पुणे-मराठा समाजातल्या गरीब मराठ्याला नक्कीच आरक्षण मिळाले पाहिजे अशी भाजपची भूमिका कायम राहिली आहे ,माझा सवाल आहे आरक्षणाची लढाई सुरु कधी झाली १९८२ साली अण्णासाहेब पाटलांनी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले मराठा आरक्षण नाही दिले तर माझा जीव संपविल असे सांगितले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही देत, म्हणून अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली . १९८२ पासून 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते , तेव्हा का नाही दिले मराठा आरक्षण ,मराठ्यांना आरक्षण देण्याची गरज नाही असे तेव्हा कोण म्हणाले याची सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता मतांकरिता दुफळी निर्माण करण्याचे काम सुरु आहे,आम्ही आरक्षण दिले हायकोर्टात ही टिकविले , सुप्रीम कोर्टात त्याला प्रोटेक्ट करताना विरोधकांचे सरकार होते त्यांनी ते केले नाही . मनोज जरांगेंना माझा सवालच नाही ,शरद पवार,उद्धव ठाकरे,आणि नाना पटोलेंचा सवाल आहे तुम्ही सांगा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याकरता तुमचे समर्थन स्पष्ट करा , दुटप्पी भूमिका सोडा, मार्थ्यांना , ओबीसींना दोघानाही वेडे करून झुंजवत ठेवायचे हे सोडा.आम्हाला तर शिव्या खायची सवय आहे , समाजाला न्याय देण्याकरिता कितीही शिव्या खाव्या लागल्या तरी आमची तयारी आहे पण मराठा आरक्षण प्रकरणी शरद पवार,उद्धव ठाकरे,आणि नाना पटोलेंचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही, तुमचा खोटारडेपणा हा समाजापुढे आणावाच लागेल असा खणखणीत इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला
फेक नरेटीव्ह जास्त दिवस टीकत नाही त्यांला खऱ्या नरेटीव्हने उत्तर द्या. भाजपच्या योजना लोकांपर्यत पोहचवा. विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना फ्री हँड दिला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिले होते. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला, आज जे आरक्षण चालले आहे ते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा वाढवल्याने म्हणून या देशात संविधानाने दिलेले आरक्षण सामान्य लोकांना मिळत आहे, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, काही जण महायुती निवडून आली तर आरक्षण संपवणार, संविधान बदलणार असे खोटे नरेटीव्ह पसरवत आहेत. फेक नरेटीव्हला जास्त दिवस टीकत नाही. खोटे जास्त दिस टिकत नाही. यांच्या खोट्या विजयाचा फुगा विधान परिषदेच्या निवडणुकीत यांचा फटला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधकांचे सरकार असताना त्यांनी सर्व योजना बंद पाडल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे लोक भरुण घेतील आणि सरकारपर्यंत पोहचू देणार नाही. यामुळे माता -भगिणीने महायुतीवर नाराज होऊ नये. महिलांनी या मविआच्या लोकांकडून अर्ज भरुण घेऊ नये असे फडणवीसांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उत्तर देता येते, पण तो विचार करतो की, आदेश आला तर उत्तर देईल. मात्र, आता सर्व पदाधिकाऱ्यांनी आदेशाची वाट न बघता जशाच्या तसे उत्तर द्या. केवळ हीट विकेट होऊ द्यायची नाही, चार दिवस आपल्या बोलण्याचीच उत्तरे द्यावे लागतील असे बोलू नका. खरे बोलायला विचार करावा लागत नाही, तुम्ही खोट्याला खऱ्याने उत्तर द्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकाने मुलीचे 100 टक्के शिक्षण मोफत केले आहे. तर गृहिणीसाठी 3 सिलेंडर देण्यात येत आहे. 2013 मध्ये या ठिकणी निवडणूक लढवली त्यानंतर 2014 मध्ये आपण बहूमतासह जिंकली. निवडणूक आपण 4 जणांविरोधात लढत होतो, आपण फेक नरेटीव्हला खऱ्या नरेटीव्हने उत्तर देणार आहोत. अवघ्या काही मतांनी आपला पराभव झाला आहे, थोडी जास्त मेहनत घ्यायची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.