पुणे-येरवडा येथील इझी पे प्रा.लि. ही कंपनी देशभरात ऑनलाईन पेमेंटची सुविधा नागरिकांना पुरविण्याचे काम करते. सदर कामाकरिता संबंधित कंपनीने देशभरात नाेंदणीकृत एजंटची नेमणूक केलेली आहे. व त्यांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. सदर कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणुक करणाऱ्या नोंदणीकृत एजंटचे दाेन साथीदारांना परराज्यातून अटक करण्यात अाल्याची माहिती अार्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पाेलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली अाहे.
उबेद ऊर्फ अब्देदुल्ला अन्सारी (वय-३६,रा.गया, बिहार) व अायुब बाशीर अालम (रा.बिहार) अशी याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११/८/२०२२ पासून सदर कंपनीतील नाेंदणीकृत असलेल्या एजंटपैकी ६५ एजंट यांनी संगनमत करुन कंपनीच्या वेबपाेर्टल अॅप द्वारे कंपनीच्या अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने अधिकृत केलेल्या माेबाईल व्यतिरिक्त दाेन ते चार व त्यापेक्षा जास्त वेगवेगळया माेबाईल संचाचा वापर करुन अनाधिकृतपणे सदर माेबाईल द्वारे लाॅग ईन अायडीने लाॅग इन करुन कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला.
कंपनीचे व्हीपीए खात्यातून अन्य ४४ बॅंक खात्यावर एजंटचे कमिशन व्यतिरिक्त तीन कोटी 52 लाख 70 हजार रुपयांची कंपनीची फसवणुक केली. याबाबत सायबर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हयातील अाराेपी अंकित कुमार अशाेक पांडे (रा.दुर्गापूर, पश्चिम बंगाल) व छाेटू ऊर्फ एजाज अालम त्याचे वडील जिअाऊल अन्सारी (रा.बिहार) यांना अटक करण्यात अाली. सदर अाराेपी विराेधात न्यायालयात दाेषाराेपपत्र देखील सादर करण्यात अाले. सदर अाराेपींच्या तपासात पाहिजे अाराेपी बाबत माहिती घेऊन पाेलीसांनी तपासातील प्राप्त इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील पाहिजे अाराेपी अबेद अन्सारी व अायुब अालम यांचा शाेध घेण्यासाठी सायबर पाेलीस स्टेशनचे वपाेनि मीनल सुपे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक तुषार भाेसे, पाेलीस अंमलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, निलेश लांडगे असे पथक दिल्लीस रवाना झाले.
सदर आरोपी हे त्यांचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत हाेते. त्यानुसार गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी दिल्ली येथून बिहार व तेथून पश्चिब बंगाल येथे गेल्याचे समजल्याने पोलिसांनी सापळा रचून उबेद अन्सारी व अायुब अालम यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तपासात गुन्हयात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना काेलकता मधील न्यायालयात हजर करुन पाच दिवसांचा ट्रान्झीट रिमांड घेऊन पुण्यात अाणण्यात अाले. त्यानंतर अाराेपींना पुणे न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांचा पाेलीस काेठडी सुनाविण्यात अाली. सदर अाराेपींकडून चार माेबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात अाले अाहे.