पुणे- आज महात्मा फुले जयंती आणि रमजान ईद निमित्त महात्मा फुले स्मारकावर अभिवादन करायला आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आपल्या असंख्य सहकार्यांच्याबरोबर सकाळी येथे अभिवादन झाल्यावर नाश्ता केला पण पत्रकारांशी त्यानंतर संवाद साधताना मात्र त्यांनी मिसळीचा झणझणित पणा आपल्या जिभेवर तसाच ठेवत यावेळीही पत्रकारांवर तोफा डागण्याची संधी दवडली नाही
अजित पवार यावेळी म्हणाले ,’आज अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसंच ईद हे दोन्ही एकाच दिवशी आलेले….१४ तारखेला घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्याच्यानंतर राम नवमी आहे.त्याच्यानंतर हनुमान जयंती अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या आहेत
मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्व आमच्या बंधू-भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा देतो.महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारक आहे.इथं त्यांना मी अभिवादन करण्याच्या करता महात्मा फुले वाड्यामध्ये आलेलो होतो. एकनाथराव शिंदे,देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचा पण योगदान आहे आणि सगळ्यांनी मिळून अतिशय चांगला अशा पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मारक करायचं ठरवलेलं आहे.
ऑलरेडी स्मारक झालेले परंतु जागा फार कमी पडतील म्हणून आजूबाजूची मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ज्या लोकांची जागा घेतली जाणारे त्यांना व्यवस्थितपणे मोबदला देऊन त्यांचा समाधान होईल. अशा प्रकारचं त्यांचा पुनर्वसन करण्याचा आमचा आहे.
भिडे वाड्यामध्ये देखील जिथं पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेले होते ती पण जागा आता सगळी ताब्यात आलेली आहे.ती कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आता पण दिलेली आहे.त्याचे पाच सहा प्लॅन देखील तयार झालेले त्याच्यामध्ये साधारण लोकांना जो मान्य होईल अशा प्रकारचा प्लॅन पास केला जाईल.आणि नंतर त्याचं काम सुरू केलं जाईल या दोन्ही कामातदार कुठल्याही प्रकारची निधीची अडचण भासणार नाही याची ग्वाही देतो.
विजयराव शिवतरे साहेबांनी स्वतः शिंदे देवेंद्रजी मी आणि विजयराव बसलो होतो. त्याच वेळेस त्यांचे काही महत्त्वाचे त्या भागातले विषय आहेत व पिण्याचा पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे काही भागातल्या एमआयडीसीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे.असे काही त्यांचे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली ते म्हणाले की महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले पाहिजेत ते काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ भोर मधला काही भाग आहेत इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत त्या विषयाला कुठेतरी मदत व्हावी त्याविषयीची सोडवू नको व्हावी या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित कराल त्यावेळेस येऊ त्या पद्धतीने त्यांनी आज सभा तिथल्या ग्राउंड वर सभा आयोजित केलेली आहे.
शिवतारेंना कोणाकोणाचे फोन गेले होते ? या प्रश्नावर ते म्हणाले तुम्ही मला मी मूर्ख समजू नका?आंबेडकरांनी जे संविधान दिलेलंय त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे आणि तेवढच मी बोलेन.मला सांगायचं ते सांगितलं आहे.
सातारा आणि नाशिक सगळं होईल आपण काळजी करू नका.आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही.नाशिक किंवा कोकण यांच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहेआणि देशातला संवाद सातवा सातवा टप्पा शेवटचा आहे तर त्याला अजून विलंब आहे.आज आम्ही मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे त्यावेळेस आम्ही जागा वाटप त्याच्याबद्दलची चर्चा करू देवेंद्रजी पण असतील उद्या पण मी मुंबईमध्ये आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढून
पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या विदर्भातल्या आहेत विशेषता भंडारा गोंदिया रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्या भागातल्या आणि त्याच्यावर त्यांची एक चंद्रपूरला सभा झाली दुसरी माझ्या माहितीप्रमाणे विदर्भात सभा आहे आणि त्यांनी काय भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे.
त्यांनी घरवापसी केली आहे.भाजप वाढवलं त्यात त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव आपल्याला घेता येईल त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे साहेबांचं नाव घेता येईल प्रमोद महाजन साहेबांचं नाव घेता येईल नितीन गडकरी साहेबांचा नाव घेता येईल हे सगळेजण आम्ही त्या काळामध्ये होते परंतु खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचं काम खडसे यांनी केलं.हे मी तरी बघत आलो आहे. मी राजकारणात आल्यापासून तिथे खडसे साहेबांच प्रभुत्व होतं आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने ही संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीचा शेअर सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला वजन समाजाचे मागासवर्गीय समाजातील सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्या योगदान मोठं होतं परंतु मोदी काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते ते आता घरवापसी केली आहे
परवा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातलं काम त्यांनी पाहिलं आहे त्यांना आवडतं म्हणून त्यांनी बिनिश्वर्त पाठिंबा आम्हाला दिलेला आहे याचा नक्कीच फायदा महायुतीला होईल राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे आहे