पुणे-पक्षांतर्गत डावपेचांना ठोसे लगावत त्यांना गारद करून दिल्लीपर्यंत मजल मारत गेलेले माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि दत्ता बहिरट यांनाच पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने या दोन्ही ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यास सर्वाधिक विलंब झाला.पण या राजकारणावर मात करण्यात हे दोघे बाजीगर ठरले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात पूर्वी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागेवर लहू शेवाळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील सचिन सावंत यांनी तिकीट नाकारल्यावर अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालं आहे.महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील जाहीर करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॉंग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवारांची नावे:
1. अमळनेर – अनिल शिंदे 2. उमरेड – संजय मेशराम 3. अरमोरी – रामदास मासराम 4. चंद्रपूर – प्रवीण पडवेकर 5. वरोरा – प्रवीण काकडे 6. नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफूर 7. औरंगाबाद पूर्व – लहू शेवाळे 8. नालासोपारा – संदीप पांडे 9. अंधेरी पश्चिम – अशोक जाधव 10. शिवाजीनगर – दत्तात्रेय बहिरट 11. पुणे छावणी – रमेश बागवे 12. सोलापूर दक्षिण – दिलीप माने 13. पंढरपूर – भागीरथ भालके 14. बल्लारपूर – संतोषसिंह रावत
पुणे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी देण्यात आलेले रमेश बागवे हे पुण्यातील ज्येष्ठ आणि शक्तिशाली नेत्यांमधील १ वरच्या फळीतील नेते मानले जातात.दलित बहुजन वर्गाचे नेते मानले जातात.नगरसेवक पद पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केलेले बागवे सर्व धर्म समभाव या एकाच मुद्द्यावर ४० वर्षे कॉंग्रेस मध्ये कार्यरत आहेत स्थायी समिती अध्यक्ष,सभागृहनेते अशी महापालिकेतील पदे त्यांनी भूषविली,राज्यात आतंकवादी कसाबला येरवड्यात फाशी देण्यात आली तेव्हा ते गृहराज्यमंत्री होते. दलित मागास समाजाला पुढे आणण्यासाठी अविरत कार्यरत राहिलेले डॅशिंग नेते अशी त्यांची प्रतिमा राहिली आहे. सुरेश कलमाडी यांच्या कडे नेतृत्व शहराचे असताना बागवे,दीपक मानकर हे त्यांचे दोन हाथ होते. मनुवादी साम्राज्य शाहीचे ते प्रमुख विरोधक शहरात मानले जातात. २०१४ ला भाजपची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे शहर कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले या काळात त्यांच्या एवढी जनतेशी संबधित प्रश्नांवर आंदोलने अन्य कोणीच केली नाहीत अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे.