पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी काँग्रेस भवन येथे 31 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या सरचिटणीस सौ. कमलताई व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, सरचिटणीस Adv. अभय छाजेड़ यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस व इंदिराजींच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी बोलताना डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले, “धर्मनिरपेक्षता या शब्दाचा खरा अर्थ राजसत्ता व धर्मसत्तेने एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करु नये. इंदिरा गांधी यांनी खऱ्या अर्थाने या देशासाठी खऱ्या अर्थाने बलिदान करुन या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता रुजविन्याचे काम केले. आज इतिहासाचे चुकीचे दाखले देत दुहिचे बीज पेरण्याचे काम या देशातील राज्यकर्ते करत आहेत. या देशामध्ये स्वातंत्र्य चळवळ व त्यानंतर राष्ट्र उभारनीचे काम काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झाले. इंदिराजीनी बैंक राष्ट्रीयकरण केल्यामुळे गोर-गरीब लोकांना मदतीचा हात मिळवून दिला.
अंतराष्ट्रीय दबाव असूनही 1971 च्या युद्धात बांग्लादेश पाकिस्तानातून वेगळा करण्यात इंदिराजीनी नेतृत्वतील कणखरता दाखिवली.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव घेऊन भाजपा सरकार जाहिरात करत आहे. नसलेल्या वारशावर अतिक्रमण करु पाहत आहे. सरदार पटेल गृहमंत्री असताना आर.एस.एस वर बंदी घातली होती. गांधी हत्येमागे आर.एस.एस चा हात होता असे त्यांचे ठाम मत होते. सरदार पटेल यांनी असंख्य संस्थानिकांना भारतामध्ये विलीन करुन घेऊन अखंड भारत देशाचे निर्माण केला. लोकशाही रुजली, राजेशाही नष्ट झाली. ”
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस Adv.अभय छाजेड़ यांचे स्व.इंदिराजी गांधी आणि सरदार पटेल यांच्या जीवनावर भाषण झाले.
या वेळी माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी महापौर रजनीत्रिभुवन, अनिल सोंडकर,रमेश अय्यर, नगरसेवक दत्ता बहिरट, लक्ष्मी घोड़के, लता राजगुरु, मा. नूरुद्दीन सोमजी, अंजनी निम्हण, गोपाळ तिवारी, राजेंद्र भूतड़ा, विजय खळदकर, बाळासाहेब अमराळे, शानी नौशाद,जावेद निलगार,अंथोनी जाकोब, .श्रीकृष्ण बराटे, बेबी युसूफ सय्यद, राजू सुराणा, विनय ढेरे, संदीप कुदळे आदींसह शहर काँग्रेस चे अनेक पदाधिकारी-कार्यकर्त, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन Adv.नीलेश बोराटे यांनी केले तर आभार कमल व्यवहारे यांनी मानले.