मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावावरून सध्या राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद सुरू आहे. आमदारांच्या त्या यादीच्या नावावर अजून शिक्कामोर्तब न झाल्याने राजभवनात भुतं आली का? अशी टीकाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांनतर राजभवनात री यादी सुरक्षित असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा संजय राऊत यांनी राज्यपालांना टोकलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले ?
दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 12 आमदारांच्या नावासंदर्भात इतके दिवस उलटूनही का निर्णय होत नाही? ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का? राज्याच्या मंत्रिमडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची ही नावे आहेत. त्यावर सहा-सात महिने निर्णय होत नाही. ही गोष्ट महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या लौकिकाला साजेशी नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांनी या गोष्टीचे भान ठेवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.