अजितदादा तुमच्या मनात लपलंय काय ?

Date:

पुणे- बापटांच्या निधनामुळे लोकसभेची पोटनिवडणूक होईल? कधी होईल ?का होणार नाही ? असे प्रश्न उपस्थित होत असताना लोकसभेच्या उमेदवारीबाबत मात्र अनेकांनी चाचपणी सुरु केली आहे तर काही वातावरणात हवा सोडण्याची कामे करू लागले आहेत.यावेळी महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचे ठरवले तर निश्चितच भाजपाचा पराभव होईल असे मानले जाते.मात्र अजित दादांनी कुरघोडी करून पुण्याची जागा कॉंग्रेसला नाही तर राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे असा दावा सुरु केलेला आहे. एका अर्थी या दाव्याला तसे महत्व देखील आहे.पणअगदी गोपाळ तिवारी जिथे उमेदवारी मागत आहेत त्या कॉंग्रेसच्या ते पचनी पडणार नाही,कॉंग्रेसकडे लोकसभा लढण्यासाठी तगडा उमेदवार म्हणून कोण या दृष्टीने पाहिले तर केवळ रमेश बागवे यांचे नाव पुढे येते,त्यानंतर बागुलांचे नावही काही लोक घेतात बागुल लढणार नाहीत असा राजकीय समीक्षकांचा दावा आहे.पण बागवे तरी मनापासून लढण्यास तयार आहेत काय ? आणि त्यांना मविआ साथ देणार काय ? हे प्रश्न देखील त्याबरोबर पुढे केले जात आहेत.एकूणच त्यांचे नाव वगळले तर कॉंग्रेसकडे विजयी होईलच असा तगडा उमेदवार नसल्याचा दावा होऊ लागल्यानेच अजित पवारांनी या मतदार संघावर दावा करायला सुरुवात केली आहे.पण विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडे देखील केवळ दीपक मानकर यांच्या शिवाय कोणी तगडा उमेदवार दिसत नाही.प्रशांत जगताप इच्छुक असले तरी त्यांची कार्यशक्ती मर्यादित मानली जाते आणि मानकर यांची कार्यशक्ती त्याहून व्यापक अशी संपूर्ण मतदार संघावर पकड असलेली मानली जाते.आणि मानकर हे कॉंग्रेस मधूनच राष्ट्रवादीत आलेले आहेत.त्यामुळे कॉंग्रेस पक्षात देखील त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत.

अशा सर्व स्थितीत जेव्हा अजित पवार पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करतात तेव्हा नेमके त्यांच्या मनात उठणाऱ्या राजकीय समीकरणा बाबत उत्सुकता निर्माण होऊ लागते जी आज राजकीय सामिक्षकात निर्माण झाली आहे.

त्यातच सोशल मिडिया वर व्ह्युअर्स आणि लाइक्स मिळवण्या इतकी लोकसभेची निवडणूक सोपी नसते,पण तरीही या माध्यमांतील गाजावाजा करणाऱ्यांना महापालिकेची निवडणूक देखील जड होणार आहे,अशांनी रिंगणात येऊ अशी हवा करायला सुरुवात केली आहे,त्या केवळ तुम्हाला आम्ही पाडण्यास कारणीभूत होऊ शकतो एवढेच इशारा देण्यापुरत्या मर्यादित असल्याचे मानले जाते असा सूत्रांचा दावा आहे.

भाजपने टिळकांच्या घरात उमेदवारी दिली नाही म्हणून कसबा हारला हा फसवा प्रचार आतापर्यंत अनेक नेत्यांच्या लक्षात आला असेलही,पण बापटांच्या सुनेला तेव्हाच उमेदवारी दिली असती.. तर…हा विचार कोणाच्या मनाला शिवत कसा नाही ? हाच प्रश्न आहे.अर्थात बापटांच्या सुनबाई यांना प्रत्यक्षात प्रचारात उतरता आले नसते ते मतदार देखील जाणून आणि समजून घेणारे होतेच.पण त्या जर कसब्याच्या रिंगणात असत्या तर कॉंग्रेसच उमेदवाराला विजय कठीण होता,आणि बंडखोरी रोखणे कठीण होते.पण आता या भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेला बापटांच्या घरात उमेदवारी दिली तर..हा विचार केला तर…अनेकंची विभिन्न मते व्यक्त होताना दिसतात.महापालिका पदाधिकाऱ्यापैकी कोणालाही पुन्हा उमेदवारी दिली तर मात्र भाजपचा पराभव होईल असा दावा केला जातो.आणि म्हणूनच भाजपकडे विजयी होण्यासाठी पुढे असलेले नाव आहे ते माजी खासदार संजय काकडे यांचे.ते उद्योजक आहेत आणि सर्व धर्मियात आणि सर्व पक्षात त्यांचा चांगला संपर्क आहे.जो अन्य कुणाहि पेक्षा अधिक सरस आहे असाही दावा देखील केला जातो.

एकूणच सध्याच्या वातावरणात जर पुण्याची लोकसभा पोट निवडणूक झाली तर ती राजकारणात चांगलेच रंग भरेल अशी शक्यता दिसून येते आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....