मिसिंग लिंकवरून पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Date:

“मिसिंग लिंकला विरोध नव्हता; सुरक्षेच्या दृष्टीने केवळ स्थगिती दिली होती”

पुणे | प्रतिनिधी

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्थगिती देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंकची संकल्पना ही काँग्रेस-आघाडी सरकारचीच होती आणि आपण या प्रकल्पाला विरोध केला नव्हता, असे स्पष्ट करत त्यांनी रस्ते कंत्राटे, वाढीव प्रकल्प खर्च, समृद्धी महामार्ग आणि राज्यातील कथित भ्रष्टाचारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “मी मिसिंग लिंकचे काम बंद पाडले किंवा हा प्रकल्प होऊ दिला नाही, ही चर्चा चुकीची आहे. डिसेंबर २०१३ मध्ये मी या प्रकल्पाला केवळ स्थगिती दिली होती. कारण या प्रकल्पाचे कॅल्क्युलेशन्स आणि सेफ्टी चेक पुन्हा करायचे होते. अशा प्रकारचा बोगदा यापूर्वी देशात कुठेही झाला नव्हता. त्यामुळे ‘विंड टनेल स्टडी’सारखे अभ्यास पुन्हा करण्याची गरज होती. डिझाईन आणि प्रकल्पाला माझा कधीही विरोध नव्हता.”

चव्हाण यांनी यावेळी रस्ते प्रकल्पांच्या किमती आणि कथित भ्रष्टाचारावरही थेट आरोप केले. “आमदार खरेदी करण्यासाठी लागणारे 50-50 खोके कुठून येतात? हा पैसा रस्ते कंत्राटांमधून येतो,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. कर्नाटकातील ‘पे सीएम’ आणि ४० टक्के कमिशन प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती त्यापेक्षाही अधिक भयंकर असल्याचा दावा केला. “मिसिंग लिंक प्रकल्पाची गरज होती, सरकारने तो पूर्ण केला याबद्दल अभिनंदन. पण कंत्राटे देताना आणि किमती ठरवताना काय-काय होते, हे सर्वांनाच माहिती आहे,” असे ते म्हणाले.

मिसिंग लिंकवरील खड्डे आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘ड्युरेबिलिटी टेस्ट’च्या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली. “मी स्वतः एक इंजिनियर आहे. कॉंक्रीट किंवा डांबर टाकण्याआधीच त्याची टेस्ट केली जाते. काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाल्यानंतर कुणीही टेस्टसाठी खड्डे खोदत नाही. मुख्यमंत्र्यांना जास्त माहिती असेल, पण मला हे पटत नाही,” असे चव्हाण म्हणाले.

यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेसवे प्रकल्पांशी तुलना करताना ते म्हणाले की, “लेन किलोमीटर खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग 35 ते 40 टक्के अधिक महाग आहे. आमचे सरकार आल्यावर या वाढीव किमतींचे कॅग ऑडिट केले जाईल.” राज्यात ‘ट्रिपल इंजिन’चे सरकार असल्याने कंत्राटदारांना तीन दारे पुजावी लागतात, त्यामुळेच मोठे उद्योग महाराष्ट्रात येत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

पावसामुळे रस्त्यांची होत असलेली दुरवस्था आणि त्यामागील हवामान बदलाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “हळूहळू मान्सूनचे तास कमी होत आहेत आणि कमी वेळात अधिक पाऊस पडत आहे. हा हवामान बदलाचा स्पष्ट परिणाम आहे. 2005 मध्ये मुंबईत काय झाले होते, ते आपण पाहिले आहे. या बदलांचा अभ्यास प्रकल्पांचे डिझाईन करताना केला गेला नसेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्प, समृद्धी महामार्ग, रस्त्यांवरील खड्डे आणि प्रकल्पांच्या वाढीव खर्चाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ‘बघून घेईन’ची भाषा कशी? राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

‘मिसिंग लिंक’, राम मंदिरातील कथित गैरव्यवहार आणि रेल्वे भरतीच्या...

‘मिसिंग लिंक’वरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; प्रकल्पाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिल्याचा आरोप; प्रति किलोमीटर ५४०...

टाटा पॉवरची २०३० पर्यंत ३० गिगावॅट क्षमतेची झेप; ६६ टक्के ऊर्जा पोर्टफोलिओ स्वच्छ स्रोतांकडे

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ५,२१२ कोटींचा निव्वळ नफा; भागधारकांसाठी...