शरद पवारांचे नाव न घेत ‘भटकती आत्मा” म्हणत टीकास्त्र : इच्छा अपूर्ण राहिलेल्या अशा भटकणाऱ्या आत्म्यां पासून देशाला वाचविण्याची गरज
पुणे-पंतप्रधान मोदी यांची महायुती संकल्प सभामहाराष्ट्राने देशात अनेक वर्ष राजकीय स्थिरता दिली आहे. काही स्वप्न अधुरी राहिले की आत्मा भटकता राहतो. महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचा शिकार झालेला आहे. 45 वर्षांपूर्वी येथील एका नेत्याने या खेळाला सुरवात केली. तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचा खेळ सुरू झाला. ते केवळ विरोधकांना अस्वस्थ करत नाही ही आत्मा कुटुंबाला देखील सोडत नाही, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.पुण्यातील रेस्कोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री, चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, रूपाली चाकणकर, खा.मेधा कुलकर्णी, डॉ नीलम गोऱ्हे, प्रकाश जावडेकर उपस्थित होते.या भूमीतून जनतेला संदेशकसे आहे पुणेकर असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केसर रंग सर्वत्र दिसत आहे. मुले माझी वेगवेगळी चित्र घेऊन आली त्यांनी खाली बसावे. या भूमीने अनेक समाज सुधारक देशाला दिले आहे. आज ही भूमी जगाला संशोधक देत आहे. पुणे जेवढे प्राचीन आहे तेवढे भविष्यकडे वाटचाल करणारे आहे. पुणे तिथे काय उणे असे त्यामुळे म्हणतात. काँग्रेसने देशात 60 वर्ष राज्य केले पण त्यांनी अर्धी जनता जवळ मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला नाही. पण आम्ही सहा वर्षात मूलभूत सुविधा पूर्ण केल्या पण त्यासोबत प्रत्येक वर्गाची आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विकास प्रकल्प हे विकसित भारताचे स्वप्न आहे.सर्वाधिक पेटंट भारतीय युवकांच्या नावावरमोदी यांची गॅरंटी आहे देशाच्या पहिले बुलेट ट्रेन मध्ये तुम्ही प्रवास करताल. काँग्रेसने मनमोहन सिंग रिमोट कंट्रोल सरकार काळात दहा वर्षात जे पैसे मूलभूत गरजांवर खर्च केले ते आम्ही एक वर्षात करत आहे. स्टार्टअप इंडिया मध्ये युवकांनी सव्वा लाख स्टार्टअप बनवले आहे. त्यातील अनेक पुण्यात आहे. रीफॉर्म , ट्रान्सफॉर्म, परफॉर्म यावर भर दिला आहे. देश जगात आपली ताकद दाखवून देत आग हे. सर्वाधिक पेटंट आपले युवक नोंदणी करत आहे. दहा वर्षापूर्वी मोबाईल आयात करत होतो पण आता आपण जगात दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार बनलो आहे.कॉंग्रेसचा देशातील संपत्तीवर डोळामेड इन इंडिया अंतर्गत विविध क्षेत्रात विकास संधी दिली जात आहे. संशोधन हब, सेमी कंडक्टर हब, हायड्रोजन हब यावर लक्ष्य केंद्रित केले जात आहे. मध्यमवर्गीय, गरीब यांना दिलासा देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले आहे. देशात लायसन राज्य पुन्हा हवे आहे का? सरकारला सवय झाले की, सामान्य कामात अडथळा आणणे. पण माझे स्वप्न की, २०४७ पर्यंत सर्व सरकारी कटकट बंद करणे. काँग्रेसच्या युवराजला विचारले की, गरिबी कशी हटणार ते सांगते खटाखट, खटाखट,खटाखट..विकास कसा ठकाठक ,ठकाठक,ठकाठक..विकसित भारत टकाटक,टकाटक,टकाटक..ते आता देशातील नागरिकांच्या संपत्तीवर लक्ष्य केंद्रित करत आहे. काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान केला आहे. भाजपने संविधान दिवस सुरू केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित स्थाने तीर्थेरुपात विकसित केले.देशाच्या प्रगतीची ही निवडणूक – CM शिंदेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात मोदी यांच्या सर्व सभा रेकॉर्ड ब्रेक होत आहे. नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्यावर प्रेम करत आहे. कलम ३७० हटवून दाखवत जम्मू काश्मीर देशाशी जोडले. अयोध्येत राम मंदिर करून करोडे राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केले. काँग्रेसने ६० वर्षात देश बुडवला पण मोदी यांनी देश हित पहिले. देश बुडवणारे कुठे आणि देशभक्त कुठे याचा विचार करावा. देशाचा सन्मान जगात वाढवणारे नरेंद्र मोदी आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी यांच्यात ही लढाई आहे. विश्वासाचे नाव मोदी आहे. राज्यात पाच लाख कोटीची गुंतवणूक आलेली आहे. २०१४ पूर्वी दंगली, भ्रष्टाचार, घोटाळे होत होते परंतु आता ते होत नाही. देशाच्या प्रगतीची ही निवडणूक आहे.
मोदी म्हणाले, “केंद्र सरकारच्या नवीन धोरणाचा थेट परिणाम पुण्यासारख्या शहरातील महत्त्वाकांक्षी तरुणांवर होत आहे. मॅपिंगच्या क्षेत्रात तरुण आघाडीवर आहेत. अवकाश संशोधन, संरक्षण साहित्याचे उत्पादन, संशोधन विभाग, नावीन्यपूर्ण उद्योग अशा विविध क्षेत्रांत पुणे प्रगती करत आहे. पुण्यात बुद्धिमान तरुण आहेत, त्यामुळे केंद्राने नवनिर्मितीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरुणांना ती डोळे झाकून देण्याचा निर्णय घेतला आहे.”
पुणे हे वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. दहा वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयात करावे लागायचे. पण भारत आज जगातला दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. पुण्यात उत्पादित झालेल्या ‘मेड इन इंडिया’ चिपवर जगातील गाड्या धावताना दिसतील. भारतात हायड्रोजन हब बनविण्याचा संकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे हे आमचे सरकार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत उपचार
“केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार असताना महागाई आणि भ्रष्टाचार असे दुहेरी कर जनतेला भरावे लागत होते,” अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही महागाई नियंत्रणात आणली. भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले. आयकराची मर्यादा वाढविली. आता वयाची ७० वर्षे ओलांडलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मोफत उपचार मिळतील, ही ‘मोदींची गँरेटी’ आहे.”
राहुल गांधींवर टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, “शहेजाद्याला विचारले गरिबीचे कसे निर्मूलन होणार, त्यावर शहेजादे म्हणतात, ‘खटाखट’ आहे. युवराजला विचारले विकास कसा होतो, तर त्यावर ते म्हणतात, ‘खटाखट,टकाकट आहे.’ काँग्रेस परत ‘लायसन्स राज’ आणू पाहत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गरिबांना सरकार उपलब्ध होईल
देशातील मध्यम वर्गाला उद्देशून मोदी म्हणाले, “मध्यम वर्गीयांच्या आयुष्यात सरकार ही एक कटकट असते. ती बंद झाली पाहिजे. वेळोवेळी होणारा सरकारचा हस्तक्षेप नसला पाहिजे. तसेच गरिबांना प्रत्येक वेळेला सरकार उपलब्ध हवे, अशी व्यवस्था उभारणार आहे. हे परिवर्तन २०४७ पर्यंत होईल.”
भटकता आत्मा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील एका नेत्याने राजकारण अस्थिर केले आहे. हा अस्थिरतेचा खेळ त्यांनी ४५ वर्षांपूर्वी सुरू केला. अनेक मुख्यमंत्री अस्थिर केले. केवळ विरोधकांनाच नाही, तर स्वतःचा पक्षही अस्थिर केला. कुटुंबातही अस्थिरता आणली. ज्यांची स्वप्ने अद्यापही पूर्ण झाली नाहीत, असा भटकता आत्मा आहे. महाराष्ट्र त्याचा शिकार झाला आहे. हाच भटकता आत्मा १९९५ मध्ये युती सरकार अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. २०१९ मध्ये या आत्म्याने राज्यातील जनतेच्या बहुमताचा अपमान केला.
वर्तमानपत्रे हे छापणार नाहीत…
‘रिमोटवर चालणाऱ्या मनमोहनसिंग सरकारने पायाभूत सुविधांवर दहा वर्षांत जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही दरवर्षी करतो,’ असे सांगून मोदी यांनी पुणेकरांना हा आकडा लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. ‘हा आकडा लक्षात ठेवायला सोपा आहे. लक्षात ठेवा, कारण वर्तमानपत्रे हे छापणार नाहीत. ते कुठे तरी फोन करून विचारतील, छापायचे की नाही’ अशी टिप्पणी मोदी यांनी केली.
मोदी अभी जिंदा है!
”विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटकात काँग्रेसने एका रात्रीत मुस्लिमांना ‘ओबीसीं’चे आरक्षण दिले. केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर ते दलित, आदिवासी, ‘ओबीसीं’चे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देतील. मात्र मी जिवंत असेपर्यंत या देशात धर्मावर आधारित आरक्षण होऊ देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले…
जनऔषधी केंद्रांमधून ८० टक्के सूट
ज्येष्ठांवरील दवाखान्याचा खर्च कमी करणार ही मोदींची गॅरंटी
मध्यमवर्गीयांच्या घरासाठी ‘रेरा’चा कायदा
गरिबांसाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण, पण बँकेत गरिबांना स्थान नाही
ज्यांना बँकेत कोणी गॅरंटर नसते, त्यांना मोदींची गॅरंटी असते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाला
डॉ. आंबेडकर हे मला देवापेक्षा कमी नाहीत