पुणे- लोकसभेच्या पुण्यातील जागेवर कॉंग्रेस हक्क सोडणार नसून येथून हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आज वतर्वली गेली . पुण्यात आज मल्लिकार्जुन खर्गे,प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्याच्या लोकसभेच्या जागेबाबत माजी केंद्रीय मंत्री गुलाम नभी आझाद यांच्या समक्ष चर्चा केल्याचे वृत्त आहे . या चर्चेचा आधार देवून पुणे लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांना च उमेदवारी देऊन पुण्याचे नेतृत्व देखील त्यांच्याकडे सोपवावे याबाबत चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . मात्र याबाबत खुद्द हर्षवर्धन पाटील यांच्या तयारीची माहिती देखील लक्षात घ्यावी अशा हि सूचना पुण्यातील एका पदाधिकारी असलेल्या नेत्यास दिल्याचे समजते .
जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरूनही यावेळी चर्चा झाली. शहराध्यक्ष रमेश बागवे हे मातंग समाजाचे असल्याने काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे पदाधिकारी त्यांना आयोजनात सहयोग देण्याएवजी चुका दाखवून पक्षाचे हसू करण्यात समर्थता मानीत आहेत .याबाबत हि काही बोलले गेले . दलित किंवा मराठा समाजाचाच उमेदवार पुण्यातून द्यावा .पूर्वी ज्यांना पुण्यातून संधी दिली त्यांना परत संधी देवू नये .महापालिकेच्या निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला अशांनी तर इच्छुक म्हणून देखील जाहीर करू नये . आणि नुकत्याच कॉंग्रेस पक्षात आलेल्यांनी जरी महापालिकेची निवडणूक जिंकली असेल आणि आता तातडीने त्यांना विधानसभेची हि उमेदवारी हवी असेल तर त्यांच्या कार्याची आणि कामकाजाची व्यवस्थित माहिती घ्यावी .पण त्यांना अजिबात आश्वस्थ करू नये असेही संकेत या चर्चेतून देण्यात आले .