Home Blog Page 59

वय फक्त आकडा ठरला; ५ ते ७० वयोगटातील महिलांकडून सिंहगड २.५ तासांत सर

पुणे: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सखी प्रेरणा मंच व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्या वतीने आयोजित ‘हिरकणी ट्रेक’ या विशेष किल्ले सिंहगड मोहिमेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत तब्बल २८९० महिला सहभागी झाल्या.

‘आम्ही स्वराज्याच्या रणरागिणी, ज्योत स्वराज्याची तेवत ठेवू मनी’ या प्रेरणेने मोहिमेत महिलांनी उत्साहाने सहभाग घेत किल्ला सर केला. यावेळी त्यांच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास व एकतेची भावना प्रकर्षाने दिसून आली. विशेष म्हणजे ५ ते ७० वय वर्षे वयोगटातील महिलांनी पायथ्यापासून संपूर्ण किल्ला २.५ तासात सर केला.

यापूर्वी रायरेश्वर, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी या किल्ल्यांवरही मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही ‘हिरकणी ट्रेक’ मोहीम विशेष ठरली. महिलांच्या सहभागातून स्त्री शक्तीचा साहसाचा व स्वावलंबनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

सखी प्रेरणा मंच व फोर्ट फिट मुव्हमेंट यांच्याकडून मोहिमेत सहभागी महिलांसाठी प्रवास व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांकडून आवश्यक सुरक्षा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सखी प्रेरणा मंचाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सक्षमीकरणात्मक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. सोबतच फोर्ट फिट मुव्हमेंटचे हे पाचवे यशस्वी पुष्प ठरले आहे.

मोहिमेबद्दल बोलताना मंचाच्या संस्थापक अध्यक्षा व नगरसेविका ऐश्वर्या पठारे म्हणाल्या, “महिलांमध्ये साहस, आत्मविश्वास व एकजुटीची भावना वाढावी, तसेच स्वराज्याच्या इतिहासाशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने महिला भगिनींनी सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला, याचा मनापासून आनंद आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.”

मोहिमेत सहभागी महिलांनी सखी प्रेरणा मंचाचे व फोर्ट फिट मुव्हमेंटचे आभार व्यक्त करत, “या मोहिमेमुळे आम्हाला आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळाली. संपूर्ण आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित होते. अशा उपक्रमांमुळे महिलांना एकत्र येऊन स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि नव्या उर्जेने पुढे जाण्याची संधी मिळते,” अशा भावना व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

मुंबई: विधान भवन येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नद्यांमध्ये वाढलेल्या जलपर्णी तसेच दूषित पाण्याचा गंभीर प्रश्न आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सभागृहात मांडण्यात आला.

नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळला जात असून जनावरांसाठी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही. तसेच, पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शुद्धीकरण न करता सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे शेतीवर गंभीर परिणाम होत असल्याचे पठारे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, “दूषित पाण्यामुळे जमिनींची सुपीकता कमी होत असून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, जोपर्यंत शुद्ध पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करू नये, ती माफ करण्यात यावी.”

यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वर्षांपासून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांकडून अशुद्ध सांडपाणी नदीत सोडले जात असल्याची वस्तुस्थिती मान्य केली. शेतकऱ्यांना दूषित पाणी मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शासनाकडून शेतकऱ्यांची पाणीपट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, तसेच संबंधित महानगरपालिकांकडून दंड वसूल करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव येणे अत्यंत गंभीर, संस्कृतीचा ढोल पिटणाऱ्या रा. स्व. संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा: हर्षवर्धन सपकाळ.

कॅनडा सारखा देश अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही, नरेंद्र मोदी का घाबरतात? सरसंघचालकांनी १५ दिवसात नरेंद्र मोदींना जाब विचारावा: अॅड. प्रकाश आंबेडकर.

काँग्रेस-वंचितचा संविधान चौकापासून RSS च्या कार्यालयावर संयुक्त धडक मोर्चा, पोलिसांना पुढे करून मोर्चा अडवण्याचा सरकारचा प्रयत्न.

नागपूर/ मुंबई, दि. २३ मार्च २०२६.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे. पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झालो, असे मोदी सांगत असतात. रा. स्व. संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकापासून रा. स्व. संघाच्या कार्यालयावर संयुक्त धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर, वंचितचे नेते हर्षवर्धन पुंडकर, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. साजिद खान पठाण, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश भोयर, अतुल कोटेचा यांच्यासह काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चाने धडकी भरलेल्या भाजपा सरकारने पोलिसांना पुढे करून मोर्चाला परवानगी नाकारून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला पण हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी संघ मुख्यालय परिसरात धडकले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव आल्याने पंतप्रधान अमेरिकेपुढे सरेंडर झाले आहेत. याच दबावाखाली नरेंद्र मोदींनी व्यापार करार करून भारताला गुलाम बनवले आहे. देशातून सिलेंडर आणि संसदेतून नरेंद्र गायब झाले आहेत. इंधन गॅस तुडवड्यावर मोदी काहीच बोलत नाहीत, देश म्हणून एकत्र भूमिका घेताना दिसत नाहीत. एपस्टिन फाईलमध्ये नाव आले तरीही काहीच कारवाई होत नाही गेंड्याचा कातडीचे व बेशरमपणाचे लक्षण आहे. एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची भूमिका एकच असल्याने आम्ही संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चा काढणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचा पोलिसांवर दबाव आहे. संघ कार्यालयावर मोर्चा काढल्याने भाजपाची देशभरात नाचक्की होईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली तरी आमचा निर्धार व मागण्या कायम आहेत. असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अशोक खरातचे कारनामे सुरु असताना फडणवीस झोपा काढत होते का?
नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण आपणच बाहेर काढले अशा फुशारक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मारत आहेत. मुख्यमंत्र्याच्या प्रत्येक शब्दात अहंकार ठासून भरलेला दिसतो. फक्त मलाच ज्ञान, बुद्धी आहे असा त्यांचा समज असून इतर सर्वांना ते मुर्ख समजतात. मुळात एपस्टीन फाईल्सवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशोक खरात फाईल उघडण्याचा त्यांचा कांगावा असावा. भोंदू अशोक खरात प्रकरण होऊच कसे दिले? मागील पाच वर्षाच्या काळात फडणवीसच गृहमंत्री होते, त्यावेळी फडणवीस झोपा काढत होते का? हे त्यांचे अपयश आहे, हे त्यांनी मान्य करावे. प्रकरण अंगलट झाल्याने रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, चाकणकर यांना कशाचाही पश्चाताप झालेला नाही व नौतिकतेच्या आधारेही त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मोर्चापूर्वी संविधान चौकातील सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देशाचे संविधान व तिरंगा झेंडा रा. स्व. संघाला देणार होतो पण सरसंघचालक मोहन भागत हे मोर्चाला व संविधानाला घाबरून दिल्लीला निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली असता त्यांनी निवृत्ती घ्यावी असे बौद्धिक त्यांना देण्यात आले पण मोदींने ते मानले नाही, याचा अर्थ नरेंद्र मोदी संघाला घाबरत नाहीत, ते सैराट झाले आहेत. संघात नैतिकता राहिलेली नाही हे यातून दिसत आहे. भाजपा व संघाला देशातून संविधान संपवून बंच ऑफ थॉट लादायचे आहे. संघ व भाजपाला संविधान मान्य नाही. सर्व यंत्रणा सरकारने खिशात घातल्या आहेत. भाजपा व संघाला मनुवादी, हुकूमशाही व्यवस्था आणायची आहे. हा देश अदानी-अंबानीच्या हाती द्यायचा डाव आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

वंचितचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले की, केंद्रातील भाजपाचे सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत आहे. भारतीय मालावर अमेरिकेने १८ टक्के कर लावला आहे. पण अमेरिकेच्या मालांवर भारतात शून्य टक्के कर आहे, भारताला गुलाम बनवण्याचा हा प्रकार आहे. एपस्टिन फाईलमध्ये मोदींचा उल्लेख असून मोदींनी दुसऱ्या राष्ट्रप्रमुखांसमोर मुजरा केल्याचा उल्लेख आहे. देशाचा स्वाभिमान अमेरिकेला विकणे, देशाला गुलाम बनवणे ही मोदींची राष्ट्रभक्ती आहे का? डोनाल्ड ट्रम्पचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आलेले आहे, त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी त्यांनी इराणवर हल्ला केला आहे. इराण हा भारताचा मित्र असून जम्मू काश्मीर प्रश्नी इराणने भारताच्या भूमिकेचे उघड सर्मथन केलेले आहे. प्रत्येक संकटात इराणने भारताला साथ दिली पण आज भारत इराणच्या मागे उभा राहिला नाही. कॅनडा सारखा छोटा देश अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही तर नरेंद्र मोदी का घाबरतात? सरसंघचालक मोहन भागवत येत्या १५ दिवसात नरेंद्र मोदी यांना जाब विचारतील, अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. काँग्रेस व वंचितची विचारधारा वेगळी आहे पण देशाच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आलो आहोत. देशाचे स्वातंत्र, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असेही आंबेडकर यावेळी म्हणाले..

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध ते डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी १०५ क्रमांकाची बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्याने औंध-बाणेर परिसरातील नागरिकांकडून सातत्याने सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.

आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता पहिल्या बसचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह आनंद छाजेड, शिरीष नाईकरे, रिपाई शिवाजीनगर युवक अध्यक्ष महादेव साळवे, मनोज दळवी, वसंत जुनावणे, निलेश गायकवाड, सुजाता पाटील, सूर्यकांत कळापुरे, सतीश तारू, मारुती पाटील, जॉन प्रकाश, मंगल जाधव, सुरेखा कुलकर्णी तसेच स्थानिक नागरिकआणि पीएमपीएमएल अधिकारी  उपस्थित होते.

डीपी रोड परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेली ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही सेवा सकाळी ५.३० ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू राहणार असून या मार्गावर दररोज आठ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे औंध-बाणेर ते डेक्कन परिसरातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नगरसेवकांचा तिकीट काढून प्रवास

पीएमपी च्या नवीन बस मार्गाचा शुभारंभ झाला की अधिकारी, नेते हिरवा झेंडा काढून थांबतात. मात्र आज सनी निम्हण
पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह आनंद छाजेड यांनी तिकीट काढून पहिल्या बस फेरी मध्ये सामान्य नागरिकांसोबत प्रवास केला.

स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर

0

पुणे-स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या सेवाभावी संस्थेकडून दिला जाणारा “अण्णासाहेब हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर झाले आहेत . या संदर्भात ‘अण्णा हजारे यांनी म्हटले आहे कि,’जीवनात स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातून मानवी जीवनाचा अर्थ कळत गेला. मानव सेवा हीच इश्वर सेवा हे समजल्याने आपल्या जीवनातही जे काही कर्म करावयाचे ते निष्काम भावनेने, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजातील दिन-दुबळे, रंजले-गांजलेले व उपेक्षित जीवन जगणाऱ्यांसाठी कार्य करायचे असा ठाम निर्णय वयाच्या १७ व्या वर्षी भर तारूण्यात घेतला. तथापि हे कार्य उपाशी पोटी हे कसे करणार? व स्वतःचा भार इतरांवर पडू नये या करिता सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. १९६२ साली झालेल्या चीन युद्धात सैनिकांची जीवीत हानी मोठ्या प्रमाणावर झाल्याने भारतीय सैन्य दलात १९६३ साली दाखल झालो. पुढे देश सेवा करीत असताना सन १९६५ मधील पाकिस्तानच्या आक्रमणात माझ्या बरोबरीने काम करणारे अनेक जवान शहीद झाले. सुदैवाने मी वाचलो गेलो ही इश्वराची कृपा, व पुनर्जन्म समजून पेन्शन मिळेपर्यंत देश सेवा केली.

दरम्यान महात्मा गांधीजींची पुस्तके वाचत गेलो व कामाला सुरवात केली. जन्मभर अविवाहीत राहूनच हे कार्य करता येईल म्हणून आजन्म ब्रम्हचारी व्रताचे पालन केले. मंदीरात वास्तव्यास राहिलो. देश बदलायचा असेल तर देशाचा घटक गाव, गावाचा घटक कुटूंब व कुटूंबाचा घटक प्रत्येक व्यक्ती बदलल्याशिवाय देशाचा विकास साध्य होणार नाही.

या भावनेने समविचारी सहकाऱ्यांचे संघटन बांधणी करून स्वतःच्या गावातून कार्याला सुरूवात केली. गावात कार्य करताना श्रमदान, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी या पंचसुत्रीचा अवलंब केला. प्रसंगी राज्यात व देशातील समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर अनेक वेळा उपोषणे आणि आंदोलने करावी लागली. त्यातून देशातील जनतेला १) माहितीचा अधिकार, २)शासकीय बदल्यांचा कायदा, ३) ग्रामसभेला जादा अधिकार कायदा ४) दप्तर दिरंगाईचा कायदा ५) नागरिकांची सनद ६)जनलोकपाल कायदा ७)ग्रामरक्षक दल ८) महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक यांसारखे कायदे मिळाले. गावातील प्रत्येक समस्येवर विचार विनिमय करून त्यावर मार्ग व उपाय शोधण्यात आले. उदा. जलसंधारण, शिक्षण, पर्यावरण, पशुसंवर्धन इ. बाबींवर कार्य करण्यात आले. त्याचा लाभ गावकऱ्यांना मिळत गेला व या सर्व कार्यांचा प्रचार व प्रसार वाढत जाऊन तालुका, जिल्हा, राज्य, देश, आणि विदेशातही होत गेला.

वरील कार्याची नोंद घेऊन समाजातील वेगवेगल्या स्तरातील भेटी देणारे लोक, तसेच वेगवेगळ्या संस्था, शासन, देश व परदेशातूनही पुरस्कार मिळत गेले.

समाजाकडून मिळालेली ही रक्कम समाजालाच परत करायची यासाठी सन १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेची स्थापना करून समाजामध्ये निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती तथा संस्था यांना प्रेरणा मिळावी म्हणून वरील संस्थेच्या माध्यमातून प्रती वर्षी हे पुरस्कार दिले जात आहेत. मिळालेल्या पुरस्कारांची एकूण रक्कम १,६७,०००००/- (एक कोटी सदुसष्ट लक्ष रू.) बँकेत कायम स्वरूपी ठेवी ठेवून त्यावर मिळणाऱ्या व्याजातून प्रती वर्षी पुरस्कार प्रदान केले जात आहेत.

या वर्षी सन २०२५-२६ च्या वर्षीचे पुरस्कार, संस्थेच्या निवड समिती मार्फत दिनांक २३ मार्च २०२६ या शहिद दिनी जाहीर करण्यात येऊन, प्रत्यक्ष वितरण कार्यक्रम दि.१५ जून २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक, मानपत्र, सन्मानचिन्ह व पुरस्काराची रक्कम प्रदान केली जाणार आहे.

सन २०२५-२६ च्या पुरस्काराचे मानकरी

अ.क्र.पुरस्काराचे मानकरीपुरस्काराची रक्कम
मा. श्री यजुर्वेंद्र महाजन- दिपस्तंभ फाऊंडेशन (मनोबल), जि. जळगाव२,००,०००/-
मा. श्री दिपक नागरगोजे, शांतीवन प्रकल्प, आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड१,५०,०००/-
मा. श्री. शिवाजीराव डोळे, (माजी सैनिक) व्यंकटेश्वरा को- ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लि. अंजग-वडेल ता. मालेगाव, जि. नाशिक१,००,०००/-
मा. श्री अनंत झेंडे- महामानव बाबा आमटे सेवा संस्था, चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर१,००,०००/-
मा. श्री डॉ नंदू पालवे- सेवा संकल्प प्रतिष्ठान, बेलखेड ता. चिखली, जि. बुलढाणा१,००,०००/-

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे, दि. 23: राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी व सांस्कृतिक संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्यावतीने विमाननगर येथील सिम्बॉयसिस ऑडिटोरियममध्ये ‘मोगरा फुलला’विशेष सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, ज्येष्ठ नागरिक दिलीप पवार आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण दादा पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने अधीक्षक जानवी जानकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

या सोहळ्यात गणेश शिंदे यांनी ‘मोगरा फुलला’ हे सादरीकरण सादर केले. अभ्यासपूर्ण निवेदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले होते. संत साहित्यावर आधारित या कार्यक्रमाने उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णाई उळेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी जानवी जानकर यांनी सर्वांचे आभार मानले.

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम बनवा – सुनील माने

पुणे : महाराष्ट्राचा एपस्टीन ढोंगी बाबा अशोक खरात याच्या प्रकरणात जादू टोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा अंमल केला पाहिजे. मात्र दुर्देवाने या कायद्याचे नियम आजपर्यंत बनवले गेली नाहीत. या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ते सुनील माने यांनी केली आहे.

याबाबत ते म्हणाले, अशोक खरात याच्या विरोधात जादूटोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा अंमल केला पाहिजे त्या स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आहे. मात्र दुर्दैवाने २०१३ साली हा कायदा आपण अंमलात आणला मात्र या कायद्याचे नियम आजपर्यंत बनवले गेले नाहीत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करायला लावून सामाजिक न्याय विभाग व अन्य विभागाच्या समन्वयाने हे  कायदे कसे अंमलात येतील या संदर्भातील नियम तातडीने तयार करायला घेतले पाहिजेत. राज्यभरातल्या पोलिस स्टेशन मध्ये या कायद्यानुसार अंधश्रद्धा विरोधी कक्ष तयार करण्याची महत्वाची तरतूद आहे. अनेक पोलिस स्टेशनमध्ये आशाप्रकाच्या विभागाची निर्मिती केली आहे. पण कुठल्या नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही करायची? हे  पोलिसांना माहीत नाही. त्यामूळे ज्यावेळी आपण कायदे तयार करतो तेंव्हा त्याचे नियम तयार करायला लागतात. त्याची अंमलबजावणी करावी लागते त्यामूळे हे नियम तातडीने करायला पाहिजेत. महाराष्ट्राने २०१३ मध्ये हा कायदा आणला, मात्र त्यावेळे पासून आजपर्यंत या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. दहा वर्ष जर आपण कायदे बनवून त्याचे नियम बनवत नसू तर त्याच्यापेक्षा लांच्छनास्पद काही होऊ शकत नाही. त्यामूळे अशा भोंदू बाबांचे फावते. कुठल्याही नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही होत नाही . आणि वेगवेगळे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाते, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करता येत नाहीत त्यामूळे याचे नियम तातडीने तयार करावे लागतील असेही माने यांनी म्हटले आहे.

महावितरणच्या वीजसेवा आता ‘व्हॉट्सॲप’वर

वीजबिलाची माहिती, भरणास‍ह तक्रार नोंदविण्याचीही सोय

पुणे, दि. २३ मार्च २०२६- दिवसेंदिवस महावितरण स्मार्ट होत चालले असून, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची ‘Ease of Doing Business’ ही संकल्पना महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सत्यात उतरवली आहे. ग्राहक दैनंदिन जिवनात जे माध्यम वापरतात त्याच ‘व्हॉट्सॲपवर’ आता महावितरणच्या सेवा अधिकृतपणे पोहोचल्या आहेत. अगदी वीजबिल पाहण्यापासून वीजबिल भरण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी ग्राहकाला उपलब्ध झाले आहे. वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

राज्यात महावितरणचे ३ कोटी १२ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. तर पुणे परिमंडलात ग्राहकांची संख्या ३९ लाखांच्या घरात आहे. या सर्व ग्राहकांना १३ मार्चपासून महावितरणच्या व्हॉट्सॲप सेवेचा लाभ मिळत आहे. पूर्वी दरमहा येणारे वीजबिल व ते भरल्याची पावती घराघरांत फाईलिंग करुन जतन केले जात असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून महावितरण कंपनीने मोबाईल ॲप, संकेतस्थळावर विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्याने लाखो ग्राहक अशा सेवांचा लाभ घेत आहेत. आता ह्याच सेवा ग्राहकांना व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाल्या आहेत.

व्हॉट्सॲपवर उपलब्ध होणाऱ्या प्रमुख सेवा:


१. वीज बिल आणि पेमेंट: ग्राहक आपले चालू वीज बिल पाहू शकतात आणि तिथूनच थेट बिलाचा भरणाही करू शकतात. त्याकरिता डेबिट कार्ड, युपीआय आदींचे पर्याय विचारले जातात.


२. ई-बिल आणि पावती: व्हॉट्सॲपवरून डिजिटल बिल (e-bill) डाऊनलोड करण्याची सोय असून, बिल भरल्यानंतर त्याची पावतीही तात्काळ मिळवता येईल.


३. तक्रार नोंदणी: वीज पुरवठा खंडित होणे किंवा विजबिलांबाबत तसेच इतर तांत्रिक समस्यांबाबतची तक्रार आता व्हॉट्सॲपवर नोंदवता येईल आणि त्या तक्रारीचे सद्यस्थितीही तपासता येईल.


४. नवीन जोडणी अर्जाचा मागोवा: नवीन वीज जोडणीसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे ग्राहकांना घरबसल्या समजेल.


५. गो-ग्रीन सुविधा: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कागदी बिलाऐवजी ई-बिल घेण्याच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत ग्राहक येथूनच सहभागी होऊ शकतात किंवा बाहेर पडू शकतात.


६. चॅटबॉट सपोर्ट: ग्राहकांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे देण्यासाठी एक ‘इंटरॲक्टिव्ह चॅटबॉट’ देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘ब्ल्यू टिक’ असल्याची खात्री करा

महावितरणकडून व्हॉट्सअॅप अपडेट्सकरिता 9167777791 हा क्रमांक अधिकृतपणे वापरला आहे. ग्राहकांनी या नंबरला ‘Hi’ संदेश टाईप करुन त्यानंतर आपल्या पसंतीची भाषा (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी) निवडून हवी असलेली सेवा निवडावी. महावितरणने हा क्रमांक Verify केलेला आहे. त्याची खात्री करण्यासाठी कंपनीच्या नावापुढे ‘ब्ल्यू टिक’ असल्याची खात्री करावी. तसेच कंपनीचे संकेतस्थळ, ग्राहक तक्रारीसाठीचा ईमेल आदी माहितीही ‘बायो’मध्ये दिली आहे.

पेपरलेस सेवांवर महावितरणचा भर- मुख्य अभियंता

वसुली करतेवेळी वीजबिल मिळाले नाही, मिळाल्यावर भरतो अशा सबबी ग्राहक द्यायचे. मात्र आता ग्राहकाला हव्या असणारी वीजबिलाची माहिती महावितरणने आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध केली आहे. ग्राहकांनी आता पेपरलेसकडे वाटचाल करावी. छापील वीजबिलाऐवजी डिजीटल सेवांवर भर द्यावा.

सुनिल काकडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

0

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि पीएनजी  विस्ताराला प्रोत्साहन

एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये छापे जारी

भारतातील बंदरांवरील कामकाज सामान्य; कुठेही कोंडी  नाही

मुंबई-

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सज्जता आणि प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने सक्रीय पावले उचलत आहे. ऊर्जा पुरवठा, सागरी कामकाज आणि त्या प्रदेशातील भारतीय नागरिकांना सहाय्य करण्याशी संबंधित उपाययोजनांची अद्ययावत माहिती खालीलप्रमाणे आहे.

ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता

होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर, देशभरात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीची स्थिर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

कच्चे तेल/ तेल शुद्धीकरण प्रकल्प

· सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत असून कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा देखील पुरेसा साठा राखला जात आहे.

· देशांतर्गत तेल शुद्धीकरण प्रकल्पांमधून एलपीजीचे उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यात आले आहे.

किरकोळ विक्री केंद्रे

  • तेल विपणन कंपन्यांनी  कोणत्याही विक्री केंद्रावर इंधन संपल्याची  नोंद केलेली नाही. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचा पुनरुच्चार सरकारने केला आहे. त्यामुळे नागरिकांनी टंचाईच्या घबराटीतून इंधन खरेदी करू नये, असा सल्ला दिला जात आहे.

नैसर्गिक वायू

  • घरगुती पीएनजी (D-PNG) आणि वाहतुकीसाठीचा सीएनजी यांसारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांना 100% पुरवठा सुनिश्चित करून त्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. ग्रिडशी जोडलेल्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना त्यांच्या सरासरी वापराच्या 80% पुरवठा केला जात आहे.

एलपीजी

  • विद्यमान भू-राजकीय  परिस्थिती पाहता एलपीजीचा पुरवठा अद्याप चिंतेचा विषय आहे.
  • एलपीजी वितरकांकडे स्टॉक संपल्याची  कोणतीही नोंद नाही.
  • बहुतेक डिलिव्हरी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC) द्वारे केल्या जात आहेत.
  • टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या सिलेंडर नोंदणीत घट झाली आहे.
  • घरगुती एलपीजी सिलेंडरचे वितरण सामान्यपणे सुरू आहे.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा:

  •  केंद्र सरकारने आधीच ग्राहकांसाठी अंशतः  व्यावसायिक   एलपीजी पुरवठा (20%) पुन्हा सुरू केला आहे. याशिवाय, भारत सरकारने 18.03.2026 रोजीच्या पत्राद्वारे पीएनजी विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारणा लक्षात घेऊन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त 10%  व्यावसायिक  एलपीजी वाटप करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
  • 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी आदेश जारी केले आहेत. उर्वरित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या  व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वितरित करत आहेत. मागील 8 दिवसांत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक घटकांकडून सुमारे 15,440 मेट्रिक टन एलपीजी उचलण्यात आला आहे.

केरोसिन:

  • नियमित वाटपाव्यतिरिक्त सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 48000 किलो लीटर केरोसिनचे अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे.
  • केरोसिन वितरणासाठी जिल्ह्यांमध्ये ठिकाणे निश्चित करण्याची विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील  सरकारांची भूमिका:

  • अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 आणि एलपीजी नियंत्रण आदेश, 2000 अंतर्गत राज्य सरकारांना साठेबाजी आणि काळाबाजाराविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीसह आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर देखरेख आणि त्याचे नियमन करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारांनी प्रमुख भूमिका बजावावी लागेल.
  • भारत सरकारने 13.03.2026 आणि 18.03.2026 रोजीच्या पत्रांद्वारे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विनंती केली आहे –
    • Ø साठेबाजी, काळाबाजार, घरगुती एलपीजी सिलेंडर्सचे अनधिकृत वितरण आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी कडक देखरेख ठेवावी.
    • Ø स्थानिक गरजा आणि प्राधान्ये लक्षात घेऊन वाणिज्यिक एलपीजीसाठी योग्य वितरण पद्धती विकसित कराव्यात.

अंमलबजावणी कारवाई:

  • एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये छापे टाकले जात आहेत. काल बिहार, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये सुमारे 3,500 छापे टाकण्यात आले आणि 1200 पेक्षा जास्त सिलिंडर जप्त करण्यात आले.
  • सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारांना नियमित छापे टाकण्याची विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून काळाबाजार आणि साठेबाजी रोखता येईल.

इतर शासकीय उपाययोजना:

  • या युद्धजन्य परिस्थितीतही सरकारने घरगुती एलपीजी आणि पीएनजीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, तसेच रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांनाही उच्च प्राधान्य दिले आहे.
  • पुरवठा आणि मागणी या दोन्ही बाजूंवर सरकारने आधीच अनेक तर्कसंगत उपाययोजना लागू केल्या आहेत. यात तेल शुद्धिकरण प्रकल्प वाढवणे, शहरी भागात नोंदणी अंतर 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत आणि ग्रामीण भागात 45 दिवसांपर्यंत वाढवणे, तसेच विविध क्षेत्रांना प्राधान्याने पुरवठा करणे यांचा समावेश आहे. 

सार्वजनिक सूचना

  • सर्व कुटुंबांना एलपीजी सिलिंडर्सची उपलब्धता आणि त्यांच्या वेळेवर, घरपोच वितरणाची खातरजमा करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; नागरिकांनी केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा आणि अफवांवर विश्वास ठेवणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
  • ग्राहकांना विनंती करण्यात येते की त्यांनी घाबरून जाऊन अतिरिक्त बुकिंग करणे टाळावे, बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा तसेच एलपीजी वितरकांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देणेही टाळावे, कारण काही ठिकाणी रांगा लागल्याचे दिसत असून, घरपोच वितरणाची व्यवस्था सुरू असल्याचे सरकारने आश्वस्त केले आहे.

सागरी सुरक्षा आणि नौवहन संचालन

या प्रदेशात कार्यरत असलेल्या भारतीय जहाजांचे आणि खलाशांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार:

  •  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय हे जहाजांच्या हालचाली, बंदरांचे कामकाज आणि भारतीय खलाशांची सुरक्षा यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे; त्याच वेळी सागरी व्यापारातील सातत्य अबाधित राखले जाईल याचीही खातरजमा केली जात आहे.
  • या प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत; गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाशी संबंधित कोणतीही दुर्घटना किंवा घटना घडल्याचे वृत्त नाही.
  • 547 हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले आहे; यामध्ये गेल्या 24 तासांत परत आणलेल्या 13 खलाशांचाही समावेश आहे.
  • भारतातील सर्व बंदरांचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा कोंडी झालेली नाही; राज्य सागरी मंडळांनी या सुरळीत कार्यवाहीला दुजोरा दिला आहे.

या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा :

 भारतीय दूतावास स्थानिक भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात असून त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्यासोबतच वेळोवेळी सूचना देत आहे, अशी माहिती मंत्रालयाने दिली. 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार:

  • मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशियाई क्षेत्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे; या क्षेत्रातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. यासाठी एक समर्पित 24×7 नियंत्रण कक्ष कार्यरत असून, तो विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी नियमितपणे समन्वय साधत आहे.
  • 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत या क्षेत्रातून 3,50,000 हून अधिक प्रवासी भारतात परतले आहेत.
  • कुवेत, बहारीन आणि इराक येथून येणाऱ्या विमानसेवेवर काही निर्बंध असल्याने, भारतीय नागरिकांच्या प्रवासाची सोय आता सौदी अरेबियामार्गे केली जात आहे.
  • सहा भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहे; सौदी अरेबिया, ओमान, इराक आणि संयुक्त अरब अमिरात येथील भारतीय दूतावास, या बेपत्ता भारतीय नागरिकाचा शोध घेण्यासाठी तसेच मृत भारतीय नागरिकांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय जाती-धर्मीय स्त्री-पुरुषांची नावे किमान जाहीर करावी. आणि ज्यांचा थेट सहभाग आहे त्या सहभागानुसार प्रचलित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दयावेत अशी मागणी शिव महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी केली आहे.

ते म्हणाले,’लोकशाहीतील चौथ्या स्तंभानी(सर्व प्रसिद्धी माध्यमांनी) केवळ बातम्या देण्यापेक्षा एका विचार पिठावर सर्व पक्षाच्या, सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र बोलावून त्यांचा संवाद घडवावा. बातमीसाठी वाद घडणार नाही याची काळजी घेऊन शिवबांच्या महाराष्ट्राचे दर्शन देशाला आणि जगाला घडवून भारतीय नागरिकांना दिशा द्यावी ही मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध माध्यमांना विनंती आहे.

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे, दि. 22: ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मिळणारे मार्गदर्शन केवळ मुलींसाठी कराटे प्रशिक्षण नसून एक स्वसंरक्षण, आत्मविश्वास व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

सर परशुराम महाविद्यालय पुणे येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत आयोजित राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ .हेमंत वसेकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, संचालक योजना श्रीकृष्ण कुमार पाटील, एससीआरटी सहसंचालक तथा राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ.कमलादेवी आवटे, पुणे मनपा शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे उपाध्यक्ष अतुलजी तरवडे आदी उपस्थित होते .

श्री. भुसे म्हणाले, स्वसंरक्षण हे केवळ शारीरिक प्रशिक्षण नसून ते विद्यार्थिनींच्या आयुष्यातील एक महत्त्वाची शिस्त आहे. प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम झाले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतींमध्ये मिळणारे शिक्षण नसून आयुष्यातील प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देणारे शिक्षण असावे, याच बाबीचा विचार करुन आजच्या युगात मुलींनी आत्मरक्षा, आत्मसंरक्षणाचे उत्तम धडे गिरवविण्याकरिता शालेय शिक्षण विभागाने ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ हे विशेष अभियान सुरू आहे.

राज्याच्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी या शैक्षणिक वर्षांपासून पासून हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मार्शल आर्ट, माजी सैनिकांमार्फत प्रशिक्षण आणि योगा अशा विविध बाबींचा समावेश असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. महिला सबलीकरण, आत्मसंरक्षण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असणार आहे. प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर व सुरक्षित उभी राहण्यासाठी सर्व शाळांतील मुलींनी हे प्रशिक्षण घ्यावे. शिक्षणाबरोबर कला व क्रीडा उपक्रमाना प्राधान्य दिले जाईल. शाळेतील विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणे हे आमचे प्राधान्य आहे, या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनीमध्ये मनोबल वाढेल असा विश्वास मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केला.

श्रीमती नागपुरे म्हणाल्या, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण व जीवन कौशल्य यासारख्या उपक्रम ही काळाची गरज आहे. तसेच हे एका दिवसाचे प्रशिक्षण नाही तर आयुष्यभरासाठीचे शिक्षण असावे असे मत व्यक्त केले. तसेच आपल्या मधील शक्ती पुन्हा एकदा जागृत करण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी प्रशिक्षणामध्ये हभप अक्षय महाराज भोसले यांनी “जीवनकौशल्य ” विषयक तसेच आर्ट ऑफ लिविंग च्या मनीषा चंद्रा यांनी आत्मशांती व स्वनियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षक शेफुजी शौर्य भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण वर्गासाठी पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा या दोन्ही महानगरपालिकेच्या जवळपास 416 पेक्षा जास्त शाळांनी आणि 12 हजारापेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

पुणे विभागाचे उपसंचालक गणपत मोरे, पुणे मनपा शिक्षणाधिकारी डॉ. सुनंदा ठुबे, शिक्षण सहसंचालक हरून आतार, पुणे विभागाच्या सहसंचालक डॉ .ज्योती परिहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.विकास गरड, पुणे मनपा माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी आशा उबाळे, प्रशासनाधिकारी पिंपरी-चिंचवड मनपा संगीता बांगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक डॉ अरुण जाधव आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आठवले गटाचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यात रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यावेळी आरपीआय चे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जनरल सेक्रेटरी गौतम सोनवणे,  सचिव बाळासाहेब जानराव, चंद्रकांता सोनकांबळे, सूर्यकांत वाघमारे, महिपाल वाघमारे, नीलेश अल्हाट, हिमाली कांबळे, निशा मानवतकर, बसवराज गायकवाड, विशाल शेवाळे, जयदेव रंधवे, नीलेश रोकडे, सचिन मानवतकर, विरेन साठे तसेच उपमहापौर परशुराम वाडेकर आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  

रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मांचा, समाजातील उपेक्षित वर्गाचा, तरुणांचा महिलांचा पक्ष असून त्याला सर्वसमावेशक स्वरूप देण्याचे कार्य हाती घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पद्दूचेरी या राज्यात आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करणार आहे, असेही ते म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा पोर्ट ब्लेअर येथे आयोजित केला जाणार असून त्यात पक्ष विस्ताराच्या दृष्टीने धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुण्यात देखील बैठक घेऊन पक्ष विस्ताराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले. समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता ही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडून जागा मिळाल्या नसल्या तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि पुरेशा प्रमाणात महामंडळांची सदस्य पदे देण्यात येतील अशी ग्वाही दिली असल्याचेही आठवले यांनी नमूद केले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताची शक्यता आपल्याला वाटत नाही. मात्र, या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, संबंधित विमान कंपनीवर कठोर कारवाई व्हावी अशीच आपली देखील मागणी असल्याचे आठवले यांनी सांगितले.

भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना, राज्यातील सर्वच भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे आठवले म्हणाले. कॅप्टन खरात याच्या गुन्ह्यांची व्याप्ती बघता त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संजय सोनवणे हेच पक्षाचे अधिकृत शहराध्यक्ष

पुणे शहरात रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे दोन शहराध्यक्ष असल्याबाबत विचारणा केली असता, संजय सोनवणे हेच निवडून आलेले पक्षाचे अधिकृत शहराध्यक्ष असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. इतर कोणी शहराध्यक्ष पदाचा दावा करीत असेल तर ते घटनाविरोधी आहे. सोनवणे हे कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले अध्यक्ष असून त्यांचा तीन वर्षाचा कालावधी आहे. त्यापैकी पावणे दोन वर्ष पूर्ण झाली आहे. तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीद्वारेच नवीन शहराध्यक्ष निवडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अनेक कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

आज मदासजी आठवले यांच्या हस्ते विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश झाला. यामध्ये  हुलगेश मर्याप्पा चलवादी. (माजी प्रदेश प्रभारी, बीएसपी )  अनिल कुमार त्रिपाठी. पुणे जिल्हा प्रभारी, बीएसपी. भीम सिंह चलवादी. (अध्यक्ष, कर्नाटक आंध्र तेलंगणा राज्य, चलवादी माळा विकास महासंघ), दीप चिंचोलीकर (हायकोर्टाचे वकील) मूळ, लातूर बीएसपी चे लोकसभा उमेदवार, अविनाश इंद्रजीत मस्के (निवृत्त, आयपीएस अधिकारी.), विकास जावळे (निवृत्त, प्रॉव्हिडंट फंड कमिशनर) महाराष्ट्र राज्य., प्रकाश सोनवणे.  सुधीर वाघमोडे. संतोष आरडे. (माजी नगरसेवक) यांचा समावेश आहे. हे पक्ष प्रवेश  घडवून आणन्यासाठी प्रदेश सचिव बालासाहेब जानराव ,पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यानी विशेष प्रयत्न केले.

निसर्गोपचार आश्रमाचे शारीरिक-मानसिक आरोग्याबरोबरच ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान- उपराष्ट्रपती

पुणे, दि. २२: महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते आणि त्यांना शाश्वतता व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी देण्यात येत असलेले प्रशिक्षण अत्यंत प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार आश्रमाच्या ८१ व्या स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके, आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे, वैद्यकीय संचालक आणि विश्वस्त सचिव डॉ. अभिषेक देवीकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे मुख्य विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, उरुळी कांचन या गावात महात्मा गांधीजींनी मणिभाई देसाई, बाळकोबा भावे, श्रीमती गंगाबेन भाटे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने १९४६ या वर्षी या आश्रमाची स्थापना केली. ही संस्था आता जागतिक स्तरावर सन्मानित होणाऱ्या एका केंद्रात रूपांतरित झाली आहे. या आश्रमाद्वारे मानवतेसाठी दिल्या जाणाऱ्या महान सेवेमुळे आज हे छोटेसे गाव संपूर्ण जगात ओळखले जाते. ‘निसर्गोपचार आश्रम’ ही एक चळवळ आहे, एक तत्त्वज्ञान आहे आणि गांधीजींच्या कालातीत दृष्टिकोनातून प्रेरित झालेली एक जीवनपद्धती आहे. निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ उपचारक आहे, असा गांधीजींचा दृढ विश्वास होता. नियमित शारीरिक व्यायाम, मानसिक शांतता आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा हा आश्रम आपल्याला देतो, असेही ते म्हणाले.

खरे आरोग्य हे गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांमध्ये नसून साधेपणा, शिस्त आणि निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्यामध्ये सामावलेले असते अशी गांधीजींची शिकवण होती. त्यानुसार हा आश्रम निसर्गोपचार, योगसाधना तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती असलेल्या आपल्या दृढ कटिबद्धतेच्या माध्यमातून हजारो लोकांची सेवा करत आहे. आज संपूर्ण जग जीवनशैलीशी संबंधित आजारांचा सामना करत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणावाशी संबंधित विकार यांचे प्रमाण आज अत्यंत चिंताजनक वेगाने वाढत आहे. आजकाल प्रत्येकजण तणावाचा सामना करत मर्यादित गरजा आणि निसर्गाशी मेळ साधणाऱ्या जीवनशैलीद्वारे त्यावर मात करता येते, असे श्री. राधाकृष्णन म्हणाले.

आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, याची हा आश्रम आपल्याला आठवण करून देतो. आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याची अवस्था होय. साधेपणा, कष्ट आणि प्रामाणिक मार्गाने आपण काम केले, तर आनंद आपोआपच आपल्या मनात प्रवेश करेल आणि आरोग्य चांगले राहील.

आज संपूर्ण जग, आरोग्य आणि स्वास्थ्यासह आधुनिक काळातील विविध आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपल्याकडे आशेने पाहत आहे. जागतिक दृष्टिकोन आता बदलला आहे. केवळ पाश्चात्य वैद्यकशास्त्रच सर्वश्रेष्ठ मानले जात होते, तो काळ आता आपण मागे टाकला आहे. आपल्या पारंपरिक उपचारपद्धती आजारांच्या मुळावर उपचार करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली, भारताने आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धती, योग आणि तत्सम सर्वच क्षेत्रांचे पुनरुज्जीवन होत असून त्यांना जागतिक स्तरावरील मान्यता मिळत आहे. भारत आता ‘जागतिक वेलनेस पर्यटनाचे’ एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. या आश्रमासह देशातील निसर्गोपचार केंद्रांमध्ये आजकाल मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक उपचारांसाठी आवर्जून येत आहेत. आयुर्वेदिक उपचार, सिद्ध, युनानी उपचारपद्धतींना महत्व आले आहे. आज संपूर्ण जग ‘योग दिन’ साजरा करत आहे. आपण जेव्हा ‘विकसित भारत’ या संकल्पनेकडे पाहतो, तेंव्हा त्यासोबतच ‘स्वस्थ भारत’ असणेही आपल्यासाठी तितकेच आवश्यक ठरते. या प्रवासात आपल्या आश्रमासारख्या संस्थांची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. निसर्गोपचार आश्रमाचे प्रयत्न आणि राज्य व केंद्र सरकारचे प्रयत्न यांच्या समन्वयातून होणारे कार्य हे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने अत्यंत मोलाचे ठरेल., असे उपराष्ट्रपती म्हणाले.

जेव्हा व्यक्ती निरोगी असतात, तेव्हा कुटुंबे बळकट होतात आणि समाजाची भरभराट होते. तसेच राष्ट्राचा उत्कर्षही होतो. अशा वेळी, ‘विकसित भारत २०२७’ हे उद्दिष्ट त्याही आधी गाठणे शक्य होते. म्हणूनच, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपल्या सर्वांकडे संयम असणे आवश्यक आहे. आपण आपले मन नेहमीच एका ‘प्रवाही’ अवस्थेत ठेवले पाहिजे, जेणेकरून ते अधिकाधिक गोष्टी ग्रहण करू शकेल. ‘निसर्गोपचार आश्रमा’ ही संस्था पुढील पिढ्यांनाही असेच मार्गदर्शन, उपचार आणि प्रेरणा देत राहो, तसेच संपूर्ण मानवतेला संयमाचा धडा शिकवत राहील असा विश्वासही श्री. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

डॉ. नारायण हेगडे यांचे ‘आनंदाची रहस्ये’ हे पुस्तक आनंदी जीवनाविषयी भाष्य करणारे आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, महात्मा गांधी हे निसर्गोपचाराचे महान पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्याच्या वर्षी ३३ कोटी लोकसंख्येवरून आपण १४० कोटी लोकसंख्या गाठली असून आयुर्मयादा दुप्पट झाली आहे. आपण अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहे. मात्र, अन्नाची गुणवत्ता, विषयुक्त अन्नामुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांसह अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. निसर्गोपचार, आयुर्वेद, योगा, युनानी, आधुनिक उपचारपद्धतीं आपला समृद्ध वारसा आहे. स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचार महत्वाचे आहेत. समग्र उपचार पद्धती आज महत्वाची असून निसर्ग हा आजारांवरील महान उपचारक आहे, असेही ते म्हणाले. या संदर्भातील महात्मा गांधी यांचे विचार आजही महत्वाचे आहेत असेही राज्यपाल म्हणाले.

निसर्गोपचार आश्रम गेली ८ दशके समाजाची सेवा करीत आहे. पर्यावरण प्रदूषण, व्यसनधीनता आणि अयोग्य आहारामुळे विविध आजार वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशभरात निसर्गोपचाराचा प्रसार केल्यास रोजगार निर्मिती होण्यासोबत नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करता येईल. विकसित भारताचे स्वप्न स्वस्थ भारताच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकेल.निसर्गोपचार आश्रमाने विद्यापीठांसोबत समन्वय साधून भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीचा प्रसार करावा. त्याद्वारे अशा उपचारासाठी कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल, असे श्री. वर्मा म्हणाले.

शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी हा आश्रम प्रयत्न करत आहे. आश्रमाला परत भेट द्यायला तसेच आश्रमाच्या आदिवासी भागात सुरू असलेल्या कार्याला भेट द्यायला आवडेल असेही राज्यपाल म्हणाले.

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह म्हणाले, देशाला आत्मनिर्भर बनविण्यात स्वदेशी उपचारपद्धती महत्वाची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०१४ नंतर केंद्र सरकारनेदेखील म.गांधीजींच्या या आश्रमासारख्या प्रयोगांचा विस्तार करण्याच्या कामाला वेग दिला आहे. केंद्राने आयुष मंत्रालयाची स्थापना केली असून प्रत्येक वर्षी मंत्रालयाची आर्थिक तरतूद ४ हजार ४०० कोटीहून अधिक आहे.

जगात रोगोपचार खर्चिक होत असतांना सेवाभाव ही या आश्रमाची विशेषतः आहे. इथली कार्यपद्धती लक्षात घेतल्यास त्यात महात्मा गांधीजींच्या विचारांचा सुगंध दरवळतो आहे असे म्हणता येईल. माती, पाणी, ऊन, हवा या माध्यमांतून या ठिकाणी उपचार होत आहेत. इथली शिस्त इतरांनाही मार्गदर्शक आहे. साधे जीवन, स्वयंशिस्त आणि निसर्गाचा सन्मान करीत गांधीजींना अभिप्रेत असलेली आनंदी जीवनशैली स्वीकारता येईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, निसर्गोपचार आश्रम केवळ एक आरोग्य केंद्र नसून जीवन जगण्याचा महत्वपूर्ण मार्ग आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून स्थापन झालेला हा आश्रम नैसर्गिक उपचारपद्धतीच्या माध्यमातून आरोग्य, स्वावलंबन आणि साधेपणाच्या जीवनाचा संदेश देतो. केवळ आजारांवरील उपचार नव्हे तर सुदृढ जीवनशैली आणि निसर्गासोबत संतुलन राखण्याची प्रेरणा देखील देत आहे. निसर्ग आणि महात्मा गांधी यांचे अतूट नाते होते. ग्रामीण भागाचा विकास हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. भारताचा खरा आत्मा गावात वसतो, या विचारावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ग्रामीण उन्नती, स्वावलंबन आणि साधेपणाचा मार्ग स्वीकारला आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला.

निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येक आजार बरा करण्याची ताकद असते, हा गांधीजींचा संदेश आजही मार्गदर्शक आहे. या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी उरळी कांचन निसर्गोपचार आश्रम येथे पाहायला मिळते. गांधीजींचे हे विचार केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते साधेपणा, स्वावलंबन आणि ग्रामीण विकासाचा व्यापक संदेश देणारे आहेत. ‘खेड्याकडे चला’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच कालसुसंगत आहे, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. हेगडे यांनी प्रास्ताविकात आश्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे याच दिवशी १९४६ येथे आले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने निसर्गोपचार आश्रम स्थापन केला व स्थानिकांवर निसर्गोपचार केले. येथे आश्रमाचे तत्कालीन संस्थापकांनी आश्रमाच्या विस्तारासाठी प्रयत्न केले. तसेच येथील शेतकऱ्यांसाठी गाईंच्या वंशसुधारासाठी प्रयत्न केले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. देखणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. हेगडे लिखित ‘आमच्या आनंदाचे रहस्य’ अर्थात ‘सिक्रेट्स ऑफ आवर हॅपीनेस’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला आश्रमाचे विश्वस्त, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

‘चैत्र चाहूल २०२६’ : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!

मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या ‘ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा हा सोहळा यावर्षी गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रभावी कथावाचनाने झाली. त्यांनी प्रख्यात लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या ‘माळ’ या गाजलेल्या कथेचे वाचन सादर केले. मानवी नातेसंबंध, एकटेपणा आणि भावनिक पोकळी यांचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या या कथेचे त्यांनी केलेले सादरीकरण इतके जिवंत होते की, सभागृहातील रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘माळ’ ही केवळ ओसाड जागेची प्रतिमा नसून, मनातील रिकामेपणाचे प्रतीक आहे, हे त्यांनी आपल्या वाचनातून प्रभावीपणे उलगडले. मास्तर आणि काशीताई यांसारख्या व्यक्तिरेखा जणू रंगमंचावर सजीव झाल्याचा भास रसिकांना झाला. उपस्थितांनी या वाचनाला उत्स्फूर्त दाद दिली.

यानंतर ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचे वितरण करण्यात आले. पुण्यातील ‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले यांना ‘ध्यास सन्मान’ प्रदान करण्यात आला, तर प्रख्यात लेखक व भाष्यकार सुरेश गोसावी यांना ‘रंगकर्मी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मान स्वीकारताना शुभांगी दामले यांनी सांगितले की, नाट्यदर्पण रजनीकार सुधीर दामले यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याची दिशा मिळाली आणि इतरांना संधी उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातून आपली वाटचाल घडली. तर सुरेश गोसावी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “आजपर्यंत लिहिले खूप, पण बोलण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला. बाजुस पडलेल्या दगडाला मोठे पण द्यायचा आज उत्सव आहे. नमस्कार”

या प्रसंगी निलेश जाधव यांनी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना स्वतः तयार केलेल्या विठोबाच्या तैल चित्राची आकर्षक फोटोफ्रेम भेट दिली. तसेच त्यांना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यांतून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा उदात्त निर्णय घेत, पेण येथील दिव्यांग मुलांसाठी कार्यरत ‘सुहित जीवन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेख पाटील यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ‘ॲड फिझ’ निर्मित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कॉफीटेबल पुस्तकाची झलकही सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी ‘रंग विठ्ठल’ हा खास ‘चैत्र चाहूल’साठी सादर केलेला अभंग रसिकांसमोर सादर केला. त्यांच्या सुरेल गायनाला तबल्यावर यती भागवत, संवादिनीवर ज्ञानेश्वर सोनवणे, तालवाद्यावर सूर्यकांत सुर्वे, पखवाजवर हनुमंत रावडे, बासरीवर अमर ओक तसेच स्वरसाथीसाठी निमिष कैकाडी, स्वरांगी मराठे आणि स्वराली जोशी यांनी समर्थ साथ दिली.

सुर-संगीताने रंगले पं.  जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे चौथे सत्र

पुणे : अवीट गोडीच्या चालींनी सजलेल्या बंदिशी, गायकांचे अप्रतिम सादरीकरण, सरोदच्या तारांवर उमटणारे मधुर सूर आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अशा सुरेल संगमाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव रंगून गेला.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात निषाद व्यास (गायन), अनुपम जोशी (सरोद) आणि जयंत केजकर (गायन) यांनी आपल्या कलेचा अप्रतिम आविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

सकाळच्या सत्राची सुरुवात निषाद व्यास यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये सादर केलेल्या ‘सरस्वती चे मागत हो’ या बंदिशीने रसिकांना सुरेल आनंदाची अनुभूती दिली. त्यानंतर ‘साधू रचना राम बनाई रे’ या सादरीकरणातून त्यांनी बनारस घराण्याच्या गायकीचा ठसा उमटवला. त्यांच्या सादरीकरणाला कौशिक केळकर (तबला) आणि माधव लिमये (संवादिनी) यांची समर्थ साथ लाभली.

यावेळी बोलताना निषाद व्यास यांनी, “जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. येथे गायन करणे म्हणजे पंडित अभिषेकी यांच्या चरणी संगीत सेवा अर्पण करण्यासारखे आहे,” असे सांगितले.

यानंतर अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने मैफिलीत वेगळाच रंग भरला. त्यांनी राग बसंतने वादनाची सुरुवात केली. सरोद हे वाद्य मुख्यतः राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचलित असले तरी मराठी संगीत परंपरेशी त्याचा संगम घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘खेळ मांडीयेला वाळवंटी दारी, नाचती वैष्णव ठायी रे’ हा अभंग सरोदवर सादर करत त्यांनी वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या सादरीकरणाला महेशराज साळुंखे आणि संजय प्रधान (तबला) यांची साथ लाभली. यावेळी आयोजक उज्वल केसकर यांनी कलाकारांचा सत्कार केला.

महोत्सवातील ‘पंडित जितेंद्र अभिषेकी प्रथितयश कलाकार’ पुरस्कार प्राप्त जयंत केजकर यांनीही आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी राग जौनपुरीने मैफिलीची सुरुवात करत विविध रागांच्या सादरीकरणातून अभिजात संगीताची मेजवानी दिली. त्यांच्या सादरीकरणाला अभिजीत जायदे (तबला) आणि लीलाधर चक्रदेव (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.

संपूर्ण सत्रभर रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद देत महोत्सवाची रंगत अधिक खुलवली.