बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला

Date:

मुंबई बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिले नाही:देवेंद्र फडणवीसांचा ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला
कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नसल्याची सडेतोड प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाविषयी दिली आहे. या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठे दावे केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिले नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत पुस्तकाबद्दल म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ते सत्य आहे, ती कादंबरी नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेकांना मदत केली. मात्र, ते बोलून दाखवले नाही. शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर आहे. शिवसेनाप्रमुखांची गोध्राबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोलले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केली नाही. संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात. त्यांना वाटते मी जे बोललो किंवा लिहले ते खरे आहे असे लोकांनी मानले पाहिजे.
कथा, कादंबऱ्या किंवा बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नसल्याची सडेतोड प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाविषयी दिली आहे. या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठे दावे केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांना वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिले नाही. त्यामुळे अशा गोष्टी मी वाचत नाही. संजय राऊत कोण आहेत? ते खूप मोठे नेते आहेत का? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये ‘राजा का संदेश साफ है’ या नावाचे प्रकरण लिहिलेले असल्याची माहिती आता समोर आली आहे. आजपर्यंत कधीही समोर न आलेले अनेक खळबळजनक दावे यामध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन गुजरातचे आमदार अमित शहा यांच्यावर मोठे उपकार केले असल्याची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

गुजरात दंगल प्रकरणात सीबीआयचा ससेमिरा अमित शहा यांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्यांना तडीपार देखील करण्यात आले होते. ही तडीपारी दूर करण्यासाठी अमित शहा हे मातोश्री दरबारी आले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक फोन करून अमित शहा यांना या संकटातून कसे बाहेर काढले, याची माहिती देणारा दावा देखील या पुस्तकात करण्यात आला आहे.

संजय राऊत पुस्तकाबद्दल म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला याचे आम्हाला दुःख नाही. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाने लोफर व्यक्तींच्या हातात दिला. ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकात लिहिलेला प्रत्येक प्रसंग हा सत्य घटनेवर आधारित आहे. ते सत्य आहे, ती कादंबरी नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पुस्तकाबद्दल मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेकांना मदत केली. मात्र, ते बोलून दाखवले नाही. शिवसेनाप्रमुखांचा असा उल्लेख करणे गैर आहे. शिवसेनाप्रमुखांची गोध्राबाबतची भूमिका काय होती त्यावर स्पष्ट बोलले पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी काही चोरी चपाटी केली नाही. संजय राऊत प्रसिद्धीसाठी बोलत असतात. त्यांना वाटते मी जे बोललो किंवा लिहले ते खरे आहे असे लोकांनी मानले पाहिजे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता जागेवर निपटारा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपक्रम; ७५ टक्के...

बाजीराव पेशवे यांच्या पालखेड विजय स्मारकासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य

स्मारकासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही; अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख...

भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे-दीप्ती चवधरी

            पुणे-भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे जाणारा असल्याची टीका...

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

मुंबई, दि. १९ जून २०२६: महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून...