पुणे-महात्मा गांधी यांचे विचार म्हणजे वैश्विक ताकद आहे. त्यांच्या जन्मानंतर 153 वर्षे त्यांचे
विचार जगभर टिकून असून ते विसरता येत नाहीत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्यांची
टिंगलटवाळी करण्यात आली. मात्र त्यांचे विचार कुणीही दाबू शकत नाही. एकवेळ राजकीय
पक्षाची ओळख पुसली जाऊ शकते. पण, नेहरु, गांधीमुक्त भारत कधीही होऊ शकत नाही, असे
मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायामूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
तनया ईशा प्रकाशनातर्फे प्रकाशित व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी लिहलेल्या ‘महात्मा
गांधी आणि जग’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते
झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक
डॉ. दीपक टिळक होते. काँग्रसेच नेते वमहाराष्ट्र गांधी स्मारक ट्रस्टचे विश्वस्त अॅड .अभय
छाजेड, तनया ईशा प्रकाशनाचे प्रविण प्र वाळिंबे आदि उपस्थित होते. याप्रसंगी बालगंधर्व
कलादालनात भरवण्यात आलेल्या ‘देशादेशी बापू’ चित्रप्रदर्शनाचे उदघाटन डॉ. दीपकटिळक यांच्या
हस्ते करण्यात आले.
धर्माधिकारी म्हणाले, महात्मा गांधी यांच्या हत्येला 80 वर्षे पुर्ण होत आहे. तो साजरा करता येत
नसून, मान खाली घालणारा आहे. हा काळ प्रयाश्चीत्ताचाआहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी
वर्षात त्यांची आठवण किती जणांना येते, असा सवालदेखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.
महात्मा गांधी यांच्या हत्येपासून काही जणांनी विडंबन केले जात असल्याची खंत यावेळी त्यांनी
व्यक्त केली. महात्मा गांधी शेवटच्या श्वासापर्यंत विश्वस्त वृत्तीने जगले.
प्रत्येकाने आपल्यातला ‘गांधी’ शोधला पाहिजे. तर ‘गांधी’ शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
गांधीचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
डॉ. दीपक टिळक म्हणाले, महात्मा गांधींनी त्यांच्या विचारातून जागतिक लढा दिला. लोकमान्य
टिळक आणि महात्मा गांधी यांनी पाच वर्षे एकत्र काम केले. लोकमान्यांची चतुःसूत्री महात्मा
गांधी यांनी पुढे नेली. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार हे लोकमान्यांचे विचार त्यांनी जनसामान्यात
पेरले. शांततेच्या मार्गाने, सत्यग्रह करुन जनसामान्यांची ताकत त्यांनी दाखवून दिली.
लोकमान्यांचे राष्ट्रहिताचे कार्य जगभर पोहोचविले असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
उल्हास पवार म्हणाले, देशभरात महात्मा गांधींचे असणारे विचारांचे महत्त्व पुस्तकात मांडले
आहेत. महात्मा गांधी यांच्या ‘चाले जाव ’ याएका वाक्यावर 40 लाखलोकं एकत्र येतात,सत्याग्रह
करून तुरुंगात जातात. त्यांचे विचारांचे महत्व तरुण पिढीपर्यंत या पुस्तकातून नक्कीच जाईल.असे
ते म्हणाले.
तनया ईशा प्रकाशनचे प्रकाशक व‘देशोदेशी बापू ’ या जगातील महात्मा गांधींच्या पुतळे व स्टँपच्या
चित्रप्रदर्शनाचे संकल्पना साकारणारे प्रवीण प्र वाळिंबे म्हणाले, महात्मा गांधीचे विचार तरुण पिढीपर्यंत
पोहचवण्याचीगरज आहे.जगात ७० हून अधिक देशांमध्ये महात्मा गांधींचे १२५ हून अधिक पुतळे आहेत
तसेच सुमारे १४० देशांनी महात्मा गांधींची पोस्टाची तिकिटे प्रकाशित केली आहेत . हे भाग्य अन्य कोणत्याही
जागतिक नेत्यास लाभले नाही .
काँग्रसेच नेते वमहाराष्ट्र गांधी स्मारक ट्रस्टचे विश्वस्त अॅड .अभय छाजेड म्हणाले की , महात्मा
गांधी हे एक युग आहे .महात्मा गांधी हा एक विचार आहे .त्यांचे जगातील पुतळे आणि स्टँप यावर आधारित
‘देशोदेशी बापू’ कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
प्रारंभी महात्मा गांधींच्या तैल चित्रास पुष्पांजली अर्पण करण्यात आली .गायिका तन्मयी मेहेंदळे यांनीसर्व
उपस्थितांसह सामुहिक ‘वंदेमातरम’ म्हटले.हे पुस्तक व प्रदर्शन करणाऱ्या सर्व टीमचा सत्कार करण्यात
आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री नातू यांनी केले. अभय छाजेड यांनी आभार मानले.हे प्रदर्शन
दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्रौ ८ यावेळात सर्वासाठी विनामूल्य खुले असेल .’महात्मा गांधी आणि
जग ’ हे पुस्तक देखीलउपलब्ध असेल .