बारामती, पुणे:महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा २०मार्च हा दिवस. त्यामुळे या सत्याग्रह दिनानिमित्त बारामती येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जाऊन कोटी कुळांच्या उद्धारकास सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वभूषण आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निगराणीखाली सुशोभित देखणे झालेले येथील हे स्मारक बारामतीचे भूषणच आहे.
लढण्याचे, अन्याया विरोधात उभं राहण्याचे बळ, प्रेरणा देणाऱ्या आजच्या दिवशी महामानवाला अभिवादन करून ती प्रेरणा मिळाली “असे सुनेत्रा पवार यांनी प्रतिपादन केले.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, अभिजित चव्हाण, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, गौतम शिंदे, बिरजू मांढरे, रणधीर मोहिते, सचिन मोरे, बबलू जगताप, अनिता जगताप, रमेश मोरे, अभिजित सोनवणे, नितीन मोहिते, सचिन काकडे, शब्बिरभाई शेख, सुरेश शिंदे, मयुरी शिंदे, साधू बल्लाळ, कांबळे गुरुजी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.