Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दलित मतांची दलाली थांबावी :तुषार गांधी

Date:

पुणे :
अनेक दशकांच्या लढ्यानंतरही बहिष्कृत समाजाचे प्रश्न सुटले नसून मनातील जात संपली नाही ,म्हणून व्यापक जातीअंताची आणि परिवर्तनाची लढाई लढावी लागेल ,तसे करताना दलित मतांची दलाली थांबावी ‘ असा सूर आज सायंकाळी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ आयोजित परिसंवादात उमटला .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित  ‘जाती संस्था और वर्तमान दलित राजनीती ‘ या विषयावरील परिसंवादाने राष्ट्रपिता गांधी सप्ताह चा समारोप झाला . समारोपाच्या परिसंवादात  महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ,गुजरातच्या दलित चळवळीतील युवा नेते जिग्नेश मेवाणी ,जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली ) मधील प्राध्यापक डॉ  मिलिंद आव्हाड सहभागी झाले . अध्यक्षस्थानी डॉ कुमार सप्तर्षी होते .
तुषार गांधी म्हणाले ,’जाती व्यवस्था संपली नाही या विषयावर आज बोलावे लागत आहे ,हीच दुःखदायक गोष्ट आहे . आजही दलित ,मागास समाजावर अत्याचार -अन्याय होत आहेत . आरक्षणाला नावे ठेवली जात आहेत . प्रत्यक्षात दलितांचे शोषण होत असून त्यांच्या मतांची दलाली थांबली पाहिजे . दलितांवर होणारे अत्याचार थांबले नाहीत याला दलित राजकारणही कारणीभूत आहे . कोणत्याही एका समाजघटकावर  अन्याय होताना इतर समाजघटक गप्प बसतात ,हेही धक्कादायक आहे  ‘
डॉ मिलिंद आव्हाड म्हणाले ,’भारतातील जात व्यवस्था भांडवली दृष्टीकोनातून झालेली नाही ,तर ती धार्मिक संचितातून झालेली आहे . त्याचे ‘घेट्टोकरण ‘झाले असून ते विवेकाने तोडले पाहिजे . आजही दलितांवर अन्याय होत आहे ,बहिष्कृत समाजाचे ,महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत . काय खावे ,कसे वावरावे असे सांगणारा गंभीर काळ आला आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य ,खान-पान स्वातंत्र्य संपवले जात आहे ,अशा परिस्थितीत व्यापक परिवर्तनाचा पर्यायी मंच उभा केला पाहिजे . ‘
जिग्नेश मेवाणी म्हणाले ,’गुजरातमधील सबका साथ -सबका विकास ‘ ची कहाणी खोटी आहे . तेथील विकास दलितांना बरोबर घेत नाही . तेथे अदानी ,अंबानी याना पाहिजे एव्हडी जमीन मिळते ,पण दलित भूमिहीनांना सरकारने दिलेली १ लाख १७ हजार एकर जमीन प्रत्यक्षात ताब्यात मिळत नाही ,कारण तेथे सवर्णांनी अतिक्रमण केलेलं आहे . गांधी आणि आंबेडकर यांचे विचार घेऊन वर्णवर्चस्व वादी ,फॅसिस्ट विचारांविरुद्ध रस्त्यावर मोठा लढा उभारावा लागणार आहे .
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’जात विरहीत झाल्याशिवाय क्रांतीच्या गोष्टी बोलता येणार नाहीत . डोक्यात जात बसल्याने नवे महापुरुष ,क्रांतिकारक ,नवे विचार स्वीकारले जात नाहीत . अशा परिस्थितीत शांत राहणे हाच एक कट असून  अहिंसक  आक्रमकतेची गरज आहे ‘
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा वेग वाढवा:आमदार सुनील शेळके

पुणे-पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम...

साधु वासवानी मिशनमध्ये १०८ हवनांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

दीदी कृष्णाकुमारी यांनी गुरूच्या महानतेविषयी भावस्पर्शी मनोगत व्यक्त केलं पुणे-साधु...

कर्नाटक:४० दिवसांत १९ ते ४५ वयोगटातील हार्ट अटॅकने 30 मृत्यू; भीतीपोटी हासनहून म्हैसूरला आला जमाव

कर्नाटकात म्हैसूरमध्ये श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोव्हॅस्कुलर सायन्सेस अँड...