मुंबई, २४ नोव्हेंबर, २०२३: भारतात घर हे लोकांच्या जीवनाचे केंद्र असते. भारतीय हे उत्सव प्रिय असल्याने सातत्याने बाहेर सार्वजनिक समारंभ, उपहारगृह, थिएटर किंवा मैफिलीमध्ये सहभागी होत असतात. मात्र घराबाहेर असताना आपल्या घराच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या मनात कायम एक पुसटशी भीती देखील असते. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉइसचा एक व्यवसाय गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सने केलेल्या ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या नवीन संशोधनानुसारहे समोर आले आहे. मोकळेपणाने व निर्भयतेने राहता यावे म्हणून घराच्या सुरक्षिततेसाठी भारतीय करत असलेल्या तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल आणि भारतीयांची जीवनशैलीबद्दल हा अभ्यास नवीन माहिती देतो.
या संशोधनातून समोर आलेली एक महत्त्वाची माहिती म्हणजे, सर्वेक्षणातील ४२% प्रतिसादकांनी सांगितले की, ते एखाद्या समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात असताना आपल्या घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा किल्ल्यांसंबंधी काही समन्वय साधण्यासाठी कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परत आले आहेत. यावरून हे दिसून येते की, घरात जाण्यासाठी लोकांना बऱ्याचवेळा इतरांवर अवलंबून रहावे लागते आणि त्यासाठी कधीकधी अगदी कार्यक्रम सोडून घरी जाणे देखील त्यांना भाग पडते.
एका लोकप्रिय इव्हेंट टिकिट पोर्टलनुसार, साल २०२२ मध्ये जवळपास १९,००० मनोरंजनात्मक कार्यक्रमांमधून सुमारे ८ दशलक्ष लोक बाहेर पडले. ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या अभ्यासाने दिलेली माहिती या पोर्टलच्या माहितीशी पूरक आहे; कारण या संशोधनानुसारदेखील ५४% प्रतिसादकांनी रात्री
उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मध्यरात्री अतिरिक्त किल्ली घेण्यासाठी त्यांना त्रास देण्याच्या कल्पनेबद्दल अस्वस्थता व्यक्त केली. याशिवाय, ४१% प्रतिसादकांनी सांगितले की, घरात नसताना जर अचानक त्यांच्या लक्षात आले की गॅस किंवा गिझर चालू आहे तर ते ताबडतोब घरी परत येतील.
गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सनेचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी यांच्या मते,“‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या संशोधनातून समोर आलेली ही प्राथमिक माहिती, ग्राहकांच्या त्यांच्या घरासंबंधी असलेल्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या पैलुबाबत म्हणजेच घरच्या सुरक्षिततेबाबत काय भावना आहेत या विषयावर प्रकाश टाकते. या संशोधनातील माहितीने घराच्या सुरक्षेबाबत लोकांचे काय प्रश्न आणि काय अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांना कसे पूर्ण करू शकतो हे आम्हाला स्पष्टपणे दाखवले आहे. भारतीय आपल्या घराच्या सुरक्षेसाठी अजूनही बाह्य घटकांवर अवलंबून आहेत हे जरी स्पष्ट दिसून येत असले तरी आता ते आजच्या धावपळीच्या जगात शांत, चिंतामुक्त आणि मनमोकळे जगता यावे म्हणून विश्वसनीय तांत्रिक उपाय सुद्धा शोधत आहेत. ‘विश्वास’ या शब्दाचा जणू समानार्थी शब्द म्हणजे गोदरेज लॉक्स. या गोदरेज लॉक्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार घराच्या सूरेक्षेचे नवीन, अत्याधुनिक, डिजिटल उपाय विकसित करतो; जे आमच्या ग्राहकांना सुविधा आणि सुरक्षितता दोन्ही देतात आणि त्याचबरोबर त्यांना चिंतामुक्त मनमोकळे जगण्याची मुभा देखील देते.”
सुविधा आणि सुरक्षितता मिळविण्यासाठी माणसे स्मार्ट होम उपकरणांचा अवलंब करताना नेमके कसे विचार करतात आणि कसे वागतात हे समजून घेणे हे ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. हे सर्वेक्षण मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर आणि भोपाळ या ५ शहरांमधील २००० लोकांना घेऊन करण्यात आले आहे.
पुणे- काल साडेबत्तीस लाखाची घरफोडी एका बिल्डरची झाली असताना आज पुन्हा त्याच भोसलेनगर साडेसतरा लाखाची घरफोडी झाली .यावेळेस देखील पोलिसांनी फिर्यादीचे नाव जाहीर न करण्याचा पवित्र घेतला आहे. सीसी टीव्ही चे जाळे , सुरक्षा व्यवस्था असताना उच्चभ्रू वसाहतीत होणाऱ्या या घरफोड्या आता चर्चेचा विषय बनला नाही तर नवल वाटणार नाही अशी स्थिती आहे.भोसलेनगर मधील अशोकनगर मधील फाईवसेन्साई बिल्डींग मधील फलॅट कुलूप बंद असताना फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून वॉक इन वाॅड्रोबच्या तिजोरीचे दार कशाने तरी उचकटून तिजोरीतील सोन्याचे तसेच हिऱ्यांचे साडेसतरा लाखाचे दागिने चोरट्याने लंपास केले .सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील ९०११७१९१०० हे अधिक तपास करत आहेत.
पुणे:महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित कथा कीर्तन महोत्सव चे उद्घाटन दि २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झाले.
या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन इन्फोसिसचे उपाध्यक्ष सुश्रुत वैद्य, ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर, संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे , भारतीय विद्या भवन बंगळूरु केंद्राच्या सहसंचालक नागलक्ष्मी राव,भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे,मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत झाले.
भारतीय विद्या भवन, सेनापती बापट रस्ता येथे हा उद्घाटन सोहळा पारंपारिक उत्साहात पार पडला.
भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष संदीप महाराज पळसे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने(विठ्ठल रुक्मिणी कथा) प्रारंभ झाला . दि. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या सप्ताहामध्ये भव्य ‘कथा कीर्तन महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता विविध कीर्तन परंपरांचे सादरीकरण होणार आहे. त्यात पारंपरिक वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन व राष्ट्रीय कीर्तन अशा विविध परंपरांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना सुश्रुत वैद्य म्हणाले, ‘माणसाच्या जीवनाला चरितार्थाच्या पलीकडे अर्थ देण्याचे काम कीर्तन माध्यमातून केले जाते. महाराष्ट्राला कीर्तन प्रबोधनाची मोठी परंपरा आहे.म्हणुन या कीर्तन महोत्सवाला प्रोत्साहन देण्याचे काम इन्फोसिस फाऊंडेशनने केले आहे. मानवी जीवनाशी संबंधित शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात योगदान इन्फोसिस फाउंडेशन च्या वतीने केले जात आहे.कीर्तन महोत्सवातून या सर्व उपक्रमांना बळ मिळेल’.
डॉ.गो. बं.देगलूरकर म्हणाले, ‘शैक्षणिक संस्थेत कीर्तन, वारकरी परंपरेचा उपक्रम चालतो आहे , ही कौतुकाची बाब आहे. ब्रम्हानंद मिळावा हा कीर्तनाचा उद्देश असतो. नीती कल्पनांवर आधारित संत कार्य सर्वांसमोर ठेवणे हा कीर्तनाचा उद्देश असतो. कीर्तनाला तरुण पिढी येते , ही देखील चांगली गोष्ट आहे. भारतीय तत्त्वज्ञान चा सखोल अभ्यास कीर्तनकारांनी केलेला असतो. त्यातून अमृतानुभव आपण घेतला पाहिजे. ‘
डॉ सदानंद मोरे म्हणाले,’ आपली संस्कृती घडविण्यामध्ये आणि टिकविण्यामध्ये कीर्तनाचा मोठा वाटा आहे. ही परंपरा वर्धिष्णू होत राहिले पाहिजे.इहलोकाचे रूपांतर वैकुंठामध्ये करण्याचे सामर्थ्य कीर्तनात आहे ‘.
भारतीय विद्या भवन बंगळुरू केंद्राच्या सह संचालक नाग लक्ष्मी राव यांनीही मनोगत व्यक्त केले. लीना मेहेंदळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंदकुमार काकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले.
सप्ताह भर कथा कीर्तन
मंगळवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी ,सायंकाळी ६ वाजता देहू येथील ह .भ. प. आचार्य वैभव महाराज राक्षे यांचे पारंपरिक वारकरी कीर्तन(भक्त प्रल्हाद कथा ) होणार आहे. बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन स्वर मंजुषा श्रीमती अंजली कऱ्हाडकर व त्यांची कन्या शिवानी कऱ्हाडकर या माय – लेकींच्या “कीर्तन संवादाद्वारे ” (पुरंदर दास कथा )तिसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले जाणार आहे. गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तन विशारद श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार, दि. १ डिसेंबर रोजी,सायंकाळी ६ वाजता कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे पती-पत्नीच्या ” कीर्तन जुगलबंदीने” गुंफले जाणार आहे. या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार ,दिनांक २ डिसेंबर रोजीसायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान ” कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या” या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यम तज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे “महाभारतातील किर्तन परंपरा” यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे.
भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.प्रवेश मोफत आहे.
· चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कुटुंबाला विमायोजना खरेदी करतेवेळी प्रीमियममध्ये ५ टक्क्यांची सूट. ही सूट नूतनीकरणाच्या वेळीही राहणार कायम.
· विम्याची रक्कम पुनर्संचयित करण्यासाठी ‘रिस्टोर इन्फिनिटी’सारखा पर्याय
· अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी (प्री-एक्झिस्टिंग डिसीज – पीईडी) विशिष्ट परिस्थितीत प्रतीक्षा कालावधी ४८ महिन्यांवरून ३० दिवसांपर्यंत कमी करण्याचा पर्याय.
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ या सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनीने ‘हेल्थ सुपरचार्ज’ या नावाची एक विशेष आरोग्यविमा योजना सादर केली आहे. त्यात विमाराशीच्या पाच पटींनी अधिक एवढे विमाकवच ग्राहकांना मिळणार आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढत्या खर्चावर ग्राहकांना मात करता यावी, याकरीता ही विशेष योजना कंपनीने आणली आहे. मोठ्या महानगरांपासून लहान गावांपर्यंत सर्व कुटुंबांच्या आरोग्यसेवांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘हेल्थ सुपरचार्ज’ योजना काळजीपूर्वक रचण्यात आली आहे.
‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ या पॉलिसीमध्ये पाच लाख ते वीस लाख रुपयांपर्यंतचा आरोग्यविमा काढता येतो. कुटुंबाच्या हितांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही एक समग्र स्वरुपाची पॉलिसी आहे. ग्राहकांना त्यांच्या भौगोलिक स्थानाच्या आधारावर या पॉलिसीचे दोन पर्याय (व्हॅल्यू प्लॅन आणि जिओ प्लॅन) उपलब्ध असतील. आपापल्या गरजांनुसार ते या योजनेंतर्गत उपलब्ध असलेले इतर पर्यायी लाभही निवडू शकतात. टाटा एआयजीचे देशभरात १० हजारांपेक्षा जास्त रुग्णालयांचे विस्तृत नेटवर्क आहे. त्यांतून ग्राहकांना आपल्या वैद्यकीय गरजांनुसार उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळू शकेल.
‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ या नवीन आरोग्यविमा पॉलीसीबद्दल अधिक माहिती देताना ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि.’चे आरोग्य उत्पादने व प्रक्रिया विभागाचे वरिष्ठ उपप्रमुख डॉ. संतोष पुरी म्हणाले, “टाटा एआयजीमध्येआम्ही आमच्या ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर देतो. ग्राहकांना कोणताही तडजोड न करता नाविन्यपूर्ण आरोग्यविमा योजना मिळाव्यात, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. हेल्थ सुपरचार्ज सादर करून आम्ही पॉलिसीधारकांना त्यांच्या आरोग्यासाठी ५ पटींनी अधिक कव्हरेज प्रदान करू शकू. जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ होत असलेल्या सध्याच्या जगात, ही विमा पॉलिसी म्हणजे ग्राहकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या समर्पणाचा पुरावाच आहे. सर्वांचे आरोग्य ५ पट अधिक कव्हरेजसाठी पात्र असल्यामुळेआम्ही ही योजना त्या दृष्टीने डिझाइन केली आहे. ती सानुकूलित, परवडणारी असून निरोगीपणा व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांच्यावर भर देणारी आहे.”
‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ची प्रमुख वैशिष्ट्ये :
· पाच पट सुपरचार्ज बोनस : या विमा योजनेमध्ये पाच पट सुपरचार्ज बोनसच्या माध्यमातून ग्राहकांना वाढीव कव्हरेज मिळते. त्यातून ग्राहकांच्या कुटुंबांसाठी सर्वसमावेशक विमासंरक्षण सुनिश्चित होते. या पॉलिसीच्या प्रत्येक नूतनीकरणावर पॉलिसीच्या मूळ विमाराशीच्या ५० टक्के इतका बोनस मिळतो, तसेच पॉलिसी वर्षात ग्राहकाने कितीही वेळा क्लेम दाखल केला, तरीही मूळ विमाराशीच्या ५०० टक्क्यांपर्यंतचा जास्तीत जास्त बोनस पॉलिसीधारकाच्या नावावर जमा होतो.
· तरुण कुटुंबाना विशेष सवलत, जी कायम मिळत राहते : पॉलिसीच्या खरेदीवेळी कुटुंबातील सर्व सदस्यांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्या कुटुंबाला अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळू शकते. संबंधित कुटुंबाने कितीही वेळा क्लेम दाखल केले, तरी ही सवलत पॉलिसीच्या नूतनीकरणावरदेखील लागू होते. तरुण व्यक्तींनी आरोग्यविम्याचे लाभ अधिक संख्येने मिळवावेत, याकरीता ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
· परवडणारे प्रीमियम : ‘टियर-थ्री’ व ‘टियर-फोर’ शहरांतील लोकसंख्या, तसेच परवडणारी पॉलिसी घेऊ इच्छिणारे ‘टियर-वन’ व ‘टियर-टू’ शहरांतील ग्राहक, यांना योग्य ठरेल असे प्रीमियमचे स्वरूप.
· सानुकूल करण्याजोगे पर्याय : ‘व्हॅल्यू प्लॅन’ आणि ‘जिओ प्लॅन’ अशा दोन लवचिक स्वरुपाच्या प्रकारांमध्ये ही पॉलिसी उपलब्ध आहे. अमर्यादित पुनर्संचयन, तसेच अगोदरपासून असणाऱ्या काही विशिष्ट आजारांसाठीचा (पीईडी) प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासारखे पर्यायी लाभ मिळविण्याची सोय.
· अंगभूत स्वरुपातील निरोगीपणाच्या सेवा व निरोगीपणासाठीचे उपक्रम : आमच्या ग्राहकांना आरोग्य आणि हित कायम चांगले राखता यावे व स्वतःची देखभाल करता यावी, याकरीता विशेष सुविधा.
· प्रतिबंधात्मक वार्षिक आरोग्य तपासणी : ग्राहकाने पॉलिसीच्या वर्षभरात कितीही क्लेम दाखल केले, तरी अतिरिक्त प्रीमियम भरून एकदा आरोग्य तपासणी करून घेण्याची सोय.
पुणे : मुलीला अनिवासी भारतीय विद्यार्थी (एनआयए) कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लष्करातील निवृत्त जवानची २७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत निवृत्त जवानाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी (दोघे रा. चिखली), माजी नगरसेवक राहुल तुपेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपी शिंदे, सूर्यवंशी आणि तुपेरे यांच्याशी ओळख झाली होती. आरोपीने त्यांना तुमच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविले होते. अनिवासी भारतीय विद्यार्थी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून रोख, तसेच ऑनलाइन स्वरुपात गेल्या वर्षभरात २७ लाख २६ हजार रुपये उकळले.पैसे दिल्यानंतर आरोपींकडे प्रवेशाबाबत त्यांनी विचारणा केली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर तपास करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने देशभरातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला विमाननगर परिसरातून अटक करण्यात आली होती. पुणे शहरात मोठ्या संख्येने परराज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पालकांना प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. राहुल तुपेरे हे मनसेचे माजी नगसेवक आहेत. पानमळा भागातून ते निवडून आले होते.
येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही …प्रकाश आंबेडकर यांनी केले अलर्ट
पुणे-ज्यांनी ब्रिटीश काळात धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी लढा दिला. तेव्हा धार्मिक स्तंवात्र्यासाठी लढणाऱ्यानी सामाजिक स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांना ब्रिटीशांचे हस्तक ठरवले आज पुन्हा तीच परिस्थिती दिसते ,ज्यांनी त्यावेळेस धार्मिक हस्तक्षेप होतोय आणि आमच्या वैदिक धर्मावर आघात होतोय असा कांगावा केला होता त्यांनीच आता नवा कांगावा सुरु केला आहे ,कि या देशात हिंदूंचे राज्य असूनही या देशाला हिंदूंचे राष्ट्र असे संबोधित करावे असा लढा चाललेला आहे मी दुर्दैवाने असे म्हणेन या लढ्याचे गांभीर्य लोकांसमोर आलेले नाही ,आणि पुन्हा वैदिक परंपरा या देशात सुरु व्हावी यावरती संविधानावर बदलणार अशी घोषणा आहे , संघ ,हिंदू परिषद बोलत नाही ,पण फडणवीस हेच म्हणतात आम्ही संविधान बदलणार नाही , आमचे आवाहन आहे हेच
जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत अस वक्तव्य करत नाही, तोवर आम्ही हे मान्य करणार नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही होऊ शकतात राज्यात अनेक ठिकाणी 3 डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलिस स्टेशन्सला तसा अलर्ट आला आहे,असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशी पोलिसांना सूचना आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.सध्या देशात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. तर देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केले जात आहे. असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना केला आहे देशातलं वातावरण अस्थिर असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, येत्या सहा डिसेंबरनंतर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानंतर देशात काहीही घडू शकतं. हवं तर तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करा, कारण तशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे.राज्यात आरक्षणाच्या नावाखाली समाजासमाजाला एकमेकांविरोधात लढवले जात आहे. ते थांबण्याएवजी त्याला खतपाणी घातले जाते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडच्या सिलक्यारा-दांदलगाव बोगद्यात 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 मजुरांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे. एसडीआरएफची टीम स्ट्रेचर आणि गाद्या घेऊन बोगद्याच्या आत पोहोचली आहे. पहिली रुग्णवाहिकाही बोगद्याच्या आत पोहोचली आहे. दोन तासांत 41 कामगार बोगद्यातून बाहेर येतील.उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी सोमवारी संध्याकाळी देशवासियांना केले. त्यांची सुटका करण्यात सरकार कोणतीही कसर सोडत नसल्याचे ते म्हणाले.
तसिलक्यारा बाजूकडून आडव्या ड्रिलिंगमध्ये गुंतलेल्या रॅट होल मायनर्सनी उत्खनन पूर्ण केले आणि पाइपमधून बाहेर आले. अधिकाऱ्यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना त्यांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे. लवकरच चांगली बातमी येत आहे. येथे, कामगारांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांना तत्काळ चिन्यालिसौर रुग्णालयात नेण्यात येईल. यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. त्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे.
24 नोव्हेंबर रोजी कामगारांच्या ठिकाणापासून 12 मीटर अंतरावर मशीनचे ब्लेड तुटले होते. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले. यानंतर मॅन्युअल ड्रिलिंगसाठी सैन्य आणि रॅट होल मायनर्सना पाचारण करण्यात आले. रॅट मायनर्सचे 6 सदस्य खोदकाम करत आहेत.
ते एकामागून एक पाईपच्या आत जातात, नंतर हाताच्या सहाय्याने लहान फावडे खोदतात आणि एका छोट्या ट्रॉलीमधून एका वेळी सुमारे 2.5 क्विंटल भंगार बाहेर येतात. पाईपच्या आत, सर्वांच्या संरक्षणासाठी ऑक्सिजन मास्क, डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष चष्मा आणि हवेसाठी ब्लोअर आहे, जेणेकरून आत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये.
शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी, कामगारांच्या ठिकाणापूर्वी केवळ 12 मीटर आधी मशीनचे ब्लेड तुटले. त्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले. 12 नोव्हेंबर रोजी निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे बोगद्यात काम करणारे ४१ मजूर आत अडकले होते.
16 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 मीटर लांबीचे व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे. आतापर्यंत 31 मीटर खोदकाम झाले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सचिव पीके मिश्रा, गृह सचिव अजय के भल्ला आणि उत्तराखंडचे मुख्य सचिव एसएस संधू हे देखील बोगद्यातील बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.
27 नोव्हेंबर : पहाटे 3 वाजता सिल्क्यरा येथून 13.9 मीटर ऑगर मशीन अडकले लांब भाग काढले. सायंकाळी उशिरापर्यंत ऑगर मशीनचे डोकेही ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. यानंतर रॅट मायनर्सने हाताने खोदकाम सुरू केले. रात्री 10 वाजेपर्यंत पाईपही 0.9 मीटरने पुढे ढकलण्यात आले. तसेच 36 मीटरचे व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले.
26 नोव्हेंबर : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून उभ्या खोदकामाला सुरुवात झाली. रात्री 11 वाजेपर्यंत 20 मीटरपर्यंत खोदकाम झाले. उभ्या ड्रिलिंग अंतर्गत डोंगरात माथ्यापासून खालपर्यंत मोठा खड्डा करून मार्ग तयार केला जात आहे. अधिकार्यांनी सांगितले- जर कोणताही अडथळा नसेल तर आम्ही 100 तासांत म्हणजे 4 दिवसांत कामगारांपर्यंत पोहोचू.
25 नोव्हेंबर : ऑगर मशिन तुटल्याने शुक्रवारी बचावकार्य ठप्प झाले आणि शनिवारीही ठप्प राहिले. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितले आहे की, आता ऑगरने ड्रिलिंग केले जाणार नाही आणि इतर कोणतेही मशीन मागवले जाणार नाही.
कामगारांना बाहेर काढण्यासाठी इतर पर्यायांची मदत घेतली जाईल. प्लॅन बी अंतर्गत, बोगद्याच्या वरून उभ्या ड्रिलिंगची तयारी केली जात आहे. एनडीएमएचे म्हणणे आहे की कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 86 मीटर खोदकाम करावी लागेल.
24 नोव्हेंबर: सकाळ ड्रिलिंगचे काम सुरू असताना ऑगर मशीनच्या मार्गात स्टीलचे पाईप आले, त्यामुळे पाईप वाकले. बोगद्यात टाकण्यात येत असलेल्या पाईपचा स्टीलचा पाइप आणि वाकलेला भाग बाहेर काढण्यात आला. ऑगर मशिनही खराब झाले होते, तेही दुरुस्त करण्यात आले होते.
यानंतर, ऑगर मशीन पुन्हा ड्रिलिंगसाठी भंगारात टाकण्यात आले, परंतु तांत्रिक बिघाडामुळे बचाव पथकाला ऑपरेशन थांबवावे लागले. दुसरीकडे, एनडीआरएफने कामगारांना बाहेर काढण्यासाठी मॉक ड्रिल केले.
23 नोव्हेंबर: अमेरिकन ऑगर ड्रिल मशीन तीन वेळा थांबवावी लागली. संध्याकाळी उशिरा, ड्रिलिंग दरम्यान जोरदार कंपनामुळे, मशीनचा प्लॅटफॉर्म आत घुसला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत खोदकाम थांबवण्यात आले. यापूर्वी 1.8 मीटर खोदकाम करण्यात आले होते.
22 नोव्हेंबर: कामगारांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पाठवण्यात यश. सिल्क्यराने ऑगर मशिनद्वारे १५ मीटरपेक्षा जास्त ड्रिलिंग केले. कामगार बाहेर पडत असल्याचे पाहता 41 रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या. बोगद्याजवळ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. चिल्यानसौरमध्ये 41 खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले.
21 नोव्हेंबर : एन्डोस्कोपीद्वारे कॅमेरा आत पाठवण्यात आला आणि अडकलेल्या मजुरांचे छायाचित्र प्रथमच समोर आले. त्याच्याशीही बोलणे झाले. सर्व कामगार सुखरूप आहेत. नवीन 6 इंची पाइपलाइनद्वारे कामगारांपर्यंत अन्न पोहोचवण्यात यश आले. ऑगर मशीनने ड्रिलिंग सुरू केले.
केंद्र सरकारने तीन बचाव योजना जाहीर केल्या. प्रथम- जर ऑगर मशीनसमोर कोणताही अडथळा नसेल तर बचावासाठी 2 ते 3 दिवस लागतील. दुसरा- बोगद्याच्या बाजूने खोदकाम करून कामगारांना बाहेर काढण्यासाठी 10-15 दिवस लागतील. तिसरा- दांदलगावपासून बोगदा खोदण्यासाठी 35-40 दिवस लागतील.
20 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी उत्तरकाशी गाठून सर्वेक्षण केले आणि उभ्या ड्रिलिंगसाठी 2 जागा अंतिम केल्या. कामगारांना अन्न पुरवण्यासाठी नवीन 6 इंची पाइपलाइन टाकण्यात यश आले. ऑगर मशीनसोबत काम करणाऱ्या कामगारांच्या सुटकेसाठी रेस्क्यू बोगदा तयार करण्यात आला होता. BRO सिल्क्यराजवळ उभ्या ड्रिलिंगसाठी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करते.
19 नोव्हेंबर: सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी उत्तरकाशीला पोहोचले, त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि अडकलेल्या लोकांच्या कुटुंबियांना आश्वासन दिले. सिल्क्यरा एंड येथून दुपारी ४ वाजता पुन्हा ड्रिलिंग सुरू करण्यात आले. अन्न पोहोचवण्यासाठी आणखी एका बोगद्याचे बांधकाम सुरू झाले. बोगद्यात ज्याठिकाणी मलबा पडला होता तेथून छोटा रोबोट पाठवून अन्न पाठवण्याची किंवा बचाव बोगदा बांधण्याची योजना आखण्यात आली.
18 नोव्हेंबर : खोदकामाचे काम दिवसभर ठप्प राहिले. अन्नाअभावी अडकलेल्या कामगारांनी अशक्तपणाची तक्रार केली. पीएमओचे सल्लागार भास्कर खुल्बे आणि उपसचिव मंगेश घिलडियाल उत्तरकाशीला पोहोचले. पाच ठिकाणांहून खोदकामाचे नियोजन करण्यात आले.
17 नोव्हेंबर : सकाळी दोन मजुरांची प्रकृती खालावली. त्याला औषध देण्यात आले. दुपारी बारा वाजता हेवी ऑजर मशीनच्या मार्गात दगड आल्याने खोदकाम थांबले. बोगद्याच्या आत मशीनमधून 24 मीटर पाईप टाकण्यात आले. नवीन ऑगर मशीन इंदूरहून रात्री डेहराडूनला पोहोचले, जे उत्तरकाशीला पाठवण्यात आले. रात्री वरून बोगदा कापून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.
16 नोव्हेंबर: 200 हॉर्स पॉवर हेवी अमेरिकन ड्रिलिंग मशीन ऑगरची स्थापना पूर्ण झाली. रात्री 8 वाजता पुन्हा बचावकार्य सुरू झाले. रात्री बोगद्याच्या आत 18 मीटर पाईप टाकण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव कार्याचा आढावा बैठक घेतली.
15 नोव्हेंबर: बचाव मोहिमेचा भाग म्हणून काही वेळ ड्रिल केल्यानंतर ऑगर मशीनचे काही भाग खराब झाले. बोगद्याबाहेर कामगारांच्या कुटुंबीयांची पोलिसांशी झटापट झाली. बचावकार्यात दिरंगाई झाल्यामुळे ते संतप्त झाले. पीएमओच्या हस्तक्षेपानंतर दिल्लीहून हवाई दलाचे हरक्यूलिस विमान हेवी ऑगर मशीन घेऊन चिल्यानिसौद हेलिपॅडवर पोहोचले. हे भाग विमानातच अडकले, जे तीन तासांनंतर बाहेर काढता आले.
14 नोव्हेंबर : बोगद्यात सतत होणाऱ्या चिखलामुळे नॉर्वे आणि थायलंडच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. ऑगर ड्रिलिंग मशीन आणि हायड्रॉलिक जॅक वापरण्यात आले. मात्र सतत ढिगारा येत असल्याने 900 मिमी जाडीचे म्हणजेच सुमारे 35 इंचांचे पाईप टाकून कामगारांना बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली. यासाठी ऑगर ड्रिलिंग मशिन आणि हायड्रोलिक जॅकची मदत घेण्यात आली, मात्र ही यंत्रेही निकामी झाली.
13 नोव्हेंबर : सायंकाळपर्यंत बोगद्याच्या आत 25 मीटर खोल पाइपलाइन टाकण्यास सुरुवात झाली. ढिगारा पुन्हा आत आल्याने २० मीटरनंतर काम थांबवावे लागले. ऑक्सिजन, अन्न आणि पाणी पाईपद्वारे कामगारांना सतत पुरवले जाऊ लागले.
12 नोव्हेंबर : पहाटे 4 वाजता बोगद्यात ढिगारा पडण्यास सुरुवात झाली आणि पहाटे 5.30 पर्यंत मुख्य गेटच्या आत 200 मीटरपर्यंत मोठी रक्कम जमा झाली. बोगद्यातून पाणी काढण्यासाठी टाकलेल्या पाईपमधून ऑक्सिजन, औषध, अन्न आणि पाणी आत पाठवले जाऊ लागले. बचाव कार्यात एनडीआरएफ, आयटीबीपी आणि बीआरओ तैनात करण्यात आले होते. 35 अश्वशक्तीच्या ऑगर मशीनने 15 मीटरपर्यंतचा डेब्रिज काढण्यात आला.
पुण्यातील केवळ एकाच आमदाराकडून या प्रकारणाचा पुरेपूर पिच्छा:अन्य आमदार गप्प का ?
आतापर्यंत दहा पोलिस कर्मचारी आणि अधिकारी निलंबित
पुणे-ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 14 जणांना पोलिसांनी अटक केली असून ड्रग तस्करीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणात ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये कैद्यांची बडदास्त ठेवणारा आणि ललित पाटील याला सहाय्य करणारा कर्मचारी महेंद्र शेवते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे. शेवते याच्या अटकेमुळे ससून रुग्णालयातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील आठ आमदारांपैकी केवळ एकमेव काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर आरोप करत त्यांना सदर प्रकरणात आरोपी करा आणि अटक करा अशी मागणी करत या प्रकरणाचा पिच्छा पुरवला आहे. त्याचप्रमाणे ठाकूर यांना सहाय्य करणारा आणि कैद्यांशी सलोख्याचे संबंध ठेवणारा महेंद्र शेवते याच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ससून रुग्णालयातील कोणालाही अटक केली नव्हती. याच्या निषेधार्थ बुधवारपासून आमदार धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालय समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर लगेच शेवते याची अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.शेवते हा ससून रुग्णालयातील जुना कर्मचारी असून त्याच्या तपासामध्ये नेमके कोणत्या कोणत्या कर्मचारी आणि डॉक्टरांचे नावे निष्पन्न होतात हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. त्याच सोबत त्यानी नेमके पैसे कोणाकोणाला दिले ही देखील माहिती बाहेर येण्याची अपेक्षा आहे. याप्रकरणात अतातपर्यंत दहा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असून दोन पोलिसांना बडतर्फ करून अटक देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारत गेल्या काही वर्षांत चित्रपट निर्मितीमध्ये अधिक गुंतवणूक आहे, असे दिग्गज हॉलिवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माता मायकेल डग्लस यांनी आज गोव्यामध्ये आयोजित इफ्फी 54 मध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
54 व्या इफ्फी च्या समारोप समारंभात उद्या मायकेल डग्लस यांना प्रतिष्ठेच्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय चित्रपट उद्योगासाठी हा सर्वोत्तम काळ आहे, आणि इफ्फी 54 मध्ये 78 हून अधिक परदेशी देशांचे प्रतिनिधित्व हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. “भारतीय चित्रपट जगभर प्रसिद्ध आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचत आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,” .
जगाला एकत्र आणण्यामधील चित्रपटांची भूमिका अधोरेखित करताना डग्लस म्हणाले की चित्रपट समान भाषेची देवाण घेवाण करतात आणि आपल्याला एकमेकांच्या जवळ आणतात. “चित्रपटांमध्ये काय चालले आहे हे जगभरातील प्रेक्षक समजू शकतात. चित्रपट आंतरराष्ट्रीय संपर्क निर्माण करतात. हीच या उद्योगाची जादू, सौंदर्य आणि आनंद आहे आणि म्हणूनच मला हा व्यवसाय खूप आवडतो,” ते म्हणाले.
सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, दोन वेळा अकादमी पुरस्कार विजेते मायकेल डग्लस म्हणाले की हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे हा आपला मोठा सन्मान आहे. आपल्या महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींमध्ये रमताना त्यांनी सांगितले की त्यांनी सत्यजित रे यांच्या पथेर पांचाली आणि चारुलता सारख्या चित्रपटांचा त्यांच्या चित्रपट प्रशिक्षणा दरम्यान अभ्यास केला होता आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही त्यांच्यासाठी विशेष गोष्ट आहे. “रे यांचे चित्रपट खूप मनोरंजक होते आणि त्यांनी वास्तवाचे चित्रण केले. रे यांचे मोठेपण हे आहे की ते एकाच वेळी केवळ दिग्दर्शकच नव्हते तर लेखक, चित्रपट संपादक, आणि संगीतकारही होते,” त्यांनी विशेष नमूद केले.
ऑस्करमध्ये भारतीय चित्रपट आरआरआर ने मिळवलेल्या यशाची प्रशंसा करताना मायकेल डग्लस म्हणाले की, भारतासाठी ही एक नेत्रदीपक कामगिरी आहे आणि यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि भारतीय चित्रपट उद्योगाला असे अनेक मोठे चित्रपट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
आपले वडील, प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माते कर्क डग्लस यांच्याबद्दल बोलताना, पाच वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते मायकेल डग्लस म्हणाले की, आपल्या वडिलांच्या सावलीतून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागला. “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी साध्या भूमिका करत होतो. लोक माझी तुलना माझ्या वडिलांशी करायचे. वॉल स्ट्रीट चित्रपटासाठी अकादमी पुरस्काराचे नामांकन जिंकणे हा एक जबरदस्त क्षण होता. माझ्या सहकाऱ्यांकडून मिळालेले ते प्रमाणीकरण होते”, त्यांनी स्पष्ट केले.
In last few years, Under Prime Minister @narendramodi and Union Minister for I&B @ianuragthakur more money has been put into production & financing of the films
The beauty of this festival is that more than 78 foreign countries are represented and it's a reflection of strength… pic.twitter.com/lCGh4NHyku
बजेटपेक्षा आपल्याला चांगला आशय अधिक आवडतो, हे स्पष्ट करून, मायकेल डग्लस यांनी सांगितले की, चित्रपट निवडताना त्यांच्यासाठी आशयसंपन्न साहित्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. “भावनांना स्पर्श करणाऱ्या एखाद्या गोष्टीला मी प्राधान्य देईन. वाईट चित्रपटात मोठी भूमिका करण्यापेक्षा मी चांगल्या चित्रपटात छोटीशी भूमिका करेन,” ते म्हणाले. भारतीय चित्रपटात काम करण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल, डग्लस यांनी सांगितले की निर्माता शैलेंद्र सिंग त्यांना आवडलेल्या एका पटकथेच्या रुपरेषेवर ते काम करत आहेत.
मायकेल डग्लस यांची पत्नी आणि बहु-पुरस्कार विजेती अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भारत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप प्रिय आहे. भारताशी असलेला आपला संबंध स्पष्ट करत, त्यांनी एका भारतीय डॉक्टरचा उल्लेख केला, ज्याने त्या अठरा महिन्यांच्या असताना त्यांचे प्राण वाचवले होते. या बाफ्टा पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने भारतीय चित्रपटांबद्दलचे त्यांचे प्रेम देखील प्रकट केले आणि बॉलीवूड चित्रपटांचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय चित्रपटांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “द लंचबॉक्स हा माझ्या आवडत्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. मी तो लागोपाठ दोनदा पहिला. या चित्रपटाने मला खरोखरच स्पर्श केला.” त्यांनी बॉलीवूड चित्रपट ओम शांती ओम चाही उल्लेख केला, जो त्यांनी आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळींबरोबर अनेकदा पहिला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते आणि परसेप्ट लिमिटेडचे संस्थापक शैलेंद्र सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते. चित्रपट व्यवसायातील आपल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासावर व्यक्त होताना, “सिनेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे,” असे ते म्हणाले.
गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट निर्माते शेखर कपूर “मानवी सर्जनशीलता विरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावरील संवादात सहभागी झाले. या सत्राचे सूत्रसंचालन सुधीर मिश्रा यांनी केले. हा मास्टरक्लास इफ्फी आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या लता मंगेशकर स्मृती संवाद मालिकेचा भाग होता.
संवादाची सुरुवात करताना शेखर कपूर यांनी मानवी बुद्धिमत्तेच्या विशिष्ट गुणांवर भर दिला आणि लोकांना त्यांच्या हृदयातील बुद्धिमत्तेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. मानसिक बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्तेच्या महत्त्वावर भर देण्यासाठी त्यांनी बॉब डिलन यांचे वाक्य उद्धृत केले, “माझ्या सर्वोत्तम ओळी तितक्याच वेगाने लिहिल्या गेल्या जितक्या वेगाने माझ्या हाताने लिहिता येईल.”
त्यांनी अंतर्ज्ञान, निवड आणि लहरीपणा सारखे घटक अधोरेखित करत कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेवर ताबा मिळवण्याच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले , ज्यामुळे मानवी चैतन्य कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा आगळे ठरते. कृत्रिम बुद्धिमत्ता एखादी व्यवस्था मोडू शकते आणि जलद बदल घडवून आणू शकते याकडे लक्ष वेधत कपूर यांनी सर्जनशीलता आणि बदलांसोबत येणाऱ्या अज्ञात गोष्टी आणि भीती यांना जवळ करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
आपल्या चित्रपट सृष्टीच्या प्रवासाबद्दल बोलताना कपूर यांनी अज्ञाताची भीती आणि गूढतेची कल्पना कलात्मक प्रयत्नांना कशी चालना देते ते स्पष्ट केले. “मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करायची भीती वाटते. म्हणूनच माझे सर्व चित्रपट वेगवेगळ्या शैलीचे आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता गोंधळ निर्माण करत नाही, मात्र बदल अविश्वसनीय वेगाने होत आहेत आणि मनुष्य ते हाताळू शकत नाही असे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ताचे वर्चस्व असलेल्या जगात, कलाकार आणि तत्त्वज्ञांनी नेतृत्व करायला हवे कारण ते गोंधळाची स्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. अवास्तव कारण शोधण्यातील कलेच्या भूमिकेवर भर देत “सर्व कला या आत्म-शोधाची एक सर्जनशील कृती आहे” असे सांगून त्यांनी तात्विक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले.कृत्रिम बुद्धिमत्ताचा जलद अवलंब याबाबत बोलताना कपूर यांनी त्याची अपरिहार्यता आणि समाजांनी त्याच्या शक्यतांवर विचार करण्याची गरज मान्य केली. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनात्मक स्वरूपाचे स्वागत केले आणि अशा भविष्याची कल्पना केली जिथे तर्क आणि कारण सर्जनशीलतेला वाव देतात. कपूर यांनी बदलाची आवश्यकता लक्षात घेऊन, अस्तित्वाच्या परिदृश्यात निर्मिती आणि विनाशाच्या चक्रीय स्वरूपावर भर दिला.
“भारतीय चित्रपटसृष्टीच्या गतकाळातील अभिनेत्रींनी साकारलेल्या सर्व अपवादात्मक भूमिका आणि आणखी काही करण्याची त्यांची मनीषा, याने आम्हाला अशा टप्प्यावर पोहोचण्याचे बळ दिले आहे, जिथे आम्ही चित्रपटांमधून महिला-केंद्रित कथा सांगत आहोत.” अभिनेत्री विद्या बालन यांनी आज गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विमेन अँड द ग्लास सीलिंग’ या विषयावरील संवाद सत्रात सांगितले.
विविध पात्रे साकारण्याची तिची इच्छा प्रकट करताना, या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने सांगितले की, प्रेक्षकांशी नाते जोडू शकतील अशा नवीन कथा आणि पात्रांचा सातत्त्याने शोध घेणे जे अत्यंत महत्वाचे आहे. “अपारंपरिक भूमिका आणि ती पात्रे साकारताना ती जगणे, ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे”, त्या म्हणाल्या.
प्रत्येक चित्रपटात बहुपेडी व्यक्तिरेखा साकारण्याच्या आपल्या प्रेरणेबद्दल बोलताना ही अभिनेत्री म्हणाली की, अकल्पनीय भूमिका साकारण्याची आणि भारतीय चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखांची स्टिरियोटाइपिंग (गृहीत धरण्याची प्रथा) मोडण्याची इच्छा त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. “मी करत असलेल्या प्रत्येक चित्रपटात कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची कल्पना मला आवडते आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते जी गोष्ट मला मुक्तता देणारी आहे,”, विद्या बालन म्हणाल्या.
भारतीय चित्रपटातील महिलांच्या चित्रणाचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना विद्या बालन म्हणाल्या की, आपल्या समाजात रुजलेल्या स्त्रियांबद्दलच्या रूढीवादी कल्पना आपण सर्वांनी दूर करायला हव्यात. “आजच्या जगात स्त्रिया काळाच्या खूप पुढे आहेत”, अभिनेत्रीने अधोरेखित केले.
आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत, या अभिनेत्रीने परिणीता, भूल भुलैया, पा, कहानी, द डर्टी पिक्चर, शकुंतला देवी, शेरनी आणि जलसा यांसारख्या चित्रपटांमधील अपारंपरिक भूमिका मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील स्त्री व्यक्तिरेखांचे स्वरूप बदलून टाकले आहे.
मुंबई-उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबईत श्रीमद राजचंद्र जयंती – ‘आत्मकल्याण दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले आणि श्रीमद राजचंद्रजींच्या प्रतिमेचे अनावरण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना धनखड म्हणाले की, येथे येऊन मी धन्य झालो आहे. गुरुदेव राकेश जी यांचे आशीर्वाद सदैव माझ्या स्मरणात राहतील.
उपराष्ट्रपती म्हणाले की, गेल्या शतकातील महापुरुष महात्मा गांधी होते आणि या शतकातील युगपुरुष नरेंद्र मोदी आहेत. महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक शतकांपासून आपल्याला देशाला ज्या मार्गावर बघायचे होते त्या मार्गावर आणले आहे. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन महान व्यक्तींमध्ये एक साम्य आहे,आणि ते साम्य म्हणजे या दोघांनाही श्री राजचंद्रजींचा मनापासून आदर आहे. राजचंद्रजीं सारखे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व इतिहासात सापडणे कठीण आहे.
मैं आपको एक बात कहना चाहूंगा, पिछली शताब्दी के महापुरुष महात्मा गांधी थे, इस शताब्दी के युगपुरुष नरेंद्र मोदी हैं!
महात्मा गांधी ने सत्य और अहिंसा से हमें अंग्रेजों की गुलामी से छुटकारा दिलाया, भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने देश को प्रगति के उस रास्ते पर डाल… pic.twitter.com/mBP7zxIs0C
ते पुढे म्हणाले की, श्रीमद राजचंद्र मिशन लाखो लोकांचे जीवन सुखकर करत आहे, लोकांचे जीवन बदलत आहे, हे मिशन मानव कल्याणाचे स्तुत्य कार्य करत आहे यात शंका नाही. भारत ही शतकानुशतके महापुरुषांची जननी आहे. भारत हे जागतिक संस्कृतीचे केंद्र आहे. भारतीय संस्कृती 5000 वर्षांहून अधिक जुनी आहे. जगात असा कोणताही देश नाही की ज्याची संस्कृती आपल्या देशाइतकी प्राचीन आणि समृद्ध आहे. ते म्हणाले की, आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य बघा , श्रीमद राजचंद्रजींची जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि प्रकाश पर्व,या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्या असून आपल्या संस्कृतीचे वैभव दर्शवतात.
India is the epicenter of culture, it is the nerve-centre of culture, we have civilizational ethos of more than 5000 years!
आध्यात्मिक ज्ञान आणि संस्कृती ही आपली ताकद आहे, जगातील मोठमोठ्या देशांमधून लोक शांततेच्या शोधात आपल्या देशात येतात आणि हे पाहून खूप समाधान वाटते. अनेक शतकांपासून भारत हा संस्कृती आणि सभ्यतेचा केंद्रबिंदू आहे. ते म्हणाले की, पृथ्वी ही केवळ मानवांसाठी नाही, ही पृथ्वी सर्व प्राणिमात्रांसाठी आहे, वसुधैव कुटुंबकमचे ब्रीदवाक्य एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य यामध्ये ते अंतर्निहित आहे.
Our spinal strength will always be our spirituality!
स्टीव जॉब्स जैसे लोग, जिन्हें हमारे युवा अपना icon मानते हैं, वे भी शांति की खोज में इस देश मे आये थे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा आणि महिलांना दिलेल्या आरक्षणाचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले की, राजचंद्रजी आणि महात्मा गांधीजी आज प्रत्यक्ष उपस्थित असते तर त्यांनीही या कार्यक्रमांची प्रशंसा केली असती. महिला आरक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल घडून त्यांना त्यांचे हक्क मिळतील, असे ते म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्याग केला त्या सर्वांची दखल घेऊन, त्यांना शोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काळात महान कार्य केले आहे, असे उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. भारताची आज जगात एक वेगळी ओळख आहे, भारत हा 140 कोटी लोकसंख्येचा प्रतिभावान देश आहे, ते म्हणाले.
धनखड यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना इशारा देताना सांगितले की, शिक्षण, समानता आणि चांगल्या वागणुकीमधून देशात बदल घडून येतो. रस्त्यावरील आपली वागणूक कायद्याचे पालन करणारी असेल तर भारत बदलल्याचे जगाला दिसेल, असे सांगून ते पुढे म्हणाले की, मुंबई शहर रस्त्यांवरील शिस्तीसाठी ओळखले जाते.
उपराष्ट्रपती म्हणाले की, लोकशाहीच्या ज्या मंदिरांमध्ये वाद-विवाद, चर्चा आणि विचारमंथन यांच्या परंपरेने भरभराट व्हायला हवी, तिथे गोंगाट आणि व्यत्यय येतो. संविधान सभेचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, संविधान बनले तेव्हा संविधान सभेत तीन वर्षे चर्चा झाली, मतभेदाचे मुद्दे होते, पण कोणत्याही प्रकारचा गदारोळ झाला नाही, कोलाहल झाला नाही, कोणीही हौद्यात उतरले नाही, की कोणीही फलक झळकावले नाहीत.
आज भारत जगात वेगाने विकसित आहे, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने पाचवे स्थान मिळवले आहे, ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आहे आणि 2030 पर्यंत जपान आणि जर्मनीलाही तो मागे टाकेल.
यह पृथ्वी, सिर्फ मनुष्य मात्र के लिए नहीं है, यह planet हर living being के लिए है!
ते पुढे म्हणाले की, आज भारतातील लोक जगभरातील 20 मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. भारत जलद गतीने विकास साधत आहे. जमिनीवर, सागरात आणि नभात तिन्ही ठिकाणी वेगाने प्रगती करत आहे. ते म्हणाले की, एखादा देश किंवा व्यक्ती खूप पुढे जाते, तेव्हा काही लोक विरोधात येतात, काही शक्ती आपल्या देशाचा विकास थांबवतात, काही शक्तींना आपल्या देशाचा विकास पचवता येत नाही, देशात कुठलेही चांगले काम झाले की ते वेगळ्याच दिशेने जातात, असे होता कामा नाही, अशा परिस्थितीत तुमच्यासारख्या सुज्ञ लोकांनी गप्प बसता कामा नाही. हे संकट फार मोठे आहे, ते छोटे नाही, त्याचा फटका देशाला सहन करावा लागत आहे.
देशात असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे, आपण एक अशी संस्कृती विकसित करूया ज्यामध्ये सर्वजण राष्ट्र सर्वोच्च स्थानावर ठेवतील.आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगायला हवा, आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा आपल्याला अभिमान हवा,आपण ज्या गोष्टींची कधी कल्पनाही केली नव्हती अशा गोष्टी आज वास्तवात साकारल्या आहेत. श्रीमद राजचंद्र मिशनद्वारे चालवण्यात येणाऱ्या कल्याणकारी कार्याची प्रशंसा करत आभार व्यक्त करून उपराष्ट्रपतींनी संबोधनाचा समारोप केला.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस,महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा,श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे प्रमुख गुरुदेव राकेश जी , मिशनचे उपाध्यक्ष आत्मर्पित नेमीजी, महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ठाणे : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दि. 4 जून 2023 रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असे वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून 90 दिवसात वसतिगृहाचे पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाचे कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात, तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
वसतिगृहाचे उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देवून या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. त्या मातांशी त्यांनी संवादही साधला.
याप्रसंगी, आयुक्त श्री. बांगर यांनी दोन्ही प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. तसेच, विद्यार्थी प्रतिनिधींनी पत्र रुपाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत आढळून येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करुन शहरातील गर्भवती महिला, नवजात शिशू यांना उत्तम प्रतीच्या अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना’ सुरू केली आहे.या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
१. या योजनेत प्रसुतीगृहांचे बळकटीकरण करुन दिवस-रात्र तातडीची सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जेणेकरुन माता मृत्यू दर कमी होणेस मदत होईल.
२. महानगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाव्यतिरिक्त कोपरी प्रसुतीगृह येथे 18 खाटांचे एसएनसीयू तयार करणे. यामुळे अर्भक मृत्यू दर कमी करणेस मदत होईल.
गरोदर माता12आठवडयाच्या आतील नोंदी, अति जोखमीच्या मातांची विशेष काळजी, रक्तक्षय असणा-या मातांचा पुन: तपासणी इत्यादी करिता आशा स्वयंसेविकांसाठी अतिरिक्त कामावर आधारित मोबदला देणे.
जोखमीच्या गरोदर मातांना पोषण आहाराकरिता अनुदान देऊन मातेची व बाळाची पोषण विषयक स्थिती सुधारणे.
महापालिकेचे प्रसुतीगृह व रुग्णालयांमध्ये प्रसुत होणाऱ्या मातांना मातृत्व भेट म्हणून उपयोगी वस्तूंचे संकलन करुन एक किट देणे. सदर किटचा वापर प्रसुतीपश्चात मातेची व बाळाची काळजी घेण्यास होईल. याप्रमाणे एक वर्ष कालावधीसाठी एकूण10हजार प्रसूतींकरिता सदरचे किट मातृत्व भेट म्हणून देण्यात येईल.
शहराच्या विशिष्ट प्रभागांमध्ये नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पुरुष स्वयंसेविकांना मोबदला अदा करणे.
महापालिकेच्या कॉल सेंटरव्दारे गरोदर मातांना संपर्क करुन त्यांनी घ्यावयाची काळजी,औषधे,चाचण्या लसीकरण तसेच बालकांचे लसीकरण याबाबत माहिती उपलब्ध करुन देणे.
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात दिलेल्या भेटीत वसतिगृहाची दुरवस्था पाहून तेथील मुलांशी संवाद साधून सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. सद्य:स्थितीबाबत सर्व प्रशिक्षणार्थींनी वसतीगृह तसेच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देवून अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे नमूद केले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतीगृहाच्या इमारत नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आणि काम सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत या वसतिगृहाचे पूर्ण रूप पालटून टाकण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 11 कोटी रुपये खर्च आला. वसतिगृहाचे काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम, स्लॅब आदीची डागडुजी सर्वोच्च दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. प्रत्येक खोलीत दोन बेडस्, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे वसतीगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये भरपूर उजेड येईल अशी रचना केली आहे. मोकळ्या जागेतील प्रकाश व्यवस्था, रुममधील फरशी, रंग याबाबतची निवड काळजीपूर्वक करण्यात आली आहे. त्यासोबत, या इमारतीच्या तळमजल्यावर उत्तम सुविधांनी युक्त व्यायामशाळा आणि अद्ययावत कॅन्टीन तयार करण्यात आले आहे.
ठाणे :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली.
येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली.
७०१ कि.मी लांबीपैकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समूद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता. इगतपुरी (६०० कि.मी.) वाहतूकीस खुला झाला आहे. हजारो वाहने समृद्वीचा प्रति दिन वापर करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी १५ महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती. त्यानुषंगाने महामंडळाकडून १५ स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह-व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, सह – व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड व पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस पथक) अरविंद साळवे, नरेश म्हस्के व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
७०१ कि.मी लांबीपैकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता इगतपुरी (६०० कि.मी) वाहतुकीस खुला आहे. आतापर्यंत अंदाजे ५७ लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर असून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महामार्गावरील घटनांबाबत सेंट्रल कंट्रोल रुम स्थापित केले असून त्याद्वारे शीघ्र प्रतिसाद वाहने, १०८ रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इत्यादींना अपघातांची / इतर घटनांची सूचना देण्यात येते. जेणेकरून घटनास्थळी जलदगतीने मदत पोहोचविणे सोयीचे होते. प्रवाशांना तातडीने मदत मिळण्याकरिता महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक लावण्यात आले आहेत.याशिवाय, समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन ( Incident Management) सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड आपरेटिंग प्रोसिजर ( SOP) तयार केलेली असून त्याचप्रमाणे घटना व्यवस्थापन प्रतिसाद प्रणाली मार्फत कामकाज पाहिले जाते.
याव्यतिरिक्त रहदारी व घटना नियंत्रणासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम ( ITS) महामार्गावर स्थापित केली जाणार आहे. महामार्गावरील चालकाचे लक्ष वेधण्यासाठी प्रति २५ कि.मी वर रम्बर्लस स्ट्रीप, जागोजागी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे व विविध शिल्प उभारण्यात आले आहेत. तसेच पथकर नाक्यावर वेग मोजण्याचे भोंगे ( Hooters) लावण्यात आले असून त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणारी वाहने ओळखून त्या चालकाचे प्रादेशिक परिवहन (RTO) विभागामार्फत समुपदेशन केले जाते.
महामार्गावर बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली असून वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये – जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने – २१, रुग्णवाहिका – २१, ई.पी.सी गस्त वाहने – १४, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रे- १३, ३० टन क्षमतेची क्रेन – १३, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत – १४२ सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.
ठाणे : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक ३७७ मौजे पाचपाखाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता सदनिकेच्या चाव्यांचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नरेश म्हस्के व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महानगर प्रदेश प्राधिकरण (MMR) चे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्याने ठाण्यातील गरजूंना लवकर घरे मिळतील. संपूर्ण एमएमआर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले. शासनाची महत्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू करण्यात आली असून 10 हजार घरांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करीत आहोत. नियम-कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करीत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे.
ते पुढे म्हणाले, श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या प्रकल्पात 400 घरे, 100 दुकाने आहेत. याशिवाय व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही आहेत. या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राहणे, येथील परिसर स्वच्छ ठेवणे, ही येथील सर्वांची जबाबदारी आहे. वातावरण चांगले ठेवले की सर्वच चांगले होते. समरीन ग्रुप ने वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक श्री. मुश्ताक शेख यांचे अभिनंदन करुन मुंबई-ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचेही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,ठाणे या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकेच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.