पुण्याला नेतृत्वच राहीलं नाही ही पुण्याची आजची खरी मोठी समस्या आहे.पुण्याला नेतृत्व नसल्याने अवस्था हलाखीची झाली आहे केंद्रीयमंत्री पदावर विराजमान होऊनही मुरलीधर मोहोळ पोस्टर बाॅय बनले आहेत.ते फ्लेक्समधून फार मोठे दिसतात.तर राज्यसभेवर घेऊनही मेधा कुलकर्णी ब्राह्मण-ब्राह्मण किंवा हिंदू-मुस्लीम खेळण्यात मग्न आहेत आणि राज्यात पुण्याचे २ मंत्री असूनही त्यातले चंद्रकांत दादा पाहुणे कलाकार बनलेत .त्याच्व्हा एक पाय कोथरूडात तर एक पाय कोल्हापूरात, सांगलीत अडकलाय अन माधुरी मिसाळ मंत्री आहेत हे कार्यक्रमाच्या होर्डींगवरच कळतं.अशी जहरी टीका पुण्याच्या महिला शक्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या गुलाबो गँग च्या संगीता तिवारी यांनी केली आहे.
तिवारी यांनी पुढे अशीही टीका केलीय कि , ‘बाकी आमदार लोकांचं तर अस्तित्वच नाही. मध्यंतरी हेमंत रासने यांचं जबरदस्त अस्तित्व लोकमान्यनगर प्रकरणात दिसलं ते सोडा.पण मला सांगा कोण नेता आहे पुण्याचा? आहे का कोणी?
पोर्शे प्रकरणानंतर तात्पुरते बंद केलेले पब्ज पुन्हा सुरू झाले.पुणे पोलीसांनी लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी तात्पुरत्या हटवलेल्या फुटपाथवरच्या अवैध टपऱ्या पुन्हा आपल्या जागी आल्या. टेरेस रेस्टाॅरंट पुन्हा सुरू झाले.गुन्हेगारी कितीतरी वाढली आहे पुण्यातली. कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच नाही.पुण्याचे नेते सुरेश कलमाडी होते तेव्हा ते केवळ एका प्रकरणावर पोलीस आयुक्तांना धारेवर धरत नसत तर एकूणच गुन्हेगारीचा आढावा घेऊन त्याचा पाढा पोलीस आयुक्तांना आपल्या समोर वाचायला लावत . पोलीस आयुक्त यांच्यावर त्यांच्या नेतृत्वाचा वचक असत. आता काय चित्र आहे आपापल्या संदर्भापुरते लोकप्रतिनिधी विचारणा करतात. अन्य गुन्हेगारीवर मुके बनतात .
कोरेगाव पार्कला रात्री चक्कर मारा. लोक सांगतात की ड्रग्ज तर तंबाखू उपलब्ध व्हावी तसे सहज उपलब्ध होतात. पुणे ड्रग्जची राजधानी झाली असा एक लेख मध्यंतरी वाचण्यात आला होता.ट्रॅफिकनं जीव काढलाय लोकांचा. कुठूनही कुठे पोचायला कमीत कमी अर्धा तास लागतो गर्दीच्या वेळी. बिनडोक झाडतोडी याशिवाय कोणताही उपाय नाही सरकार आणि महापालीकेकडे कडे.पुणे महापालिका तर फक्त टेंडरचा अड्डा झालाय. फक्त टक्केवारी सोडून काही चालत नाही तिथं.टेकड्या फोडणं हे दैनंदिन काम झालंय. नदीची काय वाट लावलीय ते मोठा पूर आला की कळेल.महिला मुलींची सुरक्षा तर वेशीला टांगलेले आहे या नेत्यांना आणि महिला नेत्यांना तर काय देणे घेणे च उरलेले नाहीये.
वाह रे वाह आमचे लाडके पुणे.
नेत्यांनी इथे सगळेच केले आहे उणे.
दुःखदायक आहे सगळे… अशी भावना संगीता तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

