मुंबई : येत्या तीन वर्षांत पाच लाख मुलींना शिकवण्याचा निश्चय नन्ही कली या प्रकल्पाद्वारे करण्यात आला आहे. या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या इतर संस्थांशी अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधून, नन्ही कली केंद्रांमध्ये आणखी सुधारणा करून तसेच प्रकल्पात काम करणाऱ्या पथकांना अधिक बळकटी देऊन हा निश्चय अमलात आणण्यात येईल, असे ठरविण्यात आले आहे.
महिंद्रा उद्योगसमुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, स्त्रिया शिक्षित झाल्यामुळे कुटुंब, समाज व देश हे दारिद्र्यातून बाहेर पडू शकतात असे प्रतिपादन जागतिक बॅंकेने केलेले आहे. यातूनच स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. दारिद्र्याच्या खातेऱ्यातून भारतीय समाजाची मुक्तता करायची असेल, तर एकही क्षण न दवडता देशातील सर्व मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करावीच लागेल. तीन वर्षांत पाच लाख मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची शपथ घेऊन, नन्ही कली या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मुलींना त्यांचा शिक्षणाच्या हक्क मिळवून देणार आहोत. यामध्ये येणारे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अडथळे आम्ही दूर करण्याचा जोमाने प्रयत्न करू.
रतात मुली त्यांच्या आयुष्यात सरासरी चार वर्षांहून कमी काळ शिक्षण घेतात, असे दिसून आलेले आहे. ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी व दीर्घकालीन उपाय योजण्यासाठी उद्योग क्षेत्राने पुढाकार घ्यायला हवा.
‘नन्ही कली’ प्रकल्पाविषयी ..
‘नन्ही कली’ हा प्रकल्प महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी 1996 मध्ये सुरू केला. शिक्षित स्त्रिया या केवळ अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देतात असे नव्हे, तर हुंडा व बाल विवाह यांसारख्या क्रूर प्रथांचे निर्मूलन करण्यातही पुढाकार घेतात, या जाणिवेतून नन्ही कली हा प्रकल्प उभारण्यात आला. आतापर्यंत 14 राज्यांमधील ग्रामीण, आदिवासी व नागरी भागांतील साडेतीन लाख मुलींना या प्रकल्पाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यात आले आहे. त्यांना शैक्षणिक व तत्सम साहित्य पुरविले जाते. प्रकल्पामधून मुलींच्या शिक्षणाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती व रुढी यांविषयी जनजागृतीही करण्यात येते. या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी www.nanhikali.org. ही वेबसाईट पाहावी.
‘महिंद्र’विषयी ..
महिंद्र उद्योगसमुहाची एकूण उलाढाल 20.7 अब्ज डॉलर इतकी आहे. नावीन्यपूर्ण मोटारी व एसयूव्ही बनविणे, ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण प्रगतीला चालना देणे, नवीन व्यवसायांची जोपासना करणे, हे या समुहाचा उद्दीष्ट आहे. तसेच युटिलिटी मोटारी, माहिती तंत्रज्ञान, अर्थसेवा आणि पर्यटनविषयक सेवा आदी उद्योगांमध्ये हा समूह कार्यरत आहे. महिंद्र समुहातर्फे जगात सर्वाधिक संख्येने ट्रॅक्टर बनविले जातात. कृषी उद्योग, हवाई उद्योग, व्यावसायिक वाहनांची निर्मिती, सुट्या भागांचे उत्पादन, संरक्षणविषयक उत्पादने, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, अपारंपारीक ऊर्जा, स्पीडबोट, पोलाद उत्पादन अशा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महिंद्र उद्योगसमूह आपले पाय रोवून आहे. शंभर देशांमध्ये या समुहाच्या विविध कंपन्या आहेत व त्यांमध्ये दोन लाख चाळीस हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात.