४२% भारतीय घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक समारंभ अर्धवट सोडून येतात

Date:

मुंबई, २४ नोव्हेंबर, २०२३: भारतात घर हे लोकांच्या जीवनाचे केंद्र असते. भारतीय हे उत्सव प्रिय असल्याने सातत्याने बाहेर सार्वजनिक समारंभ, उपहारगृह, थिएटर किंवा मैफिलीमध्ये सहभागी होत असतात. मात्र घराबाहेर असताना आपल्या घराच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या मनात कायम एक पुसटशी भीती देखील असते. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉइसचा एक व्यवसाय गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सने केलेल्या ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या नवीन संशोधनानुसार हे समोर आले आहे. मोकळेपणाने व निर्भयतेने राहता यावे म्हणून घराच्या सुरक्षिततेसाठी भारतीय करत असलेल्या तंत्रज्ञानाच्या निवडीबद्दल आणि भारतीयांची जीवनशैलीबद्दल हा अभ्यास नवीन माहिती देतो.

     या संशोधनातून समोर आलेली एक महत्त्वाची माहिती म्हणजे, सर्वेक्षणातील ४२% प्रतिसादकांनी सांगितले की, ते एखाद्या समारंभात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात असताना आपल्या घराच्या किल्ल्यांची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा किल्ल्यांसंबंधी काही समन्वय साधण्यासाठी कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परत आले आहेत. यावरून हे दिसून येते की, घरात जाण्यासाठी लोकांना बऱ्याचवेळा इतरांवर अवलंबून रहावे लागते आणि त्यासाठी कधीकधी अगदी कार्यक्रम सोडून घरी  जाणे देखील त्यांना भाग पडते.

     एका लोकप्रिय इव्हेंट टिकिट पोर्टलनुसार, साल २०२२ मध्ये जवळपास १९,००० मनोरंजनात्मक कार्यक्रमांमधून सुमारे ८ दशलक्ष लोक बाहेर पडले. ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या अभ्यासाने दिलेली माहिती या पोर्टलच्या   माहितीशी पूरक आहे; कारण या संशोधनानुसारदेखील ५४% प्रतिसादकांनी रात्री

उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मध्यरात्री अतिरिक्त किल्ली घेण्यासाठी त्यांना त्रास देण्याच्या कल्पनेबद्दल  अस्वस्थता व्यक्त केली. याशिवाय, ४१% प्रतिसादकांनी सांगितले की, घरात नसताना जर अचानक त्यांच्या लक्षात आले की गॅस किंवा गिझर चालू आहे तर ते ताबडतोब घरी परत येतील.

     गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टम्सनेचे व्यवसाय प्रमुख श्री. श्याम मोटवानी यांच्या मते, ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ च्या संशोधनातून समोर आलेली ही प्राथमिक माहिती, ग्राहकांच्या त्यांच्या घरासंबंधी असलेल्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या पैलुबाबत म्हणजेच घरच्या सुरक्षिततेबाबत  काय भावना आहेत या विषयावर प्रकाश टाकते. या संशोधनातील माहितीने  घराच्या सुरक्षेबाबत लोकांचे काय प्रश्न आणि काय अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यांना कसे पूर्ण करू शकतो हे आम्हाला स्पष्टपणे दाखवले आहे. भारतीय आपल्या घराच्या सुरक्षेसाठी अजूनही बाह्य घटकांवर अवलंबून आहेत हे जरी स्पष्ट दिसून येत असले तरी आता ते आजच्या धावपळीच्या जगात शांत, चिंतामुक्त आणि मनमोकळे जगता यावे म्हणून विश्वसनीय तांत्रिक उपाय सुद्धा शोधत आहेत. ‘विश्वास’ या शब्दाचा जणू समानार्थी शब्द म्हणजे गोदरेज लॉक्स. या गोदरेज लॉक्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार घराच्या सूरेक्षेचे नवीन, अत्याधुनिक, डिजिटल उपाय विकसित करतो; जे आमच्या ग्राहकांना सुविधा आणि सुरक्षितता दोन्ही देतात आणि त्याचबरोबर त्यांना चिंतामुक्त मनमोकळे जगण्याची मुभा देखील देते.

     सुविधा आणि सुरक्षितता मिळविण्यासाठी माणसे स्मार्ट होम उपकरणांचा अवलंब करताना नेमके कसे विचार करतात आणि कसे वागतात हे समजून घेणे हे ‘सुरक्षित रहा, मनमोकळे जगा’ या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. हे सर्वेक्षण मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर आणि भोपाळ या ५ शहरांमधील २००० लोकांना घेऊन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठाकरेंचे 6 खासदार फुटले, लोकसभा अध्यक्षांची स्वतंत्र गटाला मंजुरी!

नवी दिल्ली- उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा...

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू

~ लाँच ऑफर: शून्य लॉगइन फी आणि ५० लाख रूपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजूरी ~ पुणे: आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने संपूर्ण भारतात वितरण नेटवर्कचा विस्तार करण्याच्या आपल्‍या व्यापक योजनेचा भाग म्हणून पुण्‍यातील वाकड येथे नवीन शाखा सुरू केली आहे, ज्‍यासह महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवला आहे. या नवीन शाखेसह, एबीएचएफएलचे महाराष्ट्रातील एकूण नेटवर्क आता ३५ शाखांवर पोहोचले आहे, ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील त्‍यांची उपस्थिती दृढ झाली आहे, तसेच ग्राहकांसाठी उपलब्धता अधिक सोपी झाली आहे. आयटी (माहिती तंत्रज्ञान), उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील प्रबळ उपस्थिती, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास आणि विस्तारत चाललेली शहरी कनेक्टिव्हिटी यामुळे पुणे हे भारतातील सर्वात गतिमान निवासी बाजारपेठ राहिले आहे. पहिल्यांदाच घर खरेदी करणारे ग्राहक, पगारदार, स्वयंरोजगार असणारे व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी कुटुंबं, जी परवडणाऱ्या, अनौपचारिक आणि प्राईम हाउसिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये घरांचा शोध घेत आहेत, त्यांच्याकडून गृहखरेदीसाठी सातत्याने मागणी दिसून येत आहे. आपल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांच्या गरजेनुसार तयार केलेल्या गृहनिर्माण वित्त पुरवठा पर्यायांची (हाउसिंग फायनान्स सोल्युशन्स) उपलब्धता अधिक सहजसाध्य करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वैविध्यपूर्ण गृहखरेदीच्या गरजा अधिक सुलभतेने आणि सहजतेने पूर्ण करता येतील. एबीएचएफएल परवडणारी घरे, प्राईम हाऊसिंग, कन्स्ट्रक्शन फायनान्स आणि मालमत्तेवर कर्ज यांसह विविध ग्राहक घटकांसाठी तयार केलेल्या हाऊसिंग फायनान्‍स सोल्‍यूशन्‍सची व्‍यापक श्रेणी देते. हे सोल्‍यूशन्‍स पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार व्यावसायिक, स्वयंरोजगार बिगर-व्यावसायिक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटांच्या गरजा पूर्ण करतात. प्रबळ डिजिटल परिसंस्थेच्या पाठबळासह एबीएचएफएल विनासायास ऑनबोर्डिंग, जलद मंजूरी आणि सुधारित पारदर्शकता प्रदान करते, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो. या लाँचच्या निमित्ताने, एबीएचएफएल शून्य लॉगइन फी सोबत ५० लाख रूपयांपर्यंतचे स्पॉट लोन सॅंक्शन (तात्काळ कर्ज मंजुरी) ऑफर करत आहे. ही ऑफर १७ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत वैध असेल, ज्यामुळे या नवीन शाखांमधील ग्राहकांना जलद आणि अधिक परवडणाऱ्या दरात कर्ज मिळवणे शक्य होईल. या विस्तारीकरणाबाबत मत व्‍यक्त करत आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील प्रबळ मागणी आणि वाढत्या महत्त्‍वाकांक्षा पाहता ग्राहकांशी संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमच्या वाढत्या वितरण नेटवर्कला प्रबळ डिजिटल क्षमतेची जोड देऊन ग्राहकांसाठी घर खरेदीचा प्रवास सोपा, जलद आणि त्रासरहित बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” आपल्या ‘हॅपी होम लोन जर्नी’ या आश्वासनाशी सुसंगत असलेला हा विस्तार एबीएचएफएलचे ग्राहक-केंद्रितता, जबाबदार कर्ज वाटप आणि वैविध्यपूर्ण व सखोल रिटेल पोर्टफोलिओच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला गती देण्यावर असणारा निरंतर भर सादर करतो.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही-केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश पुणे -ऐतिहासिक वारसा...