Home Blog Page 360

आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या चरणी मान्यवरांची हजेरी

पुणे : पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत या वर्षी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. नाम-ज्ञान-प्रेम-दानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात भक्तीसंगीत, पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन श्री दुगड जीवदया संस्था जवळ,आगम जैन मंदिर समोर, कात्रज,पुणे येथे करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.

यावेळीराज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे,सहपोलिस आयुक्त रंजन कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील ,राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, श्री सुसवाणीमाता सच्चीयायमाता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड, गौरव दुगड,मोनल दुगड,आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, दुगड परिवाराने मंदिर बांधले तेंव्हापासून मी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या दर्शनाला येत आहे. नावरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण राज्याला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो अशी देवी चरणी प्रार्थना केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रात ओल्या दुष्काळात बळीराजा सापडला आहे, या बळीराजाला लढण्याचे बळ दे हीच प्रार्थना सणाच्या निमित्ताने मी आदिशक्ती माता सच्चीयाय देवीच्या चरणी केली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही मदत या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला करणे शक्य आहे ती करूया, हीच मदत देवीसाठी सर्वात मोठी सेवा ठरेल.

सहपोलिस आयुक्त रंजन कुमार म्हणाले, पुणेकरांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ,आज दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, राज्यात आज ओला दुष्काळ पडला आहे, या सणाच्या निमित्ताने संकतावर माता करण्यासाठी आपण सर्व मिळून शेतकऱ्याला मदत करूया हीच खरी प्रार्थना ठरेल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, दुगड परिवाराच्या निमंत्रणांवरून आज माता सच्चीयाय देवीची आरती करण्याचा योग आला, सध्या राज्यात ओल्या दुष्काळाचे संकट आहे, या संकतावर मात करण्याची शेतकऱ्याला शक्ति द्यावी हीच प्रार्थना देवीच्या चरणी केली.

लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात

पुणे: लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 D2 तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे.

या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० व्यक्तींना सन्मानित करणार आहेत. सन्मान मिळविणाऱ्यांमध्ये उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, विज्ञान, महिला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल. यामध्ये श्री. अनिल बांगडिया, रवि अग्रवाल, डॉ. अभिजीत सोनवणे, लायन सलीम शिकलगार, डॉ. अशोक अग्रवाल, ऋतुजा जाधव, डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. रश्मी आणि डॉ. सिद्धार्थ टंडन यांचा विशेष समावेश आहे.

प्रेस कॉन्फरन्समध्ये लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल यांनी सांगितले की हा सोहळा केवळ सन्मानाचा मंच नसून समाजोपयोगी प्रकल्पांसाठी आर्थिक सहकार्य मिळविण्याचे एक माध्यमदेखील आहे. या प्रसंगी लायन रवि अग्रवाल, लायन अविनाश साकुंडे, लायन गिरीश संभ्याल आणि लायन सुशांत झवेरी उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या सामाजिक सेवा
लायन्स इंटरनॅशनल गेल्या १०८ वर्षांपासून २०० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून दरवर्षी ३० कोटींहून अधिक लोकांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य करते. प्रांत 3234 D2 (पुणे, अहमदनगर, नाशिक) तर्फे डायबिटीस, कर्करोग, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक व मानसिक आरोग्य या क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहेत.

लवकरच धर्मपुत्र अभियान (अकेले राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक आधार) तसेच नवा सवेरा (अंधत्व निर्मूलनासाठी नेत्रदान अभियान) सुरु केले जाणार असून हे उपक्रम समाजाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.

गांधी विचाराला विरोधाच्या वृत्तीने देशाची स्थिती व भवितव्य धोक्यात-ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले

गांधी विचारानेच जगात शांती आणि समृद्धी नांदू शकेल -गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार

पुणे-

कर्तुत्ववान महिलांचा गौरव आणि उद्योजकांसाठी ब्रँड मार्गदर्शन.

पुणे – बिझनेस आयकॉन तर्फे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा (नवदुर्गांचा) सन्मान करण्यात आला. या विशेष सोहळ्यात समाज, शिक्षण, सुरक्षा, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या महिलांच्या कार्याचा स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान “असा घडतो ब्रँड” या विशेष सदरात बिझनेस आयकॉनचे पराग गोरे यांनी चितळे बंधूंचे इंद्रनील चितळे आणि प्रख्यात बिझनेस कोच व मेंटोर चकोर गांधी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ब्रँड निर्मितीचे विविध टप्पे ,उद्योजकांना येणारी आव्हाने व त्या पार करत व्यवसायाचे यशस्वी ब्रँडमध्ये रुपांतर कसे करता येते याबाबत सखोल चर्चा झाली. या कार्याक्रमाल्ला उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. महिलांच्या सन्मानासह ब्रँड जर्नीवरील चर्चा या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान आणि ब्रँड प्रवासाच्या कथा या दोन्ही गोष्टींनी उद्योजकांना केवळ प्रेरणा नाही तर नवा उत्साह आणि दिशा दिली.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता…एक हजार महिलांनी केली महाआरती

पुणे -पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता आज महाआरतीने संपन्न झाली. शिवदर्शन-सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिरात एक हजारहून अधिक महिलांनी श्री लक्ष्मीमातेची महाआरती केली. प्रारंभी देवीची गाणी सादर केली गेली. वेदिका निकम हिने जोगवा सादर केला. त्यानंतर महाआरती संपन्न झाली. तेव्हा सारे वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. एस. सरोदे (प्रथम क्रमांक), माला कांबळे (द्वितीय क्रमांक), पद्मा धनगर ( तृतीय क्रमांक) याशिवाय असंख्य उत्तेजनार्थ ५०हून अधिक महिलांना बक्षिसे देण्यात आली.

अशा प्रकारे हा २७वा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यशस्वी झाला. विविध स्पर्धांमध्ये ५०००हून अधिक महिला सहभागी झाल्या आणि हा महोत्सव यशस्वी केला, याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला.

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा;या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 1 :- बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी होते. बैठकीत कंकालेश्वर मंदिर, बीड व श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय, औंध (जि. सातारा) या राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन-दुरुस्तीच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, दूरदृष्य प्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बाराव्या शतकातील यादवकालीन कंकालेश्वर मंदिराच्या जतन-दुरुस्तीकरिता शासनाने 9 कोटी 14 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जलकुंडातील स्थापत्यदृष्ट्या आकर्षक असणाऱ्या या मंदिराच्या संवर्धनाबरोबरच परिसराचे सुशोभीकरण, सरोवरातील गाळ काढणे, पदपथ-दुरुस्ती, मंदिर जोत्यांचे मजबुतीकरण, गळती प्रतिबंधक योजना, बाग-बगीचा विकास अशी कामे करण्यात येणार आहेत. या मंदिराच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र आहे. औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी याची स्थापना केली. जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे, शिल्पकला, दुर्मीळ ग्रंथ आणि पुरातन वस्तू यांचा अमूल्य ठेवा या संग्रहालयात जतन केला आहे. संशोधक, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. औंध संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्याअंतर्गत इमारतीचे संवर्धन, नवीन बांधकाम, अंतर्गत दालनांची उभारणी तसेच चित्रे-शिल्पे-ग्रंथांचे जतन अशा कामांचा समावेश आहे. कंकालेश्वर मंदिर आणि औंध संग्रहालय हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव आहे. या दोन्ही ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, मात्र या वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखूनच कामे करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यासर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहीन-आमदार सिद्धार्थ शिरोळे


‎पुणे : विद्यार्थ्यांचे हित, अध्यापनातील गुणवत्ता, संशोधनास चालना आणि उच्च शिक्षणाचा सर्वांगीण विकास यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून कार्यरत राहीन, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सत्कार प्रसंगी बोलताना दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

‎या प्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ.गोसावी म्हणाले, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची सिनेट सदस्य म्हणून झालेली नेमणूक ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या अनुभवातून आणि दूरदृष्टीतून विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विकासात्मक कामकाजाला निश्चितच नवी दिशा मिळेल.”

‎या गौरवाबद्दल आमदार शिरोळे यांनी कुलगुरूंचे आभार मानले. सिनेट सदस्य या नात्याने विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय व विकासात्मक कामकाजामध्ये माझे सक्रीय योगदान राहील, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

‎या कार्यक्रमाला विद्यापीठातील सिनेट सदस्य, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

भारतातील अवघ्या 1687 लोकांकडे देशाची अर्धी संपत्ती..पहा यात कोणाची किती संपत्ती

हुरुन इंडियाने आज, १ ऑक्टोबर रोजी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची M3M हुरुन रिच लिस्ट २०२५ जाहीर केली. यादीनुसार, मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब ₹९.५५ लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह यादीत अव्वल स्थानावर आहेत. गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब ₹८.१५ लाख कोटींच्या एकूण संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

यावेळी यादीत १,६८७ व्यक्तींचा समावेश आहे. सर्व श्रीमंतांची एकत्रित संपत्ती १६७ लाख कोटी रुपये आहे, जी भारताच्या जीडीपीच्या जवळपास निम्मी आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल स्थानावर

कुटुंब/व्यक्तीमालमत्ताएका वर्षात मालमत्ता किती वाढली किंवा कमी झाली?
मुकेश अंबानी कुटुंब९,५५,४१० कोटी-६%
गौतम अदानी कुटुंब८,१४,७२० कोटी-३०%
रोशनी नादर मल्होत्रा ​​कुटुंब२,८४,१२० कोटीनवीन एंट्री
सायरस पूनावाला कुटुंब२,४६,४६० कोटी-१५%
कुमार मंगलम बिर्ला कुटुंब२,३२,८५० कोटी-१%
नीरज बजाज कुटुंब२,३२,६८० कोटी+४३%
दिलीप संघवी२,३०,५६० कोटी-८%
अझीम प्रेमजी कुटुंब२,२१,२५० कोटी+१६%
गोपीचंद हिंदुजा कुटुंब१,८५,३१० कोटी-४%
राधाकिशन दमाणी कुटुंब१,८२,९८० कोटी-४%

स्रोत: एम३एम हुरुन रिच लिस्ट २०२५

शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत सामील झाला

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत सामील झाला आहे. त्याची संपत्ती ₹१२,४९० कोटी इतकी आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा पुन्हा एकदा अब्जाधीश झाले आहेत. या वर्षी भारतात १३ नवीन अब्जाधीशांची भर पडली असून एकूण संख्या २८४ झाली आहे.

या यादीतील सर्वाधिक ४५१ लोक मुंबईतील आहेत

यावेळी, १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या १,६८७ व्यक्तींचा समावेश करण्यात आला. त्यापैकी २८४ नवीन नावे होती. यादीत मुंबईतील सर्वाधिक ४५१ लोक होते, त्यानंतर दिल्ली (२२३) आणि बंगळुरू (११६) यांचा क्रमांक लागतो. यादीत १०१ महिलांचाही समावेश आहे.

पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्यानिमित्त तीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे होणार दहन

पुणे-रावण दहनाची पूर्व तयारी म्हणून रावणाच्या मुखवट्यांचे काम लोकमान्य नगर येथील जॉगिंग पार्क या ठिकाणी सुरू आहे. यंदा 30 फुटी रावण असणार असून ओला दुष्काळ, अत्याचारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी अशा रूपात्मक रावणाच्या प्रतिकृतीचे दहन पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७. ०० वा. लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळ करण्यात येणार आहे.

अशी माहिती पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी दिली. उत्सव प्रमुख डॉ. नरेश मित्तल, निमंत्रक शुभांगी सातपुते आहेत.

शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली, मनुस्मृती व बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा: हर्षवर्धन सपकाळ

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या व दिवाळीच्या आधी कर्जमाफी करा.

मुंबई, दि. १ ऑक्टोबर २०२५

संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना, महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत सर्व क्षेत्राची दारे उघडी केली आहेत. पण भाजपाच्या राजवटीत संविधानाची पायमल्ली केली जात आहे. गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता व राजसत्ता असावी हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या या धोरणाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा आम्ही जाहीर निषेध व धिक्कार करतो. संघाला १०० वर्षे होत आहेत, शिशुपालाप्रमाणे आरएसएसचीही शंभरी भरली आहे आता त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘बंच ऑफ थॉट’ चे दहन करून रा. स्व. संघ विसर्जित करावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

संविधान सत्याग्रह पदयात्रेचा आज वर्धा जिल्ह्यात प्रवेश झाला. तिसऱ्या दिवशीची पदयात्रा खडकीपासून सुरू होऊन लालवानी, वर्धा येथे पोहचणार आहे. या यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या २ ऑक्टोबर रोजी ही पदयात्रा सेवाग्राम आश्रमात दाखल होत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु असलेल्या या पदयात्रेत माजी मंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेस नेत्या चारुलता टोकस, शेखर शेंडे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड, राजेंद्र तिडके, संदेश सिंघलकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, कराळे गुरुजी, शैलेश अग्रवाल, फिरोज मिठीबोरवाला, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) यांच्यासह स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान मान्य नाही, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष संघाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही. मनुस्मृतीवर देश चालावा हा त्यांचा आग्रह आहे. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिले पण संघाने मात्र जाती धर्मात द्वेष वाढवला, त्यांनी विविधतेत एकता गुंडाळून ठेवली आहे. १०० वर्षात विषारी व विखारी विचार पेरला, माणसा-माणसात भेद केला, मंदिर प्रवेश नाकारला, स्त्री-पुरुष समानता नाकारली. संघाच्या विषारी झाडाच्या छायेत भ्रष्टाचार वाढला, बहुजन समाज नागवला गेला. आम्ही भारताचे सर्व जाती पंथाचे लोक रा. स्व. संघाच्या या १०० वर्षाच्या काळ्या कारकिर्दीचा धिक्कार करतो, निषेध करतो. १०० वर्ष पूर्ण करताना संघाने आता संविधान अंगिकारावे, महात्मा गांधींचा फोटो व संविधान संघ कार्यालयात ठेवावे तसेच रा. स्व. संघाची नोंदणी करावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..

दिवाळीआधी शेतकरी कर्जमाफी द्या.
राज्यातील अतिवृष्टी व महापुरावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, शेतकरी हवालदिल आहे, पिकं नष्ट झाली आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे, त्यांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे पण सर्वे व पंचनाम्याच्या नावाखाली सरकार वेळकाढूपणा करत आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, तर जमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत. महायुतीने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ असून दिवाळी पूर्वी कर्जमाफी करावी असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त कार्यक्रम व आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे, दि. १ ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळात सुस्थितीत जीवन व्यतीत करता यावे, तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, या उद्देशाने ऑक्टोंबर महिना राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

याचे औचित्य साधून दि. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण पुणे विभाग व सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे “ज्येष्ठ नागरिक दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व युवक यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. तसेच, समाजकल्याण विभागाच्या वतीने विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर-सरकारी संस्थांचा सत्कार व गौरव करण्यात येईल.

यावेळी सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर देखील आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक व संबंधित संघटनांना कार्यक्रमास व आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांनी केले आहे.

युनिट मुख्यालय कोटा सैनिक तांत्रिक भरती मेळावा

पुणे, दि. १ ऑक्टोबर : सेना चिकित्सा संगठन प्रशिक्षण केंद्र एवं कॉलेज, लखनऊ येथे युनिट हेडक्वार्टर्स कोटा अंतर्गत सन २०२५-२६ साठी सैनिक तांत्रिक (नर्सिंग असिस्टंट) पदाकरिता भरती मेळावा दिनांक ०४ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

ही भरती सर्व्हिसमन, माजी सैनिक , युद्ध विधवा, विधवा तसेच सेवारत जवानांचे खरे भाऊ, माजी सैनिक आणि संरक्षण सुरक्षा कोर कर्मचाऱ्यांचा मुलगा, बंधू (जे सेना चिकित्सा संगठन मधून निवृत्त झालेले आहेत) यांच्यासाठी राहणार आहे.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत uhq2025@joinamc.in या ई-मेल आयडीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना तात्पुरत्या स्वीकृतीबाबत ई-मेलद्वारे माहिती देण्यात येईल. सूचित केलेल्या दिवशी उमेदवारांनी सेना चिकित्सा संगठन स्टेडियम, लखनऊ-रायबरेली रोड येथे उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांनी केले पाटीपूजन

पुणे : विजयादशमी अर्थात दसऱ्याचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी होत पाटीपूजन केले. शनिवार पेठेतील न्या. रानडे बालक मंदिराच्या सभागृहात आज (दि. 1) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याला पाटी-पुस्तकांचे पूजन हे ज्ञान, सरस्वती देवी आणि शिक्षणाची देवता यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. कारण हा दिवस शारदीय नवरात्रीचा एक भाग असून महासरस्वतीची उपासना केली जाते. पूजनासाठी आठ फुटी सरस्वती पाटीची रांगोळी रेखाटण्यात आली होती. त्या भोवती बसून विद्यार्थ्यांनी सामूहिक पूजा केली. राष्ट्रीय कला अकॅडमीचे अमर लांडे, रोमा लांडे यांनी रांगोळी रेखाटली होती.

पाटी पूजन अर्थात सरस्वती पूजनाद्वारे आपली संस्कृती, परंपरा जपत उत्तम आचार-विचारांचे सोने विद्यार्थांनी लुटावे, देवी सरस्वतीची कृपा असावी या करिता विद्या आणि कलेची देवता सरस्वती मातेस वंदन करावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले.

गंधाली शाह, वज्रलेपनकार स्वाती ओतारी, अभिषेक मारणे, सतीश नाहर, न्या. रानडे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका अमिता दाते तसेच शिक्षिका शिल्पा पराडकर, मेघा रोंघे, रूपाली शुक्ल, सायली फाटक, सुवर्णा ढवळे उपस्थित होत्या.

अल्फा इव्हेंटस्‌‍तर्फे शनिवारी ‌‘स्वरार्चना‌’ : सायंकालीन रागांची मैफल

पुणे : अल्फा इव्हेंटस्‌‍तर्फे ‌‘स्वरार्चना‌’ ही सायंकालीन रागांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. मैफल शनिवार, दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सेवा भवन, सी. डी. एस. एस. चौक, एरंडवणे येथे होणार आहे.

या मैफलीत ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर, ग्वाल्हेर, किराणा आणि आग्रा घराण्याची तालीम लाभलेल्या प्रसिद्ध गायिका स्मिता देशपांडे यांचे गायन होणार आहे.

संगीत कुटुंबात जन्मलेल्या स्मिता देशपांडे यांना प्रसिद्ध गायिका अलका देव-मारुलकर तसेच पंडित विवेक जोशी यांच्याकडून मार्गदर्शन लाभले आहे. पारंपरिक ग्वाल्हेर, किराणा आणि आग्रा घराण्याच्या गायकीचे सुमधुर मिश्रण हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य आहे.

भारतीय शास्त्रीय गायन क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या अपर्णा पणशीकर यांना सुरुवातीस पंडित भास्करबुवा जोशी यांचे मार्गदर्शन मिळालेले असून सध्या त्या त्यांच्या मातोश्री विदुषी मीरा पणशीकर यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घेत आहेत.

कलाकारांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), संजय देशपांडे (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 

महावितरणमधील ग्राहकसेवेच्या कार्यालयांच्या पुनर्रचनेला आजपासून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ

0

» तत्पर ग्राहकसेवा अन् कर्मचाऱ्यांच्या कामांचे विभाजन
» राज्यात १०३ नवीन कार्यालय तर ८७६ पदांची निर्मिती
» शहरी-ग्रामीणमध्ये ग्राहकसंख्येनुसार अभियंता, कर्मचारी
» कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी, कामकाजात सुसूत्रता

मुंबई, दि. ३० सप्टेंबर २०२५: महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुर्नरचनेला प्रायोगिक तत्त्वावर बुधवारी (दि. १) प्रारंभ होत आहे. येत्या महिन्याभरात कामाकाजाचा आढावा घेऊन पुर्नरचनेचा मसूदा अंतिम करण्यात येईल व दि. १ नोव्हेंबरपासून ही पुनर्रचना लागू करण्यात येईल. दरम्यान, या पुनर्रचनेच्या अंमलबजावणीच्या कालावधीत वीजग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे सर्वाधिकार परिमंडलांच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

महावितरण अंतर्गत १६ परिमंडलांमध्ये १४७ विभाग, ६५२ उपविभाग व ३२७४ शाखा कार्यालय तसेच ४,१८८ उपकेंद्रांमध्ये सुमारे ४४ हजार अभियंते व तांत्रिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, वीजबिलांची थकबाकी वसूली, वीजहानी कमी करणे आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत आहे. ही रचना सुमारे २५ वर्षांपूर्वीची आहे व त्यावेळच्या ग्राहकसंख्येनुसार करण्यात आली होती.

पूर्वीच्या रचनेचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर देखील झालेला दिसून येत आहे. त्यामुळे सरसकट कामांचा ताण कमी करून निवडक कामांची जबाबदारी द्या अशी मागणी गेल्या १० वर्षांपासून अभियंता व कर्मचाऱ्यांच्या संघटनांद्वारे करण्यात येत होती. व्यवस्थापनाने त्यासाठी विशेष समिती स्थापन करून कर्मचारी संघटनांशी वेळोवेळी चर्चा करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे.

प्रामुख्याने थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. सोबतच ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आणखी २ विभाग कार्यालय, ३७ उपविभाग आणि ३० शाखा कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांमुळे ८७६ अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदसंख्या देखील वाढली आहे. तर सध्या अस्त्तित्वात असलेल्या पदसंख्येत कोणतीही कपात होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला व आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच परिमंडल, मंडल कार्यालयांसह संलग्न इतर कोणत्याही विभागांचा या पुनर्रचनेत समावेश करण्यात आलेला नाही.

अशी आहे पुनर्रचना – महावितरणच्या विभाग कार्यालयांमध्ये कोणताही बदल न करता त्यात विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या १० सदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. विभागातील सर्व उपकेंद्र व ३३ केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम या पथकाकडे राहणार आहे. तसेच प्रत्येक विभागात सध्या अस्त्तित्वात सर्व उपविभागांचे महसूल व देयके तसेच देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी करण्यात येईल. म्हणजे एका विभागात सध्या चार उपविभाग कार्यालय असल्यास पुनर्रचनेत देखभाल व दुरुस्ती तसेच महसूल व देयके असे प्रत्येकी दोन उपविभाग राहतील. देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलींग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसूली ही कामे करणार आहेत.

ग्राहकसेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये आणखी सुसूत्रता येणार आहे. त्यांच्यावरील कामांचा ताण कमी होणार असून ग्राहकांना अधिक तत्परतेने महावितरणची सेवा मिळणार आहे. शहरी भागातील शाखा कार्य़ालयांमध्ये पुर्नरचनेत फेरबदल करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागातील शाखा कार्यालयांच्या कार्यपद्धतीत अंशतः बदल करण्यात आला आहे.

या पुनर्रचनेमुळे महसूल व देयकांच्या ग्राहकसेवेसाठी तसेच सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र उपविभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामे एकाचवेळी करण्याऐवजी आता अधिक केंद्रीत (फोकस) पद्धतीने निश्चित केलेली निवडक कामे करता येईल. कामाचे नियमानुसार तास निश्चित होतील व कामाचा ताण देखील कमी होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. पर्यायाने वीजग्राहकांना मिळणारी ग्राहकसेवा आणखी दर्जेदार होणार आहे.

या पुनर्रचनेमधून सद्यस्थितीत कमी ग्राहकसंख्येच्या नंदुरबार, वाशीम, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांसह ३५ उपविभागांना या पुर्नरचेनमधून वगळण्यात आले आहे. तर सध्याच्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बीड, नांदेड, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुनर्रचनेची अंमलबजावणी पूरग्रस्त वीज यंत्रणेची उभारणी झाल्यानंतर होणार आहे.