मुंबई-अभिनेता अमोल कोल्हेंना आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न अन्य कोणत्याही नटाने करणे याबाबत एकंदरीतच सिनेसृष्टीत नाराजीचा सूर असताना, महाबळेश्वर ,सातारा परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत दिसल्यानंतर नाना पाटेकर आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे दिसले यावेळी तुम्ही अभिनेते अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार , असे ऐकतोय ते खरे आहे काय ? असा सवाल माध्यमांकडून करण्यात आल्यावर नाना पाटेकर म्हणाले की, मी खूप ठिकाणांहून निवडणूक लढवणार अशा चर्चा ऐकतो. एकदा मला सांगा की मी कुठून निवडणूक लढवणार? यानंतर नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली की तुम्ही अमोल कोल्हेंच्या जागी तुम्ही निवडणूक लढवणार का? यावर नाना पाटेकर म्हणाले, राजकारण हा माझा प्रांत नाही. कारण तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो आहे ते काम करण्यात जे समाधान आहे ते मला मिळणार नाही. मनात आलेलं सगळं आपणास बोलू देतील कि नाही माहीत नाही. तसंच किती राहू देतील ते पण माहीत नाही. त्यामुळे आम्ही ‘नाम’च्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहोत. गुवाहाटी, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आम्ही ही मोहीम घेऊन जात आहोत, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.

दरम्यान, आज नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुष्काळ हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करेलच मात्र आम्हीही नाम फाऊंडेशन म्हणून शक्य तितके सगळे प्रयत्न करु असे मकरंद अनासपुरे यांनी नेत्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी नाना पाटेकर देखील यावेळी उपस्थित होते. आपण आपल्यासाठी जगत असतोच, पण लोकांसाठी आपण हे काम करत राहू असंही नाना पाटेकर म्हणाले. मागच्या 8 वर्षात नाम फाऊंडेशनने 659 गावांत पाणी पोहचवण्याचं काम केलं आहे, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं.