पुणे– शेतात जाणाऱ्या बळिराजाने, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
. आज पहाटे शिर्डी, मनमाड, नगर, सातारा याठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला सुरवात केली. सरकारच्या विविध विभागांमधील समन्वय अभावामुळे शहरातील दूध, भाजीपाला पुरवठ्यावर संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नाशिक : येवल्यात शेतीमाल फेकला रस्त्यावर
येवला टोल नाक्यावर भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांतून माल खाली ओतला. तसेच येवला, नगरसूल, सायगाव येथे हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतले. सायगाव येथे माधव भंडारी यांचा पुतळा तसेच कर्जवसुलीच्या नोटिसा जाळल्या व रास्ता रोको करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली.
औरंगाबाद बाजार समितीत संपावरुन मारहाण
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत संपात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यासाठी गेलेले अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशीसह पाच जणांना फळभाजीपाला मार्केटमधील व्यापारी, विक्रेत्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर एका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला शासकीय रुग्णालय (घाटीत) उपचारासाठी) नेण्यात आले. थोडासा भाजीपाला, फळ फेकण्यात आल्याने येथील अनेक व्यापारी संतप्त झाल्याने त्यांनी ही मारहाण केली. यानंतर औरंगाबाद बाजार समितीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नगर-दौंड महामार्गावरील प्रवाशांना दूध पाजुन व रस्त्यावर दूध, बटाटे ओतून शेतकरी संपात उस्फुर्त सहभाग झाले
मोहोळ (सोलापूर ) तालुक्यातील मसले चौधरीत ओतले शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध
नाशिक मध्ये पहा रस्त्यावर झाला आंब्यांचा चिखल
वैजापूरात दूध उत्पादक शेतक-यानी दूध रस्त्यावर ओतले