पुणे-राष्ट्रवादीच्या , विद्यमान अध्यक्षा माजी महापौर खा. अॅड. वंदना चव्हाण यांच्या वर घण घणाती आरोप करीत् शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित बाबर यांनी शुक्रवारी राजीनामा दिला.पर्यावरण प्रेमी आणि प्रामाणिक अशी प्रतिमा असलेल्या वंदना चव्हाणांवर अशा रीतीने आरोप झाल्याने राष्ट्रवादी आणि एकूणच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . याबाबत अंकुश काकडे आणि सुभाष जगताप , महापौर धनकवडे तसेच प्रकाश कदम अश्विनी कदम अप्पा रेणुसे , विशाल तांबे आदी नेत्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही
दरम्यान
किती आले
प्रतिगाम्यांचे वादळ
तरी डगमगणार नाही …
सिंहाने दोन पाऊले मागे घेतली तर याचा अर्थ सा नाही की त्याने माघार घेतली…याउलट जेव्हा तो अति आक्रमक पवित्रातअसतो तेव्हा तो झङप टाकतो…”हे विरोधकांनी लक्षात ठेवावे”
अशा प्रकारची आव्हाने बाबर यांच्या कार्यकर्त्यांच्या नावे सोशल मिडिया द्वारे वंदना चव्हाण यांना दिली जात असल्याचे वृत्त आहे
बाबर यांच्या जागेवर यापूर्वीही अन्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला गेला; पण वरिष्ठ नेत्यांनीच त्यावेळी त्यांची पाठराखण केली होती.
गेल्या दोन वर्षांपासून बाबर युवक राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी कार्यरत आहेत. मध्यंतरी त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती; पण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यात हस्तक्षेप केल्याने बाबर यांचे पद कायम राहिले. मात्र, त्यानंतरही शहराध्यक्षांकडून पाठिंबा मिळत नसल्याने अखेर शुक्रवारी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा फॅक्सद्वारे पाठवून दिला आहे. पुढील दोन दिवसांत पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून राजीनामा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.चव्हाण यांच्या कडून मनमानी कारभार सुरू असल्याने संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असल्याची तक्रारही त्यांनी केली; तसेच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादीच्या दक्षिण विभागातील मातब्बर नेत्यांमध्ये एका हुशार नेत्याने भांडणे लावून दिल्याची चर्चा आहे त्यामुळे वंदना चव्हाण यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे असेही काहींचे म्हणणे आहे . दक्षिण पुण्यात महापौर – स्थायी समिती अध्यक्ष – सभागृह नेता आणि युवक अध्यक्ष अशा पदांचे वाटप होवूनही दक्षिण पुण्यातील अन्य नगरसेवक मंडळी या पदाधीकाऱ्यांचे नेतृत्व मान्य करताना दिसत नाहीत . प्रत्येकाने सावता सुभा मांडला आहे . असे हि दिसून आल्याचा दावा करण्यात येतो आहे