पुणे-(अनिल चौधरी)
कोंढवा : येवलेवाडी गावातील मुख्य रस्त्यावार पालिकेतर्फे कचरा पेट्या ठेवल्या आहेत . या कचरा पेट्या पूर्ण ओसुंडून गेल्या तरी पालिकेचे कर्मचारी किंवा ठेकेदार या कचरा पेट्या उचलत नाहीत यामुळे या परीसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे जर हा कचरा येत्या तीन ते चार दिवसात नाही उचलला तर हा संपूर्ण कचरा संबधित अधिकाऱ्याच्या घरात फेकू असा इशारा येवलेवाडी येथील मनसेचे युवा नेते उमेश धांडेकर व महेश धांडेकर यांनी दिला आहे.
येवलेवाडी हा भाग महापालिकेत येऊन जवळजवळ दोन वर्षे झाली आहेत तरी येथे नागरिकांच्या समस्या आहे तशाच आहेत . येथे पाणी , रस्ते व कचऱ्याची मोठी समस्या भागात नागरिक अनुभवत आहेत. कचरा पेट्या नेहमी ओसंडून वाहत असतात . येथील कचरा २० ते 25 दिवस पालिकेचे कर्मचारी उचलत नाहीत . यामुळे येथे कचरा मोठ्या प्रमाणात साचत आहे . यामुळे येथे दुर्गंधीयुक्त वास येत आहे व नागरिकाना डेंगू , मलेरिया सारख्या विविध आजारांना सामोरे जाये लागत आहे . येथील कार्यकर्त्यांनी पालिकेच्या आरोग्य अधिकारी तसेच मुकादम यांच्याशी वांरवार भेट घेऊन तसेच निवेदने दिली आहेत . परंतु गेंड्याची कातडी असलेल्या अधिकारी या म्हणीप्रमाणे येथील अधिकारी वागत आहेत . यामध्ये नागरिकाना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहेत.
या भागातील मनसेचे युवा नेते उमेश धांडेकर , महेश धांडेकर सोमनाथ कोकाटे श्रीकांत ढोणे , विशाल निंबाळकर यांनी अधिकाऱ्याना वेळोवेळी निवेदन देऊनही व प्रत्यक्ष भेट घेऊनही काहीही होत नसल्यामुळे अधिकाऱ्याच्या घरात कचरा फेकण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.