Home Blog Page 536

सहकार खात्याकडून घोटाळेबाजांवर कारवाई ऐवजी ते काढणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींनाच धमकी

बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा
पुणे-

फलटण येथील यशवंत बँकेचा १५० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे.यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख समावेश आहे. त्यांनी वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे आणि जणांच्या नावावर बोगस कर्ज काढलेली आहे ,कर्ज प्रकरण केलेली आहेत ,सदरचे कर्ज थकीत आहेत सदर कर्जाचे पैसे हस्तेपरहस्ते बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहे. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केला आहे .त्याचप्रमाणे बँकेमधील पैशाचा विनीयोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी केला असल्याने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
यावेळी फसवणूक झालेले बँकेचे ठेवीदार व कर्जदार यांच्यासह निलेश जाधव, गणेश पवार, एस डी कुलकर्णी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, यशवंत सहकार बँकेचे अनेक ठेवीदार यांच्याशी मी बोलणे केले. लोकांनी ज्या ठेवी बँकेत ठेवले होत्या ते मिळणे अशक्य झाले आहे. सदर रक्कम पाच लाखांच्या आत आहे दबाव ठेवीदार यांच्यावर टाकला जात आहे. माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कर्ज बुडीत यांच्या सोबत जाऊन मी त्यांची चुकीची बाजू घेत असल्याचा आरोप केला. परंतु बँक अध्यक्ष यांनी स्वतः पदाचा दुरुपयोग करून खोटी कर्ज प्रकरणे करून बँकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याने कर्ज बुडीत झाली आहे. १२७ कोटी रुपये कर्ज ही केवळ शेखर चरेगावकर यांच्या आणि नातेवाईक यांच्या नावाने आहे. स्वतःच्या बँकेतून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर कोणते कर्ज नाही सांगणे बिनबुडाचे आहे. ठेवीदार यांचे पैसे बँक देऊ शकत नसल्याने ती बुडीत दाखवून आरबीआयकडून केवळ पाच लाख रुपये ठेवीदार यांना देण्याचे आश्वासन देऊन ग्राहक आणि शासन यांची फसवणूक करण्यात येत आहे. कोणताही कागदपत्राची शहानिशा न करता कर्ज वाटप झाल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी मोठा घोटाळा केला असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी. बँकेवर प्रशासक नेमण्यात यावा.चुकीचे व्यक्ती नावे कर्ज घेतल्याने बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.

खा.कुलकर्णी म्हणाल्या ,बँकेच्या २३० कोटी रुपयांच्या ठेवी आहे परंतु मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आलेले आहेत. राज्य सहकार खाते यांच्याकडे बँकेतील अनियमितता बाबत तीन अहवाल आले आहे. सहकार खात्याने मोठी अनियमितता असून कायदेशीर कारवाई अद्याप केली नाही. सहकार खाते, पोलीस खाते यांनी अद्याप कारवाई का केली नाही हा प्रश्न आहे. माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आहे त्यांना शेखर चरेगावकर यांचे भाऊ यांच्याकडून धमकावले जात आहे.तसेच सहकार खात्यातील अधिकारी यांच्यावर देखील दबाव टाकला जात आहे. मला देखील तुम्ही याप्रकरणात गप्प बसा अन्यथा तुमचे मागील वेळी सारखे तिकीट कापू असा इशारा शेखर चारेगावकर यांचे भाऊ शार्दुल चरेगावकर यांनी नाशिक येथील मध्यस्थ मार्फत दिला आहे. केंद्रीय सहकार विभाग यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटून मी तक्रार करणार आहे. जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण सामान्य नागरिकाचे पैसे यात लुबाडण्यात आले आहे. भाजप मधील पदाचे आडून कोणी असा गैरकारभार करत असेल तर पक्षातील वरिष्ठ त्याची गंभीर दखल घेतील.

सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

याप्रकरणी सहकार आयुक्तांना भेटून कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. याची सखोल चौकशी करून सहकार आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा ठेवीदार आणि कर्जदार यांना घेऊन सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशारा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.

‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते संपन्न !!

छत्रपती संभाजी किंग्ज, विश्व टायगर्स संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे, १६ मेः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटने तर्फे आयोजित आणि ऑक्सिरीच पुरस्कृत ‘पिंपरी चिंचवड प्रीमीअर लीग’ (पीसीपीएल) टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्ज आणि विश्व टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. स्पर्धेचे उद्घाटन माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंजवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत विशाल गव्हाणे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे छत्रपती संभाजी किंग्ज संघाने बंट्स वॉरीयर्सचा १८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्‍या छत्रपती संभाजी किंग्ज संघाने १४५ धावा धावफलकावर लावल्या. अथर्व भोसले (४१ धावा), अजिंक्य खानदेशे (२४ धावा) आणि विशाल गव्हाणे (२० धावा) यांनी संघाचा डाव बांधला. बंट्स संघाच्या प्रशांत तेलंगे याने ४ गडी बाद केले. या आव्हानाला उत्तर देताना बंट्स वॉरीयर्सचा डाव १२७ धावांवर मर्यादित राहीला. निनाद सी. याने ३८ धावांची आणि प्रशांत तेलंगे याने २१ धावांची खेळी केली. छत्रपती संभाजी संघाच्या सईश शिंदे याने तीन गडी तर, विशाल गव्हाणे आणि हरीश बाकळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला शानदार विजयी सलामी मिळवून दिली.

दुसर्‍या सामन्यामध्ये अर्णेश रॉय याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर विश्व टायगर्स संघाने मोरे पाटील पॅकर्स संघाचा ७ धावांनी निसटता पराभव करून विजयी सलामी दिली. विश्व टायगर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. अर्णेश रॉय याने ३४ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना मोरे पाटील पॅकर्स संघाचा डाव ६५ धावांवर मर्यादित राहीला.
 
याआधी माणिकचंद ऑक्सिरीचच्या कार्यकारी संचालिका जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, उपाध्यक्ष वसंतभाऊ कोकणे, संघमालक विजय कापसे, रवी शेट्टी, सुदाम मोरे-पाटी, आरती तांबोळी, सहसचिव दिलीपसिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे, स्पर्धा समितीचे विजय कोतवाल, प्रदीप वाघ, मुकेश गुजराथी, नरेंद्र कदम, प्रशांत तेलंगे, युसुफ बर्‍हाणपूरे आदि मान्यवर उपस्थित होते.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
छत्रपती संभाजी किंग्जः १९.१ षटकात १० गडी बाद १४५ धावा (अथर्व भोसले ४१, अजिंक्य खानदेशे २४, विशाल गव्हाणे २०, प्रशांत तेलंगे ४-२४, सागर जाधव २-८) वि.वि. बंट्स वॉरीयर्सः १९ षटकात १० गडी बाद १२७ धावा (निनाद सी. ३८, प्रशांत तेलंगे २१, सईश शिंदे ३-१४, विशाल गव्हाणे २-१९, हरीश बाकळे २-६, ); सामनावीर विशाल गव्हाणे;

विश्व टायगर्सः १० षटकात ८ गडी बाद ७२ धावा (अर्णेश रॉय ३४, हर्षल हडके १३, सार्थक गायकवाड ३-९, रूद्र भुजबळ १-५, फैयाझ लांडगे १-८) वि.वि. मोरे पाटील पॅकर्सः १० षटकात ५ गडी बाद ६५ धावा (तिलक जाधव ३३, पुलकेश हलामुनी १२, शुभ श्रीवास्तव १२, सचिन सावंत १-७); सामनावीरः अर्णेश रॉय;

ठाकरे- पवारांचा पक्ष ‘लोफर’ व्यक्तींच्या हातात दिला:संजय राऊत म्हणाले ‘माझ्या पुस्तकातील प्रसंग सत्य’

उपकाराची फेड अपकाराने करणारी लोकं..यापेक्षा असंख्य घटनेचा मी साक्षीदार, मात्र त्या सांगणार नाही

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. तो सत्य आहे, ती कादंबरी नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

या माध्यमातून संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नरकातला स्वर्ग या पुस्तकातील प्रत्येक घटना आणि प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ती कादंबरी नाही. ते सर्व प्रसंग सत्य असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने कपोलकल्पित कथा सांगतात, त्याप्रमाणे मी पुस्तक लिहिलेले नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही कोणाच्या हातात दिली? एका लोफर माणसाच्या हातात ती दिली? त्यांचा राजकारण त्यांच्यापाशी मात्र ते शिवसेनेचे मालक कसे बनवू शकतात? तुम्ही कोण आहेत? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. चौकटीच्या बाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तुम्हाला मदत केली. त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले. हे त्यांना शोभले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आहे. याविषयी मी आतापर्यंत कधीही बोललेलो नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. काही गोष्टी गोपनीय असतात त्या गोपनीय राहायला हव्यात, असे देखील ते म्हणाले.

नरकाचा स्वर्ग या पुस्तकात माझे तुरुंगातील अनुभव असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कशी मदत केली, हे मला तुरुंगात असताना आठवले. त्यामुळे त्याचा उल्लेख देखील यामध्ये असल्याचे ते म्हणाले. पुस्तकातून तुरुंगातील अनुभव सांगितले असल्याचे देखील त्यांनी म्हणाले आहे. वरिष्ठ लोकांसोबत काही सिक्रेट गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत. त्या गोष्टी पुस्तक रूपाने सर्वांसमोर आणणे योग्य नाही, असे मला वाटते. मात्र पुस्तकांमध्ये मी केवळ एकच संदर्भ दिला आहे. शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे या प्रमुख महाराष्ट्रातील नेत्यांचे राजकारण पाहता मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता, या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडण्यात आले. तसेच पक्ष संपवण्याचा वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. उपकाराची फेड अपकाराने कशी केली, याचाच उल्लेख यात संजय राऊत यांनी केला आहे.

आजचे भाजपचे नेते बोलत आहेत त्यांना काय माहिती? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो. मात्र मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळली आहे. मर्यादेत राहील तेवढेच या पुस्तकात लिहिले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यापेक्षा असंख्य घटनेचा मी साक्षीदार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मी प्रदीर्घकाळ बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेलो आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मला माहिती आहे. मात्र मी त्या कधीही लिहिणार नाही आणि बोलणार देखील नाही. मात्र ‘नरकातला स्वर्ग’ हा वेगळा प्रवास आहे. तो तुरुंग आहे आणि त्यानिमित्ताने तुरुंगाची भिंतीशी आपण बोलतो. त्यावेळी आपल्याला अनेक संदर्भ आठवत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो. घाबरून पळून जावे लागत नाही, असा टोला देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि येत्या काळात अन्न भेसळ करणाऱ्याविरोधात व्यापक मोहीम राबवावी. पालखी सोहळ्यासंदर्भातील राज्यस्तरीय बैठकीपूर्वी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण करावी. इतर जिल्ह्यात किंवा विभागात बदली झालेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा घेण्याबाबत संबंधितांना विनंती करावी. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत परस्पर समन्वय ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता रहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील यासाठी आवश्यक उपाय योजावेत. नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी पुढे गेल्यावर मागील गावात त्वरित स्वच्छता करावी. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी असतील याची दक्षता घ्यावी.

पालखी मार्ग खड्डे मुक्त राहतील व उत्तम वाहतूक व्यवस्थापन राहील याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. घाट परिसरात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील व्यवस्थेबाबत एकत्र पुस्तिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरणीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली स्थापण्यात आली आहे २५ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान १ हजार ८६० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. पालखी मार्गावर पाणी, विद्युत, आरोग्य, गॅस सिलेंडर, स्वच्छता आदी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात येत आहेत. वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील व सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी जिल्ह्यातील तयारीची माहिती दिली. बैठकीला पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यास राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मुढाळे येथे महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता संदीप हाके, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वापराकरिता लागणारी वीज तसेच राज्यातील वाढते औद्योगिकरण लक्षात घेता सर्व घटकांना योग्य दाबाने वीजपुरवठा झाला पाहिजे याकरीता राज्यशासनाच्यावतीने वीजेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी याकरीता याकरीता सुमारे २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतात सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपाना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे.

पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेअंतर्गत १ लाख ३० हजार घरांच्याकरीता ५०० मेगॉवटपेक्षा अधिक क्षमतेचे छतावर सौरसंच बसविण्यात आले आहे तसेच या योजनेअंतर्गत १ हजार कोटी रुपयापेक्षा अधिक अनुदान लाभार्थ्यांना दिले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांनाही सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) वापरासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासर्व प्रयत्नामुळे वीजेच्या देयकात बचत होण्यास मदत होईल.

मुढाळे वीज उपकेंद्रामुळे परिसरातील वीजेच्या समस्या सोडविण्यास मदत होणार

मुढाळे गावासहित परिसरातील गावांची वीजेची समस्या विचारत घेता मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्राकरीता सुमारे ६२ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर मुढाळे, माळेगाव, पणदरे, सांगवी, होळ, कऱ्हावागज, कोऱ्हाळे आदी गावांना नियमित दाबाने अखंड वीजपुरवठा होण्यासह विजेचा भारही कमी होणार आहे. ही यंत्रणा नसून राज्य शासनाच्या सक्षमीकरणाची पायरी आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या उपकेंद्राचे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. उपकेंद्र परिसरात अधिकाधिक वृक्षारोपन करुन ती जगविण्याकरीता प्रयत्न करावे.

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत बारामती तालुक्यात १ हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत काळानुरुप बदल विचारात घेता नागरिकांना सोई-सुविधा मिळण्याकरीता सुमारे १ हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक विकासकामे करीत असताना ती दर्जेदार, टिकाऊ व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. विकास कामे करतांना समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून काम करण्यात काम करण्यात येत आहे, याकामी नागरिकांनीही सहकार्य करावे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा खरीप हंगाम आढावा आवश्यक ते नियोजन करण्यात येईल. याबाबतीत कुठलीही कमतरता भासणार नाही, याकरीता कृषी खात्यासोबत लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत दर्जेदार रोपे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

हरिहरन यांच्या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून १४ लाखांचा अपहर करणाऱ्या मोरया एंटरटेनमेंटचे विशाल गोरगोटे विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-सुप्रसिध्द गायक हरिहरन यांचा २१/९/२०२४ राेजी पुण्यातील कर्वेनगर येथील महालक्ष्मी लाॅन्स येथे कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला माेरया एंटरटनेमेंट एलएलपी कंपनीने आयाेजन केले हाेते. परंतु व्यैक्तिक कारणावरून त्यांनी सदर कार्यक्रम रद्द केला. मात्र, हरिहरन यांच्या विनंतीवरून स्वरझंकार हबने पुढाकार घेऊन केला. यादरम्यान बुक माय शाे वरून येणारे तिकिटाचे पैसे माेरया एंटरटेनमेंट यांनी स्वरझंकार हबला देण्याचा करार देखील झाला. मात्र, माेरया एंटरटेनमेंटने या कार्यक्रमाचे १४ लाख १७ हजार रुपये स्वरझंकार यांना न देता सदर रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी माेरया एंटरटेनमेंट एलएलपीचे मालक विशाल गाेरगाेटे यांचेवर वारजे माळवाडी पाेलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजस अतुलकुमार उपाध्ये (वय- ३१,रा. सहकारनगर,पुणे) यांनी आराेपी विशाल गाेरगाेटे विराेधात पाेलीसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकित गायक हरिहरन यांचा कार्यक्रम माेरया एंटरटेनमेंट एलएलपी यांनी अायाेजित केला हाेता. परंतु त्यांना काही अडचणी आल्याने त्यांनी सदर कार्यक्रम रद्द केल्यावर गायक हरिहरन यांचे विनंतीवरून तक्रारदार राजस उपाध्ये यांनी हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले हाेते. याबाबत हा कार्यक्रम हाेण्याकरिता रितसर सामंजस्य करार देखील झाला. सदरच्या कार्यक्रमाचे तिकिट विक्रीचे पैसे बुक माय शाेवरून माेरया एंटरटेनमेंट एलएलपी यांचे खात्यावर जाणार असल्याने सदरचे पैसे हे तक्रारदार यांचे स्वरझंकार हबचे खात्यावर येण्याकरिता आराेपी यांचेशी करार झाा हाेता. परंतु या कार्यक्रमाचे १४ लाख १७ हजार रुपये देण्याचे ठरलेले असताना देखील आराेपीने हे पैसे तक्रारदार यांना दिले नाही. तसेच त्यांची दिलेला चेक देखील बँकेत बाऊंस झाल्याने सदरचे पैसे तक्रारदार यांनी वारंवार मागून देखील त्यांना आराेपीने टाळल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी याबाबत पाेलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस तरडे करत आहे.

बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला

मुंबई बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला
कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नसल्याची सडेतोड प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाविषयी दिली आहे. या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठे दावे केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिले नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत पुस्तकाबद्दल म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ते सत्य आहे, ती कादंबरी नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेकांना मदत केली. मात्र, ते बोलून दाखवले नाही. शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर आहे. शिवसेनाप्रमुखांची गोध्राबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोलले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केली नाही. संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात. त्यांना वाटते मी जे बोललो किंवा लिहले ते खरे आहे असे लोकांनी मानले पाहिजे.
कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नसल्याची सडेतोड प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाविषयी दिली आहे. या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठे दावे केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिले नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत पुस्तकाबद्दल म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ते सत्य आहे, ती कादंबरी नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेकांना मदत केली. मात्र, ते बोलून दाखवले नाही. शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर आहे. शिवसेनाप्रमुखांची गोध्राबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोलले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केली नाही. संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात. त्यांना वाटते मी जे बोललो किंवा लिहले ते खरे आहे असे लोकांनी मानले पाहिजे.

बाळासाहेब ठाकरेंचे मोदी-शहांवर अनंत उपकार! शरद पवारांनीही मदत केल्याचा दावा,शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी अमित शहा निर्घृणपणे वागले

संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकात गौप्यस्फोट:मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली
मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अमित शहा हे देशाच्या राजकारणात राहणार नाही, असा दावा काल केला होता. त्यानंतर आता त्यांच्या या पुस्तकातील काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांना त्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शरद पवार यांनी देखील मदत केली होती. असा दावा या पुस्तकात करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या या पुस्तकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशाप्रकारे मदत केली याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर गुजरात दंगल प्रकरणात वाचवण्यासाठी शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशा पद्धतीने मदत केली, याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवार यांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली. तसेच अमित शहा यांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोन नंतर शरद पवारांनी कशी सूत्रे हलवली याबाबत देखील या पुस्तकात संजय राऊत यांनी लिहिले आहे.अमित शहा यांच्या मागे सीबीआय तपासाचा ससेमिरा लागल्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेच मदत करू शकतात, असे कोणीतरी सुचवले होते. त्यामुळे लहान असलेल्या जय शहाला घेऊन अमित शहा हे मुंबईत पोहोचले होते. मात्र कलानगरच्या मुख्य गेटवरच शहा यांना अडवून ठेवण्यात आले होते. बऱ्याच काळ प्रतीक्षा करूनही ठाकरे यांची भेट होत नसल्याने अमित शहा हे घामाघूम झाले होते. असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. मात्र त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी देखील शहा मातोश्रीवर पोहोचले. मात्र शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण भोगत आहोत, अशी दर्दभरी कहानी अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन केला. त्यानंतर अमित शहा यांची सुटका झाली असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.अमित शहा यांना राजकारणातील प्रवासात आणि जीवनात असलेला प्रमुख अडथळा बाळासाहेब ठाकरे यांनी दूर केला. त्या नंतर अमित शहा यांनी पुढे काय केले, हे सर्व जगाने पाहिले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी अमित शहा हे निर्घृणपणे वागले असल्याचे देखील आरोप संजय राऊत यांनी या पुस्तकात केले आहे.

कारणे सांगू नका, रिझल्ट द्या:नालेसफाईत ‘हात कि सफाई’ नकोच-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश

हलगर्जीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करा !

  • मान्सूनपूर्व कामांचा मोहोळ यांच्याकडून आढावा

पुणे –
मागील काही वर्षात शहरात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले असून कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देत मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार किंवा अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही सूचना केली असल्याची माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले,पल्लवी जावळे यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याचे सूचना मनपाला दिल्या आहे. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल. नालेसफाईचे यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहे. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.

मोहोळ म्हणाले, पुण्यात आधी ११७ क्रॉनिक स्पॉट होते. त्यानंतर २२ गावे समाविष्ट झाल्यावर आता ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ११७ स्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. त्याजागी नालेसफाई झाली असून उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील. इतर जे ३९ स्पॉट कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्याठिकाणी तात्पुरते उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे हाल होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मनपाला दिल्या आहे.

‘सन २०१९ मध्ये आंबील ओढा येथे पूर येऊन मोठी आपत्ती आली होती. त्यानंतर उपाययोजना काम करून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात आल्याने परत काही अडचण आली नाही. पुण्यात नगरसेवक नसले तरी मनपात आमदार, खासदार लक्ष्य देत असून समन्वयाने काम करण्याचे ठरले आहे. पुण्यात मान्सूनपूर्व कामाचा वॉर्ड निहाय रिपोर्ट करून त्याचा एकत्रित अहवाल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रत्येक जागी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यास देखील सांगितली आहे.जे नेमून दिलेली कामे करत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मनपाने अतिक्रमण बाबत कडक कारवाई करावी. आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा देखील घेतला गेला आहे. पुणे शहरासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे तो मनपाला मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

भोसरी, मोशी परिसरात दोन तास वीज खंडित

पुणे, दि. १६ मे २०२५: महापारेषण कंपनीच्या भोसरी २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील वीजयंत्रणेत
बिघाड होऊन ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे गुरुवारी (दि. १५) रात्री ९ ते ११
वाजेदरम्यान भोसरी व मोशी परिसरातील सुमारे ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दीड ते दोन तासांपर्यंत खंडित
होता.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या भोसरी (आरएस-२) अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रांमध्ये
५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र वीजयंत्रणेत बिघाड झाल्यामुळे गुरुवारी (दि. १५) रात्री ९
च्या सुमारास या दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रिपींग आले व वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या ८
उपकेंद्रांसह २२ केव्ही क्षमतेच्या १५ वीजवाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे भोसरी, डुडूळगाव,
चिखली, घरकुल, मोरेवस्ती, नाशिक हायवे, मोहननगर, जय गणेश साम्राज्य, खडीमशीन, चऱ्होली, अलंकापुरम,
चोविसावाडी, एमआयडीसीमध्ये सेक्टर ७, सेक्टर १०, सेक्टर १२, पीएमएवाय घरकुले आदी परिसरातील सुमारे
८० हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, महापारेषणकडून तातडीने वीजयंत्रणेतील बिघाड दुरूस्त करण्यात आला. दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर
अनुक्रमे रात्री १० व १०.३० च्या सुमारास सुरू करण्यात आले. त्यानंतर महावितरणकडून रात्री १०.३० ते ११
वाजेदरम्यान सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

फडणविसांनी केले शरद पवारांचे कौतुक,CM फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर

मुंबई-मुंबई येथील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम येथे नामकरण सोहळा पार पडला. यावेळी क्रिकेटपटू रोहित शर्मा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. अजित वाडेकर यांच्याही नावाचे स्टँड यावेळी उभारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर दिसून आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांचे क्रिकेटमधील योगदान नेहमीच लक्षात राहील असे शरद पवार साहेब तसेच आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध करणारे रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी भगिनी आणि बंधूंनो मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. मी एमसीएने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो.

शरद पवार यांच्याबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही की भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणि क्रिकेटचे जे प्रशिक्षक असतील त्यांच्यात शरद पवार यांचे नाव नेहमीच आदरणीय राहील. बीसीसीआय असेल किंवा आयसीसी असेल यात शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे एमसीएने शरद पवार यांच्या नावाचे स्टँड उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे याचे मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माझे मित्र अमोल काळे यांनी एमसीएमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. अमोल काळे यांना ईश्वराने अचानक नेले पण त्यांनी पाहिलेले स्वप्न एमसीए नक्कीच पूर्ण करेल. एमसीए लौंजला त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच रोहित शर्मा म्हणजे जे मैदानात आल्यावर मैदान दणाणून सोडतात. त्यांनी अशा दोन स्पर्धा जिंकवून दिल्या आहेत, ज्या आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण करून दाखवल्या. त्यांचे मैदानात मोकळेपणे वागणे अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कर्णधार म्हणून सगळ्या फॉरमॅटमध्ये अतिशय सुंदर आहे. आम्ही आता वाट पाहत आहोत की त्यांचा एक शॉट कधी रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो याची आम्हा सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगले आणि अधिक काळ खेळतील.

खरे तर लोक पूर्वी असे म्हणायचे की लॉर्ड ही क्रिकेटची पंढरी आहे. परंतु खरी पंढरी ही वानखेडे आहे. पंढरी तिथे देव त्या अर्थाने वानखेडे येथे सचिन तेंडुलकरचा पुतळा आहे. वानखेडे पेक्षा मोठे स्टेडियम उभारण्याची जागा आम्ही उपलब्ध करून देऊ जिथे एक लाख प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. चार वर्षांनी एमसीएला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी अजून एक नवीन स्टेडियम उभारले जाईल, असा आपण प्रयत्न करू. या अतिशय सुंदर कार्यक्रमात तुम्ही मला बोलावले हा मी माझा सन्मान समजतो.

पुणे महापालिका निवडणूक:भाजप १२५ जागांवर लढणार , युतीबाबत प्रदेश पातळीवर निर्णय होणार

पुणे-पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजपने १२५ जागांवर लढण्याची तयारी चालविली आहे तर अन्य सुमारे ५० जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना सोडण्याची तयारी शर भाजपने दर्शविण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे भाजपने जाेरात तयारी सुरु केली आहे. पुन्हा एकदा भाजपचा महापाैर महानगरपालिकेत बसला पाहिजे. यादृष्टीने काम करा असे फडणवीस यांनी देखील सांगितले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले कि,’ सध्या भाजपचे पुण्यात १०५ नगरसेवक असून त्या १०५ जागा पुन्हा निवडून येणे ही पक्षाची प्राथमिक प्राधान्याने तयारी आहे. त्या संदर्भातील उमेदवारी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन घेतला जाईल. आता आम्ही भाजप पक्ष म्हणून ज्या ज्या ठिकाणी जागा आहे तिथे तयारी करण्यास लागणार आहे. महायुती म्हणून निवडणुक लढवायची असेल तर आम्ही आमचे मत जे असेल ते निश्चित मांडू पण त्याबाबतचा जागांचा फाॅर्म्युला हा प्रदेश स्तरावर ठरणार आहे,असे मत व्यक्त केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात गुरुवारी रात्री मुक्कामी असल्याने शुक्रवारी सकाळी त्यांना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी आमदार जगदीश मुळीक, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी भेट घेत आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.

याबाबत घाटे म्हणाले, काही नगरसेवक आमचे मागील निवडणुकीत कमी मतांनी पडलेले आहे. त्यामुळे जागांचे गणिताबाबत जागांची जुळवाजुळव आम्ही करत आहे. परंतु सन २०१७ च्या निवडणुकीत ज्या जागावर भाजप नगरसेवक विजयी झाल्या आहे त्या सर्व जागा आम्ही लढणारच आहे. मागील तीन वर्ष निवडणुक न झाल्याने आम्ही थांबलेलाे हाेताे. आता न्यायालयाने निर्णय दिल्याने आम्ही तयारीस लागलाे आहे. स्वबळावर निवडणुक की युतीत लढायचे आहे याबाबतचा निर्णय प्रदेश स्तरावर हाेणार असला तरी आम्ही आमची निवडणुक तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री यांनी काेणता कानमंत्र आम्हाला दिला नाही. त्यांनी काही सूचना दिल्या आहे त्यानुसार आम्ही आमचे काम सुरु केले आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा सांभाळल्या बद्दल त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री खालील पातळीवर चर्चा करुनच नंतर प्रदेश स्तरावर पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेतील. पुण्यात रविवारी दुपारी चार वाजता डेक्कन येथून फर्ग्युसन रस्त्यावर माेठी तिरंगा यात्रा आयाेजन केले आहे. यामध्ये पुण्यातील विविध मंडळे, संस्था, पक्ष व नागरिक यांनी सहभागी हाेण्याचे आवाहन केले आहे. भारत व पाकिस्तान मध्ये जे युध्द झाले त्यात भारतीय सैन्याने जी अतुलनीय कार्य केले त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही रॅली आहे.

धर्मादाय रुग्णालयांची सेवा सर्वसामान्यांपर्यंत मिळावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : शहराच्या आरोग्य क्षेत्रातील ‘लाईफ लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मादाय (आयपीएफ) योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि ही योजना सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावी, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी (गुरुवारी) आयपीएफ संबंधात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले .

“महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय रुग्णालय चौकशी समिती सदस्य” या नात्याने योजनेच्या कार्यवाहीसाठी जबाबदार शासकीय अधिकारी आणि धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सुसज्ज आणि दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवताना येणाऱ्या समस्या व अडचणींवर चर्चा झाली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या बैठकीस प्रमुख धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात सध्या सुमारे ६० रुग्णालये आयपीएफ योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल (निर्धन) रुग्णांना दिला जातो, अशा रुग्णांच्या तक्रारी आणि रुग्णालयांना भेडसावणाऱ्या समस्या यामध्ये समन्वय साधून योजना प्रभावीपणे कशी राबवता येईल, यावर सखोल विचारविनिमय झाल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी नगर मतदारसंघातील वैद्यकीय गरजांचा विचार करता, काही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता भासते. येत्या काळात, योजनेअंतर्गत समाविष्ट सर्व रुग्णालयांमध्ये अधिक सक्षम समन्वय साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन, असा निर्धार आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

बैठकीला धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी, धर्मादाय कार्यालयातील न्यास निरीक्षक, समन्वयक, तसेच जिल्हा प्रशासनातील सुहास मापारी (अप्पर जिल्हाधिकारी), सुयोग दिवसे (नायब तहसीलदार, सर्वसाधारण शाखा), डॉ.मानसिंगजी साबळे (अध्यक्ष – मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे) तसेच आनंद छाजेड आणि प्रकाश सोळंकी उपस्थित होते.

२०२२ नुसारच प्रभागरचना:एकनाथ शिंदे

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभागरचना होती, त्याच प्रभागरचनेनुसार राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील,’ असे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका घेतल्या जाणार असून, महायुतीच्या माध्यमातून राज्यात सत्ताधारी असलेले तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील,’ असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या कार्यशाळेचे आयोजन ‘यशदा’ येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आले असता, शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक घेण्याबाबतचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ नुसारच प्रभागरचना असणार आहे.

राज्यात सत्ताधारी असलेले तिन्ही पक्ष लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढले. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकादेखील महायुतीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार आहेत.’

…पीएमआरडीएचा विकास आराखडा जरी माझ्या कार्यकाळात झाला असला तरी तो रद्द झाला कारण त्यात काही त्रुटी असल्याचे शिंदे यांनी यावेळी मान्य केले. विकास आराखडा हा त्या शहरातील नागरिकांच्या विकासाचा विचार करून झाला पाहिजे. त्यामुळे नियोजित शहर कसे असेल याचा विचार करून व त्रुटी दूर करून नव्याने हा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केले जात आहे.

विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शहरांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्र्यांनी मांडला शहर विकासाचा रोडमॅप

पुणे दि.१५: विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी चांगल्या योजना राबविल्यास राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नगरविकास विभागातर्फे राज्यातील महानगरपालिका आयुक्त आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकरिता यशदा येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. विकासाची प्रक्रिया नागरिकरणाभोवती फिरते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या चार गोष्टींसाठी नागरिक शहराकडे आकर्षित होतात. असे असताना विकासासोबत वाढत्या शहरीकरणाचा योग्यरितीने विचार न केल्याने शहर विकासाचे योग्य धोरण करण्यात आले नाही आणि त्यामुळे शहरातील समस्या निर्माण झाल्या. राज्यात ६ कोटी लोक ४५० शहरात राहतात. ही शहरे सुंदर करता आली तर ५० टक्के जनतेचे जीवनमान उंचावता येईल.

शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर भर द्या
शहरी भागातील प्राथमिक आरोग्य सुविधा निर्मितीकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी केंद्र आणि राज्यशासनाच्या योजनांची अंमलबजावणी करावी. महानगरपालिकेच्या शाळेत गरीबाच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी त्याचा नियमित आढावा घेऊन त्यातील अडचणी दूर करणे गरजेचे आहे. पाणी पुरवठ्यासाठी योग्य वितरण प्रणाली उभी करणे आणि मीटर पद्धत सुरू करणे तेवढेच महत्वाचे आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठीच्या अशा योजनांसाठी शासन सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शहराच्या आर्थिक विकासाला चालना द्या
गेल्या काही वर्षात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. वस्तू आणि सेवा पुरविताना नवा दृष्टिकोन स्वीकारण्यासह नव्या कल्पना अंमलात आणाव्या लागतील. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उभारण्याचे नवे स्रोत शोधावे लागतील, त्यासोबत करांच्या वसुलीकडेही लक्ष द्यावे. शहराच्या आर्थिक प्रगतीवर भर दिल्यास नागरिक कर भरण्यास पुढे येतील. चांगल्या प्रकल्पासाठी खाजगी क्षेत्रातूनही निधी सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यादृष्टीने शहरच्या शाश्वत विकासाचे नियोजन करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले. शहर विकासाच्या आराखड्याद्वारे शहराचा सुनियोजित विकास करता येतो. सुनियोजित रस्ते तयार केल्यास शहर सुंदर करता येतील, असेही ते म्हणाले.

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांनी चांगली कामगिरी केली. नव्याने केलेल्या सुधारणा संस्थात्मक पातळीवर राबवल्या गेल्यास प्रशासन निरंतर सुधारत राहील. आता १५० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये ई- गव्हर्नसचा उपयोग आणि मनुष्यबळ विकासावर भर द्यायचा आहे. यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल. मनुष्यबळासंबंधी सुधारणा करून आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रशासन अधिक कार्यक्षम करता येईल.

राज्य आणि केंद्राकडून मिळणारा निधी वेळेवर खर्च करून विकासाला गती देणे गरजेचे आहे, त्यासाठी डिजिटल प्रणालीचा पूर्ण वापर करणे महत्वाचे आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे कामावर नियंत्रण ठेऊन गुणवत्ता सुनिश्चित करण्याची गरज आहे. शासकीय सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून यामध्ये विविध उपक्रम राबविल्यास ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चा आराखडा तयार करणे सुलभ होईल. यासाठी सर्वांच्या सूचना उपयुक्त ठरतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सुंदर व सुनियोजित शहरांसाठी शासनाचे सहकार्य-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या विकासात महानगरपालिका आणि नगरपालिकांचा महत्वाचा वाटत आहे. सर्व शहरांचा समान विकास झाल्यास राज्यात विकासाचा असमतोल राहणार नाही, त्यासाठी शहरातील समस्या दूर कराव्या लागतील. शहरीकरणाचा वेग वाढत असताना नागरिकांना सुविधा देण्याची जबाबदारी वाढली आहे. ५ कोटी पेक्षा अधिक नागरिक शहरी भागात रहात असल्याने तेथील समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागेल, यासाठी शासन महानगरपालिका आणि नगरपालिकांना सहकार्य, करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

महानगरपालिकांनी निश्चित उद्दिष्ट समोर ठेऊन काम करावे आणि कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा. भविष्यात नव्या झोपडपट्ट्या होणार नाहीत यावर लक्ष देताना समूह विकासावरही लक्ष द्यावे. यासाठी क्षेत्र भेटी आणि महत्वाच्या प्रकल्प भेटीवर भर द्यावे. अशाने गुणवत्तापूर्ण काम सुनिश्चित करता येईल. जनतेला हक्काचे घर दिल्यास शहरे सुंदर व सुनियोजित होतील. यापुढे शहरांत अतिक्रमण होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे. सांडपाणी व्यवस्थापन, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, वेस्ट टू एनर्जीसारखे उपक्रम, उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राबवून शहरे अधिक सुंदर करता येतील, असेही श्री. शिंदे म्हणाले.

शासनामार्फत गतकाळात लोकाभिमुख योजना आखण्यात आल्या आणि अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. याआधी ‘शासन आपल्या दारी’ यासारखे उपक्रम राबविले गेले. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने जनतेच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे. जनतेला शासनाच्या विविध सेवा व सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, प्रशासनाला गती मिळावी,यासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला. त्यात गुंतवणूक, क्षेत्रीय कार्यालयाना भेटी, स्वच्छता, प्रशासकीय सुधारणा यावर भर देण्यात आल्या. आता १५० दिवस कार्यक्रमही त्याचं पद्धतीने राबवून राज्याच्या विकासाला वेग देण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे म्हणाले. सर्व क्षेत्रात राज्य पुढे जात असताना आपली शहरे विकसित करण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून मंथन व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शहर सुंदर करण्यासाठी प्रयत्न करा-राज्यमंत्री माधुरी मिसाळ
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, शहरी भागातील समस्या दूर करण्यासाठी विविध उपायांबाबत कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. बेकायदेशीर बांधकामामुळे शहरे बकाल होऊ नयेत यासाठी उपाय करण्याची आवश्यकता आहे. याबाबत शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने काम करताना लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुधारणांबाबतही विचार व्हावा. शहरे सुंदर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अतिरिक्त मुख्य सचिव गुप्ता म्हणाले, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थानी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी १५० दिवस कार्यक्रमांतर्गत ई- गव्हर्नन्सचा उपयोग करावा. महानगरपालिका आणि नगरपालिकांनी विकास प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचे नवे स्रोत शोधावे. काळानुरूप कामकाजात सुधारणा करण्यावर भर द्यावा. महानगरपालिका आयुक्त पदावर काम करताना मिळणाऱ्या संधीचा उपयोग करून शहराच्या विकासावर अधिक भर द्यावा असे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी प्रस्ताविकात कार्यशाळेची माहिती दिली. राज्याच्या शहरी भागात सर्वांगीण विकास करताना कामाची गुणवत्ता, केंद्राकडून अधिक निधी मिळविणे, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग आणि कामाचा वेग वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांवर कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सकारात्मक भावनेने आणि क्षमतेने काम करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
0000