Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तूंचे; पुण्यात भव्य व्यापार विक्री केंद्र सुरु.

Date:

पुणे-पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीमाल ,रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने ,सेंद्रिय वस्त्रे आदि .पर्यावरणपूरक वस्तूंचे ‘अद्रिष’ हे  व्यापार विक्री केंद्र पुण्यात ‘सात्विक’तर्फे  समारंभपूर्वक  सुरु झाले, पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तूंच्या या ‘अद्रिष’ व्यापार विक्री केंद्राचे उद्घाटन पुण्यातील कोरेगाव पार्क येथे कणेरी मठ कोल्हापूर येथील श्रध्देय पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज  यांच्या उपस्थितीत झाले .गणेशाची पूजा करून त्यांनी उद्घाटन केले.या प्रसंगी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, पुण्यामध्ये ‘अद्रिष’चे उद्घाटन करताना खूप आनंद होत आहे सामान्य माणसांच्या निरोगी आणि तंदुरुस्त जीवनासाठी शून्य कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक हे व्यापार विक्री केंद्र स्तुत्य उपक्रम आहे.असे प्रतिपादन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी  यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमास पुणेकरांनी गर्दी केली. अद्रिषचे अक्षय अगरवाल ,सौरभ साळुंखे,गजेंद्र चौधरी यांच्या या उपक्रमाला पुणेकरांचा खूप प्रतिसाद लाभला.उग्घाटन करताना गाईची पूजा करून मग गाईला सेंद्रिय अन्न खावयास देऊन अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले.

पुण्यातील अद्रिष या पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तूंच्या व्यापार विक्री केंद्रात किराणासामान , स्वयंपाक घरातील उपकरणे ,गृहपयोगी वस्तू , सेंद्रिय वस्त्रे , रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने हे सारे कमी दारात उपलब्ध आहे. कापडी पिशव्या , समान बसतील अशी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त खोकी उपलभ आहेत ,घरपोच सेवा देखील या व्यापार विक्री केंद्रा तर्फे दिली जाणार आहे. निरोगी आणि प्रदूषणमुक्त जीवन शैलीची ही वाटचाल आहे .असे अक्षय अगरवाल उद्घाटन प्रसंगी म्हणाले.भारतातील शून्य कचरा व्यवस्थापन सेंद्रिय जीवनशैली संकल्पना राबवणारे प्रमुख हे व्यापार विक्री केंद्र आहे .‘सात्विक’तर्फे अदृश्य (अद्रिष) पर्यावरणपूरक शून्य कचरा व्यवस्थापनाच्या अनुशांगाने रसायनमुक्त जीवनोपयोगी वस्तू असलेले इको फ्रेंडली ,व्यापार विक्री केंद्र सुरु झाल्यामुळे पर्यावरण प्रेमी व आरोग्याबद्दल दक्ष असणाऱ्या पुणेकरांची मोठी सोय झाली आहे .कोल्हापूरच्या कणेरी मठाचे श्रध्देय पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या संकल्पनेतून शुद्ध व निरोगी जीवनासाठी आवश्यक असणारी सेंद्रिय आणि रसायनमुक्त जीवन पद्धती सात्विकमध्ये साकारली असून त्यांची सर्वत्र २५ केंद्रे असून ,’अद्रिष’ हे पुण्यात नव्यानी सुरु झाले आहे.

बदलत्या काळात  आपल्या अन्नातील भेसळयुक्त वाढ हळूहळू आकलनशक्तीबाहेरील होत गेली .शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा आणि कीटकनाशकांचे प्रमाण चिंता करण्याचे मोठे कारण ठरले .सेंद्रिय व विषमुक्त शेतमाल पिकवणारेही अनेक शेतकरी आहेत पण,  त्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळत नाही.आणि सेंद्रिय शेती प्रमाणिकरण करणे हा खर्च, सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्याने,शेतमालाची योग्य विक्री होत नसल्याने,शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येतात.नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन,आपणही काहीतरी करावे ,जेणे करून सेंद्रिय शेती करणाऱ्यांना हमी भाव आणि ग्राहकांना कमी भावात माल मिळेल व समाजात विषमुक्त अन्नाविषयक जागरूकता येईल.हे जाणून घेऊन अक्षय अगरवाल आणि सौरभ साळुंखे व गजेंद्र चौधरी यांनी सात्विक तर्फे अद्रिष म्हणजे ‘अद्रुश्य’ची सुरुवात केली . या प्रसंगी बाबासाहेब साळुंखे (माजी शास्त्रज्ञ- कृषी महाविद्यालय पुणे )आणि कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक दिगाज्जांची विशेष उपस्थिती लाभली.आभार प्रदर्शन बाबासाहेब साळुंखे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...