पुणे, :- कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व गट यांना दरवर्षी शासनातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभुषण, वसंतराव नाईक शेतीमित्र
आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण व आदिवासी गट) पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या कृषि विभागातील सर्व संवर्गातील
अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतीवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
कृषि पुरस्कार सन 2016 साठीच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचना कृषि विभागाच्या संकेतस्थळावर (www.mahaagri.gov.in)ú उपलब्ध आहेत. कृषि पुरस्कारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराची संख्या एक आहे. कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रीया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या शेतकरी अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो. रोख रुपये 75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार), स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराची संख्या दहा आहे. कृषि, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, फलोत्पादन व ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात
उल्लेखीनय कार्य करणाया शेतकरी / संस्था/ गटांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रोख रुपये 50,000/- (रुपये पन्नास हजार), स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिजामाता कृषिभुषण पुरस्काराची संख्या पाच आहे. शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण
करण्याकरीता या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रोख रुपये 50,000/- (रुपये पन्नास हजार), स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराची संख्या तीन आहे. ज्या व्यक्ती /संस्था शेती, पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने कृषि क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणा-या शेतक-यांना/व्यक्तींना / संस्थांना या पुरस्काराने सन्मानित
करण्यात येते. रोख रुपये 30,000/- (रुपये तीस हजार), स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराची संख्या पंचवीस आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर, शेती पुरक व्यवसाय, स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व इतर शेतक-यांना शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनकरणा-या सर्वसाधारण एकोणीस व आदिवासी गटांतील सहा शेतकऱ्यांना/संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रोख रुपये 11,000/- (रुपये अकरा हजार), स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्काराची संख्या दोन आहे. राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाया कृषि विभागातील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास हा
पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारांकरिता पात्र शेतकरी व संस्थांनी कृषि विभागाच्या मंडळ / तालुका / उपविभागीय / जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधून नियोजित वेळेत आपले परिपुर्ण प्रस्ताव संबंधित तालुका स्तरावर सादर करावेत असे आवाहन कृषि उपसंचालक (माहिती), पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.