पुणे: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.) मुंबई मार्फत राबविल्या जाणाऱ्या सन 2017-19 या शैक्षणिक वर्षात मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य (60 टक्के पेक्षा जास्त) गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पां.भ.गिऱ्हे यांनी केले आहे.
विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ(मर्या.,)424, मंगळवार पेठ, पुणे येथे साध्या कागदावर फोटो लावून अर्ज (भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा), जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड (शिधापत्रिका) छायांकीत प्रत, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा या कागदपत्रांसह सादर करावा. तसेच मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वयंसाक्षांकित करुन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.,)424, मंगळवार पेठ, पुणे या कार्यालयाकडे 10 जुलै 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.