पुणे-लष्कर परिसरातील म.गांधी रस्त्यावरील ट्राय लक हॉटेल चौक,येथून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली व अखिल भारतीय काँग्रेसच्या चिटणीस श्रीमती सोनल पटेल व राष्ट्रवादीच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅम्प परिसरातील व्यापाऱ्यांना व जनतेला गुलाब पुष्प देऊन सकाळी ९. ०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आपले व्यवसाय बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले .या मोर्चाला दुपारी साडेबारावाजता प्रारंभ झाला .
ह्या वेळी बोलताना पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले कि अच्छे दिनचे आश्वासन देणारे मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सातत्याने पेट्रोल, डिझेल व गॅस चे दर वाढत असल्यामुळे जीवनावश्य वस्तूंची किंमत वाढायला लागली आहे. सामान्य माणसांना जगणे कठीण झालेले आहे. लोकांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष्याने आज बंदचे आव्हान केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतन तुपे म्हणाले कि मोदी सरकार गोरगरिबांच्या हितासाठी नाही केवळ अंबानी व अदाणी सारख्या उदोगपतींच्या हितासाठी काम करतात. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत जनता ह्या जुमला सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
अखिल भारतीय काँग्रेसच्या चिटणीस श्रीमती सोनल पटेल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या २००४ च्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी भारतीय जनता पक्ष्याने अनेक आश्वासने दिली होती परंतु जनतेच्या हितासाठी काही केले नाही. नोटबंदी व जी.एस.टीमुळे बाजारात मंदि आहे. अनेक कारखाने बंद झाले आहे. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत, शेतकरी हवालदिल झालेला आहे. अश्या परिस्थितीत पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ करून मोदी सरकार जनतेची पिळवणूक करीत आहे. जनतेच्या वेदना व आक्रोश सरकारपर्यंत पोचावा म्हणूनच काँग्रेस पक्ष्याने आज देशव्यापी बंद पुकारलेला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली. चुकीच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय रुपयाची किंमत डॉलर पेक्ष्या दिवसनुदिवस कमी होत चाललेली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी मोदी सरकार पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या कच्या तेलाच्या भाववाढ व आर्थिक परिस्तिथीमुळे होत आहे असे कारण सांगतात. वास्तविक पाहता केंद व राज्य सरकार पेट्रोल, डिझेल व गॅसवर अनेक कर लावून सामान्य जनतेवर हा भुर्दंड लादतात. ह्या सरकारने जनतेशी केलेली फसवणूक जनता कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता भारतीय जनता पक्ष्याला त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.
पुण्यातील ताडीवाला रोड, सिंहगड रोड, कोथरूड, डेक्कन जिमखाना, येरवडा, खडकी, औंध, बोपोडी, बिबवेवाडी, पर्वती या भागात लोकांनी बंदला उस्फुर्तपने पाठिंबा दिला. काही भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाही करण्यात आली.
माजी आमदार उल्हास पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी , कमल व्यवहारे, अभय छाजेड, आबा बागुल रवींद्र माळवदकर, नगरसेवक अजित दरेकर, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, सदानंद शेट्टी, करण मकवाना, मुकारी अलगुडे, रमेश अय्यर, संगीता तिवारी, निलेश बोराटे, रजनी त्रिभुवन, सचिन आडेकर, सुजित यादव, महिला अध्यक्ष सोनाली मारणे, एन.एस.यु.आय चे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख, भूषण रानभरे, प्रदीप परदेशी, जयकुमार ठोंबरे, सतीश पवार, सुनील घाडगे, प्रकाश आरणे, रवी ननावरे, दीपक ओव्हाळ, रामविलास माहेश्वरी, विश्वास दिघे व असंख्य पदाधीकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.