नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी देशातील कोरोना परिस्थितीवरुन मोदी सरकारवर सतत टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना मिसमॅनेजमेंटवर रिपोर्ट सादर केली.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या रिपोर्टचा उद्देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्याचा आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. आता तिसऱ्या लाटेसाठी आपल्याला आधीपासूनच तयारीत रहावे लागेल. आधी केलेल्या चुका टाळाव्या लागतील. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण सर्वात मोठे शस्त्र आहे. यात सरकारने कती आणावी.
राहुल पुढे म्हणाले की, व्हायरस सतत म्युटेड होत आहे. जानकारांनी आधीच दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. तरीदेखील सरकारने योग्य पाऊले उचलली नाहीत. त्यामुळेच आम्ही ही रिपोर्ट जारी करुन दुसऱ्या लाटेदरम्यान केलेल्या चुका सांगितल्या आहेत. यातुन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास मदत मिळेल.“दुसऱ्या लाटेत अनेकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागला आहे. आपण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवू शकलो नाही. पंतप्रधानांचे अश्रू सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे अश्रू पुसू शकत नाही. त्यांचे अश्रू त्यांना वाचवू शकत नाही, ऑक्सिजन वाचवू शकतो. पण त्यांनी हे गांभीर्याने घेतलं नाही कारण त्यांचं सगळं लक्ष बंगालच्या निवडणुकीवर होतं,” अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.
“तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून हे चार खांब विकसित केले आहेत,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
“यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि १०० टक्के लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. सरकार पूर्णपणे तयार असलं पाहिजे. रुग्णालयं, ऑक्सिजन, औषधं या सर्व गोष्टी उपलब्ध असलं पाहिजे,” असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.
“तर दुसरा खांब श्वेतपत्रिका आहे ज्यामध्ये रुग्णांसाठी गरज असणारी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत याची खातरजमा करणं आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने तयार असणं गरजेचं आहे यावर जोर देताना राहुल गांधी यांनी याचा अर्थ दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणं,” असल्याचं म्हटलं आहे