पुणे-संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड येथे म्हणाले कि,’लोकशाहीमध्ये घटना हि अत्यंत महत्वाची असते आणि घटनेची जी तत्वे आहेत, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचे बंधुत्व ,डॉ. आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्य , स्वराज्य हि महाराष्ट्राने घटनेला दिलेली विचारधारा आहे , या विचार धरलाच धोका निर्माण झाला आहे. हि घटना , लोकशाही , देश सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून आम्ही महाविकास आघाडीला काल संभाजी ब्रिगेडची नासिक येथे बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. १९२५ला डॉ हेगडेवारांनी नागपूरला आर एस एस स्थापना केली. त्यानंतर द्वितीय संघचालक गोळवलकर गुरुजी यांनी एक पुस्तक लिहिले. बेंच ऑफ थॉट्स नावाचे . त्यानंतर हा देश कसा असावा याच्यासाठी त्यांनी ३२ वर्षे काम केले. आणि तीच विचारधारा आर एस एस ची झाली. आता पुढच्या वर्षी या आर एस एस ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत . त्यामुळे देशात आणि राज्य राज्यात त्यांना भाजपाचे सरकार कोणत्याही परिस्थितीत आणायचे आहे. गोळवलकर गुरुजींच्या विचाराचे हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्यासाठी २ तृतीयांश बहुमत ४०० पारचा नारा आहे आणि त्याद्वारे राज्यघटना मनुस्मृतीच्या तत्वावर नेणे , जिथे संत तिथे विषमता ,जिथे न्याय तिथे अन्याय राहील,अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल. कारण पूर्वीच्या काळात या देशात तशी स्थिती होती .ती निर्माण करण्यासाठी गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. आपल्या देशात विविध जाती धर्म, प्रांत , भाषा असताना विविधतेने नटलेल्या आणि सौख्य लाभलेल्या देशात अशी स्थिती निर्माण करणे व्याव्हारिकच नाही तर अत्यंत धोकादायक असणार आहे.