Home Blog Page 622

तृप्ती देसाईंना 17 तारखेला बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

बीड- येथील पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या पुण्यातील तृप्ती देसाईंना चौकशीसाठी बोलवले आहे. बीड जिल्ह्यातील 26 पोलिस हे वाल्मीक कराड यांच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप देसाईंनी केला होता. मात्र, त्याचे पुरावे दिले नाही असा त्यांच्यावर आरोप आहे . त्यामुळे त्यांना 17 तारखेला बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

आरोप केले त्याचे पुरावे घेवून हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यात बीड पोलिसांनी म्हटले आहे की, तक्रार प्राप्त झाली मात्र पुरावे मिळाले नाहीत. हे आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडील असलेले पुरावे घेऊन या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता एसपी ऑफीसला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे अनेक प्रकरण बाहेर आले. यावेळी तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे एका सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली होती. या यादीमध्ये हवालदारापासून एपीआय, डीवायएसपी, अतिरीक्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नाव असलेले अधिकारी किंवा कर्मचारी वाल्मीक कराडचे निकटवर्तीय किंवा मर्जीतील असल्याचा दावाही तृप्ती देसाई यांनी केला होता. इतकच नाहीतर गृहमंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी या सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली बीड जिल्ह्याबाहेर करावी अशी मागणी केली होती.

कोण-कोणते पोलिस अधिकारी/कर्मचारी कराडच्या मर्जीतले?

बाळराजे दराडे, बीड ग्रामीण-API
रंगनाथ जगताप, अंबाजोगाई ग्रामीण – API
भागवत शेलार, केज बीट – LCB
संजय राठोड, अंबाजोगाई – additional Police
त्रिंबक चोपने, केज – Police
बन्सोड ,केज – API
कागने सतिश, अंबाजोगाई – Police
दहिफळे, शिरसाळा-API
सचिन सानप, परळी बिट – LCB
राजाभाऊ ओताडे, बीड – LCB
बांगर बाबासाहेब, केज – POLICE
विष्णु फड, परळी शहर – Police
प्रविण बांगर, गेवराई – PI
अमोल गायकवाड, युसुफवडगाव ड्रायवर Police
राजकुमार मुंडे, अंबाजोगाई DYSP ऑफिस – police
शेख जमिर, धारूर- Police
चोवले, बर्दापूर – Police
रवि केंद्रे,अंबाजोगाई – police
बापु राऊत,अंबाजोगाई – Police
केंद्रे भास्कर,परळी – Police
दिलीप गित्ते, केज DYSP ऑफिस – Police
डापकर – DYSP ऑफिस केज – Police
भताने गोविंद, परळी – police .
विलास खरात, वडवणी – Police.
बाला डाकने, नेकनूर – Police
घुगे, पिंपळनेर – API

रविवार पेठ येथील बागबान मस्जिद येथे महिलांसाठी विशेष व्यवस्था

पुणे-कोरोना प्रादुर्भावानंतर सन २०२१ पासून रविवार पेठ येथील बागबान मस्जिद येथे महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या महिला नोकरीला असतात किंवा शॉपिंग साठी बाहेर आलेल्या असतात त्यांना नमाजसाठी जागा नसते. तसेच त्यांना वॉशरूम किंवा तोंड, हात-पाय धुण्यासाठी अडचण निर्माण होते. काही महिला लहान बाळ घेऊन प्रवास किंवा घराबाहेर पडतात अशा महिलांना आपल्या बाळांना स्तनपान करण्याकरीता अडचण निर्माण होते.

ही सर्व बाब लक्षात घेऊन बागबान मस्जिद ट्रस्टी हाजी अल्ताफभाई बागबान (शेख), हाजी सिराज बागवान, सामाजिक कार्यकर्ते सैय्यद इसरार शिकीलकर, अन्सार पिंजारी, युसूफ खान, सलीम काजी, परवेज शेख (खलिफा) व इतर यांच्या सहयोगाने मस्जिद मध्ये एक विशेष रूम तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलांच्या या अडचणी दूर होऊन त्यांना सुविधा मिळणार आहेत. याठिकाणी महिला नमाज पठण करतात उपवास (रोजा – इफ्तार) आणि आराम देखील करतात. या सुविधांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

‘दगडूशेठ’ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पुणे: काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्म ला २२,००० शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे.

सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर,राहुल सोलापूरकर,नराधम दत्ता गाडे यांच्या प्रतिमा होळीत दहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या गैरकारभाराची प्रतिकात्मक होळी

पुणे-देशातील सर्वसामान्य नागरिक महागाई व बेरोजगारी या संकटांसोबत धीराने लढत आहेत.परंतु या सोबतच कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत,यासर्व परिस्थितीवर निषेध म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने होळी पेटवण्यात आली.
यावेळी होळीमध्ये वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर,राहुल सोलापूरकर,नराधम दत्ता गाडे यांच्या प्रतिमा होळीत दहन करण्यात केल्या.तसेच “कराडच्या बैलाला घो”, सोलापुरकरच्या बैलाला घो”,”कोरटकरच्या बैलाला घो” फाशी दया फाशी द्या दत्ता गाड़े ला फाशी द्या, असा शिमगा करण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत गैरकारभाराची मालिका महायुतीच्या सरकारमध्ये सुरू आहे.देशपातळीवर असलेली आर्थिक संकटे, महागाई बेरोजगारी तर राज्यभरात असलेले सुरू असलेली दडपशाही, गुंडशाही, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे वाचाळवीर या सगळ्यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य माणूस आपल्या मेहनतीने कष्ट करून आपले जीवनमान जगत असताना त्याला सुरक्षा देण्याचे काम सुद्धा सरकार करू शकत नसेल तर हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. आज महिला सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. आपल्या पुण्यनगरीमध्ये स्वारगेट अत्याचार यासारखी दुर्दैवी घटना, बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या ,कोणीतरी एक नराधम हव्या त्या माणसाचा जीव देऊ शकेल इतकी ताकद निर्माण करू शकतो आणि या राज्याची व्यवस्था त्याला संरक्षण पुरवते. राज्याचे सामाजिक परिस्थिती व कायदा व सुव्यवस्था किती घासरली आहे याची ही ज्वलंत उदाहरणे आहेत. आपल्या महापुरुषांनी आपल्या बलिदानातून भूमीला स्वराज्य सन्मानाने स्वाभिमान मिळवून दिला, त्या महापुरुषांबद्दल अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या औलादी प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या रूपाने आपल्या राज्यात आहेत,यांना देखील शासनाच्या व्यक्तीने स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते हे देखील चुकीचे आहे.
या पुण्यनगरीमध्ये वाहतूक व्यवस्था देखील अत्यंत ढासळली आहे. शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात जायला तासन् तास ट्राफिक मध्ये अडकावे लागते याचा थेट परिणाम या भागातील उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्यामध्ये होत आहे. हे चित्र देखील सामाजिक अस्थिरतेच्या दृष्टीने आपला प्रवास सुरू असल्याचे द्योतक आहे. अशा या सर्व परिस्थितीमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आजची ही प्रतिकात्मक होळी केली आहे. भविष्यात जर सरकारला वेळीच जाग आली नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची तयारी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही हा संघर्ष नक्की करू” असे देखील प्रशांत म्हणाले.
या प्रतीकात्मक होळी प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, दिपक कामठे,रोहन पायगुडे, पायल चव्हाण,रचना ससाणे,जयदीप देवकुळे, मधुकर भगत राजश्री पाटील यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

कृष्ण धवल काळातील गीतांना श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद

पिंपरी, पुणे- जागतिक महिला दिनानिमित्त हौशी गायकांचा कृष्ण धवल काळातील निवडक गीतांचा निःशुल्क कार्यक्रम विविध भारती म्युझिकल इव्हेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. निगडी, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे रविवारी (दि.९) सायंकाळी झालेल्या हिंदी, मराठी संगीत मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली.
यामध्ये विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शैलेश घावटे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, छाया अय्यर, सुचिता शेटे – शर्मा, डॉ. सायली अरुण सरमाने, अनिल जंगम, निलेश मोरे, विष्वांत काळोखे गायकांनी एकल आणि युगुलस्वरातील कृष्णधवल चित्रपटांतील गाणी सादर केली.
यामध्ये “दुनिया बनाने वाले,..” , “गोरे गोरे बाकी छोरे …” , “अफसाना लिख रही हुं…” , “बाबूजी धीरे चलना ..” , आयेगा आनेवाला आयेंगा ” , “यू तो हमने लाख हंसी देखे हैं ..” अशा एकल गीतांनी मैफलीत रंग भरले जात असतानाच अतिशय तन्मयतेने सादर केलेल्या “देखो मौसम क्या बहार हैं..” , “निंद ना मुझको आये..” , , “याद किया दिल ने कहा हो तुम ..” , “इतना ना मुझसे तू प्यार बढा …” अशा अवीट गोडीच्या युगुलगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले; तर “आजा सनम मधुर चांदणी मे हम…” या बहारदार गीताने बहार आणली. “आएगा आयेगां आनेवाला आयेंगा.” , “ओ रात के मुसाफिर…” , “हाल कैसा हैं जनाब का..” या गीतांनी मैफलीत रंगत आणली.
महिला दिनानिमित्त महिला गायिका आणि ॲड.स्मिता शेटे, डॉ. किशोर वराडे, छाया अय्यर यांचा सत्कार करण्यात आला. लकी ड्रॉ च्या पैठणीच्या मानकरी विमल बऱ्हाटे व शिल्पा कंकाळ, अर्चना भोंडवे, सुहासिनी शिंदे, स्मिता शेटे यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे, सनी शर्मा, अंकिता जंगम यांनी विशेष सहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन व सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण, आकाश गाजुल यांनी छायाचित्रण आणि अरुण सरमाने यांनी निवेदन केले.

महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी; सिंधी तरुणांनी सामाजिक भान जपत एएनपी केअर फाऊंडेशनला दिली रुग्णवाहिका भेट

पुणे: अजराक सुपरजायंट्सने एसएसडी फाल्कन्सचा ४ गडी राखून पराभव करत सहाव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा नरेंद्र लुंड सामनावीर ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर २४ दिवस ही स्पर्धा झाली. कसोटी क्रिकेटच्या धर्तीवर दोन डावांचा अंतिम सामना झाला. प्रत्येक डावात ९ षटके खेळण्यात आली.

नाणेफेक जिंकून एसएसडी फाल्कन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ९ षटकात ७ गडी गमावत ४० धावा केल्या. अजराक सुपरजायंट्सने पहिल्या डावात अवघ्या ५ धावांची आघाडी घेत ८ बाद ४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात एसएसडी फाल्कन्सने आक्रमक खेळ करत ५७ धावा उभारल्या. विजयासाठी ५३ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या सुपरजायंटचा सलामीवीर अष्टपैलू नरेंद्र लुंडने धडाकेबाज ३३ धावांची खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. राज गोविंदानीने दोन्ही डावांत २-२ बळी घेतले. ३३ धावांची खेळी आणि दोन्ही डावांत मिळून ४ बळी घेणाऱ्या नरेंद्र लुंड याला सामानावीराचा किताब मिळाला.

सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून गेल्या सहा वर्षांपासून ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे आयोजन केले जाते. यंदा लीगमधून उभारलेल्या निधीतून एएनपी केअर फाऊंडेशनला अँब्युलन्स देण्यात येणार असल्याचे संयोजक हितेश दादलानी व कन्वल खियानी यांनी सांगितले.

महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी

गंगा वॉरियर्सने सलग दुसऱ्या वर्षी सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकावले. गंगा वॉरियर्स आणि यमुना स्ट्रायकर्स यांच्यात अंतिम सामना रंगला. गंगा वॉरियर्सने कर्णधार शीतल आसवानी (१६ चेंडूत २६ धावा) व ममता (१७ चेंडूत २० धावा)  यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर निर्धारित ८ षटकांत ३ बाद ६० धावा केल्या. विजयासाठी ६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यमुना वॉरियर्सची सुरुवात अडखळत झाली.  शीतलने गोलदांजीतही कमाल करीत २ बळी घेतल्याने यमुना वॉरियर्सचा डाव ८ षटकांत अवघ्या ३५ धावांत संपुष्टात आला. शीतल आसवानीला सामनावीराचा किताब मिळाला. 

संक्षिप्त धावफलक : (पुरुष गट)

पहिला डाव 

एसएसडी फाल्कन्स: ९ षटकांत ७ बाद ४० (जतीन गोविंदानी १२, नरेंद्र लुंड ९-२) 

अजराक सुपरजायंट्स : ९ षटकांत ८ बाद ४५ (कुणाल सिरवानी २२, राज गोविंदानी २०-२)

दुसरा डाव

एसएसडी फाल्कन्स : ९ षटकांत ७ बाद ५७ (राहील दायलानी २८, रोहित मुलचंदानी १४, नरेंद्र लुंड ८-२, जतीन सेवानी १४-२, जय मायारमनी १४-२)

अजराक सुपरजायंट्स : ९ षटकांत ५ बाद ५३ (नरेंद्र लुंड ३३, राज गोविंदानी १०-२, जयेश मायारामानी १०-२)

निकाल: अजराक सुपरजायंट्स ४ विकेट्स राखून विजयी

संक्षिप्त धावफलक : (महिला गट)

गंगा वॉरियर्स – ८ षटकांत ३ बाद ६० (शीतल आसवानी २६, ममता २०) विजयी यमुना स्ट्राइकर्स : ८ षटकांत ६ बाद ३५ (स्वीटी ७, पर्ल ७, शीतल आसवानी ४-२)

ज्ञान, शक्ती आणि भक्तीच्या त्रिवेणी संगमातून स्वराज्यनिर्मिती

इतिहास अभ्यासक रायबा नलावडे ; प्रभात मित्र मंडळातर्फे ‘शिवसूर्य’ स्मरणिका प्रकाशन
पुणे : प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विचारांचा संगम जर कलियुगात पाहायचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पाहायला मिळतो. शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे या भूमीचे दोन डीएनए आहेत. त्यांनी ज्ञान, शक्ती आणि भक्तीच्या त्रिवेणी संगमातून स्वराज्यनिर्मिती केली असल्याचे मत इतिहास अभ्यासक रायबा नलावडे यांनी व्यक्त केले.

गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या ‘शिवसूर्य; स्मरणिका प्रकाशन कार्यक्रम श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, जनता सहकारी बँक,पुणेचे संचालक नाना कांबळे, ऍड. प्रताप परदेशी, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे, रवींद्र भन्साळी, मंगेश शिंदे, ओमकार नाईक, हेमराज साळुंके, अमोल थोरात, अथर्व बोगम, कृष्णा परदेशी आदी उपस्थित होते.

स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे हे ९ वे वर्ष होते. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हवेली तालुका कला क्रीडा सामाजिक संस्था, पुणे यांचे पदाधिकारी पै.भरत चौधरी व पै.भीमराव वांजळे यांचा मान्यवरांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

अण्णा थोरात म्हणाले, शिवजयंती सोहळा हा प्रत्येकामध्ये उत्साह निर्माण करीत असतो. आपल्याकडे तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे अशी दोन वेळा शिवजयंती साजरी होते. तारखेच्या वेळी जेवढा उत्साह असतो, तेवढाच तिथीप्रमाणे सोहळा साजरा करताना दिसतो. ही अत्यंत चांगली बाब आहे.

किशोर चव्हाण म्हणाले, शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच विचारांचे प्रबोधन व्हावे, यासाठी स्मरणिका प्रकाशन केले जाते. स्मरणिकेकरिता मंडळाचे कार्यकर्तेच लेखापासून ते इतर नियोजनांपर्यंत सर्व काम करतात. शहराच्या पूर्व भागातील शिवजयंतीचा भव्य दिव्य सोहळा प्रभात मित्र मंडळ साजरा करीत असून त्याची सुरुवात प्रकाशन सोहळ्याने होते, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘एक पोळी होळीची सामाजिक बांधिलकीची’

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुडमध्ये उपक्रम

पुणे-दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य केला जातो. होलिका दहन झाल्यानंतर प्रत्येक घरातून एक पोळी होळीला अर्पण केली जाते. होळीच्या अग्नीमध्ये दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा’ हा त्यामागचा उद्देश असतो.

हे अन्न जळून खाक होण्याऐवजी ते गरीब आणि अर्धपोटी झोपणार्‍यांच्या मुखात जावे या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, ‘एक पोळी होळीची, सामाजिक बांधिलकी’ची हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून २० हजार पोळ्यांचे संकलन झाले असून, या सर्व पोळ्या गरीब विद्यार्थी, अनदेण्यात आल्या.

कोथरुड हे विद्येचे माहेरघर असल्याने, देशभरातून लाखो विद्यार्थी हे इथे शिक्षणासाठी येत असतात. यामधील असंख्य विद्यार्थी गरीब आणि अल्पभूधारक कुटुंबातील असल्याने, त्यांना अनंत अडचणींवर मात करत आपले शिक्षण पूर्ण करावे लागते.

यामध्ये असंख्य विद्यार्थी हे अर्धपोटीच शिक्षण घेत असल्याने, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पोषक आहाराचे डबे सुरु केले आहेत. होळीच्या सणाचा आनंद देखील या विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी एक पोळी होळीची समाजिक बांधिलकीची हा उपक्रम हाती घेत, कोथरुडमधील प्रत्येक कुटुंबांना गरीब विद्यार्थ्यांसाठी पोळी दान करण्याचे आवाहन केले होते.

ना. पाटील यांच्या आवाहनानंतर २० हजार पोळ्यांचे संकलन झाले. या सर्व पोळ्या गरीब विद्यार्थ्यांना देऊन, त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्या हस्ते या पोळ्यांचे वितरण केले गेले.

प्रशासकीय काळात वाढली मुजोरी अन भ्रष्टाचार..महिला अधिकाऱ्यासह २ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अँटीकरप्शनची कारवाई

पुणे- सरकार, निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात सुमारे ८० टक्के नवे कर्मचारी/ अन अधिकारी आता दिसू लागले असून त्यांची मनमानी, मुजोरी भ्रष्टाचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने आता कारवाईला प्रारंभ केल्याचे दिसत आहे .जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील कामांची देयके मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पवार हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (दक्षिण) आणि अन्य दोघेजण दौंड शिरूर उपविभागात कार्यरत आहेत.

‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांना दौंड तालुक्यातील खुटबाव रस्ता ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामांची निविदा मंजूर झाली होती.\या निविदेनुसार त्यांना ४० लाख रुपयांच्या कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. ही कामे पूर्ण केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे कामाची पाहणी करतील. त्याचा अहवाल समितीला देण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी केली.तसेच तक्रारदाराच्या दोन कामांची देयके मंजूर करण्यासाठी दोन टक्क्यांप्रमाणे कार्यकारी अभियंता बाबूराव पवार आणि उपअभियंता दत्तात्रेय पठारे यांनी प्रत्येकी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख ४२ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने १० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची ११ मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यात बगाडे, पवार आणि पठारे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १३ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचून तिघांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. पवार यांच्या कार्यालयात एका बॅगेत आठ लाख ५८ हजारांची रोकड आढळली असून ती जप्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून उलगडणार  शहरीकरणाचे बदलते पैलू

‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे प्रदर्शन’ –  १६ ते १९ मार्च दरम्यान आयोजन

पुणे : विवेकानंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने  ‘अंडरस्टॅंडिंग अर्बनायझिंग पेरिफेरीज ऑफ पुणे’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपनगरातील शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास मांडणारे हे प्रदर्शन आहे. रविवार, दिनांक १६ ते १९ मार्च २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन येथे प्रदर्शन होणार आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन १६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता  माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्टचे चेअरमन ॲड. अभय छाजेड, सचिव जितेंद्र पितळीया आणि संचालक प्रसन्न देसाई यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

प्रा. हृषीकेश अष्टेकर, देवेंद्र देशपांडे, गरिमा बुरागोहैन, गुंजन महेश्वरी, मीनाक्षी सरावगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे संचालक आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आणि समन्वयक आर्किटेक्ट शेखर गरुड यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

पुण्याच्या परिघीय शहरीकरणाचा सखोल अभ्यास विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘अर्बन डिझाईन’ अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यास प्रकल्प सादर केले आहेत. गेल्या आठ वर्षांत विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी हिंजवडी,  खराडी,  देहू,  भूगाव,  चिखली, नऱ्हे या भागांचा सखोल अभ्यास केला होता.

गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी पुण्याच्या विविध दिशांमधील सहा परिघीय भागांचा सखोल अभ्यास केला आहे.अभ्यासातील महत्त्वाचे पैलूया अभ्यासात प्रतिमा, ओळख, संस्कृती व वारसा, भूगोल, पर्यावरण, अर्थव्यवस्था, वास्तुशैली, वाहतूक, पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षितता इत्यादी सात महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. पुण्याच्या बाहेरील १०-१५ किमी अंतरावर शहरीकरणाची गती, सरकारी योजना, महामार्ग व सांस्कृतिक केंद्रे यांचा प्रभाव याचा यात विशेष अभ्यास केला आहे. 

प्रदर्शन  नागरिकांसाठी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत विनामूल्य खुले असेल. 

शिवनेरीवर तिथीनुसार (दि.१७) शिवनेरी स्मारक समितीतर्फे होणार शिवजयंती उत्सव,नितेश राणे ,एकबोटे उपस्थित राहणार  

0

राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा ; सवाद्य छबिना मिरवणुकीचे आयोजन

पुणे : श्री शिवनेरी स्मारक समिती पुणेचे वतीने किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला सोमवार, दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव सुरु होणार आहे. शिवाई मातेस अभिषेक, शिवजन्मोत्सव, पालखी सोहळा, शिवजागर धार्मिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४६ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केलेला आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत शनिवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. यावेळी हिंदूधर्मवीर नितेश राणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अनेक शिवप्रेमी युवक-युवतींसह अनेक शाहीर देखील मिरवणुकीत सहभागी होणार आहे. श्रीजगद्गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठविले जाते. सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने देखील महावस्त्र पाठविण्यात येणार आहे.

सोमवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता शिवजन्मस्थळावर शिवाई मातेस सौ. व श्री. विद्यावाचस्पती डॉ.नंदकिशोर एकबोटे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा होईल. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री मंत्री नितेश राणे, विद्यावाचस्पती डॉ. नंदकिशोर एकबोटे, शिवव्याखाते सौरभ कर्डे यांच्या उपस्थितीत हा उत्सव संपन्न होणार आहे. उत्सवात पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी ९  ते १० यावेळेत शिवजन्मोत्सव साजरा करतील.

यावेळी पंचक्रोशीत विशेष काम करणा-या महिलेला राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ओतूरच्या डॉ. रश्मी घोलप, कळंबच्या ह.भ.प.सुरेखा शिंदे, गोद्रेच्या सरपंच अनिता रेंगडे, पाडळीच्या सरपंच स्वाती कबाडी, सामाजिक कार्यकर्त्या राणी बो-हाडे यांना गौरविण्यात येणार आहे.

सोहळ्यासोबतच ध्वजारोहण होऊन धर्मसभा होईल. यात शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे वतीने पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. पोवाडे गायन कार्यक्रमानंतर जाहीर अभिवादन सभा होईल. त्यामध्ये सौरभ कर्डे यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी ६ वाजता जुन्नर शहरातून मिरवणूक व रात्री सांगता सभा होणार आहे. समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, चिटणीस रमेश कर्पे व शिवप्रेमींनी उत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. पंचक्रोशीतील पन्नास गावांमधून मोठया संख्येने शिवभक्त गडावर येणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. 

मंगळवार पेठेतील ‘तो’भूखंड नका घालू बिल्डरच्या घशात ,ती जागा डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाचीच :केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे गाऱ्हाणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समिती भेटली केंद्रीय राज्य मंत्र्यांना

पुणे: मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या भावी विकास व योजनेसाठी आरक्षित जागा खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. हा करार रद्द करून सदरची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी त्वरित द्यावी, अशी मागणी दलित, बहुजन व आंबेडकर अनुयायांची आहे. सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून या संवेदनशील व महत्वपूर्ण जागेचा प्रश्न मार्गी लावून डॉ. आंबेडकर भवनाचे विस्तारीकरण करण्यात पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.

सदरच्या जागेत आंबेडरकर भवनाचा विस्तार व्हावा, डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी पुण्याचे खासदार या नात्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, या मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले. प्रसंगी माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, ॲड. अविनाश साळवे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, रोहिदास गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय सोनावणे, शैलेश चव्हाण, राहुल डंबाळे, शाम गायकवाड, महिपाल वाघमारे युवराज बनसोडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत मंगळवार पेठेतील सर्व्हे नंबर ४०५ मधील जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय २० जुलै २००० मध्ये पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला होता. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ पासून एन. जी. व्हेंचर्सला ६० वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा करार केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एखादा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यास त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्याऐवजी नियम धाब्यावर बसवून कायद्याची पायमल्ली करत घाईगडबडीने हा भूखंड खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. पक्ष व राजकारण बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा विषय असलेली ही जागा खासगी बिल्डरच्या घशात देऊ नये. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. या भवनाचे विस्तारीकरण करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे महापालिकेने २००० मध्ये केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करून येथे आंबेडकर भवनाचा विस्तार व स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे. महापालिकेच्या वतीने आंबेडकरी विचारांचे प्रचार व प्रसार केंद्र, संशोधन केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका यासह डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारावे, जेणेकरून आंबेडकरी समाजाला न्याय मिळेल, असे या निवेदनात म्हटले आहे.

पुण्यात अफूची शेती … पोलिसांची कारवाई. ४५ वर्षीय महिला अटकेत

पुणे-आळंदी म्हातोबाची या गावातील परिसरामध्ये अफु या अंमली पदार्थाची शेतात लागवड करणा-यावर लोणी काळभोर पोलीसांनी कारवाई केली आहे.
दि.१४/०३/२०२५ रोजी दुपारी १५/०० वा. चे सुमारास आळंदी म्हातोबाची येथील, जगताप मळा रोड चे कडेला असलेल्या नितीन टिंबळे यांचे प्लॉटींगचे मागील बाजुस असलेल्या जमीनीमध्ये अफु या अंमली पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने, पिक लागवड करण्यात आलेली आहे. वगैरे मजकुरची गोपनिय खबर लोणी काळभोर पोलीसांना प्राप्त झाली.
सदर प्राप्त खबरी नुसार लोणी काळभोर पोलीसांनी दोन पंचांसह घटनास्थळी जावुन छापा कारवाई केली असता कारवाई दरम्यान, आळंदी म्हातोबाची येथील गट नंबर ७७५ मध्ये एकुण ४०,०००/-रुपये किंमतीचे, व ४ किलोग्रॅम वजनाचे, ६६ अफु चे झाडे मिळुन आले आहेत. सदरची आफु ची झाडे दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन ती जप्त करणेत आलेली आहेत. तसेच त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जमीन मालक महिला नामे मंगल दादासो जवळकर वय ४५ वर्षे रा. अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची ता. हवेली, जि. पुणे हिचे विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट क.८ ब,१८ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला असुन सदर महिला आरोपीस ताब्यात घेणेत आले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पो.हवा. क्षिरसागर, वणवे, सातपुते, पो. अमंलदार कटके, कुदळे, नानापुरे, तेलंगे म.पो. अमंलदार निकंबे, यादव, यांनी केलेली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अशाप्रकारे आफु ची लागवड करणाऱ्या लोकांविरुध्द यापुर्वीदेखील २ वेळा गुन्हे दाखल करुन कारवाई करणेत आलेली आहे. अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या इसमांवर लोणी काळभोर पोलीसांचे वतीने कायदेशीर कारवाइ ‘करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यात येणार आहे.

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ – सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे (SSPU) ने ॲलेन युनिव्हर्सिटी, जर्मनी सोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शना करीता चर्चा सत्राचे आयोजन केले होते.  आज ॲलेन युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भेट दिली.

ॲलेन युनिव्हर्सिटीतील, मिरियम कोल्मर-ट्रायनी (एमए), आंतरराष्ट्रीय संबंध आणि संशोधन विपणन तज्ञ, आणि प्रा. डॉ. अंजा डायकमन यांनी शिष्यवृत्तींबद्दल मौल्यवान माहिती दिली. या वेळी मेजर सोनाली कदम (निवृत्त) आणि राघवन संथानम, संचालक – स्कूल ऑफ पोर्ट्स, टर्मिनल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट हे देखील उपस्थित होते.

या चर्चा सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे जाणून घेतले. सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि ॲलेन युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगामुळे जागतिक संधी आणि शैक्षणिक प्राविण्य मिळवण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून प्रसिद्धी मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे यांच्यासह समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे ११० गावांमध्ये दोन एलईडी चित्ररथ फिरणार असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सौजन्याने समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणार आहेत. शैक्षणिक साहाय्याच्या योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज, अनुदान, सामाजिक सुरक्षेच्या योजना आदी सर्व योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून केली जाणार आहे.