पुणे- आजारी गिरीश बापटांच्या जीवाशी भाजपा खेळ खेळत असल्याच्या आरोपाला आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे, २००६ पासून आजाराने त्रस्त असलेल्या शरद पवारांना गावोगाव फिरवून त्यांच्या जीवावर लढणार्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासदार गिरीश बापटांच्या एका कार्यकर्ता मेळाव्यातील उपस्थिती खटकायचे कार काय ? आणि त्यांना अधिकारच काय ? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुक्ता टिळक , लक्ष्मण जगताप आणि गिरीश बापटांचा आम्हाला अभिमानच आहे. प्रकृती स्वास्थ्य बरे नसतानाही त्यांनी पक्षासाठी त्रास सहन करण्याची तयारी स्वतःहून केली आमचा त्यांना सलामच आहे असे ते म्हणाले.काल जगताप यांनी एक विधान केले. त्यांची मेमरी कमी आहे.
शरद पवार आजारी असूनही त्यांना आता कसब्यात यावं लागतंय असं समजलं…त्यांना फिरवता हे अमानवी नाही का ?
आम्हाला आमच्या नेत्यांचा अभिमान आहे.मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांचा आणि गिरीश बापट आजारी असतानाही ऑक्सीजन सिलेंडर घेऊन प्रचाराला आले… कारण प्रेस मध्ये चुकीचं चालवलं गेल. आम्हाला बापट यांचा अभिमान आहे.
त्यामुळे प्रशांत जगताप यांनी तुमच्या पवार साहेबांना ही हा सल्ला द्यावा.की पवार साहेब तुम्ही किती परिश्रम घेतले आता आराम करा. तुमच्यावर आणि तुमच्या वरच्या नेत्यांवर पणं विश्वास नाहीय.. म्हणून कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही फिरताय.
कसबा पोट निवडणुकीत चुरस कसली ? असा सवाल करत ते म्हणाले ,’ इथली लढाई हेमंत रासने विरोधात रवी धंगेकर अशी नाहीच हि लढली महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीही नाही , तर देशात , आणि राज्यात कॉंग्रेस उरलेली नाही ती गल्लीतही कशी असेल ? अशा कॉंग्रेस विरोधात भाजपा अशी हि लढाई आहे , ती चुरशीची नाही .शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला वाऱ्यावर सोडून दिले दिसत आहे.
नेमके चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ….