- 25 टक्के उपस्थितीत मुख्य सभा गरजेचीच
- बेजबाबदार व्यक्ती आणि अधिकारी यांच्यावर जरब ठेवण्यासाठी मुख्य सभा गरजेचीच
पुणे-महापालिकेची स्थायी समिती गोपनीय पद्धतीने होते , आता शहरात अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले असताना गोरगरिबांच्या जीवनाशी महामारीचा सामना सुरु असताना महापालिकेची मुख्य सभा गुंडाळून टाकण्यात अर्थ नाही किंवा ती व्हर्चुअल च्या नावाखाली गुप्त पद्धतीने होता कामा नये . स्थायी समितीच्या गोपनीय बैठकांप्रमाणे ती होता कामा नये , आणि जनतेच्या जीवनाशी संबधित अनेक विषय शहरात सतावत असताना महापालिकेच्या मुख्य सभांना रोखू नये किंवा अपारदर्शी होतील अशा पद्धतीने करू नयेत . पालिकेतील 25 टक्के सभासदांची उपस्थिती राहील अशा पद्धतीने महापालिकेची मुख्य सभा प्रत्यक्षात घ्यावी .अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे आपण करणार असल्याचे कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल यांनी सांगितले .
ते म्हणाले ,’ जाणून बुजून या पूर्वीच मुख्य सभा गुंडाळण्यात आल्या . तरीही काही नगरसेवक आणि महापौरांना देखील कोरोना ची लागण झालीच ना ? जनतेत मिसळल्याने सभासदांना कोरोना चा संसर्ग झाला आहे . मुख्य सभेला उपस्थित राहील्याने नाही . आणि कोरोना च्या भीतीने , त्या सावटाखाली नगरसेवकांना जनतेच्या समस्या मांडून प्रशासनाकडून जाहीर रित्या माहिती घेण्याचा अधिकार हिसकावला जातो आहे. मुख्य सभेस गर्दी होईल असे वाटत असले तर वृत्तपत्रे, काही सरकारी कार्यालये ज्याप्रमाणे कमी उपस्थिती अल्टरनेट पद्धतीने ,किंवा ज्यांचे विषय असतील अशा कमीत कमी सभासदांना प्रवेश देऊन मुख्य सभा घेतलीच पाहिजे . पदाधिकारी वगळून किमान 25 टक्के अल्टर नेट पद्धतीने उपस्थिती ठेऊन मुख्य सभा घेण्यात याव्यात अन्यथा शहरात 15 आय ए एस अधिकारी असून कोरोना कसा कमी होत नाही याचा जाब विचारायला व्यासपीठ ठेवले नाही असा त्याचा अर्थ होईल अनेक समस्या , बिकट अवस्थांवर चर्चा होऊन मार्ग निघू शकेल असे आबा बागुल यांनी म्हटले आहे. भाजपचे एक पदाधिकारी अन्य नगरसेवकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जाऊन जनतेत मिसळत आहेत पण मुख्य सभेला घाबरत आहेत त्यांनी खरे तर सरकारकडून परवानगी घेऊन अशा पद्धतीने मुख्य सभेत चर्चा घडवून आणली असती , अधिकारी आणि एकूणच खाजगी दुकानदारी करनारे व्यापारी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर जरब बसेल असे काम मुख्य सभेच्या च माध्यमातून होऊ शकते . प्रत्येक बेंचवर एक सभासद ठेवा ,पण मुख्य सभा प्रत्यक्षात आणि पारदर्शक वातावरणात घ्या अशी आपली मागणी असल्याचे बागुल यांनी म्हटले आहे. भाजपच्या राज्यात आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय अशी अवस्था होत असून कोरोनाच्या भीतीने ‘ हाक ना बोंब ; अशी अवस्था लादली जाते आहे. त्यामुळे 15 आय ए एस अधिकारी आणि महापालिका प्रशासन हे करतय काय ? त्यांच्याकडून जनसामान्यांच्या हिताची कामे कशी करवून घेता येतील . कोरोनाचा सामना कसा करता येईल याला पारदर्शक मुख्य सभा हेच उत्तर राहील आणि. करण तिथे अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारता येईल .चांगले काम करणारांच्या पाठीवर शाबासकी देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल . त्यामुळे मुख्य सभा 25 टक्के उपस्थितीत का होईना प्रत्यक्षात व्ह्यालाच हवी असे आपले स्पष्ट मत असल्याचे बागुल यांनी म्हटले आहे.