मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. पक्षानं ज्यांना सर्वकाही दिलं ते लोक पक्ष सोडून जात आहेत हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं. काँग्रेस पार्टी संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढतोय, असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि विचारधारेच्या जोरावर संघर्ष करु आणि भाजपला पराभूत करु, असं नाना पटोलेंनी म्हटलं.