Home Blog Page 581

सदानंद शेट्टी यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश,प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा पुढाकार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशाचा पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना मोठा फायदा होणार आहे. रमेश बागवे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगून प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आणि रमेश बागवे यांनी शेट्टी यांचे स्वागत केले. तसेच त्यांना नियुक्तीपत्र दिले. शेट्टी हे काँग्रेसमध्ये असताना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. शेट्टी आता स्वगृही परतल्याने खूप आनंद झाल्याची भावना जोशी आणि बागवे यांनी व्यक्त केली. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरात आमची ताकद वाढली असून, कँटोन्मेंटसह राज्यात महाविकास आघाडी विजयी होऊन सरकार येणार असल्याचा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

जुने मित्र, सहकारी सदानंद शेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणखी मजबूत झाली आहे. या निवडणुकीत ते सोबत असल्याचा आनंद आहे, अशी भावना रमेश बागवे यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये पुन्हा परतताना खूप आनंद होत आहे. कँटोन्मेंटसह शहरातील सर्व मतदारसंघांत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वीरेंद्र राय आणि बाबू नायर उपस्थित होते. शेट्टी हे कँटोन्मेंट परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन कामासाठी (एसआरए) ओळखले जातात. या भागात त्यांचे मोठे संघटन असून लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख आहे.

त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांनीही नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ बौद्ध समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक क्वार्टर गेट येथील पीजीआय हॉलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते डॉ. अमोल देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पार पडली. रमेशदादांना विजयी करणार असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. काशेवाडी येथील चमनशाह दर्गा चौकात झालेल्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हरकारनगर येथील शिवमंदिर मैदानात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया यांची सभा जल्लोषात पार पडली. वानवडी येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि अभिजित शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी रमेशदादांच्या मोठ्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त करण्यात आला.

भिमराव तापकीर २४/७ जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी- देवेंद्र फडणवीस

पुणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी खडकवासला मतदारसंघातील बालाजी नगर येथे जाहीर सभेत प्रचंड जनसमुदायासमोर भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या कार्यकाळातील लोकोपयोगी निर्णय व प्रकल्पांची माहिती देत मतदारांना महायुतीच्या उमेदवारांसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे – समाविष्ट गावांवरील कर सवलत: ५ वर्षांसाठी ग्रामपंचायतीनुसारच कर आकारणीची सवलत लागू केली जाणार, तिहेरी एलिव्हेटेड रस्त्यांचे नियोजन: पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रकल्प, ‘इंजिनियरिंग मार्वेल’ चांदणी चौक: आंतरराष्ट्रीय दर्जाचा आधुनिक प्रकल्प, मेट्रोसह विविध विकास प्रकल्प: शहरी सुविधांचा विस्तार व दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा.

या सभेनंतर आज, १६ नोव्हेंबर रोजी भिमराव तापकीर यांनी बिबवेवाडी-राजीव गांधी नगर येथे पदयात्रा व गाठीभेटी घेऊन प्रचार मोहिमेला चालना दिली.
ज्येष्ठ नागरिक, तरुणाई, महिला, आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या सहभागामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण पसरले होते. तापकीर यांच्या कार्यकाळात रस्ते, ड्रेनेज लाईन, आणि स्थानिक विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाली. २४/७ जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या मायाळू स्वभावामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. या दरम्यान मा. नगरसेविका राणीताई भोसले, रुपाली धाडवे, दिनेश धाडवे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, प्रभाग अध्यक्ष अमोल चौधरी, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा ओंकार डवरी, जितेंद्र कोंढरे, चिन्मय भोसले, राहुल पाखरे, रितेश रासकर, आनंद साळुंखे, महेश भोसले व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

महायुतीची ताकद वाढवण्यासाठी कमळाचे बटन दाबा सांगत फडणवीस यांनी जाहीर सभेत मतदारांना आवाहन केले की, “भिमराव तापकीर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मागे उभे राहून व्होट जिहाद्यांचे नापाक इरादे गाडून टाका.”

या सभेनंतर आणि पदयात्रेदरम्यान पाहिल्या गेलेल्या उत्साहामुळे खडकवासला मतदारसंघात महायुतीचा विजय सुनिश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या सोसायटी संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे-दादा, तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो. अशी भावना कोथरूड मधील सिद्धार्थ पॉलेसमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील आपल्या प्रचारार्थ आज कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत.

आज त्यांनी कोथरुड मधील जोशी म्युझियम परिसरातील सिद्धार्थ पॅलेसमधील नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, भाजपा नेते प्रशांत हरसुले प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, प्रतिक खर्डेकर, विनिता काळे उपस्थित होते.

यावेळी सोसायटीचे पादाधिकारी कोल्हटकर म्हणाले की, “दादा, तुम्ही महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून मोठे आहातच; पण या मंत्रीपदापेक्षा तुमच्यातला कार्यकर्ता आणि साधेपणा आम्हाला खूप भावतो.” त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनीही नम्रपणे क‌तज्ञता व्यक्त केली.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ४० टक्के कर सवलती मुळे सर्व पुणेकरांना दिलासा मिळाला असल्याची माहिती दिली. तसेच, मेट्रो सारख्या प्रकल्पामुळे कोथरुड मधील नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच, कोथरूडकरांच्या सेवेसाठी सदैव समर्पित असल्याची भावना ही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक महायुतीच्या पाठीशी

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास

ज्येष्ठ नागरिकांना मिळतोय विविध योजनांमधून लाभ

मुंबई, ता. १६ नोव्हेंबर २०२४

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबरोबरच महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा लाखो ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला. त्यामुळे लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत महायुतीच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांविषयीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.

त्या म्हणाल्या की राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास लागू केला. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्यात ३००० रुपये थेट डीबीटीमधून दिले जातात. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत आतापर्यंत राज्यभरातून ६ लाख अर्ज सरकारला प्राप्त झाले, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने ज्येष्ठ नागरिकांचा महिन्याचा औषधांचा खर्च भरुन निघाला. ग्रामीण भागातील ज्येष्ठांना या योजनेचा मोठ लाभ झाला.

उतारवयात देवदर्शन करण्याची ज्येष्ठांची इच्छा असते पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. त्यासाठी राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्यात आली. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या, ऋषीकेश, काशी मथुरा,पंढरपूर, अशा तिर्थक्षेत्रांना नेले जाते. मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगरमधून तिर्थयात्रा सुरु होते. आतापर्यंत राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला, असे त्या म्हणाल्या. ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अन्याय, त्यांची सायबर फसवणूक, त्यांच्यासंदर्भात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वित केल्याचेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून दोन वर्षात ४० हजार रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी ३५० कोटींची मदत देण्यात आली. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आरोग्य विम्याचे संरक्षण १.५ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आले. राज्यात ९ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली. बार्टी आणि महाज्योतीमधून लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने राज्यातील महिलांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सरकारने पाच महिन्यांचे ७५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवले. शिवसेनेने प्रत्येक मतदार संघातील २५ हजार लाडक्या बहिणींशी संवाद साधला. त्यामुळे लाडक्या बहिणी विरोधी पक्षांना मतदानातून धडा शिकवतील, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर; प्रियंका गांधींचे नरेंद्र मोदींना चोख प्रत्युत्तर.

भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटलांचा पराभव करून शिर्डी मतदार संघातील दादागिरीचा कायमचा बिमोड करा: बाळासाहेब थोरात.

काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभांचा झंझावात.

शिर्डी/ कोल्हापूर, दि. १६ नोव्हेंबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवणमधील महाराजांचा पुतळा तर अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. भाजपा सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, शिवरायांचा हा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितले.

काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापूरात प्रचारसभा झाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्लाबोल केला, राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला उत्तर देत प्रियंका गांधी म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्षाची विचारधार वेगळी आहे पण बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाला नितांत आदर आहे, असे स्पष्ट सांगून शिवसेना वा काँग्रेसचा कोणताही नेता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कदापी सहन करणार नाही असे बजावले. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यावे असे आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी खुल्या व्यासपीठावरून जातनिहाय जनगणना करणार व ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार ही घोषणा करुन दाखवावी, असे प्रतिआव्हानही प्रियंका गांधी यांनी दिले आहे.

राहुल गांधी आरक्षण विरोधी असल्याच्या आरोपाचा समाचार घेत प्रियंका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमिटरची पदयात्रा काढून आजही संविधान वाचवण्याची लढाई लढत आहेत, त्यांच्यावर मोदी शाह हे संतांच्या भूमीतून खोटे आरोप लावत आहेत. भाजपा, मोदी व शाह हे राहुल गांधी यांना घाबरले आहेत असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

महाराष्ट्र मजबूत करण्याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदींची पोलखोल करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंडित नेहरुंनी देशातील विविध राज्यात संस्था उभा केल्या, धरणे बांधली, आयआयएम, आयआयटी स्थापन करताना कधीच भेदभाव केला नाही पण मोदी सरकारने मात्र भेदभाव केला आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला पळवले, टाटा एअरबस प्रकल्प पळवला, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पळवला, अशी यादी वाचून महाराष्ट्रातील उद्योग व रोजगार मोदी सरकारने पळवल्याचे सांगितले. मोदी सरकारमुळेच महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण व महिला मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. ११ वर्षापासून सत्तेत असताना भाजपा व नरेंद्र मोदींना महिला, तरुण, शेतकरी यांची आठवण झाली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना प्रियंका गांधी यांनी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिर्डी के साईबाबा की जय, अशा घोषणा दिल्या. तसेच महाराष्ट्राची भूमी साधू संतांची आहे असे सांगताना, संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा यांचा आवर्जून उल्लेख केला. “जें का रंजलें गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा”, या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांचा उल्लेख केला.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, संगमनेरमध्ये विकास झालेला नाही तेथे गुंडगिरी आहे या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आरोपाला थोरात यांनी उत्तर दिले. विखे पाटील यांनी समोरासमोर येऊन संगमनेर व शिर्डी मतदारसंघात किती विकास झाला हे, कुठे दादागिरी सुरु आहे हे मांडावे असे पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. शिर्डी मतदार संघातील दहशतवाद संपवून जनतेला मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या श्रीमती घोगरे यांना विजयी करा व शिर्डी भागातील विखे पाटलांची दादागिरी मोडीत काढा, असे आवाहन थोरात यांनी केले.

यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, शिर्डी विधानसभेच्या उमेदवार प्रतिभाताई घोगरे, युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात, जयंतराव वाघ, किरण काळे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ‘कटेंगें बटेंगे’ चालणार नाही; भाजपा युतींच्या नेत्यांमध्येच मतभेद

लोकसभेला उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने भाजपाला धडा शिकवला; या निवडणुकीतही भाजपा युतीला घरी बसवा.

मुंबई, दि. १६ नोव्हेंबर २०२४
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने सर्वांनाच मान सन्मान, रोजीरोटी दिली आहे, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न साकारले जाते. सर्व जातीधर्मांना सामावून घेणाऱ्या महाराष्ट्रात ‘कटेंगे बटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ सारख्या घोषणा देऊन फूट पाडण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही असे स्पष्ट करुन ‘कटेंगे बटेंगे’ वरून भाजपा व युतीतील नेत्यांमध्येच मतभेद आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांनी सांगितले.
टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज बब्बर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे, संस्कृती, परंपरा आहे. या राज्याची मान सन्मान, प्रतिष्ठेला इतर राज्यातून येऊन कोणीही धक्का लावू शकत नाही. भाजपाने जातीधर्मात फूट पाडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण, पंकजा मुंडे यांनीही बटेंगें तो कटेंगे घोषणेला विरोध करत हे महाराष्ट्रात चालणार नाही असे म्हटले आहे. भाजपा युतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही द्वेष पसरवणारी भाषा महाराष्ट्रात चालणार नाही, असे स्पष्ट केले. महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फोडीफोडीचा डाव चालणार नाही हे लक्षात आल्यानेच पंतप्रधान प्रचार सोडून परदेश दौऱ्यावर गेले असे नाव घेता राज बब्बर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला. उत्तर प्रदेशात ३० जागा कमी केल्या तर महाराष्ट्रात १६ जागा कमी करुन त्यांना त्यांची जागा दाखवली आहे आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाला धडा शिकवा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन राज बब्बर यांनी केले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चयनिका उनियाल, चरणजित सप्रा, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते निजामुद्दीन राईन आदी उपस्थित होते.

हजारो दिव्यांनी उजळले चतु:श्रृंगी मंदिराचे प्रांगण

पुणे: हजारो दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने चतुःशृंगी मंदिराचे प्रांगण शुक्रवारी उजळून निघाले. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून नवचैतन्य हास्ययोग परिवार व चतुःशृंगी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. चतुःशृंगी मंदिराच्या प्रांगणात रचनात्मक पद्धतीने प्रज्वलित केलेल्या दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळाला. आनंदी व हास्यमय जीवन जगण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. 

येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे नायक अनुपसिंग ठाकूर, निर्माते केतनराजे भोसले व टीमने या दीपोत्सवाला उपस्थिती लावली. दीपोत्सवावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजयराव भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, हरीश पाठक, जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे यांच्यासह नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य व मंदिर देवस्थानाचे विश्वस्त श्रीकांत अनगळ, नंदकुमार अनगळ, सुहास अनगळ, डॉ. विनायक देडगे, पराग पोतदार, किशोर सरपोतदार, स्वाती महाळंक, चैताली माजगावकर भंडारी, आदी उपस्थित होते.

अनुपसिंग ठाकूर म्हणाले, “मागील वर्षी मी चतुःश्रृंगी मातेचे दर्शन घेतले आणि मला या चित्रपटाची संधी मिळाली. आईच्या दर्शनासाठी पुढच्या वर्षी पुन्हा येईन. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाची भूमिका साकारायला मिळणे, हा मातेचा आशीर्वाद आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार खूप चांगले काम करत आहे. मला या परिवाराचा आणि तुम्ही केलेल्या कामाचा हेवा वाटतो.”

मकरंद टिल्लू म्हणाले, “आम्ही गेल्या अकरा वर्षांपासून हा दीपोत्सव करतो. या माध्यमातून आम्ही सर्व ज्येष्ठांना व तरुणांना हास्यमय जीवन जगण्याचा संदेश देतो. या परिवारामध्ये पंचवीस हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत. या दीपोत्सवाच्या माध्यमातून ताण-तणावाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी आपण हास्याचे दिवे प्रज्वलित करूया आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरूया.”
दीपोत्सवाचे आरेखन विजयराव भोसले यांच्या संकल्पनेतून केले होते.

महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या अत्यंत गंभीर, प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले तर रोजगार कुठून मिळणार?

शेतकरी मोठ्या संकटात, आत्महत्यांमध्ये मोठी वाढ तरीही भाजपा सरकारची शेतकरी कर्जमाफीस नकारघंटा.

महाराष्ट्रातील भाजपा सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालते, मविआचे सरकार आणा.

मुंबई, दि. १६ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण झाली असून कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा ही राज्ये पुढे गेली आहेत. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर चालत असून आता महाराष्ट्रात परिवर्तन करून मविआचे सरकार आणा, असे आवाहन माजी केंद्रीय अर्थमंत्री खासदार पी. चिदंबरम यांनी केले आहे.

टिळक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना पी. चिदंबरम यांनी आकडेवारीसह भाजपा राजवटीत महाराष्ट्राची अधोगती कशी झाली हे सविस्तरपणे सांगतिले, ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ९.६ वरून ७.६ टक्क्यावर घसरले आहे, कृषी क्षेत्रात ४.५ टक्क्यांवरून १.९ पर्यंत घसरण झाली आहे, सेवाक्षेत्रात १३ टक्क्यावरून ८.८ टक्के घरसण, बांधकाम क्षेत्रात १४.५ टक्क्यांवरून ६.२ टक्के घरसण झालेली आहे, वित्तिय तुट वाढलेली आहे. सरकार पैसे खर्च करत आहे पण कोणत्याही क्षेत्रात वृद्धीदर वाढलेला दिसत नाही. महाराष्ट्रात आज बेरोजगारीची समस्या अत्यंत बिकट असून बेरोजगारीचा दर १०.८ टक्के आहे. पगारी नोकरी करणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यावरून ३१ पर्यंत घरसण झाली आहे तर ४० टक्के लोक स्वयंरोजगार करत आहेत. १८ हजार पोलीस भरतीसाठी ११ लाख अर्ज आले होते तर ४६०० तलाठी पदांसाठी ११.५ लाख लोकांनी अर्ज केले होते. यातून बेकारीची अवस्था किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार का मिळत नाहीत यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले की, राज्यात नोकऱ्या आहेत कुठे? महाराष्ट्रातील तरुण मुले मुली व त्यांच्या पालकांनी २० तारखेला मतदान करताना नितीन गडकरी यांचे ‘नोकऱ्या कुठे आहेत?’ हे वक्तव्य लक्षात ठेवूनच मतदान करा.

महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास मोठे उद्योग तयार होते, त्यासाठी परस्पर सामंजस्य करारही केले, प्रकल्पासाठी जागा निश्चित केली पण त्यानंतर हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग्ज प्रकल्प, तळेगावमध्ये होणारा सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, नागपुरला होणारा टाटा एअरबस प्रकल्प हे महाराष्ट्रातून कोणत्या राज्यात गेले हे लहान मुलगाही सांगू शकतो. रोजगार देणारे मोठे प्रकल्प जर दुसऱ्या राज्यात गेले तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळणार कुठून? असा सवाल चिबंरम यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या बाबतीतही भाजपा सरकारचे ठोस धोरण नाही उलट भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्रात ६५ लाख टन कांदा उत्पादन होते, हा कांदा निर्यात केल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो पण यावेळी केंद्रातील भाजपा सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली, त्यावर ४० टक्के कर लावला. त्यामुळे कांद्याचे दर बाजारात कोसळले त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, मागील एका वर्षात महाराष्ट्रात २८५१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. शेतकरी मोठ्या संकटात असताना त्यांना कर्जमाफी देऊन त्याच्यावरचे ओझे उतरवले पाहिजे पण भाजपा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. महाराष्ट्रातील १७.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली आहे, असेही चिदंबरम यांनी सांगितले..

भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे ते शक्य आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तर देताना पी. चिदंबरम म्हणाले की, भाजपा सरकारने ५ ट्रिलीयनचे लक्ष्य गाठण्यासाठी दिलेली कालमर्यादा वाढवली आहे, २०२२-२३ मध्ये हे लक्ष्य गाठले जाणार होते, हे लक्ष्य गाठणे अशक्य नाही, केव्हातरी ते गाठलेच जाईल पण प्रश्न आहे तो ते लक्ष्य गाठण्यासाठी लागणार वेग, हा वेग मात्र मंद आहे, लक्ष्य नाही तर वेग महत्वाचा आहे, असे पी. चिदंबरम म्हणाले.

रोजगार निर्मीतीवर बोलताना चिदंमबर म्हणाले की, रोजगार आहेत, वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रातही अनेक लोकांची गरज आहे. आज या क्षेत्रात पदे रिक्त आहेत, ती भरली पाहिजेत. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यातही रोजगार निर्मितीचा आराखडा दिला आहे असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकटेश, राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, चरणजित सप्रा आदी उपस्थित होते.

गुजरातला उद्योग हलवून महाराष्ट्रात रोजगार कसा देणार ?

काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा महायुतीला सवाल

मुंबई
मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रचंड रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्राकडून हिरावून गुजरातला नेले असता महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात 25 लाख रोजगार देण्याचे आश्वासन कसे दिले आहे, असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा राज्य उत्पन्नाचा वाटा दोन टक्क्यांनी घसरला आहे तर गुजरातचा वाटा हा ७ टक्क्यांनी वाढला आहे असे गाडगीळ यांनी दर्शनास आणून दिले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन कोटी रोजगार देण्याच्या व वल्गणा करणाऱ्या मोदी सरकारच्या गेल्या ७ वर्षात तब्बल ५० लाख नोकऱ्या गेल्या आहेत ही आकडेवारी का झाकून ठेवल्या जात आहे असा सवालही गाडगीळ यांनी केला आहे.

काँग्रेसने कर्नाटकात दिलेल्या ५ गॅरंटी यशस्वीपणे सुरु, अंमलबजावणीसाठी बजेटमध्येच ५६ हजार कोटींची तरतूद: जी. परमेश्वरा

पंतप्रधान मोदी व भाजपा नेत्यांचा काँग्रेस गॅरंटीबद्ल अपप्रचार, अंमलबजावणीच्या पाहणीसाठी कर्नाटकात त्यांचे स्वागत.

मुंबई,

कर्नाटकात काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या ५ गॅरंटींची यशस्वीपणे अंमलबजाणी सुरु असून कर्नाटकातील लाखो लोक या गॅरंटींचा लाभ घेत आहेत. सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ५ गॅरंटी लागू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या ५ गॅरंटीसाठी कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पातच ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने निधीची कमतरता असण्याचे काहीच कारण नाही असे स्पष्ट करत पंतप्रधान मोदी व भाजपा नेते काँग्रेसच्या ५ गॅरंटीबद्दल अपप्रचार करत आहेत. या गॅरंटींच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी त्यांनी कर्नाटकात यावे त्यांचे स्वागत आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या ५ गॅरंटींची माहिती टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत देताना जी. परमेश्वरा पुढे म्हणाले की, गृहलक्ष्मी गॅरंटी अंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना २ हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेचा आतापर्यत १.२२ कोटी लाभार्थींनी लाभ घेतला असून ३०,४१६ कोटी रुपये त्यांच्या खात्यात दिले आहेत. गृहज्योती योजनेचे १.६६ कोटी लाभार्थी असून त्यावर १४,०६५ कोटींच्या निधीचे वाटप केले आहे. युवानिधी गॅरंटीखाली बेरोजगार तरुणांना महिन्याला ३ हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेचे ४.३० लाख लाभार्थी आहेत व २०० कोटींचे वाटप केले आहे. शक्ती गॅरंटीअतंर्गत प्रत्येक महिलेला कर्नाटक सरकारच्या बस मधून मोफत प्रवासाची सुविधा सुरु आहे. शक्ती गॅरंटीअंतर्गत ३१७ कोटी महिलांनी प्रवास केला असून ६१२५ कोटी रुपये आतापर्यत खर्च करण्यात आले आहेत तर अन्नभाग्य गॅरंटीअंतर्गत १० किलो धान्य मोफत दिले जात आहे. या गॅरंटीचा १.१५ कोटी लाभार्थींनी लाभ घेतला असून ८२२९ कोटींचे वाटप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे नेते जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अपप्रचार करत आहेत. या ५ गॅरंटी सरकारचा कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरुच राहतील अशी ग्वाही जी. परमेश्वरा यांनी दिली.
महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून जलयुक्त शिवार योजनेत १० हजार कोटींचा घोटाळा, रुग्णवाहिका खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात ड्रग्जची खुलेआम विक्री होत असून तरुणपिढी नशेच्या आहारी जात आहे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे सावकारांचे सरकार आहे. महाराष्ट्रातील वातावरण हे महाविकास आघाडीसाठी अनुकुल असून मविआ सरकार स्थापन करेल, असा विश्वासही जी परमेश्वरा यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री सुरेश शेट्टी, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सचिव श्रीकृष्ण सांगळे उपस्थित होते.

अमरावतीत राहुल गांधी यांच्या सामानाची तपासणी:EC च्या अधिकाऱ्यांनी केली पडताळणी

0

अमरावती -निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अमरावती येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सामानाची झाडाझडती घेतली. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे राजकारण तापले आहे.

राहुल गांधी यांची शनिवारी अमरावतीत प्रचारसभा झाली. तत्पूर्वी त्यांचे हेलिकॉप्टर येथील हेलिपॅडवर उतरताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांचे हेलिकॉप्टर व सामानाच्या बॅगांची कसून तपासणी केली. त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाची व्हिडिओग्राफीही केली. राहुल यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना याकामी मदत केली. यावेळी राहुल गांधी काही क्षण हेलिकॉप्टरजवळ थांबले. पण त्यानंतर ते तेथून आपल्या सभास्थानाकडे निघाले. यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांना काही सूचना करतानाही दिसून आले.दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कारचाही आज महाराष्ट्रात तपासणी करण्यात आली. रेवंत रेड्डी शनिवारी नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. रस्त्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने त्यांच्या कारची झाडाझडती घेतली. या घटनेचाही व्हिडिओ समोर आला आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाने या निवडणुकीत उद्धव ठाकरे व राहुल गांधीच नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. अमित शहा यांच्या बॅगांची कालच हिंगोलीत तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत ही प्रक्रिया निकोप व निष्पक्ष निवडणुकीसाठी आवश्यक असल्याचे म्हटले होते.

धंगेकरांच्या प्रतिहल्ल्याने भाजपला हादरा ..

फडणविसांणी माझी नाटकं पहिलीत जी सर्वच त्यांना झोंबली..म्हणूनच त्यांना कसब्यात सभा घ्यावी लागली

पुणे- माझी नाटकं फडणविसांनी पाहिली , ती युवा पिढीला व्यसनापासून वाचविण्यासाठी आणि भाजपचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणणारी होती म्हणून त्यांना झोंबली आणि आता रस्नेंचा पराभव दिसू लागला म्हणून त्यांना कसब्यात सभा घ्यावी लागली अशी खार्मार्तीतिका करत फडणविसांच्या कालच्या वक्तव्यांचा कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी समाचार घेतला आहे. आज धंगेकर यांनी जोरदार प्रतिहल्ला करत भाजपच्या रासने गोटात जोरदार हादरा दिल्याचे मानले जाते

कसब्यातील सलोखा बिघडवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न
आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

ज्येष्ठ भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी पुणेकरांना नेमके काय दिले या माहितीपेक्षा या मतदारसंघात विद्वेष पसरवणारी भाषा केली. त्याद्वारे त्यांनी कसबा मतदारसंघातील धार्मिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचेच काम केले आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.

धंगेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काल झालेल्या फडणवीस यांच्या सभेतील आरोपाचा मुद्देसूद समाचार घेतला. धंगेकर म्हणाले की, पुण्याचा कसबा मतदार संघ हा सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारा मतदारसंघ आहे. वर्षानुवर्षे येथील सामाजिक सलोखा टिकून आहे. पण येथे धार्मिक विद्वेषाचा खडा टाकून फडणवीस यांनी हे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. तथापि, त्यांच्या या प्रयत्नांना येथील मतदार जराही भिक घालणार नाहीत. निवडणुका येतात आणि जातात पण अशा विद्वेषाच्या भावनेतून मनावर ओरखडे उमटवणारा प्रचार केला गेला तर त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होतो ही बाब भाजपच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे.

या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असल्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी हा प्रयत्न केला असावा असे मतही धंगेकर यांनी व्यक्त केले.

फडणवीस यांनी आपल्यावर व्यक्तिगत टीका करताना, आपण नाटक करतो किंवा आपण नाटकी आमदार आहोत अशी भाषा वापरली आहे. पुण्यातील ड्रग रॅकेट प्रकरण, पोरशे कार अपघात प्रकरण, आणि बेकायदेशीर पब प्रकरण या प्रकरणी मी पोटतिडकीने आवाज उठवला. त्याबाबत पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणांना कारवाई करण्यास भाग पाडले. या प्रश्नांबरोबरच या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत मी सातत्याने आवाज उठवला, माझी ही कृती जर फडणवीस यांना नाटक वाटत असेल, तर मी हे नाटक या पुढील काळातही करत राहीन, असे प्रत्युत्तरही धंगेकर यांनी यावेळी दिले.

धंगेकर यांना फडणवीस यांनी नाटकी म्हणणे भाजपला पडणार महागातगेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघात प्रचार करताना आणि पत्रकारांशी बोलताना ‘हू इज धंगेकर?’ असा प्रश्न विचारून आमदार रवींद्र धंगेकर यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न कसबा मतदारसंघातील नागरिकांना आवडला नाही. त्यामुळे मतदारांनी धंगेकर यांच्या बाजूने हिरिरीने मतदान करून पोटनिवडणुकीत धंगेकर यांना निवडून आणले. आता फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रचारात धंगेकर यांना नाटकीपणाची उपमा दिली आहे, ते नाटक करतात असे म्हटले आहे. फडणवीस यांचे हे विधानही चंद्रकांत पाटील यांच्या विधानाप्रमाणेच आता कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला महागात पडणार आहे असे प्रतिपादन धंगेकर यांच्या समर्थकांनी केले आहे.

सिद्धार्थ शिरोळे यांचा सुज्ञ मतदारांवर विश्वास

विविध स्तरामधून शिरोळे यांना वाढता पाठींबा

पुणे, दि. १६ नोव्हेंबर, २०२४ : “शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व स्तरांतील, वयोगटातील नागरिकांसाठी आणि तरुण सहकाऱ्यांसाठी मी पाच वर्षांमध्ये काम करून दाखविले आहे. ही कामे जनतेसमोर असल्याने विरोधकांच्या भुलथापांना जनता फसणार नाही. शिवाजीनगरच्या सुज्ञ मतदारांवर माझा विश्वास आहे”, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केले.

लोकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि सरकारकडून आवश्यक निधी आणण्यासाठी केलेली खटपट यांतूनच जनहिताची अनेक कामे करू शकलो, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले. शिवाजीनगर, औंध भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी शिरोळे यांनी लहान थोर, महिला, युवा, व्यापारी, नोकरदार अशा सर्वच नागरिकांशी आपुलकीने संवाद साधलेला पहायला मिळाला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, “आमदार शिरोळे यांनी सांगितले, की पुणे मेट्रो ही शिवाजीनगरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरली आहे. या मेट्रोची दहा स्थानके शिवाजीनगर मतदारसंघात आहेत. याच जोडीला आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे कामदेखील विक्रमी वेळेत पूर्ण होताना दिसत आहे. या मेट्रो मार्गामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना मेट्रोची आणखी तीस स्थानके उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे शिवाजीनगरमधील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी सर्व जण जलद आणि आरामदायी प्रवास करू शकणार आहेत. “

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवारीत ते पूर्ण होईल. या पुलामुळे वाहतूक कोंडी निश्चितपणे कमी होईल. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सोबतच खडकी व रेंज हिल्स येथील अंडर ब्रिजच्या विस्तारीकरणाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी महापालिकेने निधी राखीव ठेवला आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. भूमिगत मेट्रोवर प्रशस्त एसटी स्थानक तयार होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानेच ही सर्व कामे मार्गी लागली आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले क्रांतिगुरू लहुजी वस्ताद स्मारक लवकरच पूर्णत्वास जाईल. तीन मजली होमी भाभा रुग्णालयही पूर्ण होत आल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त वसाहतीमधील जवळपास बाराशे गाळ्यांना आणि जनवाडी, पांडवनगर येथेही ‘एफएसआय’ वाढवून देण्याची गरज आहे. यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जनतेच्या आशीर्वादाने २३ तारखेनंतर हे काम मार्गी लावून दाखवेन. महायुती सरकारमध्ये सर्वसामान्यांच्या कामाला निधी कमी पडत नाही, असे आमदार शिरोळे म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी

कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन

पुणे:

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत; घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे स्त्रीचा भक्कम आधार असतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा यांना त्यांच्या पत्नी आणि व्यवसायाने कॉस्ट ऑडिटर असलेल्या अंजली पाटील यांची वेळोवेळी साथ मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. नागरिकांमधूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनीही निवडणूक प्रचारात सहभागी होऊन; कोथरूड मधील अनेकांच्या घरोघरी भेटी घेत आहेत.

यामध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुनिती जोशी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ. वासंती पटवर्धन आणि भुपाल पटवर्धन, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ माया तुळपुळे, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आणि मधुमिता बर्वे यांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले.

यावेळी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील ह्या देखील उपस्थित होत्या.

पर्वतीत सायबर पोलिस स्टेशन उभारणार आमदार माधुरी मिसाळ

पुणे:नागरिकांचे आर्थिक व्यवहार हे बहुतांशी ऑनलाइन पद्धतीकडे वळल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा ऑनलाइन गुन्हेगारीकडे वळविल्याचे दिसून येते. शहरात दिवसाकाठी 70 ते 80 तक्रार अर्ज दाखल होतात. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यावर मोठा ताण येतो. सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात सायबर पोलिस स्टेशन उभारणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ सॅलिस्बरी पार्क परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, डॉ. भरत वैरागे, बंटी मोकळ, देवेंद्र बनसोडे, सुनील इंगळे, प्रसन्न वैरागे, निखिल शिळीमकर, उमेश शहा, सिद्धार्थ चिंचोळकर, किरण रामसिन्हा, राजेंद्र सरदेशपांडे, गणपत मेहता, पूजा जोशी, संगीता कांबळे, वंदना गावडे, रेणुका पाठक,अनिल भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर गुन्हेगारांच्या नवनवीन क्लुप्त्या पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. गंभीर गुन्हे हाताळण्यासाठी 30 पोलिस ठाणी आणि संपूर्ण गुन्हे शाखा काम करते. मात्र गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांची संख्या दुप्पट असूनही त्याचा ताण केवळ एकाच सायबर पोलिस ठाण्यावर येत आहे. या पोलिस ठाण्यात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. तक्रार अर्जांची संख्या लक्षात घेता प्रत्येक गुन्ह्याचा तपास करणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्वतीत सायबर पोलिस ठाणे उभारून प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहोत.

मिसाळ पुढे म्हणाल्या, पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द लक्षात घेता आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, काळे, फुरसुंगी, काळेपडळ या ठिकाणी पोलिस स्टेशन उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांवरील ताण कमी होऊ शकेल. पर्वती मतदारसंघात सिंहगड रस्ता आणि बिबवेवाडी परिसरात प्रत्येकी एक पोलिस स्टेशन व पोलिस चौकी उभारण्यात आली. या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देता आले. तसेच प्रशासनात गतिमानता यावी यासाठी संगणक उपलब्ध करून दिले. गुन्ह्यांचा तपास तत्काळ आणि कुशलतेने होण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना बूस्ट मिळाला. त्यामुळे मतदारसंघातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.