Home Blog Page 624

औरंगजेबाची कबर नष्ट करा:एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संसदेत मागणी

नवी दिल्ली- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआने संरक्षित केलेल्या देशातील 3,691 स्मारक व कबरींपैकी 25 टक्के कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणालेत.खासदार नरेश म्हस्के लोकसभेत बोलताना खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली. सभागृहाच्या शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के सभागृहात म्हणाले की, “औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर संरक्षित करण्याची काहीच गरज नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) द्वारा संरक्षित 3,691 स्मारके आणि कबरींपैकी 25 टक्के मुघल आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या आहेत, ज्यांनी देशाच्या संस्कृती आणि परंपरांच्या विरोधात काम केले.”

नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली व लुटली. औरंगजेबाने शिखांच्या नवव्या आणि दहाव्या गुरूंचीही हत्याकेली. त्याची कबर खुलताबादमध्ये आहे. ती ASI ने संरक्षित केली आहे. औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर जतन करण्याची काय गरज आहे? औरंगजेबासह भारताविरोधात काम करणाऱ्या सर्वांची स्मारके नष्ट करावीत.

अमली पदार्थाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा-ड्रग्ज मुक्त युवा पिढीसाठी कोथरुडकरांचा शंखनाद

अमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा नाही- ना. पाटील

झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण- उपायुक्त निखील पिंगळे

पुणे-ड्रग्जमुक्त युवा पिढीसाठी मंगळवारी शिवाजी रायगड स्मारक मंडळ, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारत आदी संघटनांच्या वतीने कोथरुड मधील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये कोथरुडकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अमली पदार्थ विरोधात शंखनाद केला. यामध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी अमली पदार्थ विरोधी लढा तीव्र करण्यासाठी अमली पदार्थ विक्रीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. तसेच, झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण असल्याची भूमिका पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी यावेळी मांडली.

यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या अमली पदार्थ विरोधी चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. सांगली सारख्या जिल्ह्यातही अमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत. त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री नात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती पुरविल्यास त्यास वैयक्तिकरीत्या रक्कम रूपये १० हजारांचे बक्षीस दिले जात आहे. कोथरुड मध्येही अमली पदार्थांची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करणाऱ्यास बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

अमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा मिळू देणार नाही, असा स्पष्ट इशारा देऊन ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मला प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता. पण मी कुठेही मागे हटलो नाही, अशी आठवण त्यांनी करुन दिली. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी लोकसहभागातून कोथरुड मध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी अमली पदार्थ ही आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित सर्वांनी अमली पदार्थ विरोधासाठी शपथ देखील घेतली.

स्व.यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण केले,याच विचारांची सध्या महाराष्ट्राला गरज

-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र समृद्ध करतानाच सुसंस्कृत राजकारण केले, त्याच विचाराने आणि मार्गाने जाण्याची सद्यस्थितीत गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (बुधवारी) स्व.चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना केले.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सोशल मिडिया विभाग यांच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त मंडईतील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी जलसिंचन, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा याची चांगली पायाभरणी महाराष्ट्रात केली आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध समाजाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना एकत्र केले. काँग्रेस पक्ष मजबूत केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पक्ष वाढीसाठी स्व.चव्हाण साहेबांच्या मार्गाने जाऊन मजबुतीने उभे राहिले पाहिजे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची ती जबाबदारी आहे, असे आवाहन माजी आमदार मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना केले.

या प्रसंगी बाळासाहेब अमराळे, प्रविण करपे, भोला वांजळे, चेतन अगरवाल, गौरव बालंदे, धनंजय भिलारे, साहिल राऊत, गोविंद वांजळे आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाचे सरचिटणीस सुरेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

४०० केव्ही वाहिन्यांना अंडर व्होल्टेजचा धोका;ग्रामीण भागात विजेचे अर्धा तास भारनियमन

पुणेदि. १२ मार्च २०२५: विजेची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील ४०० केव्ही पारेषण वीजवाहिन्यांचे व्होल्टेज बुधवारी (दि. १२) दुपारी २.४७ वाजता कमी (अंडर व्होल्टेज) झाले. त्यामुळे इतर ४०० केव्ही ग्रीडचा वीजपुरवठा बंद पडण्याचा धोका टाळण्यासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. यात २५६ मेगावॅटची तूट निर्माण झाल्यामुळे प्रामुख्याने मंचर, राजगुरुनगर, मुळशी तसेच रास्तापेठ विभागातील सुमारे २ लाख १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा २५ ते ३० मिनिटांपर्यंत बंद ठेवावा लागला.

४०० केव्ही वीजवाहिन्यांचे व्होल्टेज ३७५ ते ३६५ केव्हीपर्यंत आल्याने विजेची आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अंडर व्होल्टेजमुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. यात महापारेषण कंपनीच्या काठापूरथेऊरफुरसुंगीमरकळसणसवाडीपिंपळगाव व कुरुळी या २२० केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.

मात्र महावितरणमहापारेषण व महानिर्मिती कंपन्यांनी युद्धपातळीवर केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुणे परिमंडलामध्ये अर्धा तासात विजेची आपत्कालिन परिस्थिती नियंत्रणात आली. यासाठी महानिर्मितीने कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे विजेची जादा निर्मिती केली. तर महावितरण व महापारेषणने संयुक्तपणे विजेचे भारव्यवस्थापन केले. 

पारेषणमधील २५६ मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी नाईलाजाने वीजपुरवठा २५ ते ३० मिनिटांपर्यंत बंद ठेवण्यात आला. यात मंचर विभागातील मंचर शहरपिंपरखेडनिरगुडसरकाठापूरलोणीपेठराजगुरुनगर विभाग अंतर्गत आळंदी शहरगोळेगावपिंपळगावमरकळधानोरेसोलूकेळगावशेलपिंपळगावकळूसभोसेबहूलवडगाव आणि मुळशी विभाग अंतर्गत वाघोलीकेसनंदआव्हाळवाडीपेरणेथेऊरवडतीकुंजीरवाडीलोणी काळभोरसोरतापवाडीफुरसुंगीउरुळी देवाची तसेच रास्तापेठ विभागातील कोंढवा व एनआयबीएम परिसर येथील सुमारे २ लाख १२ हजार ग्राहकांचा समावेश होता.  

सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकीच्या लग्नाच्या केटरिंगसाठी एक चविष्ट लढाई

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये हिना खान आणि रॉकी जयस्वाल
किचनमध्ये आल्याने एक आनंददायी वळण मिळण्यासाठी येथील स्टेज सज्ज झाले आहे. ही
जोडी त्यांच्या लग्नासाठी एक परिपूर्ण केटरिंग सेवा निवडण्याच्या विशेष मिशनसाठी या मालिकेत
सहभागी झाले आहे. जज रणवीर ब्रार म्हणतात, “मेनू तयार करण्याची ही खूप मोठी संधी आहे.”
मात्र अर्थातच लग्नाप्रमाणे लडकीवाले आणि लडकेवाले यांच्यात मजेदार स्पर्धा रंगणार आहे.
कारण ते त्यांच्या पाककलेच्या कौशल्याने जोडप्याला प्रभावित करण्यासाठी स्पर्धा लावतील.
 टीम लडकीवाले यांच्यात फैसल शेख, तेजस्वी प्रकाश, अर्चना गौतम, गौरव खन्ना यांचा
समावेश असून ते सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी तयार आहेत. तर राजीव अदतिया, उषा नाडकर्णी,
निक्की तांबोळी आणि दीपिका कक्कर यांचा समावेश असलेली लडकेवाली टीम स्वयंपाकघरात
मसालेदार पदार्थ करण्यासाठी सज्ज आहे. प्रेम, हास्य आणि भरपूर मसालेदार पदार्थांनी युक्त
अशा एका रुचकर मनोरंजक एपिसोडसाठी तयार व्हा- कोण जिंकणार, लडकीवाले की लडकेवाले?
हा प्रश्न गंभीर आहे.
या चॅलेंजदरम्यान हिना आणि रॉकीने त्यांच्या हृदयस्पर्शी प्रेमकथेबद्दल सांगितले. हिना
म्हणाली, “खूप वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या शोच्या सेटवर मी त्याला भेटले होते. तो दुसऱ्या
कुणाच्या जागी सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून आला होता. मी त्याला भेटलेही नव्हते, पण मला
ते आवडलं नव्हतं. मी खूप पूर्वग्रहदूषित होते. पण तो खूप चार्मिंग आहे, त्याच्या कामाच्या
पद्धतीने मी प्रभावित झाले. कामातूनच आमचं नातं वाढत गेलं. खूप काळ आम्ही चांगले मितर्
होतो.” रॉकी हसत म्हणाला, “मला वाटतं आमच्यात प्रेमाआधी आदर आला. हीना ही खूप
समर्पित आणि प्रतिभावान आहे. पण मला तिचे गुण आवडले. आम्ही दररोज एकमेकांना
भेटायचो, अनेक दिवस मित्र होतो. पण एके दिवशी आम्ही एकमेकांना मिठी मारून भेटलो, तेव्हा
हे काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली. ” हिना पुढे म्हणाली, “तेव्हा आम्हाला समजलं की
ती आता मैत्री राहिली नाही.” परस्परांबद्दल आदर आणि गहिऱ्या नातेसंबंधातून अनपेक्षितपणे

प्रेम कसे फुलू शकते, हे यांच्या कथेवरून कळते. हीना खान आणि रॉकी जयस्वाल यांना परफेक्ट
केटरिंग सेवा मिळेल का? सेलिब्रिटी शेफ या आव्हानाला सामोरे जातील का? हे सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता,

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी टेलिव्हिजन वर…पाहता येणार आहे

हेमा मालिनी म्हणाल्या.. ‘अमिताभ, शत्रुघ्न यांसारख्याबरोबर ‘नसीब’ चित्रपट स्वीकारताना घाबरले होते..’

 
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 एक धमाकेदार होळी स्पेशल एपिसोड
घेऊन येत आहे. ज्यात दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी स्पेशल जज म्हणून उपस्थित राहतील.
या विशेष पाहुण्यांसह उत्सवात जज श्रेया घोषाल, विशाल दादलानी आणि बादशाह, सूत्रसंचालक
अभिजीत सावंत आणि मियांग चांग यांचाही समावेश आहे. संगीत, नॉस्टॅल्जिया आणि
अविस्मरणीय क्षणांचे आनंददायी मिश्रण या भागात असेल. या एपिसोडमध्ये आयडॉल की बसंती
उर्फ रितिका, मेरे नसीब मे या गाण्याचे हृदयद्रावक सादरीकरण करेल. हे गाणे एपिसोडचे प्रमुख
लक्षवेधी ठरेल. तिची नाट्यमय अभिव्यक्ती आणि गाण्याने प्रभावित होऊन श्रेया घोषाल प्रेमाने
म्हणते, ती गाण्यातले नाट्य खूप चांगल्या प्रकारे पकडते, त्यामुळे मी तिला ड्रामा क्वीन म्हणते, या सादरणीकरणाद्वारे एक नॉस्टॅल्जिक प्रवास सुरु होतो. कारण यानिमित्ताने बादशाह हेमा
मालिनी यांना स्टार-स्टड चित्रपट नसीबमध्ये भूमिका करण्याच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारतो. 
हेमा मालिनी यांनी मल्टी स्टार कास्टिंग असलेल्या या चित्रपटात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला
संकोचले होते हे मान्य केले. त्या म्हणाल्या, ‘त्यांनी माझ्यासाठी मल्टी स्टार कास्टचा चित्रपट
साइन केला तेव्हा मी घाबरले. हा सिनेमा एका वर्षात पूर्ण करण्याचे टार्टेट होते. पण सगळेच
कलाकार बिझी होते. अमित जी, ऋषी कपूर, रीना रॉय, अमजद अली खान जी, शत्रुघ्न सिन्हा,
अगदी सहकलाकारसुद्धा बिझी होते. सगळ्यांनी एकत्र येऊन चित्रीकरण करणे खूप कठीण होते.
ताकण आम्हाला त्याचवेळी इतर अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरु होते. त्यासाठी आम्हाला खूप
प्रवासही करावा लागत होता. पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केले. निर्माते आणि
त्यांच्या टीमचे खूप खूप आभार.. मला वाटतं एका वर्षात आम्ही चित्रपट पूर्णही केला.’

या इव्हिनिंग नॉस्टॅल्जियात भर टाकताना मियांग चांग याने फरदीन खानने हेमा जी आणि
फिरोज खान जी यांच्याबद्दल पूर्वी शेअर केलेली एक हृदयस्पर्शी गोष्ट शेअर केली. या
प्रसंगाबद्दल सांगण्यास उद्युक्त केले. त्या म्हणाल्या, हा प्रसंग क्या खूब लगती हो, बडी सुंदर
दिखती हो, या गाण्यादरम्यान घडले. फिरोज खान जी खूप भावनिक चित्रपट निर्माते होते.

गाण्याच्या शेवटच्या सीनच्या वेळी मागील बाजूला लोक हसत होते. त्यामुळे त्यांना राग आला
आणि रागाने काहीतरी लाथाडले. त्यांना नंतर कळले की तो माझा मेकअप बॉक्स होता. त्या गंमतीने पुढे म्हणाल्या, त्यानंतर दोन दिवस पिन-ड्रॉप सायलेन्स होता. कारण सगळेच घाबरले
होते. ते माझे आहे, हे समजल्यानंतर त्यांनी माफी मागितली. क्लासिक परफॉर्मन्स, नॉस्टॅल्जिक प्रसंग आणि होळीच्या रंगांची उधळण असलेला इंडियन
आयडॉल 15 एपिसोड ‘सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन’ आणि ‘सोनी लिव्ह’ वर शनिवारी
आणि रविवारी रात्री 8.30 वाजता प्रदर्शित होणार आहे

पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

मुंबई – राज्य सरकारने पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण करून पुणे, मुंबईच्या एकत्रित विकासाला चालना द्यावी, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना केले.

सन २०२५-२६च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी भाग घेतला. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी विकसित होत आहे, त्याचबरोबर पुण्याकरिता सर्व्हिसेस हब निर्माण करावे, ही सध्याची गरज आहे. त्यातून पुणे, मुंबई इकॉनॉमिक रिजनच्या एकत्र विकासाला चालना मिळेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. पुणे विभागात महिला व्यावसायिकांकरीता ‘स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र’ निर्माण करावे, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली.

विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या उद्दीष्टाकडे नेणारा उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी आणि सेवा क्षेत्र याचे संतुलन साधणारा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ या घोषणेची ग्वाही देणारा हा अर्थसंकल्प आहे, असे या अर्थसंकल्पाचे वर्णन आमदार शिरोळे यांनी केले.

मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीशील भूमिकेमुळे दाओस येथील आर्थिक परिषदेत अनेक कंपन्यांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे १६ लाख रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला. राज्याने निर्यातीत वाढ होण्यासाठी धोरण आखले, त्यामुळे राज्यातील निर्यातीचे प्रमाण १५.४ टक्के झाले. राज्याने लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली त्यातूनही रोजगार निर्मिती होईल, असे शिरोळे म्हणाले.

पुण्याचे औद्योगिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्व लक्षात घेऊन अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. तळेगाव ते चाकण २५ किलोमीटरचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) प्रस्तावित केला आहे. पुणे ते शिरूर ५४ किलोमीटरचा उन्नत रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील औद्योगिक पट्टा आणि पुणे ते नगर प्रवास करणाऱ्यांना फायदा होईल. वाहतूक कोंडीतूनही मुक्तता होईल. पुण्यामध्ये मेट्रोच्या विस्ताराला उत्तम गती मिळाली आहे आणि असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. तसेच सुमारे दोनशे सत्तावीस डिझेल बसेस ह्या लवकरात लवकर सी एन जी मध्ये रूपांतर कराव्यात आणि पुण्याला अजून तीन हजार बसेस ची गरज असून लवकर त्यावर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शिरोळे यांनी अर्थमंत्र्यांकडे केली. तसेच पुरंदर विमानतळाच्या कामाला गती देण्याचे काम सरकार ने करावे अशी ही सूचना शिरोळे यांनी केली.

प्रस्तावित पुणे-नाशिक इंडस्ट्रिअल एक्स्प्रेस वे चा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प ३ वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता दिल्याबद्द्ल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले.

शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार, मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार:शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार

मुंबई दि. १२ मार्च २५
आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक दिली. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकारातून काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द या घोषणांनी आझाद मैदान दणाणून सोडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वड्डेटीवार, आमदार कैलास पाटील, प्रविण स्वामी, दिलीप सोपल, सचिन अहिर, राजेश विटेकर, राजू नवघरे, अरुण लाड, जयंत आसगावकर,माजी खासदार राजू शेट्टी, आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाडगे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गिरीश फोंडे, उपस्थित होते.

अंबादास दानवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातील एका भाषणातील व्हिडीओ क्लिप ऐकवली. शक्तीपीठ रद्द करणार असे ते जाहीर भाषणात म्हणाले होते. मग आता तो रद्द होत नाही म्हणजे फडणवीस तुमचं ऐकत नाही असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

जयंत पाटील म्हणाले, एकाही शेतकऱ्याची मागणी नसताना सरकार हा रस्ता करत आहे. राज्यात असे अनेक रस्ते आहेत ते मागणी नसताना होत आहेत हा चमत्कार आहे. पक्षनिधी उभा करण्यासाठी सरकारने हा नवा मार्ग अवलंबला आहे. कंत्राटदार यांना पोसण्याची ही नवी साखळी आहे, ठराविक सहा जणांना कामे दिली जातात याचा भुर्दंड आपल्या सर्वांवर बसत आहे. तुम्ही शेतकरी याला विरोध करणार असाल तरच आम्ही यात पुढाकार घेतो. यावेळी उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी जयंत पाटील यांना समर्थन देत शक्तीपीठ महामार्ग विराधात जोरदार घोषणा दिल्या.

आमदार सतेज पाटील म्हणाले, कुणाचे तरी वाळू सिमेंट खपवण्यासाठी हा महामार्ग कंत्राटदारांसाठी झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जो गरजेचा रस्ता आहे त्याला कोणी विरोध करत नाही मात्र हा रस्ता नको म्हणत असतानाही सरकार तो रेटत आहे. ठेकेदाराला हवे असणारे कामच हे सरकार करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तीपीठ रद्द झाल्याची घोषणा केली पण आता त्यांना विसर पडला आहे. विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, हे सरकार डबल धूलकी सरकार आहे. खाण्यासाठी हे एकत्र येतात आणि लोकांचे हित पाहताना मात्र विराधाभास दाखवतात. सद्याचे सरकार टक्केवारीवर चालते. सध्या 9 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. ज्यांनी पक्षांशी गद्दारी केली त्यांनी शेतकऱ्यांनाही फसवले.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग म्हणजे देवाची आळंदी सोडून चोराची आळंदी करता कशाला. ज्या ज्या ठिकाणी नव्या रस्त्यावर टोल उभारले आहेत त्यांची 25 टक्के सुद्धा वसुली होत नाही.
आमदार विश्वजित कदम म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याला विरोध केला जात असताना याची फिकीर नाही.

जमीन मोजणी केली असेल तर त्या खुणा मुजवा, उपसून टाका असे आवाहन शेट्टी यांनी केले. हा रस्ता झाला तर कोल्हापूर जिल्ह्यात ४० दिवस पूर हटणार नाही.पूर्ण शेती पुराच्या पाण्यात जाणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.

लातूरला ८ एप्रिल ला मेळावा
शक्तीपीठ महामार्गचा हा लढा पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या ८ एप्रिलला लातूर येथे भव्य मेळावा घेण्याचा निर्णय या मोर्चात घेण्यात आला. प्रत्येक जिल्यात मेळावे, स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्री यांना जाब विचारण्यासाठी घरावर मोर्चे काढणार, सरकार निर्णयाचा निषेध म्हणून शेतात काळे झेंडे लावणार असे निर्णय यावेळी घेण्यात आले.

सतेज पाटील यांनी दाखवली ताकद
या मोर्चाला किती लोक उपस्थित राहतील याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चाला आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सर्वाधिक उपस्थिती होती. शक्तीपीठ महामार्गाचा विषय आमदार सतेज पाटील यांनी शेवटपर्यंत लावून धरल्याने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

२५२ सीसीटीव्ही तपासुन अखेरीस लावला त्या २ अल्पवयीन मुलींना शोधले

पुणे-अपह्त झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा सीसीटीव्ही कॅमे-याच्या फुटेजचे आधारे शोधुन काढण्यात फरासखाना पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश आले आहे.
फरासखाना पोलीस स्टेशन येथे दिनांक ०७/०३/२०२५ रोजी १४ वर्षे व ८ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुली तितली फाऊडेशन बुधवार पेठ पुणे येथुन अपह्त झाल्याची तक्रार नोंदवली गेल्याने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ सदर घटनेची दखल घेवुन तपासाबाबत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ श्री. संदिप सिंग गिल्ल पुणे शहर यांना आदेश दिले.
त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ संदिप सिंग गिल्ल यांनी लागलीच परिमंडळ १ मधील गुन्हे पथकाचे पोलीस अधिकारी व पो. अंमलदार यांना वर नमुद गुन्हयाचे अनुषंगाने तैनात करुन, फरासखाना पोलीस ठाण्याचेवरिष्ठ पोलीस निरिक्षक व पोलीस निरिक्षक गुन्हे याचे देखरेखीखाली तपास करणेबाबत आदेश दिले.
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भस्मे यांनी फरासखाना पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव गायकवाड, पोलीस उप निरिक्षक अरविंद शिंदे व तपास पथकातील पोलीस अंमलदार व खडक पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना गुन्हयाचे अनुषंगाने सुचना देवुन वेगवेगळ्या ७ पथके तयार करुन त्यांना कामाची विभागणी करुन दिले. त्याप्रमाणे तपासकामी नेमण्यात आलेल्या ७ पथके यांनी एकमेकांचे संपर्कात राहुन, वर नमुद गुन्हयातील अपह्त झालेल्या दोन अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही फुटेजचे मदतीने शोध सुरु केला, गुन्हयाचे अनुषंगाने पासोडया विठोबा मंदिर, बुधवार चौक, शिवाजी रोड, स्वारगेट सीटी बस स्टॅण्ड, ससुन हॉस्पीटल, पुणे स्टेशन, केशवनगर, पदमावती सहकारनगर भागात जवळपास २५२ सीसीटीव्ही कॅमे-याच्या तपासुन, सीसीटीव्ही फुटेज चे मदतीने दोन अल्पवयीन मुलीचा माग काढुन, त्याचा शोधु घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमारपाटील, पोलीस उप-आयुक्त परी-१ संदिप सिंग गिल्ल, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भस्मे, पो.नि. (गुन्हे) अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, पोलीस उप निरिक्षक संतोष गोरे, सपाफौ गेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार, तानाजी नागंरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, अविनाश गोपनर, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, संदिप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, अर्जुन कुंडाळकर, अमोल गावडे, भाग्येश यादव, शोएब शेख, मयुर काळे, सागर मोरे यांनी केलेली आहे.

महापालिकेत समाविष्ट गावांचा विकास आराखडा कधी मंजूर होणार; पठारे यांचा अधिवेशनात सवाल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार यांनी महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या लोहगाव सह इतर गावांच्या विकास आराखड्याबाबतीत शासनाचे लक्ष वेधले. पठारे म्हणाले, “समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप शासनाकडून मंजूर न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गावांमध्ये डीपी (विकास आराखडा) प्लॅन नसल्यामुळे नागरिकांच्या जमिनी, भूखंड आणि बांधकाम संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया रखडल्या आहेत. परिणामी, अनेक कुटुंबांना मालमत्तेच्या संदर्भातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख रस्ते, जोडरस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून, याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.” महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील संबंधितांकडून हप्ते वसूली होत असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार पठारे यांच्या ठोस मागणीनंतर उद्योग मंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांनी या सर्व बाबींची सखोल शहानिशा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. यामुळे वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या त्वरित हस्तक्षेपामुळे या भागातील नागरी समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा आहे.

एचएसआरपी नंबर प्लेटलावण्याची मुदत ३ महिने वाढवा-आमदार शिरोळे यांची मागणी

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्याचे काम चालू झाले आहे. नंबरप्लेट लाण्यासाठीची मुदत तीन महिने वाढवून मिळावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत आज (बुधवारी) केली आहे.

एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे सुप्रीम कोर्टाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार, राज्यात वाहनांना नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ आहे. केवळ पुणे शहरातच सर्व प्रकारची ४० लाख वाहने आहेत. आजपर्यंत फक्त २ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात आली आहे. वाहनांची मोठी संख्या पाहता ३० एप्रिल पर्यंत पुण्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे सध्याच्या वेगाने अशक्य आहे. आरटीओ कार्यालयांत त्यासाठी सक्षम व्यवस्था नाही. हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत. केवळ पुण्यातच नव्हे तर राज्याच्या विविध शहरांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे, याकडे आमदार शिरोळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

तसेच या नंबर प्लेट लावणारी सेंटर्स कमी असल्यामुळे नागरिकांना अपॉइंटमेंट लवकर मिळत नसून, राज्यात सेंटर्स वाढवून द्यावीत आणि नंबर प्लेट लावून देण्यासाठीची मुदत ३ महिने वाढवून द्यावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र आमदार शिरोळे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही पाठविले आहे.

अवघी दुमदुमली आळंदी

पुणे-नभी फडकणारी भगवी पताका अन मुखी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराज की जय’ चा जयघोष क्षणाक्षणाला वाढणारा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि त्यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं, निमित्त होत.. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं. रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर अशा आनंदानुभव उपस्थितांनी याप्रसंगी घेतला. येत्या १८ एप्रिलला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटातील आपल्या संत भूमिकेच्या रूपात दर्शन दिलं.

असामान्य बुद्धिमत्ता आणि भक्तीयोगमार्गात उच्च स्थान प्राप्त केलेल्या संत मुक्ताई या अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे जीवन जगल्या. मानवी मनाचे समुपदेशन करणाऱ्या आदीशक्ती मुक्ताईचे नाव स्त्री संतांच्या मांदियाळीत प्रामुख्याने घेतले जाते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई. ही चारही भावंडे विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तीमंत दिव्य स्वरूप होत. बोलण्यात स्पष्टता आणि कठोरता असणाऱ्या मुक्ताईने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी भावंडांचे आईपण स्वीकारत शिष्यांवर मायेची चादर पांघरली. अशा संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

केलेली पापे इथेच फेडायची आहेत… मानकरांचा हल्लाबोल

अजितदादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. धंगेकर यांना कडक भाषेत सुनावले

पुणे- रविंद्र धंगेकर ने अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’रविंद्र धंगेकरने स्वतः चार दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्याची लायकी आहे का ? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन हा गद्दार निवडून आला नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागला. पुण्यातील पब संदर्भात आंदोलन करायची हप्ते वसुल करून नंतर आंदोलन स्थगित करायची. कॉर्पोरेशनच्या कामांमध्ये बिल्डर लोकांची कामे अडवून खंडणी वसूल करायची.लक्ष्मीरोडच्या सराफांकडून घर दुरुस्तीच्या नावाने कॉर्पोरेशन कडून बांधकामाला परवानगी घेवून सगळ्या सोन्या मारुती चौकातील बांधकामे बेकायदेशीर करून पैसे वसूल करायचे. वक्फ बोर्डाची मुसलमान समाजाची गणेश पेठेतील जमीन गिळंकृत केली. लाचलुचपत खात्यात त्याच्या विरोधात १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली याची चौकशी सुरु आहे. क्राईम ब्रांच युनिट १ ला खंडणीचा गुन्हा प्रलंबित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा पडीक आमदारास दादांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही. वाटेल ते स्टेटमेंट करतोय. दादांनी त्याला दाखवले आहे. ज्या दिवशी बडगा दाखवतील त्यावेळी ह्या बांडगुळाला त्याची लायकी समजेल. शिंदे गटात जाऊन स्वतःला भविष्यात पोलिसांकडून होणारा त्रास कमी होणार नाही. गृह खाते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. याची जाणीव ठेवा. केलेली पापे इथेच फेडायची आहे. मुस्लीम समाजाला वापरून त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केलेली आहे. शिक्षण मंडळाच्या बालवाडी शिक्षिका, सेविका यांना कायम करण्यासाठी करोडो रुपये वसूल केले. त्या गरीब महिलांनी स्वतःचे दागीने मोडून पैसे दिलेत. काही महिला एजंट,काही कार्यकर्ते पैसे वसुलीसाठी नेमले होते. याची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी म्हणजे ह्या भुरट्याचे सत्य समोर येईल.
ज्या काँग्रेस पक्षाने लोकसभा,विधानसभेची अनेकांना डावलून ह्या धंगेकरला उमेदवारी दिली.त्याने फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांना वापरून आपला रंग दाखवला. हा कोणाचा होवू शकत नाही.शिंदे साहेबांना ह्याचा अनुभव येईल. त्यावेळी बराच उशीर झालेला असेल. हा Who is Dhangekar नाही तर He is Real Criminal Dhangekar हे सत्य तुमच्या समोर लवकरच येईल. अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही. फालतु वाचाळ बडबड मिडीयाच्या माध्यमातून सारखी कडून सवंग प्रसिद्धी मिळवू नका. हीच मिडिया लवकरच तुमच्या विरोधातील बातम्या तुम्ही केलेल्या वाईट कर्माच्या बातम्या प्रसिद्ध करतील.

स्वारगेट बसस्थानकाचा वीजपुरवठा सुरळीतच- महावितरण

मंगळवारी रात्रभर वीज खंडित नव्हती

पुणे, दि. १२ मार्च २०२५: स्वारगेट येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. ११) रात्रभर सुरळीतच होता. वीजपुरवठ्यामध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. तथापि, स्वतंत्र वीजजोडणी असलेल्या बस आगारामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दोन फेज सुरु असले तरी हायमास्ट व कार्यालयांचा वीजपुरवठा सुरु होता असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे. स्वारगेट बसस्थानकामध्ये काल रात्रभर वीज खंडित होती का याबाबत बुधवारी (दि. १२) सकाळपासून माध्यमांद्वारे विचारणा होत आहे. त्यासंदर्भात महावितरणकडून हे स्पष्टीकरण करण्यात आले.

एसटी महामंडळाच्या स्वारगेट बसस्थानक व आगारासाठी स्वतंत्र उच्चदाबाची वीजजोडणी आहे. यातील बसस्थानकाचा वीजपुरवठा अखंडित व सुरळीत आहे. तर आगाराच्या जोडणीला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये काल सायंकाळी बिघाड झाला. मात्र महावितरणकडून दोन फेजद्वारे आगारामध्ये कार्यालयीन व हायमास्ट दिव्यांचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला होता. बिघाड झालेली वीजवाहिनी उड्डाणपुलाखालील कॉन्क्रीट रस्त्याखाली आहे. त्यामुळे आगाराला पर्यायी व्यवस्थेतून तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र स्वारगेट बसस्थानक व आगाराच्या वीजपुरवठ्यात मंगळवारी (दि. ११) रात्रभर कोणताही व्यत्यय आलेला नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

करीअर सोबतच मुलांवर चांगले संस्कार करा-सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष : महिला उद्योजिकांचा सन्मान

पुणे: महिलांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेत केवळ आर्थिक स्वावलंबनच नव्हे, तर संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, व्यवसाय किंवा नोकरी करताना महिलांनी केवळ पैसा कमविण्यावर लक्ष केंद्रित न करता, मुलांवर चांगले संस्कार देखील कसे करता येतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे.अशी भावना ज्येष्ठ उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल यांनी व्यक्त केली.

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला उद्योजिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृणाली रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम अभिनेत्री वाळके उपस्थित होते. महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि शासकीय स्वयंरोजगारासाठी योजनांचे माहिती प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सारिका पाठक, सोनल गांधी या महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.    

कृष्णकुमार गोयल म्हणाले, महिलांचे कर्तृत्व मोठे आहे. रोज त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. अनेक रुपात त्या आपले कर्तृत्व पार पाडत असतात. तुळशीबाग गणपती शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. महोत्सव अंतर्गत वर्षभर सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.