पुणे – बांधकाम क्षेत्रात बदलाचे वारे वाहत असून शासन स्तरावरदेखील नियम व प्रक्रियेमध्ये अनेक बदल होत आहेत. सद्यस्थितीत भारतात साडेसात लाख कोटींचे बांधकाम सुरु असून त्यातील ८६ टक्के रहिवासी व १४ टक्के व्यवसायिक बांधकाम आहे भारतातील ९२ टक्के जनता हि मेट्रो शहरांव्यतिरिक्त अन्य शहरात राहत असून या शहरांमध्ये फक्त ४० टक्के बांधकाम झाले असल्याने सर्व बांधकाम व्यावसायिकांना मोठी संधी आहे क्रेडाईच्या माध्यमातून सर्व बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन अडचणींमधून मार्ग काढण्याची विनंती सरकारला केल्यास बांधकाम व्यवसायाला उज्ज्वल भविष्य असल्याचे मत मान्यवरांनी समारोपाच्या दुसऱ्या दिवशी व्यक्त केले.
क्रेडाई महाराष्ट्र तर्फे नाशिकमध्ये आयोजित ‘महाकॉन २०१८’ या वार्षिक परिषदेची सांगता झाली. यात ५१ शहरातून १००० हून अधिक विकसक उपस्थित होते.माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष कटारिया यांनी दिली
महाकॉन मधील प्रत्येक सत्र हे विकसकांसाठी उपयुक्त ज्ञान मिळवण्याची पर्वणीच ठरला असल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली.
या परिषदेत मुंबईतील लोढा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर, अध्यक्ष जक्षय शहा, उपाध्यक्ष बोमन इराणी, माजी चेअरमन इरफान रझाक, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख एस.चोकलिंगम , ऍनॉरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट अध्यक्ष अनुज पुरी, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, महाकॉनचे समन्वयक गिरीश रायबागे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल हे उपस्थित होते.
बांधकाम क्षेत्रात ब्रँड चे महत्व सांगताना गीतांबर आनंद, इरफान रझाक,सुहास मर्चंट,सतीश मगर उपस्थित विकसकांना मार्गदर्शन केले. दर्जा आणि विश्वास या सोबतच योग्य संवाद हे ब्रँड बनवण्याचे गमक असल्याचे नमूद केले. याशिवाय क्रेडाई नैशनलचे जक्षय शहा क्रेडाई मुळेच व्यवसाय बहरला हे देखील आवर्जून सांगितले
आम्ही लैंड टायटल इंशुरन्सच्या विरोधात नाही पण त्याची प्रिमियमची किंमत अतिशय अवास्तव असल्यामुळे ती कमी करणे गरजेचे आहे शिवाय त्यात स्पष्टता आणणे आवश्यक आहे .याशिवाय क्रेडाई या मुद्द्यांविषयी विमा नियामक केंद्र आणि राज्य सरकारकडे जाणार असल्याचे मत कटारिया यांनी मांडले.
यावेळी क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद यांनी लिहिलेल्या ‘परवडणारी घरे’ या विषयावरील बुलेटीनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.