पुणे-शहरातील हेल्मेट सक्ती चा कायदा रद्द करण्यासाठी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आश्वासन दिले आहे.त्यामुळे ‘’ हेल्मेट दंड भरणाऱ्यानो भाजपला धडा शिकवा ‘’असे आवाहन माजी महापौर अंकुश काकडे , शांतीलाल सुरतवाला,आणि माजी उपमहापौर डॉ .सतीश देसाई यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि,पुणे आधी टांग्याचे, मग सायकलींचे आणि आता स्वयंचलित २५ लाख दुचाकीचे महानगर आहे. अचानक पुणेकरांवर हेल्मेट सक्तीचा वरवंटा फिरवण्यात आला. कोणतेही प्रबोधन, प्रचार आणि प्रसार न करता पोलीस
दलाकडून पुण्याच्या दुचाकी स्वरांची पिळवणूक करण्यात आली. कोट्यावधी रुपयांची लुट केली जात असताना
पुण्याचे पालक मंत्री मात्र डोळे मिटून पुणेकरांचे हाल पाहत होते. शहराबाहेर स्टेट आणि नॅशनल हायवेवर
सक्ती गरजेची आहे मात्र पुण्याचे अरुंद रस्ते, अत्यंत धीम्या गतीने ताशी १० की. मी. वेगाने चालणारी वाहतूक
यामुळे हेल्मेट डोके वाचवण्याऐवजी डोकेदुखी ठरते. पुणेकरांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तरुण–तरुणी,
मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचेच याबाबत एकमत आहे.
२३ एप्रिल २०१९ ची लोकसभेची निवडणूक हि पुणेकरांना आलेली पर्वणी आहे. राष्ट्रपिता म. गांधीनी
सांगितलेले सविनय कायदेभंगाचा मार्ग हेल्मेट बाबत पुणेकर आचरणात आणत आहेत. ज्या ज्या पुणेकरांचे
हेल्मेट सक्तीवरून खिसे कापण्यात आले त्या त्या पुणेकरांच्या समोर निष्क्रिय गिरीश बापटांना घरी बसवण्याची
संधी आली आहे. ३ लाख पुणेकरांना दंड झाला. हा कायदा संसदेने केला असल्यामुळे पुणेकरांनी संसदेत
पाठवल्या नंतर प्रसंगी खासगी विधेयक मांडून शहरात हेल्मेट सक्तीचा कायदा रद्द करेन, असे कॉंग्रेस
-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांनी सांगितले आहे.