मुंबई – लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणी होऊ नये यासाठी आरबीआयने कर्जाच्या पेमेंटमध्ये दिलासा देण्याचा आणि कर्ज स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतीच्या कर्जाच्या हप्ता भरतीत तीन महिन्यांची सवलत देण्यात आली आहे. रेपो रेटमध्येही 0.75% कपात केली आहे. यामुळे सर्वप्रकारचे कर्ज स्वस्त होतील. या रेपो दरावरच बँकांना आरबीआयकडून कर्ज मिळते. जर बँकांना स्वस्त कर्ज मिळाले तर ते देखील ग्राहकांसाठीचे दर कमी करतील. यापूर्वी रेपो रेट 5.15% होता, आता तो 4.40% आहे.
आरबीआयचे 5 मोठे निर्णय
> 1. रेपो रेटमध्ये 0.75% कपात
परिणाम : सर्व कर्ज स्वस्त होतील
> 2. मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन महिन्यांची सूट
परिणाम : ग्राहक आणि बँकांना दिलासा मिळले.
3. कार्यरत भांडवलावरील व्याजाची रक्कम तीन महिन्यांकरिता पुढे ढकलली
परिणाम : कंपन्यांना दिलासा मिळेल.
> 4. कॅश रिझर्व्ह रेशोत 1% कपात
परिणाम : बँकांकडे अधिक कॅश असेल.
5. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयामुळे यंत्रणेतील 3.74 लाख कोटींची रोकड वाढेल
ईएमआयमध्ये तीन महिन्यांच्या सवलतीचा अर्थ काय?
ईएमआयमध्ये सूट दिल्याचा अर्थ असा नाही की आपल्याला कधी थकबाकी भरावी लागणार नाही. फक्त तीन महिने पुढे ढकलू शकता. मात्र नंतर पैसे द्यावे लागतील. लॉकडाऊनमुळे ज्यांच्याकडे खरोखरच पैशांची कमतरता आहे, त्यांना कर्ज फेडण्यासाठी थोडा वेळ मिळावा या उद्देशाने हे पाऊल उचलले गेले आहे. तज्ञांचे मत आहे की पगारदार किंवा ज्यांच्याकडे पुरेशी रोख रक्कम आहे त्यांनी वेळेवर ईएमआय भरावा, अन्यथा त्यांच्यावरच ईएमआयचे ओझे वाढेल.