Home Blog Page 625

दीदी कृष्णा कुमारी यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार

पुणे – रोटरी क्लब ऑफ निगडी, पुणे यांनी साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांना शांतता आणि सौहार्द वाढविण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ७:०० वाजता एल्प्रो ऑडिटोरियम, एल्प्रो सिटी स्क्वेअर, चिंचवड, पुणे येथे झाला.निगडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुहास ढमाले यांनी मेळाव्याचे स्वागत केले आणि दीदी कृष्णा कुमारी यांनी असंख्य व्यक्तींना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि विकसित होण्यास कसे प्रेरित केले आहे यावर प्रकाश टाकला.डीजीएन रोटेरियन नितीन ढमाले यांनी सांगितले की, रोटरी अनेक मानवतावादी प्रयत्नांमध्ये सहभागी आहे, परंतु शांतीचे राजदूत विकसित करणे हे त्यांच्या ध्येयाचे केंद्रबिंदू आहे.पीस डायरेक्टर रोटेरियन. त्यानंतर रानू सिंघानिया यांनी दीदी कृष्णाची ओळख करून दिली आणि त्यांचे वर्णन असे केले की त्या खोल भावनिक बुद्धिमत्ता आणि खोल आध्यात्मिक बुद्धिमत्ता दोन्हीचे उदाहरण दिले. त्यांनी दीदींच्या केवळ शब्दांद्वारेच नव्हे तर त्यांनी दाखवलेल्या करुणेद्वारे शांती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलले.त्यानंतर, दीदी कृष्णा कुमारी यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुरस्कार देण्यात आले. आपल्या स्वीकृती भाषणात, दीदींनी नम्रपणे सांगितले की तिचे गुरू – साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी – अधिक पात्र होते. त्यांनी त्यांचे वर्णन ‘शांतीचा खरा पैगंबर” /दूत असे केले.
दीदींनी एका सामान्य गैरसमजाचे निराकरण केले: “बरेच लोक असा विश्वास करतात की ते एकटे वैयक्तिकरित्या जागतिक शांततेत योगदान देऊ शकत नाहीत. पण युद्धे कशामुळे होतात? मत्सर, स्वार्थ. जर हे आपल्या आतून सुरू झाले तर शांती देखील आली पाहिजे.” शांती हा जन्मसिद्ध हक्क आणि जीवनपद्धती आहे, असे दीदी कृष्णा म्हणाल्या.

त्यांनी शांती विकसित करण्याचे सहा सोपे मार्ग सांगितले: संयम निवडा, वर्तमानात जगा, कृतज्ञ रहा, क्षमा करायला शिका, निःस्वार्थ प्रेम करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवासोबत करा आणि पहिला क्षण शांततेत घालवा.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते आर.टी.एन. सुहास ढमाले, सचिव आरटीएन रवींद्र कदम, संचालक आरटीएन राणू सिंघानिया, डीजीएन आरटीएन नितीन ढमाले, आरटीएन राकेश सिंघानिया, आरटीएन सुजाता ढमाले, आरटीएन ईश्वर ठाकूर आदी मान्यवर व अन्य सन्माननीय रोटेरियन उपस्थित होते.संध्याकाळची सांगता दीदींच्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणेने झाली, जिथे उपस्थितांनी अलौकिक शांतीचे क्षण अनुभवले.पूर्वी ध्यानात रस नसलेल्या एका ६२ वर्षीय महिलेने सांगितले की, दीदींच्या शब्दांनी तिच्या विचारांना उजळून टाकले आहे.

दीदी कृष्णा बद्दल
दीदी कृष्णाने तिच्या आयुष्याची सुरुवात साधू वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्या मार्गदर्शनाने केली. तो वासवानीच्या शिकवणींना समर्पित आहे आणि सर्व प्राण्यांसाठी प्रेम, सेवा आणि श्रद्धेचा संदेश पसरवत आहे. साधू वासवानी मिशनच्या प्रमुख म्हणून, त्या शिक्षण, आरोग्यसेवा आणि मदत कार्यातील मानवतावादी उपक्रमांची देखरेख करतात. ती तिच्या गुरूंचे ज्ञान सामायिक करण्यासाठी व्यापक प्रवास करते आणि विविध श्रोत्यांना संबोधित करते, ज्यात आंतरधर्मीय मेळावे आणि जागतिक शांतता मंचांचा समावेश आहे.

धंगेकरांनंतर अजून एक फायरब्रँड नेत्या सुलभा उबाळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला

0

पुणे-राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सध्या मिशन टायगर जोरात सुरू आहे. पुण्यात शिंदे उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसरा धक्का दिल्याचे समोर आलंय. रवींद्र धंगेकर यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत.ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलंय. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

शहरातील तीनही मतदार संघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात पक्षाचं अस्तित्वचं शिल्लक नाही, पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्षसोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असं ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी म्हटलंय.

धंगेकर म्हणजे पुण्यातील कराड;काँग्रेसच्या अध्यक्षांचा आरोप
काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र या पक्षप्रवेशानंतर पुण्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी भीतीपोटी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याचा दावा केला तर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.रवींद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नाही. आमचा पक्ष कुठच कमी पडला नाही. पक्षाने त्यांना चारवेळा संधी दिली तरी पक्षाला सोडून गेले. मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले. काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे. त्यांना लीड घेता आलं नाही. अशी टीका काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांच्यावर केली.पुढे बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, धंगेकर पक्षासाठी काम करत नव्हते मात्र पक्षाने माझ्यासाठी काम केला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. यापुढे पक्षाला विनंती आहे की, अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही. हे संधीसाधूपणा करत आहेत, आम्ही पक्षाला सांगितलं होतं अनेकदा पक्षाच्या विरोधात काम करत आहेत, असे सांगितलं होतं. आम्ही कधीच त्यांच्यावर बोललो नाही. रस्त्यावर आम्ही उतरून काम केलं. देश राम मंदिर उत्सव साजरा करताना हे बाबरी मशीदवर बोलत होते, विचारधारा नाही. यांना एका पार्टीची लाइन धरता येत नाही. कुठल्याच बैठकीला, आंदोलनांना येत नाहीत, अशी तक्रार अनेकदा आम्ही पक्षाला दिली होती. त्यांना अनेकदा समज दिली, मात्र बदल झाला नाही. हे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात, यांनी काय केलं नाही. एक नगरसेवक केला नाही, आम्हाला दुःख आहे की,अशा नाकर्त्यांवर आम्ही विश्वास ठेवला, यांनी केवळ मतलबी राजकारण केलं. असं देखील यावेळी अरविंद शिंदे म्हणाले.तर खासदार संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, त्यांच्या टेंडरमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी पक्ष सोडला. वक्फ बोर्डच्या जागेचा वाद होता, विषय वक्फ बोर्डचा होता आणि या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार होती म्हणून त्यांनी पक्ष सोडला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. त्यांच्या बायकोचा विषय नाही, वहिनींचं नाव कुठ नाही. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी राजकारण केलं असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.तसेच त्यांच्यामुळे पक्षाला कोणताही फायदा झाला नाही. यांच्यात हिम्मत असती तर समोर येऊन पत्र देऊन पक्ष सोडून गेले असते. तीन नगरसेवक असताना त्या पक्षातील लोकांनी अनेक विषय बाहेर काढले, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत.येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना हरवू त्यांना कायमचं माजी ठेवू. ससूनमधले विषय, ड्रॅग्सचे विषय पुढे का गेले नाहीत, स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलन केली. पुढं या आंदोलनाचं काय झालं. असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या उच्च विचारांची परंपरा जपणे आपली जबाबदारी” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन कार्यक्रम

मुंबई दि. १२ मार्च २०२५ : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आज सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण केला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी त्यांना अभिवादन करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेच्या राजकारणाची संकल्पना रुजवली. मतभेद असले तरी समाजकारणाला महत्त्व द्यावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या विचारांची परंपरा जपणे ही आपली जबाबदारी आहे.”

तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होण्यासाठी मोठे योगदान दिले. सहकार, शेती, संस्कृती, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले.

शाळेत असताना आम्ही यशवंतराव चव्हाण यांना पाहिलं होतं. महाराष्ट्र गीताच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. ते नेहमी म्हणायचे की राजकारण हे सर्वांचं मिळून असतं, मात्र समाजकारण अधिक महत्त्वाचं आहे. मतभिन्नता असली तरी सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला जपणं आवश्यक आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अन्य मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत त्यांच्या योगदानाला स्मरले.

मंगळवार पेठेतील ‘तो’ भूखंड बिल्डरच्या गळ्यात मारू नका -आमदार टिळेकर

ज्या जागेवर कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव

मुंबई- पुणे येथील कर्करोग रुग्णालयासाठी नियोजित केलेली जागा खाजगी व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देऊ नका अशी मागणी आज येथे आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत केली .मंगळवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची ८९०० चौरस मीटर जागा नाममात्र मूल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास हस्तांतरित केल्याने पुण्यात कर्क रोग रुग्णालय निर्माण करण्यास अडथळा येणार आहे म्हणून ही जागा खाजगी व्यावसायिकाला देऊ नये अशी आग्रही मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात केली
त्यांनी सदर नियोजित जागेबाबत सभागृहात माहिती दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांचे कार्यालयाचे पत्रानुसार दिनांक५ मे २०१२ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर मंगळवार पेठ पुणे येथील जागा ‘वैद्यकीय शिक्षण विभागास’ हस्तांतरित करण्याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय यांनी सुचित करून त्या मोबदल्यात महामंडळाचे आर्थिक नुकसान शासनामार्फत भरून देण्याच्या अटीस अधीन राहून सदर मंगळवार पेठ, पुणे येथील जागा वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरित करण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची हरकत नसल्याचे दि.१२.०२.२०१३ रोजीच्या पत्रान्वये कळविले होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार IAS यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करून बैठका घेऊन पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणेचा प्रस्ताव तयार झाला असून लवकरच तो मंत्रिमंडळ मान्यतेसाठी ठेवणार आहे असे सांगितले होते. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालय व छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कॅन्सर रुग्णालयात रुग्णांवर मोफत तसेच सवलतीच्या दरांत उपचार होतात परंतु, संपूर्ण राज्यातील रुग्णांचा भार या रुग्णालयांवर पडत असल्याने पुण्यासारख्या ठिकाणी ससूनच्या आवारात एक सरकारी कॅन्सर रुग्णालय उभे करण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी दिलेली होती.पुण्यात राज्यातून उपचारांसाठी रुग्ण येत असतात.त्यासाठी, ससून हॉस्पिटलच्या समोरील रस्ते विकास महामंडळाची जागा देण्याचे नियोजन केलेले होते. त्यासाठी सध्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व तत्कालीन ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी या जागेत साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. परंतु अद्याप त्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही.. ज्या जागेवर कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता ती मंगळवार पेठ, पुणे, येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मालकीची ८९०० चौरस मीटर जागा मे. एनजी वेंचर्स यांना भाडेतत्त्वावर विकासासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादितचे संचालक मंडळ यांचे दि.२९.०२.२०२४ रोजीचे बैठकीत मान्य केला आहे. कोट्यावधी रुपये किमतीची ही मोक्याची जागा खाजगी बिल्डरला 70 कोटी रुपयाला लीज वर देण्याचा निर्णय घेतला.सध्या या जागेचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत आहे. सदर जागा मे. एनजी वेंचर्स यांना हस्तांतरित करावयाची असल्याने सार्वजनिक बांधकाम पुणे अंतर्गत असलेली कार्यालये व सदर कार्यालयाच्या इमारती इतरत्र हलवून व जागा मोकळ्या करून देणेबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे कळविले आहे. परंतु या जागेवर नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे कर्करोग रुग्णालयाची उभारणी करण्याची गरज आहे. सदरच्या जागेवर कर्करोग रुग्णालय न बांधता जर ती जागा खाजगी व्यवसायिकाला भाडेतत्त्वावर दिली तर नागरिकांमध्ये शासनाविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष वाढून आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे ही जागा खाजगी व्यावसायिकाला देऊ नये. या जागेवर कर्करोग रुग्णालय लवकर उभारावे अशी आग्रही मागणी आमदार टिळेकर यांनी केली.

विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे सासवड येथे आयोजन- सचिव सोनल पाटील

पुणे, दि. 12: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 16 मार्च 2025 रोजी वाघीरे कला, वाणिज्य आणि विज्ञान, महाविद्यालय, सासवड, जि. पुणे येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे.

या महाशिबीराचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहीते-डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हे महाशिबीर संपन्न होणार आहे.

या महाशिबीरास जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि सासवड या तालुक्यातील सुमारे 10 हजार 940 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागाच्या 75 पेक्षा अधिक स्टॉल असणार असून स्टॉलवर लाभार्थ्यांना संबंधित विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. यावेळी 50 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. तसेच शासकीय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) योजनांबाबतचे माहितीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या शिबीरात बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि सासवड या तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून या संधीचा लाभ लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.

उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येईल- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. १२: जिल्ह्यामध्ये अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक व विकास व्हावा यासाठी उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत आहे. उद्योगांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यालाही प्रशासनाचे उच्च प्राधान्य असून कोणत्याही घटकाकडून त्रास होत असल्यास उद्योगांनी खुलेपणाने, निर्भिडपणे त्याची माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

एमसीसीआयए येथे आयोजित औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम, मोठे उद्योजक, बँकर्स यांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबाने, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासाला व अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम उद्योग क्षेत्र करते असे सांगून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असून त्यादृष्टीने शासन काम करत आहे. महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री २.०) पोर्टल या एकाच व्यासपीठावरुन उद्योगांना सर्व परवानग्या, सुविधा देण्याची व्यवस्था तयार करण्यात आली असून त्यामुळे गुंतवणुकीला व उद्योग उभारणीला चालना मिळणार आहे.

विभागात उद्योग उभारणी, त्यांच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, असामाजिक तत्त्वांकडून येणारे अडथळे आदींच्या अनुषंगाने उद्योगांशी संवाद साधण्यासाठी प्रशासन कायम उपलब्ध असून दर तीन महिन्यांनी उद्योगांसोबत आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आले असल्याने आता खासगी क्षेत्रात उद्योग उभारणीला चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात खासगी क्षेत्रातही रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा चांगल्या उपलब्ध आहेत. त्या अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या धोरणात्मक सुधारणांच्या अनुषंगाने शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील.

जिल्ह्यात विकसित होत असलेला बाह्य वर्तुळाकार मार्ग तसेच अन्य सुविधांमुळे बाह्य क्षेत्रातही उद्योग विकासाला चालना मिळणार आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या अनुषंगाने अधिसूचना निघताच तात्काळ समृद्धी महामार्ग तसेच पुणे बाह्य वर्तुळाकार मार्गाच्या धर्तीवर गतीने भूमीसंपादन करण्यात येईल. त्याशिवाय पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून अशा प्रकारे बाह्य व अंतर्गत वाहतूक कोंडीवर गतीने मार्ग काढण्याच्या उपाययोजना सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येईल- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, जिल्हा उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून त्याच्या वृद्धीसाठी शासन आणि उद्योगांनी एकत्रित प्रयत्न करावेत. प्रशासन उद्योजकांसोबत आहे असा विश्वास देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री यांचे उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे निर्देश असून त्यादृष्टीने जिल्हा पातळीवर एक समिती कार्यरत आहे. या समितीची दर दोन महिन्याला बैठक घेऊन उद्योगांना त्यासाठी आमंत्रित करण्यात येईल तसेच त्यांना आवश्यक जागा, वीज, पाणी, मनुष्यबळ आदींच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी, समस्या गतीने सोडविण्यात येतील.

ते पुढे म्हणाले, उद्योगांची वाढ होत असतानाच सार्वजनिक वाहतूक, एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठीही शासन प्रयत्नशील आहे. उद्योगांची उभारणी करत असताना आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन ठेवावा लागेल तसेच केवळ पुणे जिल्ह्यालाच समोर ठेऊन चालणार नाही तर पुणे मुंबई कॉरिडॉर एकत्रित लक्षात घ्यावा लागेल.

पुणे जिल्ह्यात कृषी क्षेत्राच्या तसेच कृषीशी निगडीत व्यवसाय, उद्योग वाढीच्या मोठ्या संधी आहेत. येथे उद्योग, कृषीशी निगडीत नवसंशोधन करणारे व नवोद्योग, प्रगतीशील शेतकरी असून पुणे व मुंबईसारख्या मोठ्या स्थानिक बाजारपेठा आणि जेएनपीटीसारखे मोठे आंतरराष्ट्रीय बंदर असल्याने कृषी निर्यातीची मोठी संधी आहे. हे पाहता उद्योगांनी कृषीशी संबंधित नवीन उद्योग सुरू करण्यास पुढे यावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कृषीमाल प्रक्रिया उद्योग आणि निर्यात या बाबींसाठी उद्योगांनी पुढे यावे असेही ते म्हणाले.

पुढील महिन्यात प्रशासन देशात पहिल्यांदाच नाविन्यपूर्ण अशी पुणे ॲग्री हॅकॅथॉन आयोजित करण्यात येणार असून यासंदर्भात देशामध्ये कृषीमध्ये होत असलेले नवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करत असलेल्या मोठ्या उद्योगांसोबतच नवकल्पनांच्या माध्यमातून स्टार्टअप स्थापन करणाऱ्यांनाही बोलावण्यात येणार आहे. या सर्वांना त्यांचे तंत्रज्ञान दाखविण्याची संधी मिळणार असून ते प्रत्यक्ष शेतीपर्यंत कसे जाईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

राजपूत म्हणाले, या परिषदेत ७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे सुमारे १७२ सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या गुंतवणुकीमुळे ५० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. मैत्री २.० च्या अंमलबजावणीतून उद्योगस्नेही वातावरण व धोरण राबविण्यात येत असून उद्योग विभागाकडून उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गिरबाने म्हणाले, एकूण निर्यातीत पुणे जिल्हा हा देशात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असून अभियांत्रिकी निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीतही पुणे जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. चेंबर तसेच सदस्य उद्योगांच्यावतीने इलेक्ट्रॉनिक वाहने (ईव्ही) धोरण तसेच नवीन औद्योगिक धोरणासाठी उपयुक्त सूचना देण्यात येतील. जिल्ह्यात येणाऱ्या गुंतवणूकदारांना विश्वास वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया असेही ते म्हणाले.

या परिषदेत ५० लाख रुपये ते १ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार असल्याचे सांगण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यापैकी काही प्रमुख गुंतवणूकदारांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा डाव:नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?,नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक, मंत्रीच चुकीची व खोटी माहिती पसरवतो.

मुंबई, दि. १२ मार्च २५
महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याचाच भाग म्हणून नितेश राणेंना पुढे करून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव असून तो जनतेने ओळखावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

राज्याचे मत्स्यपालन व बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज प्रक्षोभक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत, त्याचा समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा मंत्री मटन कोणाकडून घ्यायचे व कोणाकडून घ्यायचे नाही हे जाहीरपणे सांगत आहे. कोणी काय खावे व कोणाकडून काय विकत घ्यावे हे सांगण्याचा अधिकार ह्या मंत्र्याला कोणी दिला. हलाल, झटका, किंवा आणखी काय हे जनतेला ठरवण्याचा अधिकार आहे, हे मंत्र्यांचे काम नाही. नितेश राणे यांचा कोणताही अभ्यास नाही, कोणताही विचार नाही, केवळ माझा बॉस सागर बंगल्यावर आहे व माझे कोणी काही करू शकत नाही अशी जाहीर विधाने करून समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. याआधीही नितेश राणेंच्या गुंडांनी कणकवली मध्ये शेख अशरफ या तरुणाला “जय श्रीराम बोल” म्हणत मारहाण केली, याप्रकरणी कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश देऊनही कारवाई केली जात नाही. नितेश राणे उघडपणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून दंगली भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस विभाग काय झोपा काढत आहे का? असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लीम नव्हता असे विधान करून या नितेश राणेंनी आपल्या अकलेच तारे तोडले आहेत. या महाशयाचे विधाने पाहता त्यांना कशाचाही अभ्यास नाही, इतिहासाचा तर अजिबात गंध नाही, असे स्पष्ट दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सरनोबत नूरखान बेग तर तोफखाना प्रमुख इब्राहीम खान होता, महाराजांचा अंगरक्षक इब्राहीम सिद्दी तर वकील काझी हैदर होता. अफजल खान भेटीच्यावेळी १० अंगरक्षकांमध्ये हा इब्राहिम सिद्दी होता. तर महाराज आग्र्याच्या कैदेत असताना हिरोजी फर्जत बरोबर मदारी मेहतर ह्या मुस्लीम सेवकाने महत्वाची जबाबदारी पार पाडली होती, यांच्यासह असंख्य मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यदलात होते पण ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि गरळच ओकायची ठरवले असेल तर त्यांच्यावर जालीम इलाज केला पाहिजे. बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज संविधान आणि कायद्याला पायदळी तुडवून सातत्याने प्रक्षोभक, भडकाऊ व हिंदू मुस्लीम अशी गरळ ओकत आहेत, त्याला मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे का? आणि नसेल तर राणेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

शिवरायांच्या सैन्यात मुसलमान नव्हतेच:नीतेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – औरंग्याची निशाणी नष्ट केली, आता कबरही उखडून काढू

मुंबई-आमच्यातील काही कारटे सांगतात की शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम होते, कोण मुसलमान शिवरायांच्या सैन्यात नव्हते. ही लोकं उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू-विरुद्ध मुसलमान होती, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या नावापुढे जी हिंदू अडनावे दिसत आहे, ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे दिसत आहे. नाही तर आपल्या नावापुढे वेगळीच अडनावे दिसली असती. कुणी शेख असता तर कुणी खान असता. हिंदवी स्वराज्यांची लढाई ही इस्लामी करणाच्या विरोधातच झाली आह

नीतेश राणे म्हणाले की, औरंगजेबची कबर उखडून काढू. सरकारने काढली नाही, तर आम्ही काढू. कबर काढण्यासाठी लाँग मार्च काढू. आम्ही हिंदू म्हणून व्यासपीठावर एकत्र आहोत. कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने संभाजी महाराज धर्मरक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री नीतेश राणे बोलत होते.

नीतेश राणे म्हणाले की, आपल्या नावापुढे जी हिंदू अडनावे दिसत आहे, ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे दिसत आहे. नाही तर आपल्या नावापुढे वेगळीच अडनावे दिसली असती. कुणी शेख असता तर कुणी खान असता. हिंदवी स्वराज्यांची लढाई ही इस्लामी करणाच्या विरोधातच झाली आहे. मुघलांनी जे इस्लामिक आक्रमन सुरू केले होते, त्या कारट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमची हिंदू मंदिरे तोडली. हिंदू माता-भगिणीचा छळ सुरू करत धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. आमचा धर्म संपवण्याची शपथ त्याने घेतली होती. त्या औरंग्याला थांबवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे.

नीतेश राणे म्हणाले की, आमच्यातील काही कारटे सांगतात की शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम होते, कोण मुसलमान शिवरायांच्या सैन्यात नव्हते. ही लोकं उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू-विरुद्ध मुसलमान होती. औरंग्याची निशाणी नष्ट केली आहे, आता कबरही उखडून काढू. तर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे असे स्मारक उभारू की, जगभरातील सर्वजण या ठिकाणी येऊन नतमस्तक होतील, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी तारीख किंवा वेळ घोषित केली जाणार नाही, लॉंग मार्च काढू. आपल्या नावापुढे जी हिंदू नावे दिसत आहे ही फक्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळेच लागली आहेत.

एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याची मुजोरी,मराठी येत नाही आणि बोलणारही नाही:मराठी आली पाहिजे हे कुठे लिहिलंय?

मुंबई-मुंबईतील एअरटेलच्या एका कार्यालयातील हिंदी भाषिक महिला कर्मचाऱ्याने मराठीच्या मुद्यावरून मराठी तरुणाशी हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सदर कर्मचारी मराठी का आली पाहिजे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असे कुठे लिहिले आहे का? असे विविध प्रश्न विचारत मला मराठी येत नाही व मी बोलणारही नाही अशी उद्दाम भाषा वापरताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी एअरटेलला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

गत काही महिन्यांपासून परप्रांतीयाच्या मुजोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एअरटेलच्या कार्यालयातील ही घटना समोर आली आहे. सदर व्हिडिओत मराठी तरुण एअरटेलच्या गॅलरीत उभा असल्याचे दिसत आहे. तो आपल्या व्हिडिओ म्हणतो, मी मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो आहे. पण माझी तक्रार सोडवली जात नाही. येथील कर्मचारी मराठीत संवाद साधण्यासही नकार देत आहेत. माझ्याशी ते उद्धटपणे बोलत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, महिला कर्मचारी सदर तरुणाशी हिंदीतून मोठ्या आवाजात बोलत आहे.

यावेळी मराठी तरुण तिला हळू आवाजात नीट बोलून आपली समस्या सोडवण्याचा आग्रह धरतो. पण ती उडवाउडवीची उत्तरे देते. ती आपल्या वरिष्ठांना सांगते की, ही व्यक्ती मला महाराष्ट्रात आहात तर मराठीत बोलले पाहिजे असे सांगत आहे. महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी आली पाहिजे, असे कुठे लिहिले आहे. मला मराठी समजत नाही. त्यामुळे मी हिंदीतच बोलेन. आपण हिंदुस्तानात राहतो. त्यामुळे कुणी कोणतीही भाषा बोलू शकतो. या प्रकरणी मराठी महत्त्वाची आहे असे मला वाटत नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?:अदिती तटकरे म्हणाल्या – फडणवीस, पवार अन् शिंदे निर्णय घेतील; विरोधकांचा सभात्याग

आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहेवरुण सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर देताना अदिती तटकरे म्हणाल्या, ऑक्टोबर 2024 मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटी 33 लाख 64 हजार लाभार्थी महिला होत्या. फेब्रुवारीत आपण हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा 2 कोटी 47 लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.

मुंबई- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 करण्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही. यावरून आज सभागृहात विरोधकांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न विचारले. त्यासंदर्भात अदिती तटकरे विधानसभेत निवेदन केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे त्या म्हणाल्या.

परंतु अदिती तटकरेंनी दिलेल्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? हे आधी सांगा, अशी भूमिका घेत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, केवळ मतांसाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच, लाडक्या बहिणींना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? या प्रश्नावरून आज सभागृहात गोंधळ झाला. विरोधकांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारले. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अदिती तटकरेंची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? या प्रश्नासाठी त्यांनी अखेर फडणवीस, अजित पवार आणि शिंदे यांच्याकडे बोट दाखवून तूर्तास वेळ मारून नेली. अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभात्याग केलाआज विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आले होते की 1500 हून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

नमो शेतकरी महिला योजनेत महिलांना 1000 रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान 1500 रुपयांचा लाभ शासनाकडून मिळायला हवा. त्यानुसार नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून 1000 रुपये तर वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात. त्यामुळे त्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले नाही. 20 ते 25 लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या योजनेसंदर्भात तीन प्रश्न विचारले. निवडणुकीपूर्वी योजना जाहीर केली तेव्हा किती लाभार्थी होते? निवडणुकीनंतर सगळे निकष लावले गेले, त्यामुळे नेमक्या किती लाभार्थी महिलांना अपात्र केले गेले? आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना 2100 रुपये देणार आहात की नाहीत? असे प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केले. याला महिला व बालकल्याण मंत्री आदिती यांनी सविस्तर उत्तर दिले.

2100 रुपयांसंदर्भात CM व दोन्ही DCM निर्णय घेतील-दरम्यान, यावेळी आदिती तटकरेंनी यावेळी सन्माननिधीचा हप्ता 2100 रुपये होण्यासंदर्भात उत्तर दिले. महायुती सरकारने ही योजना आणली आहे. महिलांना 1500 रुपयांचा लाभ देणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. 2100 रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतील. पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, असे आदिती तटकरे म्हणाल्या.

ट्रान्सयुनियन सिबिल आणि फेस यांचे  ग्राहक शिक्षण उपक्रम सुरू करण्यासाठी सहकार्य 

या सहकार्याचे उद्दिष्ट आर्थिक साक्षरता वाढवणे आणि विविध माध्यमांवर कस्टमाइज्ड कंटेंटद्वारे ग्राहकांना कर्जाची सहज उपलब्धता करणे हे आहे

मुंबई, 12 मार्च 2025: ट्रान्सयुनियन सिबिल आणि फिनटेक असोसिएशन फॉर कंझ्युमर एम्पॉवरमेंट (FACE) हे भारतात आर्थिक साक्षरता आणि क्रेडिट जागरूकता वाढवण्यासाठी एकत्र येत आहेत. सिबिल जागरण नावाचा हा उपक्रम क्रेडिट शिक्षण सुधारण्याचा आणि फिनटेक सोल्यूशन्सद्वारे ग्राहकांना क्रेडिटची सहज उपलब्धता सुलभ करण्याचा प्रयत्न करतो.

या करारांतर्गत, ट्रान्सयुनियन सिबिल ज्ञान आणि कौशल्य प्रदान करेल, सह-ब्रँडेड आणि कस्टमाइज्ड शैक्षणिक सामग्री विकसित करेल. फिनटेक क्षेत्रातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त स्व-नियामक संघटना (SRO) FACE, ग्राहकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि क्रेडिट जागरूकता वाढवण्यासाठी 165 हून अधिक फिनटेक सदस्यांच्या नेटवर्कसह काम करेल.

ट्रान्सयुनियन सीबीआयएलचे माहिती भांडार, डेटा क्षमता आणि विश्लेषणात्मक अंतर्दृष्टी आर्थिक साक्षरतेबद्दल संबंधित सामग्री देण्यासाठी चांगली स्थिती निर्माण करते. या सामग्रीमध्ये ईमेल, लेख, व्हिडिओ, वेबिनार आणि पॉडकास्टचा समावेश असेल, आणि ते FACE द्वारे प्रसारित केले जातील. या मोहिमेचा विस्तार आणि प्रभाव जास्तीत जास्त वाढवण्यासाठी FACE स्वतःचे आणि त्याच्या सदस्यांच्या डिजिटल चॅनेलचा वापर करेल.

FACE सोबतच्या भागीदारीची घोषणा करताना, ट्रान्सयुनियन CIBIL चे MD आणि CEO भावेश जैन म्हणाले: “ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आर्थिक उत्पादनांचा ऍक्सेस मिळाला आहे. त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी या उत्पादनांचा वापर कसा करायचा याची त्यांना समज नसण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२४ मध्ये फिनटेकच्या 28% ग्राहक न्यू-टू-क्रेडिट (NTC) 1 होते हे लक्षात घेता, ग्राहकांना त्यांचे क्रेडिट सकारात्मक पद्धतीने व्यवस्थापित करायचे असेल तर फिनटेकसाठी ग्राहक साक्षरता आणि शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रान्सयुनियन CIBIL आणि FACE च्या प्रयत्नांमुळे ग्राहक आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि स्वावलंबी होईल.

ग्राहक शिक्षणात संपूर्ण आर्थिक परिसंस्थेच्या सहभागावर भर देताना, FACE चे सीईओ सुगंध सक्सेना म्हणाले: “FACE आणि TransUnion CIBIL सारख्या संस्था आर्थिक उत्पादने आणि ग्राहकांमधील दरी भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा संयुक्त उपक्रम व्यक्तींना सुजाण आणि जबाबदार आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यावर भर देतो. जबाबदार क्रेडिट वर्तन आणि कर्ज घेण्याच्या पद्धतींबद्दल ग्राहकांशी सतत संवाद साधणे हे क्रेडिट आणि वित्तीय परिसंस्थेच्या मजबूततेची खात्री करण्यासाठी अविभाज्य आहे. एक माहितीपूर्ण आणि जबाबदार ग्राहक हा आर्थिक परिसंस्थेची एक मालमत्ता आहे आणि राष्ट्राच्या आर्थिक कल्याण आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचा आहे.

बालाजीनगरच्या आयुर्वेदिक उपचार केंद्रातील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून मागितली खंडणी तिघांना बेड्या

0

तोतया पत्रकारांचा एक ग्रुप शहरातील विविध ब्युटी पार्लर, स्पा मधे घुसून ब्लॅकमेल करत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि पत्रकार असल्याचे सांगत त्यांनी सहकार नगर मधील एका महिलेस टाँर्चर करून खंडणी मागितली आणि तिचे व्हीडीओ काढले. या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर रोहीत वाघमारे, शुभम धनवटे आणि राहुल वाघमारे यांच्याविरुद्ध विनयभंग, Robbery , extortion आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या ग्रुप मधे काही महिला देखील आहेत.

पुणे-आयुर्वेदिक उपचार केंद्रात येणाऱ्या महिलांचे व्हिडिओ चित्रित करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार पुण्यात उजेडात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हा गुन्हा पुण्यातील वेगवेगळ्या 7- 8 ठिकाणी केल्याची कबुली केली आहे.राेहित गुरुदत्त वाघमारे (वय-29,रा. वारजे माळवाडी,पुणे), शुभम चांगदेव धनवटे (20,रा. उत्तमनगर, पुणे) व राहुल ज्ञानेश्वर वाघमारे (36,रा. काेथरुड,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सदर आराेपींना न्यायालयात हजर केले असता 12 मार्च पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तीन फेब्रुवारी राेजी दुपारी एक वाजता धनकवडीतील पुण्याईनगर क्लासिक हाईटस तिसरा मजला येथील तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्रात दोन आरोपी आले. त्यांनी आयुर्वेदिक उपचाराची माहिती विचारली. केंद्र चालक महिलेने त्यांना ती दिली. त्यावर संबंधितांना उपचारासाठी काेणते तेल वापरायचे आहे अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तिळाचे तेल वापरण्याचे सांगितले. त्या ग्राहकाने त्याचे नाव राेहित वाघमारे सांगून एक तास उपचार घ्यायचा असे सांगितले.

दरम्यान, त्याने महिलेस धमकावून तिच्या अंगावरील टाॅप काढण्यास सांगितले. त्याने मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, तू जर मी सांगेल तसे उपचार केले नाहीस तर तुझे आयुर्वेदिक उपचार केंद्र बंद करुन टाकेन असे सांगून जबरदस्तीने उपचार करुन घेतले. त्यानंतर थाेड्या वेळाने आणखी 2 ते 3 जण राेहित वाघमारे याचे साेबत आले व आम्हाला 20 हजार रुपये दे नाहीतर तुझे उपचार करत असताना, नकळत काढलेले व्हिडिओ दाखवून हा व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावेळी उपचार केंद्र चालक महिलेकडे पैसे नसल्याने आराेपींनी काऊंटर मधील 800 रुपये जबरदस्तीने नेले.

या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राहुल गाैड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकातील सपाेनि सागर पाटील व पाेलिस अंमलदार करत आहेत. त्यांनी तांत्रिक विश्लेषण करुन संशयित आराेपींचा माग काढला. त्यांनी वारजे माळवाडी पाेलिसांच्या मदतीने तीन आराेपींना ताब्यात घेऊन त्यांची सखाेल चाैकशी केली. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारे पुणे शहरात वेगवेगळया 7 ते 8 ठिकाणी गुन्हा केल्याची माहिती दिली. आराेपी राेहित वाघमारे विराेधात वारजे पाेलिस ठाण्यात यापूर्वी विनयभंगचा गुन्हा दाखल आहे. तर, वाघमारे आणि धनवटे याच्यावर बीड जिल्ह्यातील अंभाेरा पाेलिस ठाण्यात कलम 304 (4) नुसार आणि अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी येथे कलम 309 (6)नुसार गुन्हे दाखल आहेत.

निसार शेख आणि योगेश राऊत या हडपसरमध्ये नशेसाठी टर्मिन इंजेक्शन विक्री करणारे दोघांना पकडून १९० बाटल्या जप्त

पुणे – नशेखोरी करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन)या इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍या दोन जणांना हडपसर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन)च्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.निसार चाँद शेख (वय २३, रा. घाडगे गल्ली, शेख चाळ, हडपसर) आणि योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. घुलेवस्ती, मांजरी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

हडपसर पोलिसांच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गस्त घालत असताना, विठ्ठलनगरचे पाठीमागील जिजामाता वसाहतचे मागील कॅनॉल येथे दोनजण संशयितरित्या फिरताना दिसून आले. पोलिसांना पाहून अचानक ते पळून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड यांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी करत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगेत मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) या नावाची इन्जेक्शनच्या ६० बाटल्या मिळून आल्या. हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ५५० रुपयांना विकत असल्याचे आरोपिनी सांगितले. सखोल चौकशी दरम्यान त्यांच्याकडून मॅफेनटरमाइन सल्फेटच्या एकूण १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना देखील आणि संबंधित औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण त्यांनी घेतलेले नसल्याचे स्पष्ट झाले. हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी आरोपींनी जवळ बाळगल्याचे दिसून आले.नागरिकांना अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांबाबत माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस उपनिरीक्षक सत्यावान गेंड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. |

पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रूपयांची देणगी सुपूर्त !!

पुणे, ११ मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने सगल दुसर्‍या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजक श्री. पुनितदादा बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन आणि धारीवाल फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते ५ लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना देण्यात आला. यावेळी पुणे शहर पोलिस दलाचे डीसीपी मिलिंद मोहीते, डीसीपी हिम्मत जाधव, सिनेचित्रपट अभिनेता आकार ठोसर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरोत्सव निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस तास आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व सार्वजनिक उत्सवाचा आनंद घेता येत असतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुनित बालन ग्रुप संघाने पुने शहर पोलिस संघाचा ५५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १० षटकामध्ये १२३ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये पुनित बालन यांनी नाबाद २६ धावांची खेळी केली. याशिवाय राहूल साठे (३२ धावा), ऋतुराज वीरकर (२७ धावा) आणि आतिश कुंभार (नाबाद २१ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे शहर पोलिस संघाचा डाव ६८ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः
पुनित बालन ग्रुपः १० षटकात ४ गडी बाद १२३ धावा (पुनित बालन नाबाद २६, राहूल साठे ३२, ऋतुराज वीरकर २७, आतिश कुंभार नाबाद २१, प्रशांत गायकवाड २-१५) वि.वि. पुणे शहर पोलिसः १० षटकात ८ गडी बाद ६८ धावा (विपुल गायकवाड नाबाद १७, अभिजीत ढेरे ११, उल्हास कदम १०, कुणाल भिलारे २-८, आदित्य कर्जतकर २-८, अनिकेत कुंभार २-११); सामनावीरः राहूल साठे;

भाजपला साथ देणाऱ्यापुणेकरांच्या हातीअंदाजपत्रकात ‘भोपळा’च! – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

पुणे : राज्याच्या अंदाजपत्रकात पुण्याच्या विकासासाठी भरीव तरतूद केलेली नाही. एकंदरीतच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात मात्र, भोपळाच देण्यात आला आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

पुण्यात महायुतीचे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे दोन कॅबिनेट मंत्री आहेत, माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत आणि मुरलीधर मोहोळ हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. पुणेकरांनी भाजप आणि महायुतीला भरभरून मते दिल्यामुळे या चौघांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मात्र, अंदाजपत्रकात पुणेकरांच्या पदरी निराशाच आहे. पुण्याच्या औद्योगिक आणि व्यापारी उलाढालीला चालना मिळावी, यासाठी पुरंदरचा विमानतळ आम्ही लवकरच करू, असे आश्वासन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन वारंवार दिले आहे. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदरच्या विमानतळाचा उल्लेख नाही, भूसंपादनासाठीची तरतूदही नाही, ही बाब धक्कादायक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्याची इच्छाशक्ती असती तर पीएमपीएमएलसाठी २ हजार बसगाड्या घेण्यासाठी तरतूद करण्यात आली असती. पण, तशी तरतूद करण्यात आलेली नाही. पुणे मेट्रो चा पहिला टप्पा अजून पुर्ण झाला नाही आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पुढील दहा वर्षांसाठीचा वायदा करून ९हजार कोटींच्या तरतुदी केल्या आहेत. खडकवासला-खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बाग अशा दोन मार्गांसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले आहे. या योजनांना पूर्ण होण्यासाठी १० वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. ही घोषणाही पोकळच आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५०कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीचा गाजावाजा सत्ताधारी पक्ष करीत आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना कागदोपत्रीच राहिली आहे, याचा उपमुख्य मंत्री अजित पवार यांना विसर पडला आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

‘लाडकी बहिण’ योजनेबाबतही महायुती सरकारने महिलांची फसवणूकच केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना अनुदान चालू केले आणि निवडणुकीनंतर २,१०० रुपये करू, असे आश्वासन दिले. यासाठी वारेमाप खर्च करून जाहिराती केल्या. महिलांनी भरवसा ठेवून महायुतीला मते दिली. मात्र, सत्ता आल्यानंतर त्या आश्वासनांना अंदाजपत्रकात हरताळ फासण्यात आला, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.