार आहे. पण हे सर्व झाडे झुडूप या प्रकारात येतात,’ असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘या तीन हजार वृक्षांमध्ये ९६ टक्के झाडे ही सुबाभूळ, कुबाभूळ या प्रजातीमधील आहेत. या वृक्षांची अनियंत्रित वाढ होत असते. नदी सुधार प्रकल्पाच्या कामासाठी जेथे झाडे काढणे आवश्यक आहे, तेथेच ती काढली जाणार आहेत. त्यामध्येही सुबाभूळ आणि कुबाभूळ यांचे प्रमाण जास्त आहे. इतर झाडांची पुर्नरोपण करण्यात येणार आहे.’

पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे लावणार

‘नदी सुधार प्रकल्पासाठी स्थानिक प्रजातीची कोणतेही झाड काढले जाणार नाही,’ असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले की, ‘उलट पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक प्रजातीची ६० ते ६५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्षारोपण करताना बंगलोर येथील बॉटनीमध्ये अभ्यास असणाऱ्या एका संस्थेची मदत घेतली जाणार आहे. तेथील तज्ज्ञांनी नदीकडेला कुठल्या पद्धतीची झाडे असली पाहिजेत, याचा तांत्रिक अभ्यास केला असून ती झाडे लावली जाणार आहेत. यामध्येही सावली देणारे झाडे, पक्ष्यांसाठी, वन्यप्राण्यासाठी फळे-फुले देणारी झाडे, नदीला पूरक अशी झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. नदी कडेला ही झाडे लावण्याचे नियोजन सुनियोजित पद्धतीने करणार आहोत. जेणेकरून ही झाडे टिकून राहतील.’

दिग्दर्शक भाऊरावांच्या मदतीसाठी खुद्द अजित पवार आले पुढे

पुणे – राष्ट्रीय पुरस्कार विजेते, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा टीडीएम (TDM) हा मराठी सिनेमा २८ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे. परंतु सिनेमाला सिनेमाला थिएटर मिळत नसून भाऊरावांसह टीडीएमच्या टीमने खंत व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना भाऊरावांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू आले. मात्र आता स्वत: राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार भाऊरावांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यांनी लवकरात लवकर टीडीएमला स्लॉट उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

१ मे रोजी भाऊराव आणि त्यांच्या टीमने फेसबुक लाइव्ह करत टीडीएम या मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याची व्यथा मांडली. फेसबुक लाइव्हवर बोलताना भाऊराव म्हणाले की, ‘हा सिनेमा आम्ही तुमच्यासाठी बनवला आहे, तुम्हाला जर आवडला तर लोकांपर्यंत पोहोचवा. माझी खंत एवढीच आहे की, एवढा चांगला सिनेमा झाला आहे आणि जिथे शो लागले आहेत तिने नव्याने शो लावले जातायंत. लोकांनी शोबद्दल विचारल्यास त्यांना सांगितलं जात आहे की आज टीडीएमचा शो नाही. एखादाच शो आहे, असं सांगितलं जात. यावरुन असं वाटतं की कुठेतरी मराठी सिनेमा संपतोय आणि संपवला जातोय.’

भाऊरावांच्या या फेसबुक लाइव्हचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्याबाबत ट्वीट केले आहे.

‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी,’ असा आदेश अजित पवारांनी दिला आहे.

पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

पुणे, दि. २: पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ २३ एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताच्या अनुषंगाने अपघाताची कारणे आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत परिवहन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती असते. यातून वाहनांचा वेग वाढतो. वाहनाला सतत ब्रेक लावल्यामुळे ब्रेकमध्ये अनावश्यक उष्णता व दाब निर्माण होऊन तत्कालीन स्थितीत ब्रेक काम करेणासे होतात. हेदेखील अपघातांचे महत्त्वाचे कारण ठरू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

जड वाहनांची वेगमर्यादा घटविणे आवश्यक
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा घटवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने ट्रक मालक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, असे निर्देष जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

एनएचएआय, पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह सेव्ह लाईफ फाऊंडेशन संस्थेने सुचविलेल्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका
या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांतर्गत तसेच कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस चौकी स्थापन करणे, त्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरी पूल दरम्यान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरची संख्या वाढवणे, तातडीचे मदत देण्यासाठी पोलीस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवणे, दरी पुलाजवळ सेवा रस्त्याला जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी हाईट बॅरिकेट्स बसवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

नियम तोडणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी 2 इंटरसेप्टर वाहने
राष्ट्रीय महामार्गाच्या या लांबीत वाहतूक नियमांचे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना तातडीने रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेला एक आणि ग्रामीण पोलीसांना एक अशी दोन इंटरसेप्टर वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन करावयाच्या उपाययोजनांतर्गत कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्याअनुषंगाने लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री यांची बैठक होणार असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी सांगितले.

वाहन चालविताना ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्याचा पर्याय उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण तयार करणेही उपयुक्त ठरेल, असेही यावेळी सुचविण्यात आले.
0000

संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येरवडा पुणे येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे, दि.२ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह येरवडा पुणे येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी दिली आहे.

संत जनाबाई मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात १०० मागासवर्गीय मुलींना इत्ता अकरावी, बारावी व डिप्लोमा पर्यंतच्या वर्गाना मोफत प्रवेश देण्यात येतो. त्याचबरोबर दरमहा ८०० रुपये निर्वाहभत्ता, १०० रुपये स्वच्छतेसाठी दिले जातात. स्टेशनरीसाठी ४ हजार रुपये प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी दिले जातात. सहल, गणवेश, ॲप्रण व प्रोजेक्टसाठीही नियमानुसार साहित्य पुरविण्यात येते.

या वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थीनींनी तहसिलदारांचा मागील वर्षाचा उत्पनाचा दाखला, मागील वर्षाचे गुणप्रत्रक, जातीचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.

इच्छुक विद्यार्थीनींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११) अथवा गृहपाल, संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा पुणे (भ्रमणध्वनी क्रमांक ९५६१५६८४५९) येथे संपर्क साधावा, असे आवाहन संत जनाबाई मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, गोची, ढोर व होलार ) व्यक्तींसाठी सन २०२३-२४ मध्ये विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अनुदान योजना आणि बीजभांडवल योजनेसाठी अटी व शर्तीनुसार महामंडळाच्या कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. विशेष घटक व बीज भांडवल योजनेतंर्गतचे यापुर्वीचे जुने कर्जप्रस्ताव रद्द करण्यात येतील. स्वहस्ताक्षरात, टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्विकारण्यात येतील.

महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, अन्यथा कर्जप्रस्ताव अपात्र करण्यात येईल. अर्जदार यांनी परिपूर्ण कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तीशः अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्जप्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही.

अर्जदारांकडून सर्व परिपूर्ण कागदपत्र असलेलेच कर्ज प्रस्ताव स्विकारले जातील. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी असावी. अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरून त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासकीय कामात अडथळा या सदराखाली संबंधित मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

कर्जप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस / महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्जप्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्दिष्टास दोन पट या पद्धतीने कर्जप्रस्ताव जेष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येतील.

कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची छायांकित प्रत, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कोटेशन (जीएसटी सह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता परवाना अथवा बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईटबिल अथवा टॅक्सपावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. योजनेअंतर्गत जुन्या प्रलंबित कर्जप्रस्तावाबाबत ज्या लाभार्थ्यांनी यापुर्वी जिल्हा कार्यालयात कर्जप्रस्ताव दाखल केलेले आहेत आणि ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थीची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करून कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

लाभार्थ्यांचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्याचा विनंती अर्ज, ज्या जागी व्यवसाय चालू करावयाचा आहे त्या त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला सोबत जोडावा. दोन सक्षम जामीनदारापैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र आवश्यक आहे. लाभार्थ्याचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा ५ ते ६ वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक आहे.

जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस,लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर, अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, यापूर्वी कर्जाच्या अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र, जातीचा दाखला, लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक, आधार संलग्न (लिंक) बँक खाते क्रमांक, जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक, अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली असून आहे. चर्मकार समाजातील बांधवांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ दाखल करुन जास्तीत जास्त अर्जदारांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

सेवेचा समृद्ध वारसा जोपासण्याचे ध्येय ठेवा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

महावितरणच्या उत्कृष्ट ५६ जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव

पुणे, दि. ०२ मे २०२३: ‘महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रासोबतच सेवेचाही समृद्ध व संपन्न वारसा आहे. मूलभूत गरज बनलेल्या वीज क्षेत्रात सेवा देताना आपल्या राज्याचा हा वारसा जोपासण्याचे ध्येय ठेवा. मासिक वेतन घेऊन सेवा देण्याचे भाग्य वीज अभियंता व कर्मचारी म्हणून आपल्याला लाभले आहे. त्यासाठी प्रत्येक वीजग्राहकाचे समाधान हे महावितरणचे ध्येय कायम जोपासत राहा’, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सोमवारी (दि. १) केले.

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सन २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या उत्कृष्ट १३ यंत्रचालक व ४३ तांत्रिक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार बोलत होते. यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता सर्वश्री सतीश गायकवाड, जयवंत कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर यांची उपस्थिती होती.

पुणे परिमंडलातील विभागनिहाय उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे– अनिल जाधव, पुरूषोत्तम झिंगरे, सुशिला कड, अमोल पाटील (बंडगार्डन विभाग), जनार्दन गायकवाड, योगेश बांदल, राहुल इंगळे, योगेश पवार (नगररोड विभाग), सागर कांबळे, दत्ता कांबळे, बाळासाहेब सांडभोर, चंद्रकांत बागवले (पदमावती विभाग), सचिन झांबरे, रोशन ढोबळे, सफल अताग्रे, मोहन दारवटकर (पर्वती विभाग), दत्तात्रय वाल्हेकर, सुरेश एजगर, योगेश वानेरे, समाधान मोरे, निरंजन ठणठणकार (रास्तापेठ विभाग), शरद डगळे, दत्तात्रय हुले, संतराम बनसोडे, अविनाश चौगुले, श्यामकुमार नेवारे, सचिन चिंचोलीकर (मंचर विभाग), स्वप्नील अवचट, गणेश लोखंडे, अमोल कोंडे, सूर्यकांत शिंदे, शरद वाघमारे, पुनाजी चौरे (मुळशी विभाग), धनाजी काळे, ज्ञानेश्वर होले, अमर कोंढाळकर, अजित दजगुडे, हरिदास आंबेकर, सुरेश कोकणे (राजगुरूनगर विभाग), संतोष कांबळे, काळू मोहरे, तुळशीराम गवळी, गुलाब पठाण (भोसरी विभाग), चंद्रशेखर बधे, नीलेश निंबाळकर, पांडुरंग भोसले, बंडू खर्जुले (कोथरूड विभाग), दिनेश कारंडे, हरीश मानकर, अशोक मुळे, काशिनाथ वाजे (पिंपरी विभाग), महादू ठाकरे, सचिन मुंडे, शेषनारायण फावडे, गणेश सेलूकर व हणमंत शिंगटे (शिवाजीनगर विभाग).

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? 

शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला. मात्र, ते राजीनामा कितीपत मागे घेतील, याबद्दल शंका उपस्थित होत आहे.आता शरद पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरू आहे. त्यातही पाच प्रमुख नावांची जोरदार चर्चा आहे.शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतलाच नाही, तर त्यांची जागा कोण घेणार? याची चर्चा सुरू आहे. त्यात पाच ते सहा नावे चर्चेत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे नाव म्हणजे अर्थातच अजित पवार. मात्र, अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हे पाहता ते संघटनात्मक कामात कितपत रस घेतील, हे काळच सांगेल. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांचेही नाव चर्चेत आहे.

शरद पवार यांनी अचानक नव्हे, तर ठरवून आज आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याचे दिसते. कारण त्यांचे भाषण संपते न संपते तोच त्यांच्या भाषणाच्या प्रती माध्यमांकडे पोहचविण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकिपीडिया पेजवरील अध्यक्षपदाचे त्यांचे नाव हटवण्यात आले. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष नेमण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना केली. हे सारे पाहता, त्यांच्या ध्येय आणि धोरणास योग्य अशा व्यक्तींची चर्चाही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जंयत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, झिरवळ आदींची समिती नेमावी. या समितीने सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणारा, सर्वांना सोबत घेऊ जाणारा अध्यक्ष निवडावा असे आवाहन केले आहे.

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रकाशन झाले. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. अनेकांनी तिथेच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सिल्व्हर ओकवर जाऊन अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शरद पवारांची मनधरणी केली. मात्र, तेव्हाही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. तसेच कार्यकर्त्यांनी विरोध मागे घ्यावा. राजीनामा सत्र थांबवावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत आपण फेरविचार करू, असे आवाहन त्यांनी केले.

शरद पवार यांना निर्णय मागे घ्यायचा असल्यास त्यांनी तो तात्काळ घेतला असता. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही त्यांनी आपल्या निर्णयावर नंतर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे शरद पवार राजीनामा मागे घेतील, याची खात्री नाही. त्यासाठी त्यांचे 82 वर्षांचे वय हे प्रमुख कारण सांगितले जाते. विशेष म्हणजे पवारांनी आता राजीनामा मागे घेऊ नये, असे पत्नी प्रतिभा पवार यांनाही वाटते. त्यामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील, असा अंदाज आहे.

मे महिन्याच्या सुट्टीत सोडवा चित्तथरारक रहस्य शेरलॉक होम्सच्या संगतीनं!

स्टोरीटेल सादर करत आहे शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा अभिनेता कवी गायक संदीप खऱे यांच्या आवाजात!

शेरलॉक होम्स होता तरी कोण? एक काल्पनिक पण प्रभावी व्यक्तिमत्व ! निरिक्षण आणि निष्कर्ष शास्त्राचा प्रणेता ! गुप्तचरांचा परात्पर गुरू. त्याने अनेक रहस्ये आपल्या बुध्दिचातुर्याने उलगडली. स्कॉटलंड यार्ड या गुप्त पोलिसांच्या बालेकिल्ल्याचा तो फार मोठा आधार होता. तो केवळ बौध्दिक यंत्र नव्हता तर तो संवेदनशील माणूस होता. त्याच्या मध्ये माणूसकीचे निर्झर होते. म्हणून तो ख-या व्यक्तिमत्वा इतकाच लोकप्रिय झाला आहे आणि होतच राहिल…!

सर ऑर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा जगभर लोकप्रिय झाल्या. जगभरातील सर्व भाषांत त्यांची भाषांतरे झाली. एवढेच नव्हे तर शेरलॉक होम्सच्या रहस्यकथांवर आधारित अनेक टि.व्ही.मालिका आणि चित्रपट निघाले. इतकेच नव्हे तर शेरलॉक होम्सचे आधुनिक काळातील रूप कसे असेल अशी कल्पना करूनही अनेक कथा, मालिका व चित्रपट तयार झाले. शेरलॉक होम्स हे नाव त्यामुळेच जागतिक साहित्यात अजरामर झाले.

स्टोरीटेल ने शेरलॉक होम्सला सर्व भाषांमधून ऑडिओबुक स्वरूपात सादर करायचे ठरवले आणि इंग्रजीसह अनेक युरोपयिन भाषांत होम्सच्या कथा सादर केल्या आहेत. मराठीमध्ये सुप्रसिध्द लेखक आणि नाट्यकर्मी भालबा केळकर यांनी केलेले शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे अनुवाद लोकप्रिय आहेत. स्टोरीटेलसाठी त्यातील वीस रहस्य कथांचे सादरीकरण संदीप खरे यांनी अभिवाचन करून केले आहे.

मे महिन्याच्या सुट्टीत कुमार वयोगटातील मुलांना या रहस्यकथा ऐकताना जुना ब्रिटीश काळ आणि तेव्हाची संस्कृती समजेल तर रहस्यकथा प्रेमी वाचकांना या कथा नव्याने ऐकताना पु्र्नप्रत्ययाचा आनंद मिळेल.

एक मे पासून दर दिवसाआड एक कथा याप्रमाणे या वीस कथा स्टोरीटेलवर प्रकाशित होणार आहेत.

शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांचे संदीप खरे यांनी केलेले अभिवाचन ऐकण्यासाठी लिंक

https://www.storytel.com/in/en/books/sherlock-holmes-chya-chaturya-katha-part-1-2397127

पुण्यातील राष्ट्रवादी भवनालाही फुटला हुंदका

पुणे : घरातील वडीलधाऱ्याचा अनपेक्षित निर्णय ऐकून सैरभैर झालेले शेकडो कार्यकर्ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जमा झाले. एक कान मुंबईतील घडामोडी जाणून घेण्यासाठी टीव्हीकडे होता. पवारसाहेबांनी काही निर्णय बदलला नाही आणि कार्यकर्त्यांना अक्षरशः हुंदका फुटला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ही बातमी समजली आणि पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवार यांना साकडे घालण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले. प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित सर्व कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर उपस्थीत होते
याप्रसंगी बोलताना देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. पवारसाहेब हे घरातील वडीलधारे कर्ते आहेत. घरातील वडीलधारे कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे साहेब निर्णय बदलत देत नाही तोपर्यंत आम्हीही सर्वजन राजीनाम्यावर ठाम आहोत
सगळ्याच कार्यकर्त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या होत्या.अश्रू आवरत नव्हते. राजीनामा मागे घ्या अशा घोषणा दिल्या जात होत्या
प्रवक्ते प्रदीप देशमुख , रविंन्द्र माळवदकर , सदानंद शेट्टी , मुणालिनी वाणी , निलेश निकम , काका चव्हाण अजिंक्य पालकर, विक्रम जाधव , फईम शेख , गुरूमितसिंग गिल व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

पीएमपीएमएल ची पर्यटन बससेवा आता फक्त ५०० रूपयांत

पुणे-

 पर्यटन बससेवेच्या सर्व ७ मार्गांवर सुधारीत तिकीट दर लागू
 प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन बससेवा सुरू राहणार
 पर्यटन बससेवेसाठी वातानुकुलित ईलेक्ट्रीक बस
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर व १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व
पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या
दिवशी दिनांक ०१/०५/२०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे.
तथापि, सदरील पर्यटन बससेवेस प्रवासी नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने व पर्यटन बससेवेचे तिकीट दर जास्त
असलेबाबतच्या भावना नागरिकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केल्याने परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
यांनी पर्यटन बससेवेच्या तिकीट दरात बदल करणेचा निर्णय घेतला आहे. सर्व पर्यटन बससेवेच्या मार्गांवर तिकीट दरामध्ये सुधारणा
करून प्रति प्रवासी तिकीट दर रूपये ५००/- इतका करण्यात आला आहे.

पर्यटन बससेवेचे मार्ग व सुधारित तिकीट दर खालीलप्रमाणे

 पर्यटन बससेवा क्र. १
 मार्ग – हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
पर्यटन बससेवा क्र. २
 मार्ग – हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर
मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
 पर्यटन बससेवा क्र. ३
 मार्ग – डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
 पर्यटन बससेवा क्र. ४
 मार्ग – पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
 पर्यटन बससेवा क्र. ५
 मार्ग – पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ७००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ६
 मार्ग – पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, श्री क्षेत्र तुळापूर त्रिवेणी संगम, छ. संभाजी महाराज
समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-
 पर्यटन बससेवा क्र. ७
 मार्ग – भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी
(शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्तीनिगडी.
 पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ७००/-
 सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पीएमपीएमएल पर्यटन बससेवेबाबत इतर माहिती खालीलप्रमाणे

  1. बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत
    देण्यात येईल .
  2. परिवहन महामंडळाचे १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी
    बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रावर सदरील बससेवेचे तिकिट बुकींग करण्यात येईल.
  3. सदरील बससेवेस ज्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभेल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बससेवा रद्द
    झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (त्यापुढील आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी) प्रवास करण्याची
    मुभा राहील.
  4. सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या
    ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून
    प्रवास करण्याची मुभा राहील.
  5. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
    पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येत असलेल्या पर्यटन बससेवेचा लाभ भक्तगण, भाविक व पर्यटक यांनी
    घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

तरुणांच्या योगदानामुळे भारत विकसित राष्ट्र होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली दि.02 : लोकसंख्या व तरुणाईचा फायदा घेऊन चीन, अमेरिका यांसारखे देश विकसित झाले. भारताने जर येथील तरूणांचे योगदान वाढविले, येथील लोकसंख्येचा फायदा घेतला तर भारतही विकसित राष्ट्र बनेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व कृषी महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. उद्योगांना मनुष्यबळ हवे तर तरुणाईला रोजगार हवाय. असे असतानादेखील आपल्या देशात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. म्हणून या ठिकाणी शासनामार्फत दोघांचा दुवा म्हणून कौशल्य प्राप्त तरुणांची निर्मिती करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याकरिता कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असून प्रशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी चालून येतील व बेरोजगारीचे प्रमाण आपोआपच कमी होईल.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त आयटीआयचे प्रशिक्षण घेतलेले तरुण तरुणी आहेत. ते पुढे उद्योगांना आपली सेवा पुरवतील. गडचिरोली जिल्ह्यात आता संधी निर्माण होत आहेत. आज गडचिरोली जिल्ह्यात १० पेक्षा जास्त उद्योग आलेले आहेत व येत आहेत. जिल्ह्यातील तरुणाईला जास्त संधी उपलब्ध होत असून पुढच्या काळात त्यांना कामही मिळेल. आपल्याकडे असलेल्या खनिज संपत्तीचा उपयोग केला पाहिजे.  कोनसरी  प्रकल्पाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होत आहे. लोह उद्योगात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. लोह उद्योग  मोठया प्रमाणात रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. यात गडचिरोलीच्या तरुणांना प्राधान्य राहील. त्यातून त्यांना रोजगार प्राप्त होऊन जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल असे ते यावेळी म्हणाले.तरुणांनी निराश होऊन चालणार नाही. त्यांनी निराश न होता कौशल्य प्राप्त करुन प्रशिक्षण घेतल्यास ते रोजगारात मोठी भरारी घेऊ शकतात असेही ते यावेळी म्हणाले. मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व खासदार अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली कुमार आशीर्वाद व युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा तसेच आमदार देवराव होळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन योगेंद्र शेंडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास यंत्रणा गडचिरोली व डॉ. माया राऊत सहायक प्राध्यापक कृषी विद्यापीठ गडचिरोली यांनी केले.

राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पांत;  मुख्यमंत्र्यांनी केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन

मुंबई, दि. २ : राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. त्याबद्दल आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक झाली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २९६७ वरून ३१६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आज झालेल्या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हिटीसाठी भूमिगत ऑप्टीकल फायबर केबलचे प्रस्ताव, रस्ते प्रकल्पांचे प्रस्ताव तसेच अन्य विकास कामांच्या प्रस्तावांचा समावेश होता. आजच्या बैठकीत १९ प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळास शिफारशीसाठी सादर करण्यात आले.

यावेळी महाडाटा वेब पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या संशोधन प्रकल्पांच्या परिणामांसाठी एक प्रसार मंच म्हणून हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्या वरील संशोधन प्रकल्पांमधून भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनद्वारे पुस्तके, जर्नल लेख, तांत्रिक अहवाल, एमएससी प्रबंध, पीएचडी शोध प्रबंध, इंटर्नशिप प्रबंध आणि लोकप्रिय लेख यांचा समावेश असणार आहे.