पुणे- दुष्काळग्रस्त गावांसाठी राज्य सरकार लवकरच जलयुक्त शिवार योजना सुरु करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. आज (सोमवार) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत दरवर्षी राज्यातली ५ हजार गावं निवडली जातील आणि या योजनेच्या माध्यमातून या गावांमधील दुष्काळ कायमस्वरूपी घालवण्यास राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
याशिवाय या योजनेला ५ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असून सध्या राज्य सरकारनं यासाठी १ हजार कोटी रूपये मंजूर केले असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.