~स्वच्छता जागरुकतेसाठी देशभर 70 व्या प्रजासत्ताक दिनी दैनंदिन स्वच्छता बाणवण्याकरिता घेतला पुढाकार~
~16 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन~
पुणे: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या देशभरातील महत्वाच्या शाखां आणि प्रशासकीय कार्यालयाद्वारे स्वच्छतेची मोहीम आयोजित केली. बँकेचे कार्यकारी संचालक श्री ए. सी. राउत आणि कार्यकारी संचालक श्री हेमन्त कुमार टम्टा यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले होते.
बँकेचे कार्यकारी संचालक श्री ए सी राऊत म्हणाले “आम्हास विश्वास वाटतो की, आमच्या बँकेचे राज्यामध्ये सर्वाधिक शाखांचे जाळे आहे आणि त्या माध्यमातून स्वच्छता आणि दीर्घकालीन आरोग्यदायी पर्यावरण संदर्भात जागरूकता आणणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही हाती घेत असलेल्या पुढाकाराने सामान्यजनांवर दीर्घ आणि चिरस्थायी ठसा उमटेल.”
लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागरूकता आणण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरातील शाखांद्वारे विविध उपक्रम राबवण्यात आले. बँकेने ‘स्वच्छता रॅली’, कार्यालय आणि कार्यालय परिसर स्वच्छता, निवासी वसाहती तसेच सार्वजनिक जागा येथे स्वच्छता, याबरोबरच स्वच्छतागृहे, उद्याने, कचरापेटी यांच्याही स्वच्छतेचे कार्य देशभरातील 30 अंचल कार्यालयांच्या अंतर्गत कार्यरत शाखांच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. स्वच्छतेविषयी ‘स्वच्छता पंधरवड्यादरम्यान नागरिकांमध्ये संवेदनशीलता आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि स्वच्छता मोहिमेस अधिक व्यापकता येण्याच्या जनजागृतीच्या दृष्टीने बँकेतर्फे ही कार्ये हाती घेतली गेली होती.बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमन्त कुमार टम्टा म्हणाले की, “शारीरिक स्वच्छता ही पुरेशी नसून स्वच्छता ही मनापासून आली पाहिजे. दृश्य स्वरूपाद्वारे पोहोचवलेला संदेश लोकांवर दीर्घकालीन परिणाम करणारा असतो. दैनंदिन स्वच्छंता राखण्याच्या आणि स्वच्छ राहण्याच्या सवयींमुळे व्यवसायाच्या ठिकाणी आणि जनसमूहाच्या ठिकाणी आरोग्यदायी पर्यावरण राहू शकेल. आम्ही आमच्या पूर्ण संसाधनांसहित ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्याचे ठरवले आहे.‘स्वच्छ भारत’ अभियानंतर्गत दिनांक 16 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन बँकेतर्फे करण्यात आले आहे.