Home Blog Page 623

घरगुती गॅस सिलेंडर मधुन गॅस चोरी करून कमर्शियल सिलेंडर भरून ते विकणारे लोणीकाळभोर पोलिसांनी पकडले

पुणे- घरगुती गॅस सिलेंडर मधुन गॅस चोरी करून कमर्शियल सिलेंडर भरून ते विकणारे लोणीकाळभोर पोलिसांनी पकडले आणि १३५ सिलेंडर सह सुमारे सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त केला आहे .

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१२/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण व युनिट ६ कडील पथक असे लोणी काळभोर पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार शेखर काटे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, महादेव मंदिरा जवळ, लोणी काळभोर, पुणे येथे एक इसम घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस पाईपचे सहाय्याने काढून तो लहान मोठ्या व कमर्शियल गॅस सिलेंडर मधे भरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पुरवठा अधिकारी इम्रान मुलानी व पथक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील स्टाफ यांचे सह सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता त्याठिकाणी मदन माधव बामणे वय २० वर्षे रा. महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर, पुणे हा घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस पाईपचे सहाय्याने काढून तो लहान मोठ्या व कमर्शियल गॅससिलेंडर मधे भरत असताना मिळून आला आहे. सदर ठिकाणी वेग वेगळ्या कंपनीचे लहान मोठे व कमर्शियल गॅससिलेंडर एकूण १३५, इलेक्ट्रिक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारे पाईप, नोजल असा एकूण ०२,१३,९५०/- रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदर आरोपीता विरुद्ध लोणीकाळभोर पो.स्टे.गु.र.नं.१२५/२०२५ भा. न्या. सं. कलम २८७, २८८ सह जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ चे कलम ३,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा, चे प्रभारी वाहिद पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पो.स्टे. चे राजेंद्र पन्हाळे सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस उप-निरीक्षक अनिल जाधव (लोणीकाळभोर पो.स्टे.) पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे, लोणीकाळभोर पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार प्रदिप क्षीरसागर, अक्षय कटके, सचीन सोनवणे, बालाजी बांगर यांनी केली आहे.

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा’ : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा सांगीतिक कार्यक्रम

पुणे : सीतामातेवरील बंदिश कमलसी कोमल कमल नयनसी  मिथिला किशोरी जनक नंदिनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई यांच्यावरील माई सांगिनी विनायकी ही बंदिश. राजमाता जिजाबाई यांच्यावरील बंदिश जय जय जिजाऊ…अशा विविध शास्त्रीय बंदिशींच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीमध्ये आजपर्यंत झालेल्या महान स्त्रियांमुळे संस्कृतीला मिळालेल्या भक्ती, शक्ती, शौर्य, मातृत्व, त्याग आदी विविध गुणांचे दर्शन गायिकांनी उलगडून दाखवले

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ऊर्जा – सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरुडच्या बाल शिक्षण मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे,  खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुशील ओक, पं.सुहास व्यास, विदुषी माधुरी डोंगरे, विदुषी मंजिरी कर्वे-आलेगावकर, डॉ. शुभांगी बहुलीकर, अपर्णा केळकर, शेखर कुंभोजकर, पं. विकास पुरंदरे उपस्थित होते.

‘शास्त्रीय बंदिशी द्वारा देवी सीतामाता, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, यमुनाबाई सावरकर अशा महान व्यक्तिमत्वांच्या  त्याग, तपस्या, भक्ती, शौर्य, मातृत्व, शक्ती अशा गुणांचा परिचय झाला. भारतमातेवरील विशेष बंदिश या कार्यक्रमात सादर करण्यात आली.

भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांचे योगदान, त्यांनी दाखवून दिलेला पराक्रम आणि त्यांचा समाजमनावर झालेला परिणाम हे या बंदिशीच्या माध्यमातून रसिकांना अनुभवायला मिळाले.   संत मीराबाई यांची श्रीकृष्णावरील भक्ती, राजमाता जिजाऊ यांनी आपल्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली शक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांनी केलेला त्याग या गुणांना अनुभवताना रसिकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळले.

संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनात या संपूर्ण कार्यक्रमाची मांडणी केली गेली.   बंदिशींची रचना आणि सादरीकरण संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या तिसऱ्या पिढीतील गायिका पल्लवी पोटे, मृणाल भिडे, प्राजक्ता मराठे व श्रुती विश्वकर्मा-मराठे यांनी केली. तबल्याची साथ सावनी तळवलकर व हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली. कीर्तनकार मानसी बडवे यांनी सूत्रसंचालन केले तर आदिती केसकर यांनी निवेदन केले.

पूनावाला फिनकॉर्पचा शैक्षणिक कर्ज व्यवसायात प्रवेश; 3 कोटी रु. पर्यंतचा वित्तपुरवठा करणार

मुंबई – सायरस पूनावाला ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेली ग्राहक व एमएसएमईना वित्तपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करणारी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (PFL) ने आंतरराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्यवसाय सुरू केला आहे. या सुविधेचा उद्देश वेगवान प्रक्रिया व त्वरित मंजुरी प्रदान करून विद्यार्थ्यांना अडथळाविरहित अनुभव देणे हा आहे. या सादरीकरणाचा एक भाग म्हणून कंपनीने शैक्षणिक कर्जासाठी तत्काळ मंजुरी देण्याच्या या उद्योग क्षेत्रातील पहिल्या उपक्रमाची घोषणा केली आहे. हा सुलभ, तंत्रज्ञान प्रणीत वित्तपुरवठा सेवा अनुभव नव्या आणि विद्यमान PFL ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी याचे महत्व काय आहे?

·         3 कोटी रु. पर्यंतचे कर्ज (तारणासह) – विद्यार्थी आणि सह-अर्जदार यांच्यासाठी ट्यूशन फी, राहण्याचा खर्च, प्रवास, पुस्तके आणि विमा हप्ते कव्हर करणारे कर्ज, सोपी सुलभ मंजुरी प्रक्रिया

·         1 कोटी रु. पर्यंतचे कर्ज – विनातारण अर्ज करू शकण्याचा पर्याय उपलब्ध

·         तत्काळ मंजुरी – त्वरित निर्णय प्रक्रिया सुनिश्चित करत 75 लाख रु. पर्यंतच्या कर्जासाठीचा उद्योगक्षेत्रातील प्रथम उपक्रम 

·         आकर्षक व्याजदर – आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षण घेण्याचे नियोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कर्ज सुलभ करण्यासाठी स्पर्धात्मक, आकर्षक व्याजदर

पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद कपिल या सादरीकरणाबद्दल म्हणाले, “शिक्षण ही भविष्याची सर्वात प्रभावी गुंतवणूक आहे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या स्वप्नांना मर्यादा येता कामा नये. आमच्या शिक्षण कर्ज योजनांद्वारे, आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी मदत करण्याकरता आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याकरता कटिबद्ध आहोत.”

वाढत्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित

एक उभरती अर्थव्यवस्था म्हणून भारताचा शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्याच्या आकांक्षा यांवरील वाढता भर यामुळे शैक्षणिक कर्ज क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हा एक आकर्षक उद्योग असल्याची जाण PFL ला आहे. आपल्या ग्राहक-केंद्रित व्यवसाय मॉडेलवर लक्ष केंद्रित करून विविध कुटुंबांशी जोडून घेत या क्षेत्रात अग्रणी राहण्याचे, पसंतीचे नाव बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासाठी कंपनीने भारतभरातील शैक्षणिक सल्लागारांशी भागीदारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार वित्तपुरवठा करण्यासाठी आणि ग्राहक अनुभव उंचावण्यासाठी उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

उत्पादन सादरीकरणात वैविध्य आणण्यासाठी आणि समग्र, व्यापक आर्थिक सेवा सुविधा पुरवण्यासाठी शैक्षणिक कर्ज व्यवसाय क्षेत्रातील पदार्पण हा PFL च्या व्यापार विस्तार धोरणाचा एक भाग आहे. नुकतेच, कंपनीने नोकरदार, पगारी व्यावसायिकांसाठी डिजिटल प्राइम वैयक्तिक कर्ज सुरू केले आहे.

PFL त्याच्या जोखीम-प्रथम दृष्टिकोनावर ठाम आहे आणि सध्याच्या वित्तीय गरजांना उत्तर देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करत आहे. कर्ज प्रक्रिया सुलभ करणे, ग्राहकांचे समाधान वाढवणे आणि त्यांना सर्वोत्तम अनुभव देणे ही कंपनीसाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे.

सलमान खान इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी

ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या काही शर्यतींमध्ये सलमान खान उपस्थित राहणार आहे.

मुंबई: भारताच्या मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या पहिल्या सीझननंतर इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांना अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी करून घेण्यात मन:पूर्वक आनंद होत आहे. त्यांची दमदार ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा आणि प्रचंड लोकप्रियता यामुळे सलमान खान यांचा ISRL मधील सहभाग हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. सलमान खान यांच्यामुळे लीग मुख्य प्रवाहातील क्रीडा मनोरंजनाच्या नवीन युगाच्या अग्रस्थानी येईल. मोटरस्पोर्ट्सबाबतची त्यांची आवड आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षकांशी असलेले भावनिक नाते यामुळे सलमान खान यांची उपस्थिती ISRL च्या लोकप्रियतेला अधिक गती देईल आणि त्यामुळे सुपरक्रॉस भारतातील घराघरात पोहोचेल.

या सहकार्यातून सलमान खान मोटरस्पोर्ट्सच्या जाहिरात क्षेत्रात प्रवेश करीत असून त्यांच्या संपूर्ण भारतभरातील लोकप्रियतेचा फायदा ISRL च्या धडाकेबाज रेसिंग अॅक्शनला मिळणार आहे. सलमान खान यांची शहरी भागापासून दूरवरच्या ग्रामीण भागांपर्यंत असलेली प्रचंड फॅन फॉलोइंग आणि ISRL चा जोशपूर्ण स्पर्धात्मक थरार यांचा सुरेख संगम या सहयोगातून साधला जात आहे. केवळ रोमांचक रेसिंग लीगपुरतेच मर्यादित न राहता, ISRL चा दुसरा सीजन संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण मनोरंजन सोहळा ठरणार आहे. त्यामध्ये सलमान खान आघाडीवर राहून सर्व वयोगटातील चाहत्यांसाठी हा खेळ अधिक सहज आणि आकर्षक बनवतील. मोटरसायकल्स, फिटनेस आणि अॅक्शन स्पोर्ट्सबाबत असलेल्या त्यांच्या आवडीमुळे सलमान खान सुपरक्रॉस रेसिंगमधील जोशपूर्ण ऊर्जेचे आणि साहसी दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत आणि लीगला यशाचे नवे उंच शिखर गाठण्यासाठी आदर्श अॅम्बेसेडर ठरणार आहेत.

या सहयोगाबाबत आनंद आणि उत्साह व्यक्त करताना सलमान खान म्हणाले, “मोटरसायकल्स आणि मोटरस्पोर्ट्सबाबत मला प्रचंड आकर्षण आहे आणि त्यामुळे अशा गोष्टीचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे. ISRL जे निर्माण करत आहे ते खरोखरच क्रांतिकारी आहे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून ते पुढे जात आहेत. या लीगमध्ये अफाट मनोरंजन मूल्य आहे आणि ती आवड जागृत करण्याचे, कौशल्य दाखवण्याचे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या हिरोंची निर्मिती करण्याचे काम ही लीग करत आहे. एकत्रितपणे, आपण सुपरक्रॉसला भारतात घराघरात पोहोचवू आणि आपल्या रायडर्सना जागतिक स्तरावर नेऊ.”

ISRL चे व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले, “ISRL परिवारात सलमान खान यांचे स्वागत करणे हा भारतीय मोटरस्पोर्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मोटरस्पोर्ट्सला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असताना इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने भारताला जागतिक मोटरस्पोर्ट्स नकाशावर भक्कमपणे स्थिर केले आहे. या सहकार्यातून आमची भारतीय मोटरस्पोर्ट्सला अव्वल स्तरावर नेण्याची समान महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित होते. त्यांची शर्यतीच्या वेळी असणारी उपस्थिती, सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शनामुळे आपण मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांती घडवत आहोत. भावी भारतीय रायडर्सना यातून प्रेरणा मिळेल आणि भारताला जागतिक पातळीवर सुपरक्रॉसचे एक प्रमुख स्थळ म्हणून स्थान मिळवून देता येईल.”

यूबीटी (सलमान खानची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी) चे सहसंस्थापक विक्रम तन्वर म्हणाले, “ISRL च्या पहिल्या सीजनला मिळालेले जबरदस्त यश आम्ही पाहिले आहे. भारतातील आणि जागतिक स्तरावरील अव्वल रायडर्सनी या स्पर्धेत आपली अतुलनीय प्रतिभा सादर केली. लीगला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि भारतात या क्रीडा प्रकाराची भरभराट होण्यासाठी आम्ही हा सहयोग करत आहोत. सलमान खान यांची विविध लोकसमूहांमध्ये असलेली अफाट लोकप्रियता सुपरक्रॉसच्या जोशपूर्ण विश्वाला लाखो नव्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”

ISRL चे सहसंस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “सलमान खान यांचा ISRL सोबतचा सहयोग ही सुपरक्रॉसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि भारतीय ब्रँड्सना या रोमांचकारी खेळाच्या जागतिक परंपरेशी जोडण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि देशभरातली चाहत्यांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे भारतभरातील ब्रँड्सना या जोशपूर्ण प्रवासाचा भाग होण्यासाठी प्रेरणा मिळेल. या खेळातील नवीन हिरो पुढे येतील आणि सुपरक्रॉसला भारतात त्याचे खरे घर मिळेल. जागतिक स्तरावर प्रत्येक भारतीय अभिमानाने उभा राहील असा आपण सुपरक्रॉसचा पुढचा अध्याय लिहिणार आहोत.”

ISRL च्या पहिल्या उद्घाटन सीजनने भारतातील मोटरस्पोर्ट्स इव्हेंट्ससाठी नवे मापदंड प्रस्थापित केलेती स्पर्धा 30,000 हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिली आणि केवळ दिवसांच्या प्रसारणात 11.5 दशलक्ष लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. सुपरक्रॉस इव्हेंटसाठीचा हा एक नवा जागतिक विक्रम ठरला आहे.

या स्पर्धेत जगभरातील 48 सर्वोत्तम रायडर्सनी भाग घेतला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दिग्गज जॉर्डि टीक्सीअर, मॅट मॉस आणि अँथनी रेनार्ड यांनी विविध श्रेणींमध्ये आपली प्रतिभा सादर केली. भारताच्या डकार अग्रणी सी एस संतोष यांच्या नेतृत्वाखालील टीम बिग रॉक मोटरस्पोर्ट्सने विजेतेपद पटकावत स्पर्धेसाठी एक उच्च मापदंड प्रस्थापित केला. पहिल्या हंगामाने भारतात जागतिक दर्जाच्या सुपरक्रॉससाठी असलेली आवड यशस्वीपणे प्रदर्शित केली आणि या खेळाच्या वाढीसाठी भक्कम पाया रचला.

शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा युती सरकारने घेतलेला बळी: हर्षवर्धन सपकाळ.

नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा

आश्वासन देऊनही खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी न देणारे युती सरकार शेतकरीविरोधी

उद्योगपती व कंत्राटदारांचे खिसे भरणाऱ्या भाजपा युती सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास मात्र टाळाटाळ.

मुंबई, दि. १३ मार्च २०२५
राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

कैलास नागरे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी ते म्हणाले, कैलाश नागरे यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्याच्यांशी आपला अनेक वर्षांपासून स्नेह होता. नागरे हे प्रगतीशील शेतकरी आणि सामाजिक जाणिव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले होते मी माझ्या मुलाला तुझी शेती पहायला पाठवतो असे त्यांना सांगितले होते. माझ्या मुलाला आदर्श म्हणून दाखवलेला माणूस अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो हे अत्यंत वेदनादायी आहे.

राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याला होळीच्या सणाच्या दिवशी विषारी औषध पिऊन जीवन संपवावे लागले ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे पण त्याच्या ताटातच अन्न नसेल तर तो आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरेल. कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानाची नोट लिहून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला आहे. कैलाश नागरे यांनी खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शेतक-यांना पाणी द्यावे म्हणून डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते पण तीन महिने उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरे निराश झाले होते व त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

एक ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणीसुद्धा उपलब्ध करुन देता येत नाही हे अत्यंत लाजीरवाणे व वेदनादायी आहे. एक तरुण शेतकरी आपले आयुष्य संपवतो याहून दुसरे दुर्दैव काय, पण सत्तेत बसलेल्यांना फक्त हिंदू, मुस्लीम, औरंगजेब याच्यापलीकडे काही दिसतच नाही. हे सरकार मुर्दाड आहे, मुजोर आहे क्रूरकर्मा औरंजेबापेक्षा निष्ठूर आहे, या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

कैलास नारगे या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने सरकारने खडबडून जागे व्हायला हवे पण तसे होताना दिसत नाही. कैलास नागरेची आत्महत्या ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शमरेने मान खाली घालायला लावणारी आहे. सरकारमध्ये थोडीफार लाज शरम शिल्लक असेल तर त्यांनी कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करून नागरे यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी व महाराष्ट्रात पुन्हा कोणी कैलास नागरे आत्महत्या करणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

स्व.प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार सोहळा अन कवी संमेलन रंगले

पुणेकरांचे कधीही प्रेम करू शकत नाही – अशोक सराफ

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळालेले पुरस्कार मी जपून ठेवले असून ते मला सतत ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार समारंभात कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मुंजुळे उपस्थित होते.
याप्रसंगी सुनिता झाडे (नागपूर) यांना ‘शब्दांच्या पसाऱ्यातील आत्महत्या’ या कविता संग्रहासाठी कै. शिवाजीराव अमृतराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’, फेलिक्स डिसोजा (वसई) यांना
आरशात ऐकु येणार प्रेम या कविता संग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार, सफर अली इसफ (वैभववाडी) यांना ‘अल्लाद ईश्वर’ कवितासंग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जेष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, जेष्ठ लेखक व कवी प्रा. फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर , ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गौरव फुटाणे, सचिन जाधव, कुणाल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार माझा सन्मान आहे, प्रेम मी विसरणार नाही. स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचा ऋणी आहे. पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केले याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, अशोक सराफ हा कलाकार तळागाळात मिसळणारा आहे. त्यांच्यात बडेजावपणा, इगो अजिबात नाही. कधीही केव्हाही भेटणारा साधा सरळ हा माणूस आहे. साध्या सरळ माणसाला हा पुरस्कार मिळाल्याने खरोखर आनंद आहे.
नागराज मुंजुळे म्हणाले, अशोक मामाच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे. हा माणूस आभाळासारखा आहे. कारण मी त्यांना अनुभवलं आहे. मी काहीही नसताना त्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो असता, कुठून आला, कोण आहेस असे कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पहिला बाईट दिला. हा माणूस चित्रपट क्षेत्रातलाच नव्हे तर खऱ्या जीवनातला देखील हिरो आहे, सही यावेळी त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ढेरे व जाधव परिवाराने गेली 39 वर्षे कार्यक्रमातून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जतन ठेवल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा संस्कृतपणा आणि राजकारण पुढे घेऊन जायचे आहे. सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चाललेला आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जोपासण्याचे आपले सर्वांचे काम आहे. यशवंतरावाचा सुसंस्कृतपणा ढेरे-जाधव परिवार जोपासत आहे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले .
तीन पुरस्कार विजेते कवींसह अंजली कुलकर्णी, प्रकाश होळकर, कल्पना दुधाळ, मृणालिनी कानिटकर, अनिल दीक्षित, बालिका विखले, वैशाली पतंगे, शशिकांत तिरोडकर, नितीन देशमुख, गुंजन पाटील यांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, प्रा. फ. मुं. शिंदे व अशोक नायगावकर यांनी कवि संमेलनाचे सूत्रसंचालन केले. यावेळी राजकारण, समाजातील व्यथा कवितेतून केले. तसेच आपल्या खास भाषेतून कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली.
गझल, प्रेमगीते, राजकरण्यांवर विडंबन कविता सादर करत उत्तोरात्तर संमेलन रंगत गेले. त्याचबरोबर कवि रामदास फुटाणे व अशोक नायगावकर यांच्या खास शैलीतील किस्यात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
कवीनीं श्रोत्यांची वाहवा मिळविली. कवि डॉ. विठ्ठल वाघ यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. या कवी संमेलनास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कवितेचा आस्वाद घेतला

१७६८ बुलेट मॉडिफाय सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसविणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करणार

पुणे शहर वाहतूक शाखेकडुन बुलेट मॉडिफाय सायलेन्सर च्या कर्कष आवाजाच्या बाईक सायलेन्सर वर सर्जिकल स्ट्राईक करून “बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे” अंतर्गत सुमारे १७६८ बुलेट मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला आहे.
पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाने व सह पोलीस आयुक्तरंजनकुमार शर्मा व अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक शाखेकडुन बुलेट मॉडिफाय सायलेन्सर च्या कर्कष आवाजावर सर्जिकल स्ट्राईक करून “बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे” अंतर्गत कारवाई केलेल्या १७६८ मॉडिफाय सायलेन्सर जप्त करून त्यावर रोड रोलर फिरविण्यात आला आहे.
पुणे शहरातील बेशिस्त नागरिकांकडुन वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकारांमध्ये बुलेट, दुचाकी वाहनास असलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवुन सार्वजनिक रस्त्यावर, रहिवाशी भागात दिवसा / रात्री कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे प्रकार तरूणांमध्ये वाढत असल्याने त्यामुळे या कर्कश आवाजाने जेष्ठ नागरिक, महिला, शांतताप्रिय नागरिकांना त्रास होत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिंकाकडुन प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्याबाबत सुचना मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दिल्या होत्या त्यानुसार वाहतूक शाखेकडील सर्व विभागांकडुन मोहिम राबविण्यात आली होती. तसेच बुलेट सायलेन्सर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असुन सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसविणाऱ्या गॅरेज मालिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

विधिमंडळात लक्षवेधी लावण्याची धमकी देऊन उकळली जाते खंडणी :आमदार परिणय फुकेंच्या आरोपाने खळबळ; ऑडिओ क्लिप देखील सादर

या ऑडिओ क्लिपची फॉरेनसिक लॅबचा रिपोर्ट हातात येत नाही, तोपर्यंत सभागृहात कोणाचेही नाव न घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फुके यांना केल्या आहेत. या आधी देखील लक्षवेधी लावण्याच्या संदर्भात पैशाची देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप झाले आहेत. मात्र आता या ऑडिओ क्लिप मुळे पुन्हा एकदा या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांचे एजंट आर्थिक व्यवहार करत असल्याचा खळबळजनक आरोप या माध्यमातून भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे.

मुंबई-गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकरांवर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या चुकांबाबत कारवाई झाली होती. तशाच कारवाया परत करण्याची धमकी देऊन सभागृहात लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, आम्ही तुमची राईस मिल बंद करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारच्या धमक्या राईस मिल धारकांना दिल्या जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर आमदार फुके यांनी याबाबत एजंट सोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप देखील विधिमंडळात सादर केली. आता परिणय फुके यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.भाजप आमदार परिणय फुके यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये प्रश्न का लावायचा नाही? लावल्यानंतर काय होणार? अशा धमक्या या ऑडिओ क्लिप मध्ये देण्यात आल्या आहेत. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट कडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप या माध्यमातून करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यात या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी, यासाठी या ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आल्या असल्याचे आमदार फुके यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपची फॉरेनची चौकशी झाल्यानंतरच पोलिस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे, अशी माहिती फुके यांनी दिली.

सरकारची जागा,सरकारचेच अब्जावधी रुपये अन शिवसृष्टी पाहायला ६०० रुपयांचे तिकीट: अबब किती लुटमार ?

पुणे- महापालिकेची शिवसृष्टी चांदणी चौकात होऊ दिली नाही त्या ऐवजी सुरुवातीलाच करोडो रुपये देऊन आणि २१ एकराचा मोठा भूखंड शिवसृष्टीला मोठ्या मानाने सरकरने दिला , त्यानंतरही येथील कामकाजासाठी सरकारने कोरोडो रुपयांची माया खळखळतीच ठेवली, अजिबात नाही तर मुक्त हस्ताने उधळण केली आणि आता हि शिवसृष्टी पाहायला तब्बल ६०० रुपयांचे तिकीट लावले जात आहे काय आहे हे ? किती लुटमार ? आणि एवढे तिकीट ठेवले तर पाहायला जाणारा वर्ग कुठला असेल ? असे सवाल करत स्वराज्य पक्षाचे आशिष भोसले यांनी राज्य सरकार, महापालिका यांच्या सहित शिवसृष्टी चालविणाऱ्या मंडळावर टीकेचा भडीमार केला आहे.

आशिष भोसले म्हणाले कि,’1995 साली महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार आले. या सरकारने प्रतिष्ठानला नर्‍हे आंबेगाव (बु.) येथे 21 एकर जमीन दिली. शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च झाले आहेत असे सांगण्यात येते .शिवसृष्टीतून खूप मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होणार,.जेव्हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे ‘मेगा टूरिझम प्रोजेक्ट’ सादर केला, तेव्हा किमान 300 लोकांना रोजगार उपलब्ध होईल हा एक निकष होता. तो पूर्ण होईल. त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरात हॉटेल्स, लॉज, रिक्षा, टॅक्सी इत्यादींनाही व्यवसाय उपलब्ध होईल. शिवसृष्टी पूर्णपणे आकाराला येईल, तेव्हा प्रत्येक दालनाला स्वतंत्र व्यवस्थापन, तंत्रज्ञ असेल. ती गरज लक्षात घेऊन पुढील काळात आम्ही प्रशिक्षित व्यक्तींचा शोध घेऊ असे व्यवस्थापनाने सरकार ला सांगितले. 2006च्या विजयादशमीला या शिवसृष्टीचे भूमिपूजन झाले आणि 2007च्या वर्षप्रतिपदेला प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.  मागे सरकारनं या प्रकल्पाला मेगा प्रोजेक्ट म्हणून मान्यता देत ३०० कोटींची गुंतवणूक करायची घोषणा केलीय. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी अर्थसंकल्पात सुद्धा 50 कोटींची तरतूद केली आहे अनेक उद्योजक,राजकीय नेते देणगी देतात तरीही नागरिकांना शिवसृष्टी पाहण्यासाठी 600/- रुपये प्रति व्यक्ती असा दर लावला जातोय ही एक प्रकारे लूट आहे दरवेळी आंबेगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या नागरिकांना शिवसृष्टीत येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या स्वागतावेळी पोलीस कर्मचारी वेठीस धरून दुकाने बंद ठेवायला भाग पाडतात, वाहने थांबवून ठेवतात, रस्त्यांवरील खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण करतात म्हणजे याचा अर्थ असा का शिवसृष्टी मंडळाच्या लोकांवर सरकार आणि महानगरपालिका कार्यरत आहे.

 पुढील ५ वर्षांत ६ हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य

‘यूएसटी’ने पुण्यात सुरू केले एक हजार आसन क्षमतेचे नवीन कार्यालय

नवे कार्यालय ८०,००० चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले, १००० आसन क्षमतेचे.

· डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोगांसाठी नाविन्यपूर्ण कार्यास पुणे कार्यालयातून मिळणार चालना.

पुणे : यूएसटी या तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तन उपाय क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने पुण्यात नवीन कार्यालय सुरू करीत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कंपनीचे भारतातील जाळे अधिक मजबूत होणार आहे. या कार्यालयीन विस्तारातून पुढील ३ ते ५ वर्षांत पुण्यात सुमारे ३५०० ते ६००० नोकऱ्या निर्माण करण्याची योजना यूएसटी कंपनी आखत आहे. बालेवाडी येथे ईक्यू स्मार्टवर्क्स संकुलात स्थित असलेले हे नवीन कार्यालय ८०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले असून, तेथे १०००पेक्षा जास्त आसनक्षमता आहे. हे कार्यालय पुण्यातील साई राधे कॉम्प्लेक्स येथील विद्यमान कार्यालयास पूरक ठरणार आहे.

पुण्यातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘यूएसटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा सुधींद्र यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यान्वयीन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस, मुख्य मूल्य अधिकारी सुनील बालाकृष्णन, यूएसटी उत्पादन अभियांत्रिकीचे प्रमुख व पुण्यातील कार्यालयाचे प्रमुख रामप्रसाद संथानगोपालन, कंपनीचे उपाध्यक्ष व टॅलेंट अॅक्विझिशन विभागाचे जागतिक प्रमुख किशोर कृष्णा, डिझाइन व एक्सपेरियन्स प्रॅक्टिस विभागाच्या उपप्रमुख स्मिता सूर्यप्रकाश, महाव्यवस्थापक शेफी अन्वर, ‘यूएसटी’चे कार्यस्थळ व्यवस्थापन व कार्यसंचालन या विभागाचे वरिष्ठ संचालक हरी कृष्णन मोहनकुमार, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि इतर सहकारी उपस्थित होते.

‘यूएसटी’च्या ‘पुणे सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये सध्या २०००हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, ते डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोग यातील सखोल तज्ज्ञतेचा उपयोग करून नाविन्याला चालना देत आहेत, तसेच व्यवसायवृद्धी गतीमान करीत आहेत. फिनटेक, हेल्थकेअर व लाइफ सायन्स, रिटेल व ई-कॉमर्स, उत्पादन व ऑटोमोटिव्ह यांसारख्या उद्योगांतील आघाडीच्या जागतिक कंपन्यांना सेवा देणारे हे पुणे केंद्र यूएसटीच्या जागतिक ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

यूएसटीचे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी अलेक्झांडर वर्गी म्हणाले, “पुण्यात नवीन कार्यालयाच्या उद्घाटन होणे हा भारतातील आमच्या सातत्यपूर्ण वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या धोरणात्मक विस्ताराद्वारे आम्ही डिजिटल परिवर्तन क्षेत्रातील व्यवसायाच्या गरजांसह बाजारातील संधींशी जुळवून घेत आहोत आणि आमची कार्यपद्धती मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे नियोजन करीत आहोत. एआय, डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आमच्या वाढत्या संघांना सहाय्य करण्यासाठी सक्षम प्रतिभावंत कर्मचाऱ्यांचा समूह उभारणे, व्यवसाय सल्लागारांची साखळी निर्माण करणे, धोरणात्मक भागीदारी करणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यांवर आमचा भर आहे.”

यूएसटी उत्पादन अभियांत्रिकीचे अध्यक्ष आणि पुणे केंद्रप्रमुख रामप्रसाद संथानगोपालन म्हणाले, “पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान केंद्र आहे. येथे नवीन कार्यालय उभारून यूएसटीने या भागातील वाढीतील मोठी गुंतवणूक केल्याचे दाखवून दिले आहे. एआय, अत्याधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक अभियांत्रिकी या क्षेत्रांत गुंतवणूक केल्याने आमच्या क्षमता अधिक बळकट होतील आणि पुणे केंद्र हे नाविन्यता आणि डिजिटल उत्कृष्टता यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून समोर येईल. आमच्या तज्ज्ञ संघाच्या सखोल डोमेन ज्ञानामुळे आम्ही जागतिक आस्थापन ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन प्रकल्प यशस्वीपणे राबवू आणि नाविन्याच्या अग्रस्थानी राहू, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

पुढील तीन वर्षांत यूएसटी भारतातील आपल्या कार्यालयांमध्ये आसनक्षमता आणि कर्मचारी संख्या यामध्ये सातत्यपूर्ण वाढ साध्य करणार आहे. आगामी तीन ते पाच वर्षांत आपल्या व्यवसायाच्या गरजा आणि डिजिटल परिवर्तन, एआय यांमधील बाजारातील संधी ध्यानात घेऊन कंपनी आपली कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढविणार आहे. व्यवसाय सल्लागार क्षेत्रातील भक्कम संधी निर्माण करण्यावर, मोठा प्रतिभा समूह विकसित करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्यावर यूएसटी लक्ष केंद्रित करीत आहे.

‘यूएसटी’ने भारतभर आपली उपस्थिती सातत्याने वाढवत जागतिक डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. मागील वर्षी कंपनीने बंगळुरूमध्ये दुसरे कार्यालय आणि एक डिझाइन एक्सपीरियन्स सेंटर सुरू केले. तसेच, केरळमधील कोची येथे आपल्या दुसऱ्या स्वतंत्र कॅम्पसची पायाभरणी केली. त्या ठिकाणी पुढील पाच वर्षांत ३,००० नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने बाळगले आहे. या भागातील वाढ आणि गुंतवणूक यांविषयीची कंपनीची बांधिलकी यावरून दिसून येते. ‘यूएसटी’ने हैदराबादमधील इंटरनॅशनल टेक पार्क येथे अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन २०२३ मध्ये केले. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास हे काम या कार्यालयात होते.

कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेली यूएसटी ही १९९९ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून, भारतातील तिचे मुख्यालय तिरुअनंतपुरम येथे आहे. बंगळुरू, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, कोची, पुणे, मुंबई, चेन्नई, कोयंबतूर, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद आणि होसूर यांसारख्या प्रमुख ठिकाणी तिची कार्यालये आहेत. सध्या भारतात २०,००० हून अधिक कर्मचारी ‘यूएसटी’सोबत कार्यरत आहेत.

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर अभिनेते सचिन खेडेकर

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि  जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

‘गेट वेल SOON!’, ‘हॅम्लेट’, ‘हसवा फसवी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’, ‘संज्या छाया’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘चारचौघी’, ‘आज्जी बाई जोरात’ आदी मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणाऱ्या दर्जेदार नाटकांची परंपरा जपणाऱ्या जिगिषा आणि अष्टविनायक या निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचे शिवधनुष्य उचलले आहे. आयुष्यात प्रत्येकाच्याच वाट्याला एक ‘भूमिका’ येते. भूमिका जगण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कलावंतच असण्याची गरज नसते… असे म्हणत जिगिषा अष्टविनायक एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. अभिनेते  सचिन खेडेकर  यांनी आजवर दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर मराठीत चित्रपट, मालिका, नाटक या  तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवला असून, सोबत हिंदी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम चित्रपट तसेच वेब सीरिजमध्येही त्यांच्या अनेक भूमिका  लक्षवेधी  ठरल्या आहेत. 

आता आगामी ‘भूमिका‘ या नाटकात ते कोणत्या रूपात रसिकांच्या भेटीला येतात याची उत्सुकता आहे. या नाटकातील सचिन खेडेकर यांच्या व्यक्तिरेखेबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. त्याचप्रमाणे नाटकातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञ कोण असणार ? याची माहितीसुद्धा लवकरच उलगडली जाणार आहे. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून, याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

२८ किलो गांजा मुंढव्यात पकडला

पुणे -पुणे पोलिसांनी एकूण १६लाख ८० हजार रुपये किंमतीचा २८ किलो गांजा मुंढवा पोलीस ठाणे हद्दीत पकडला . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
दि.११/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे मुंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळालेले बातमीवरुन मुंढवा कोरेगांव पार्क रोडने शहा यांचा मोकळा प्लॉट, मुंढवा पुणे येथे इसम नामे १) प्रमोद सुधाकर कांबळे, वय ४४ वर्षे रा किल्ला वेस, करमाळा सोलापुर पुणे २) विशाल दत्ता पारखे वय ४१ वर्षे रा प्लॅट नं ६, मोहन नगर, आदित्य सोसा. विश्रांतवाडी पुणे यांच्या ताब्यात एकुण १६,८०,०००/- रु.कि. चा गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द मुंढवा पोस्टें गु.र.नं. ७७/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्तअमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, संदिप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी केली.

जातीयवादाच्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात होळी

पुणे-वंदे मातरम संघटनेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून जात, धर्म, पंथ भेदभाव न करता भारतीय एकात्मतेची होळी साजरी केली जाते.स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमधील अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि दत्ता गाडेला फाशी व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या हत्येतील वाल्मीक कराड व सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. या मागण्यांसाठी होळी दहन करण्यात आले.

या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर अध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, समन्वयक महेश बाटले, आयटी सेल अध्यक्ष विशाल शिंदे तसेच राज घाटे, प्रसाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे, हेमंत कुंभार, किरण केकाने, आदित्य मुंगळे, आकाश जामगे, तुषार गिरी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही होळी महिलांच्या व शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते दहन करून समाजात सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.

अनुप सोनी क्राइम पेट्रोलमध्ये परतला: 26 हत्यांचे प्रकरण खिळवून ठेवणार

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील सर्वात लोकप्रिय क्राइम शो पैकी एक क्राइम पेट्रोल पुन्हा सुरु होणार आहे. या नव्या सीझनमध्ये 26 अत्यंत गुंतागुंतीच्या आणि चित्तथरारक हत्या प्रकरण प्रेक्षकांना
खिळवून ठेवतील. ज्यांचे प्रभावी सूत्रसंचलन या कार्यक्रमाशी एकरुप झाले आहे, ते या कार्यक्रमाचे
निवेदक म्हणून पुन्हा पपरतले आहेत. ते त्यांच्या विशेष शैलीद्वारे प्रेक्षकांना गंभीर प्रकरणाबद्दल माहिती देतील, ज्यामुळे विश्वासार्हता व गांभीर्य दिसून येईल.

प्रत्येक प्रकरण जसजसे हळू हळू पुढे जाईल, तसतसा क्राइम पेट्रोलचा नवीन सिझन प्रत्येक वळणावर एक प्रश्न विचारतो- ‘आखीर खून किसने किया?’ वास्तविक जीवनातील घटनांवर आधारीत या घटना अत्यंत गुंतागुंतीच्या तपासात प्रेक्षकांना खोलवर घेऊन जातात. यातून भयंकर गुन्ह्यांचे धक्कादायक सत्य आणि त्यामागील गुन्हेदारांचा पर्दाफाश होईल.
कार्यक्रमात पुन्हा येण्याबद्दल अनुप सोनी यांनी उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “क्राइम पेट्रोल ही मालिका त्याच्या आकर्षक कथनामुळे प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम बनला आहे. कार्यक्रमातील खूनांचे रहस्य अधिक गूढ आहे, त्यामुळे नवीन सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे वचन देतो, खऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारीत असा यातील प्रत्येक भाग अत्यंत गुंतागुंतीच्या हत्या प्रकरणांची उकल करून खऱ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करतो. या गुंतागुंतीच्या तपासांत प्रेक्षकांना घेऊन जाणारा सूत्रसंचालक म्हणून मी परत आलो आहे, याचा माला खूप आनंद झाला आहे. नव्या प्रोमोने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडेल, अशी मला खात्री आहे. ”

100 हून अधिक CCTV तपासून दोन चोरट्यांनी चोरलेल्या 53 मोटारसायकली जप्त

पुणे-पिंपरी पाेलीस ठाण्याचे हद्दीत मेट्राे स्टेशन व इतर ठिकाणी वारंवार हाेणारे माेटार सायकल चाेरीच्या गुन्हया संर्दभात पाेलीसांनी अज्ञात माेटार सायकल चाेरटयांचा शाेध घेऊन माेटारसायकल चाेरांचा शाेध सुरु केला हाेता. त्यानुसार पिंपरी चिंचवड व पुणे शहर हद्दीतील १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तांत्रिक विश्लेषण आधारे आराेपींचा माग काडून दाेन आराेपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून २६ लाख १० हजार रुपये किंमतीच्या ५३ माेटारसायकल जप्ती करण्यात आल्या आहे. पिंपरी चिंचवड पाेलीस आयुक्तालय व आयुक्तालयाबाहेरील एकूण ३५ वाहनचाेरीचे गुन्हे उघडकीस आल्याची माहिती परिमंडळ एकच्या पाेलीस उपायुक्त स्वप्ना गाेरे यांनी दिली आहे.
धीरज प्रदीप सावंत (वय-२३,रा. नऱ्हेगाव,पुणे), बालाजी ऊर्फ तात्यासाहेब भाेसले (२४,रा. शाहुपुरी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. पिंपरी पाेलीस ठांण्याचे वपाेनि अशाेक कडलग यांचे मार्गदर्शनाखाली सपाेनि दिंगबर अतिग्रे यांचे पथक माेटारसायकल चाेरीच्या गुन्हयाचे घटनास्थळापासून माेटारसायकल चाेरी करुन घेऊन आराेपी गेलेल्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तपासणी करत असताना, पाेलीस अंमलदार एस जानराव यांना त्यांचे खबऱ्याकडून माहिती मिळाली की, माेरवाडी मेट्राेस्टेशन पिंपरी येथील माेटारसायकल पार्क केलेल्या ठिकाणी एक संशयित व्यक्ती फिरत अाहे. त्याप्रमाणे पिंपरी पाेलीसांचे पथक तातडीने सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आराेपीचा शाेध घेऊन त्यास सापळा रचून ताब्यात घेत चाैकशी केली.
त्यावेळी आराेपीने वाहनचाेरीचे गुन्हे साथीदार साेबत केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून एकूण ५३ माेटारसायकल पाेलीसांना मिळून आल्या आहे. आराेपींनी पिंपरी चिंचवड शहरात वाहनचाेरीचे २५ गुन्हे, पुणे शहरात चार गुन्हे, काेल्हापूर मध्ये दाेन गुन्हे तर सातारा मध्ये चार गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.