Home Blog Page 3567

राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजनेंतर्गत आठ प्रकरणात प्रत्येकी 75 हजार रुपये मंजूर

0

 

सातारा(जि.मा.का) : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या आज झालेल्या समितीच्या बैठकीत अपघातात मृत्युमूखी पडलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 75 हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिली.
राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी श्री.यादव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला उपशिक्षणाधिकारी पी.डी.कुंभार, उपशिक्षणाधिकारी आर.एन.चव्हाण, विस्तार अधिकारी एस.के.देशमाने, पोलीस निरीक्षक संजय सुर्वे आदी उपस्थित होते.
श्री.देशमाने यांनी विषय वाचन केले. आज झालेल्या बैठकीत पाटण तालुक्यातील तळमावले येथील वाल्मिकी विदया मंदिर 7 वीच्या वर्गात असणाऱ्या ऋषिकेश नारायण पाटील या विद्यार्थ्याचा 11 फेब्रुवारी 2014 रोजी मृत्यू झाला होता. कराड तालुक्यातील कोर्टी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिकत असणाऱ्या सुशांत साहेबराव भोसले याचा 3 ऑक्टोबर 2014 रोजी नदीत पोहताना बूडून मृत्यू झाला होता. म्हासोली – येवती येथील भैरवनाथ विद्यालयातील प्रतीक्षा सुभाष साळुंखे या विद्यार्थीनीचा 16 मे 2014 रोजी वाहन अपघातात मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील वाठार (नि.)येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या राधेय संतोष कासार तसेच 3 रीत शिकणाऱ्या मयूर संतोष कासार या दोघा विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून 28 मार्च 2015 रोजी मृत्यू झाला होता. कोरेगांव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील इ.4 थीच्या वर्गात शिकणाऱ्या शिवम दिनेश चौधरी याचा 27 जून 2015 रोजी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता.
जावली तालुक्यातील श्री.वेण्णा विद्यामंदिर इ.10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विकी शंकर धनावडे याचा वाहन अपघातात 16 मे 2014 रोजी मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील इ.12 वी मध्ये शिकणाऱ्या विक्रम बिराजी माने या विद्यार्थ्याचा 7 जानेवारी 2014 रोजी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता.
वरील आठही अपघाती प्रकरणांमधील मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या आईच्या नावे प्रत्येकी 75 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

rsz_1logo-for-portal

संजय जाधव यांचा ‘तू ही रे’ सिनेमा ४ सप्टेबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

0
1 2 unnamed1

संजय जाधव यांच्या दुनियादारी, प्यारवाली  लव्हस्टोरी यासुपरहिट सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर कमाल दाखवली. अशीच काहीशी कमाल दाखवण्यासाठी  संजय जाधवयांची आणखी एक फिल्म सज्ज झाली आहे. प्रेक्षकांना’प्रेम’, ‘मैत्री’ अशा नात्यांवर विश्वासठेवायला भागपडणाऱ्या सिनेमांच्या यादीत तू ही रे  सिनेमाचं नावलवकरच दाखल होणार आहे. दुनियादारीने मैत्रीची सफरघडवून आणली तर प्यारवाली लव्हस्टोरीने प्रेमाच्या एकाअनोख्या जगात नेलं आणि आता तू ही रे प्रेक्षकांनाकोणत्या वळणावर घेऊन जाणारआहे याबाबत उत्सुकतानिर्माण झाली आहे.  रोमॅंटिक सागा असलेल्या तू ही रे सिनेमात मराठीतील आघाडीचे कलाकार स्वप्निल जोशी,   सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, गिरीश ओक, बालकलाकार मृणाल जाधव अशी तगडी स्टारकास्ट आहे.

पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कच्या साथीने आणि ‘तू ही रे’ सिनेमाच्यावतीने ‘तू ही रे नेक्स्ट ड्रीम फ्लोवरगर्ल’ कॉनटेस्ट आयोजित केली आहे. या कॉनटेस्ट अधिक माहिती   देताना हिंदुस्तान युनिलिव्हर पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचे कॅटेगरी हेड श्रीनंदन सुंदरम म्हणाले की,पॉंड्सचा सुगंध  आतापर्यंत भारतातील विविध संस्कृतीत दरवळत आहे. ‘तू ही रे’ च्यानिमित्ताने मराठी संस्कृतीत देखील पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कचासुगंध दरवळेल. आजकालच्या महत्वाकांक्षी महिला स्वप्नपाहतात आणि पूर्णही करतात. पॉंड्स ड्रीमफ्लोवरटॅल्कमुळेमिळणारा सुगंध आणि तजेलदारपणा त्याच्यातीलआत्मविश्वास वाढवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेअभिनेत्री सई ताम्हणकर. ती परफेक्ट ‘ड्रीमफ्लोवर गर्ल’ आहे. चित्रपटात नंदिनीची भूमिका  करणाऱ्या सईच्या अभिनयाचा दरवळ असाच दिर्घकाळराहील. त्याचबरोबरपॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कसुद्धा सई सारख्या ‘ड्रीमफ्लोवर गर्ल’ चा शोध एका कॉनटेस्ट तर्फे घेत आहे. जिला ‘तू ही रे’ टीमच्या उपकमिंग फिल्ममध्ये काम करण्याची संधीमिळणार आहे. पॉंड्स ड्रीमफ्लोवर टॅल्कतर्फे दिग्दर्शक संजय जाधव यांनाशुभेच्छा.

“दुनियादारी आणि प्यारवाली लव्हस्टोरी सिनेमाच्यायशानंतर प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.  या दोन्ही चित्रपटांप्रमाणे तू ही रे सिनेमाही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी खात्री मला वाटते आहे. यादोन्ही सिनेमाच्या टीमला तू ही रे मध्येएका वेगळ्या रुपात मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. सिनेमाची  गाणी प्रेक्षकांना आवडतील यात शंका नाही.”  असं संजय जाधव यांनी सांगितलं.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटातील काही वैशिष्ठ्यांपैकी एका म्हणजे सिनेमाची गाणी. ओठांवर रेंगाळणारी चटकन आपलीशी होणारी गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीतदिलेआहे. ‘सुंदरा…’, ‘गुलाबाची कली’, ‘तोळा तोळा’, ‘जीव हा सांग ना’,  अशी गाणी आहेत.  ‘सुंदरा’ हे गाणं सई ताम्हणकर  चित्रित झाल असून आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातलं हे गाणं आपल्याला सुंदरेच्या सुंदरतेची कल्पना देते. ‘गुलाबाची कली’ हेगाणं सध्या सोशल साईटवर गाजत आहेत. लग्नाच्या

या चित्रपटासंदर्भातील यापूर्वीची बातमी पहा

http://goo.gl/l3XqiH

अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी- मोहम्मद हुसेन खान

0

अलिबाग : अल्पसंख्याक समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व शासकीय यंत्रणांनी करावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी केली.

शासनाच्यामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमाचा तसेच केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष मोळवणे, जिल्हा पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक, अल्पसंख्याक आयोगाचे सचिव मोहम्मद हुसेन मुजावर, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) प्रकाश खोपकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, अल्पसंख्याक आयोगाचे गणेश सुरवसे आदी उपस्थित होते.

श्री.खान म्हणाले की, देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्व समाजाची प्रगती होणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक समाजाची प्रगती व्हावी यासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी. योजनेच्या अंमलबजावणीत आर्थिक तरतुदीची अडचण निर्माण झाल्यास याबाबत आयोगास कळविल्यास निधी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी शासनाने तरतूद केली आहे. या तरतुदीचा योग्य वापर होण्यासाठी अधिकाधिक मदरशांकडून प्रस्ताव मागविण्यात यावेत. पोलीस भरतीसाठी अल्पसंख्याक समाजाच्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ठिकठिकाणी मोहल्ला कमिटी स्थापन करुन तरुणांचा त्यामध्ये सहभाग करुन घ्यावा. जिल्ह्यात पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी, असे सांगून त्यांनी जिल्ह्यातील अल्पसंख्याकांच्या योजनांसंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच अधिक चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

समता व सामाजिक न्याय वर्षांनिमित्तच्या कार्यक्रमांसाठी सव्वाशे कोटींचा निधी

0
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे वर्ष राज्य शासनातर्फे समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात त्यानिमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रमांसाठी 125 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या ऐतिहासिक वर्षात इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामास तातडीने सुरुवात करण्याचा शासनाचा निर्धार आहे. तसेच केंद्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या धर्तीवर राज्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान’ स्थापन करण्यात येणार आहे.

समता व सामाजिक न्याय वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले आहेत. याअंतर्गत पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी (बार्टी) पुण्यालगत नवीन प्रशासकीय इमारत आणि संकुल निर्माण करणे, अनुसूचित जातीच्या नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे वसतिगृह तसेच मुलींसाठी 50 विद्यार्थी क्षमतेची तालुकास्तरीय 50 वसतिगृहे बांधणे आणि दलित वस्त्यांच्या सर्वंकष विकासाची योजना राबविण्यात येणार आहे. तसेच दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शनही मुंबईत भरविण्यात येईल.

डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेली घटनास्थळे आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना पर्यटनाचा दर्जा देण्यासोबतच त्यांचा विकास करणे, डॉ. आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्र आणि साहित्याचे प्रकाशन करून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासह संविधान उद्देशिका आणि समता दिनदर्शिका प्रकाशन, परिसंवाद, चर्चासत्र आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य तसेच सामाजिक न्याय विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम, जलसे, नाटक इत्यादी तयार करून त्यांना विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

एफआरपीसाठी सॉफ्ट लोन उपलब्ध; साखर कारखान्यांना राज्य शासनाचा दिलासा
राज्यातील गेल्या हंगामात गाळप करून 50 टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपीची (रास्त आणि किफायतशीर मूल्य) रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. मात्र केंद्राच्या सॉफ्ट लोन योजनेच्या निकषात न बसलेल्या साखर कारखान्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम देता यावी, यासाठी राज्य शासनाने सॉफ्ट लोन योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे पात्र ठरणाऱ्या कारखान्यांना १८७ कोटी ७६ लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध होणार असून त्यावरील पाच वर्षांच्या व्याजापोटीची 56 कोटी ३३ लाख रुपये एवढी रकम शासन भरणार आहे.

राज्यातील काही साखर कारखान्यांनी फक्त २०१४-१५ या वर्षांचा गाळप हंगाम घेतलेला आहे, तसेच एफआरपीची ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम 30 जून २०१५ पर्यंत दिलेली आहे, अशा साखर कारखान्यांना एफआरपीची उर्वरित रक्कम ऊस उत्पादकांना देता यावी, यासाठी राज्य शासनामार्फत सॉफ्टलोन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या कारखान्यांपैकी जे कारखाने एनपीए (Non Performing Assets) आहेत, त्यांना संचालक मंडळाच्या जबाबदारीवर शासन हमी देण्यात येईल. मुद्दलाची रक्कम वेळेवर न भरणाऱ्या कारखान्यांना योजनेतून तत्काळ वगळण्याचा निर्णयही घेण्यात आला.

राज्याच्या सॉफ्ट लोन योजनेतील कारखान्यांना १० टक्के सरळव्याज किंवा बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर यामधील कमी असलेल्या व्याजदरानुसार पाच वर्षांचा रिड्यूसिंग बॅलन्सनुसार व्याजाची रक्कम राज्य शासन अनुदान स्वरुपात देणार आहे. या साखर कारखान्यांना १८७ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होणार असून त्यावरील व्याजापोटी 56 कोटी ३३ लाख रुपये एवढ्या रकमेचा भार शासनावर पडणार आहे.

पाऊस/पीक-पाणी

राज्यात सरासरीच्या 58 टक्के पाऊस, 48 टक्के पाणीसाठा, 93 टक्के क्षेत्रावर पेरणी
राज्याच्या सर्वच भागात तुरळक पावसाने हजेरी लावली असून मराठवाडा विभागात पाणी टंचाई जाणवत आहे. राज्यात आजपर्यंत 497 मि.मी. पाऊस झाला असून तो 861 या सरासरीच्या 57.7 टक्के आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जलाशयातील सर्व प्रकल्पांत 48 टक्के एवढा साठा आहे.

राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे-
नागपूर व अमरावती जिल्ह्यात 100 टक्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून नंदूरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, भंडारा या सहा जिल्ह्यात 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 19 जिल्ह्यांमध्ये 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या सात जिल्ह्यात 26 ते 50 टक्के पाऊस पडला आहे.

राज्यातील 355 तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 0 ते 25 टक्के, 97 तालुक्यात 26 ते 50 टक्के, 150 तालुक्यात 51 ते 75 टक्के, 70 तालुक्यात 76 ते 100 टक्के आणि 33 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

राज्यात 93 टक्के क्षेत्रावर पेरणी
राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 134.70 लाख हेक्टर असून 21 ऑगस्टअखेर 124.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

राज्यात कोकण, पुणे व कोल्हापूर विभागाच्या पश्चिम घाट भागात भात व नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून, नागपूर विभागात भात पिकाच्या पुनर्लागवडीचे काम प्रगतीपथावर आहे. खरीप ज्वारी व बाजरी पिके पोटरी अवस्थेत, मका व तूर पिके वाढीच्या तर उडिद, मूग व सोयाबीन पिके फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. कापूस पीक पाते धरणे ते फुलोरा अवस्थेत आहेत. पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे.

खरीपासाठी हंगामातील अपेक्षित क्षेत्र, मागील 3 वर्षांची सरासरी आणि बियाणे बदल यानुसार पीकनिहाय बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे. खरीपाकरिता 16.64 लाख क्विंटल बियाण्यांची गरज होती, त्या तुलनेत 17.11 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. दि. 21 ऑगस्टअखेर 14.99 लाख क्विंटल (90 टक्के) इतका बियाणे पुरवठा झाला आहे.

धरणात 48 टक्के पाणी साठा
राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत 48 टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 62 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे-

मराठवाडा-8 टक्के (19), कोकण-82 टक्के (89), नागपूर-70 टक्के (65), अमरावती-61 टक्के (48), नाशिक-41 टक्के (58) आणि पुणे-50 टक्के (78), इतर धरणे-69 टक्के (89) असा पाणीसाठा आहे.

एकोणिसशे गावांना टँकरने पाणीपुरवठा
राज्यातील 1501 गावे आणि 2677 वाड्यांना आजमितीस 1901 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास 1524 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.
रोहयोच्या कामावर 93 हजार मजूर
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात 15 ऑगस्टपर्यंत 12 हजार 643 कामे सुरू असून या कामावर 92 हजार 908 मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात 4 लाख 38 हजार 695 कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता 1294.27 लाख एवढी आहे.

 

विमा क्षेत्राने शाश्वत कृषी विमा योजना विकसित कराव्यात- उपराष्ट्रपती

0
मुंबई : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसू नये, त्याचा मुकाबला करता यावा यादृष्टीने ग्रामीण जनतेच्या मदतीसाठी विमा क्षेत्राने शाश्वत कृषी विमा योजना विकसित कराव्यात, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी केले.

ताज हॉटेलमध्ये झालेल्या इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए.के. राय, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एस.के. रॉय उपस्थित होते.

उपराष्ट्रपती म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसण्यापासून शेतकऱ्याला वाचविणे आवश्यक आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या व त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणामाचे निवारण होण्याची गरज आहे.

पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी केवळ 12 टक्के क्षेत्राला सध्या पीक विमा संरक्षण मिळते आणि अनेकदा विमा हप्ता आणि दावा यांचे प्रमाण प्रतिकूल असते. पीक विमा योजनेचा आराखडा आणि अंमलबजावणीतही त्रुटी असून विमा पर्याय अधिक आकर्षक आणि वाजवी ठरावा यासाठी फेअर प्रिमियम दर कमी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

भारताच्या कृषी क्षेत्राला दुष्काळ, पूर, कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. अद्ययावत पर्जन्यमापक संरचनेच्या सहाय्याने पर्जन्य विम्याद्वारे या समस्येवर काही प्रमाणात मात करता येऊ शकते. खाजगी आणि सार्वजनिक विमा कंपन्या सध्या पर्जन्य विमा उत्पादनांच्या शक्यता आजमावून पाहत आहेत आणि त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपरिक पीक विम्याऐवजी शेतकऱ्यांना हवामान दर्शक विमा योजना अल्प दरात देण्याचा यशस्वी प्रयोग रवांडा, घाना, सेनेगल आणि इतर आफ्रिकी देशांनी केल्याचे उदाहरण त्यांनी दिले. गरिबांसाठीच्या विमा तरतुदी, दारिद्रय निर्मूलनाच्या लढ्याविरोधात महत्त्वाच्या ठरु शकतात, असेही उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारख्या योजनांद्वारे गरिबांना विमा छत्राचा लाभ देण्यासाठी आणि आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी सरकारने धोरणे निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

पीक विमा सर्वेक्षणासाठी 500 गावात प्रायोगिक तत्वावर योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य- मुख्यमंत्री
हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेता विमा कंपन्यांनी कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना आकर्षित करेल अशा विमा योजना देखील तयार केल्या पाहिजेत. कृषी पीक विम्याची नुकसान भरपाई देताना त्याबाबतचे सर्वेक्षण हे गाव निहाय आणि व्यक्तिगत झाले पाहिजे यासाठी राज्यातील पाचशे गावात प्रायोगिक तत्वावर योजना सुरू करण्यात येत आहे. अशा प्रकारची योजना सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विमा क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय आहे. विमा क्षेत्रात अधिकाधिक कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची गरज असून त्याद्वारे अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त होण्यास मदतच होणार आहे, याकामी इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए. के. राय यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरूवात आणि सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया विषयी..

इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे आधीची जे सी सेटलवाड मेमोरियल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स इन्स्टिट्यूट, 1955 मध्ये स्थापन झाले. देशात विमा शिक्षण आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश. आयु आणि सर्वसाधारण विमा संस्थेच्या विविध शाखांमध्ये, विमा एजंट आणि सर्वेक्षकासाठी नियमित परीक्षा घेण्याबरोबरच लायन्सशिएट, असोसिएटशिप आणि फेलोशिप सारख्या व्यावसायिक परीक्षाही ही संस्था घेते. संस्थेकडून प्राप्त झालेल्या पात्रतेला, विमाउद्योग, सरकारी संस्था, आयआरडीएआय आणि भारतातल्या इतर संस्था तसेच सीआयआय, एआयसीपीसीयू, एल ओएमए तसेच कॅनडा आणि परदेशातल्या विमा संस्थेची मान्यता आहे.

 

पुण्यातून ‘डायल 108’सेवेच्या 20 रूग्णवाहिका नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रवाना

0
unnamed1
पुणे :
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या 20 रूग्णवाहिका पुणे जिल्ह्यातून रवाना करण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकांमध्ये 5 रूग्णवाहिका ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ (अङड), 15 रूग्णवाहिका ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ आहेत. तसेच रूग्णवाहिकांमधून 20 डॉक्टर्स आणि वाहनचालकांची टिम रवाना झाली आहे,  अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.
कुंभमेळ्यामध्ये ‘डायल 108’ सेवेद्वारे आत्तापर्यंत 165 रूग्णांना आपत्कालीन मदत तर 5331 रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, ‘डायल 108’ सेवेच्या एकूण 30 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 12 त्रंबकेश्‍वर येथे तर नाशिक येथे 18 रूग्णवाहिका 24 तास सेवेसाठी राहणार आहेत.
नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 1 कोटीहून अधिक भाविक येतात त्यामुळे मोठ्याप्रमाणात चेंगराचेंगरी किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्राण वाचविण्याच्या ‘गोल्डन अवर्स’मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठी ‘डायल 108’च्या रुग्णवाहिका कुंभमेळ्यामध्ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत राहणार आहेत.  अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे जिल्हा व्ययस्थापक डॉ. गजानन पुराणिक यांनी दिली.
कुंभमेळ्यासाठी कार्यरत वाहनचालक, डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, शासकिय सेवेतील डॉक्टर्स, प्रायव्हेट डॉक्टर्स आणि इतर प्रतिनिधी यासर्वांना ‘गोल्डन अवर्स’मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्वयंसेवी संस्थांनी उद्योजकीय दृष्टीकोन वाढवावा : विनोद पारटकर

0
unnamed
पुणे :
  स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रात विधायक बदल घडवून आणण्यासाठी तेथील उद्योजकीय दृष्टीकोन वाढवून उद्योजकता विकासासाठी काम करावे’, असे प्रतिपादन ‘महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’चे संचालक विनोद पारटकर (उद्योजकता विकासतज्ज्ञ) यांनी केले. ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस’च्या एनजीओ रिसोर्स सेंटर, सहायक टेक महिंद्रा फाऊंडेशन’ यांनी स्वयंसेवी संस्था प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. 25 संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस’ कर्वेनगर येथे मंगळवारी दि. 25 ऑगस्ट रोजी हे प्रशिक्षण पार पडले.
प्रकल्प समन्वयक म्हणून ‘सामाजिक संस्थाना तज्ञ मार्गदर्शकांकडून मदत मिळवून, सामाजिक उद्योजकांना विकसित करण्याची तयारी’ निकिता देशपांडे यांनी एनजीओ रिसोर्स सेंटरची भूमिका मांडताना व्यक्त केली.
‘महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ चे संचालक  पारटकर म्हणाले, स्वयंसेवी संस्थांकडे समाजाच्या गरजेप्रमाणे कामाच्या स्वरूपात बदल करण्याची लवचिकता असते आणि समाजात बदल घडवून आणण्याची तळमळ असते. याचा उपयोग करून त्यांनी उद्योजकीय प्रेरणा समाजात वाढविल्या तर बरेचसे प्रश्‍न सुटायला मदत होईल.’ स्वयंसेवी संस्थांच्या प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
उद्योजकता विकास करण्यासाठी चमकदार कल्पना आवश्यक असतात, त्याला तंत्र आणि व्यावसायिकतेची जोड दिली की मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.’ निकिता देशपांडे, मालविका सुदामे, प्रा. महेश ठाकूर यांनी स्वागत केले. प्रोजेक्ट डेव्हलप कन्सेप्ट, अंडरस्टँडिग फिजिबिलीटी अस्पेक्ट्स’, डेमोप्लॅन’ अशा मुद्यांवर या शिबिरात चर्चा झाली.

ज्योतिषशास्त्राचा अतिरेकीपणावर परखडपणे भाष्य करणार “जमलं बुवा एकदाचं” नाटक 31 ऑगस्ट रोजी रंगमंचावर

0

ज्योतिषशास्त्र तारक की मारक? ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास ठेवावा? अशा एक न अनेक प्रश्नांवर परखड भाष्य करनारं “जमलं बुवा एकदाचं” या नाटकाची निर्मिती सिड एंटरटेनमेंटची आहे. ‘यु टर्न’, ‘मदर्स डे’, ‘सुनेच्या राशीला सासू’ या नाटकांना प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर लेखक आनंद म्हसवडकरांनी हे चौथ नाटक घेऊन येत आहेत. एकाच लेखकाचं एकाचवेळी विविध रंगमंचावर सादर होणारं हे चौथं नाटक आहे.

या नाटकातील कथा वखारकर या सुशिक्षित कुटुंबाची आहे. एक लेखक, एक दिग्दर्शक, एक प्रसिध्द फोटोग्राफर आणि एक नेता अशी चार मुलं आणि त्यांचा ज्योतिषी मामा यावर आधारित हे कथानक आहे. ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन किंबहुना त्याची भिती दाखवून सामान्य माणसांना ज्योतिषी कशाप्रकारे भिती दाखवत असतात त्याचबरोबर याच अतिरेकीपणामुळे या सर्व मुलांचे मन परिवर्तन कशापध्दतीने होते याची अचुक मांडणी या नाटकात करण्यात आली आहे. भविष्य जर खरि ठरत असती तर जगभरात घडणारे मोठे अनर्थ टाळता आले असते. या मताचा दयानंद वखारकर हा मुलगा जेंव्हा या मामाच्या अतिरेकिपणामुळे घर सोडून जातो आणि नंतर मामाने वर्तविलेलं भविष्य खोटं सिद्ध करतो. या सर्व गोष्टींची अचुक मांडणी लेखक आनंद म्हसवडकर यांनी केलीये. तर या नाटकाचं दिग्दर्शन हेमांगी काळे यांनी केले आहे. सिड एंटरटेनमेंटने या नाटकाची निर्मिती केली आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.

यावेळी दिग्दर्शक हेमांगी काळे म्हणाल्या कि, नाटक आणि नृत्य क्षेत्रात पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर दिग्दर्शन क्षेत्रात येण्याचा मान “जमलं बुवा एकदाचं”च्या माध्यमातून मिळाल्याचा आनंद होत आहे. या नाटकातून आम्ही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. ज्योतीषशास्त्राविरुध्द डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लढा दिला त्यानंतर अशा थोर व्यक्तीला अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत असताना हौतात्म्य मिळालं. या नाटकाद्वारे आम्ही त्यांचा अंधश्रद्धा निर्मुलनाचा लढा पुढे चालूच ठेवणार आहोत.

“जमलं बुवा एकदाचं” या नाटकाची रंगीत तालीम व पत्रकार परिषद पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सुरु आहे. यावेळी दिग्दर्शक हेमांगी काळे, निर्माते सतिश लालबिगे तसेच कलाकार उपस्थित होते.

  “जमलं बुवा एकदाचं”

निर्मिती – सिड प्रोडक्शन

मुळ कथा / लेखक – आनंद म्हसवेकर

दिग्दर्शक – हेमांगी काळे

नेपथ्थ- संदिप देशमुख

प्रकाश योजना – प्रशांत निकम

कलावंत – आदर्श गायकवाड, मंगलदास माने, सागर पवार, संदिप सोमण, महेंद्र चव्हाण, चेतन गरुड, हेमांगी काळे, उज्वला गौड, आश्विनी आव्हाड.

दिग्दर्शक ‘प्रवीण कारळे’ यांची हॅट्रिक

0

‘मानसन्मान’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत मनाचे स्थान मिळविणारे दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे एकानंतर एक असे सलग तीन चित्रपट पुढील काही महिन्यात प्रदर्शित होत आहेत. प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘दुनिया गेली तेल लावत’ हा चित्रपट ऑक्टोंबर महिन्यात, ‘माझी आशिकी’ हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात तर ‘हा, मी मराठा’ हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत  आहे. विशेष म्हणजे या तिन्ही चित्रपटांचे कथाविषय अतिशय वेगवेगळे आहेत.

वयाच्या अगदी चौथ्या वर्षापासून रंगभूमीवर पदार्पण केल्यामुळे नाट्य आणि चित्रसृष्टीच्या सर्व विषयाची बारीक-सारीक माहिती असलेले प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव असून एक हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणून त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीत नाव आहे. बालनाटकांपासून मोठ्या नाटकांपर्यंत आणि लघुपटापासून विविध मालिका आणि चित्रपटांचे प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मानसन्मान’ या आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांनी शिवाजी साटम, रिमा लागू यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी काम केले. त्यानंतरचे त्यांचे ‘बोकड’ आणि ‘भैरू पैलवान की जय’ हे चित्रपटही गाजले. आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेले  ‘दुनिया गेली तेल लावत’, ‘माझी आशिकी’ आणि ‘हा, मी मराठा’ हे तीन एकापाठोपाठ प्रदर्शित होत आहेत.

‘दुनिया गेली तेल लावत’ या चित्रपटात खरे बोलणाऱ्या तरुणाची कथा असून त्याच्या खरे बोलण्यामुळे सगळेजण कसे अडचणीत येतात. याचे खुमासदार चित्रण करण्यात आले आहे. सिद्धार्थ जाधव, नवतारका मानसी देशमुख, डॉ. गिरीश ओक आदी प्रमुख कलाकार असलेला हा चित्रपट ‘रहस्यमय कॉमेडी’ आहे. अनिल कालेलकर यांच्या कथेवर बेतलेल्या या चित्रपटाचे निर्माते प्रीतम देव असून हा चित्रपट दोन ऑक्टोंबरला प्रदर्शित होत आहे.  ‘माझी आशिकी’ हा त्यांचा दुसरा चित्रपट सहा नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असून ती खूप वेगळी ‘प्रेमकहाणी’ आहे. निर्मात्या सरिता चिल्की यांच्या या चित्रपटाची कथा सुरेश वाल्मिकी यांनी लिहिली  आहे. आनंद माने आणि इस्टर नोरोला ही फ्रेश जोडी या चित्रपटाद्वारे मराठीच्या पडद्यावर पदार्पण करीत असून इस्टर नोरोला हिने यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात कामे केली आहेत.

 

त्यांच्याशिवाय उदय टिकेकर, डॉ. गिरीश ओक, भाऊ कदम यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. तरुणाईला साद घालणारा आणि ‘साहसपट’ ठरेल असा  ‘हा, मी मराठा’  हा प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. निर्मात्या अमृता राव यांच्या या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, प्रियांका यादव, यतीन कार्येकर यांच्या प्रमुख भूमिका असून अनिकेत विश्वासराव यांची तगडी भूमिका हे या चित्रपटाचे खास वैशिष्ठ्य आहे. याशिवाय प्रसिद्ध निर्माते सुधाकर बोकाडे यांच्या ‘हैण्डस-अप’ या हिंदीतील रहस्यपटाचेही प्रवीण कारळे यांनी दिग्दर्शन केले असून तो पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होत आहे.

 

माननीय संजय भोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या

0

माननीय संजय भोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या

w copy

कांद्याच्या किमती पूर्ववत करण्यासाठी आंदोलन

0

पुणे- कांद्याचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आणा या मागणीसाठी शहर कॉंग्रेसने… रात्रीच्या काळोखात  झगमगाटात उजळून पुण्याची शान बनू पाहणाऱ्या मंडई समोर आज दिवसा अनोखे आंदोलन केले .

ज्या कांद्याचे सर्वत्र वांदे  झाले आहेत असे कांदे … नव्हे कांद्याच्या माळा गळ्यात घालून केल्याने हे अनोखे आंदोलन बनले . अर्थात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारला भाव वाढीबाबत दुषणे देत कांद्याचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आणा अशी मागणी यावेळी करण्यात आली .

शहराध्यक्ष अभय छाजेड , महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा कमाल व्यवहारे , रोहित टिळक , संजय बालगुडे , अरविंद शिंदे, नीता परदेशी , बाळासाहेब मारणे , बाळासाहेब दाभेकर , मिलिंद काची , राजेंद्र भुतडा ,मंद चव्हाण , मुकारी अलगुडे , शेखर कपोते , विनोद निनारीया , मधुकर राऊत, राजा महाजन ,सुधीर काळे , मंदा चव्हाण  आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .

‘वनवासी कल्याण आश्रम’आयोजित ‘रानभाजी महोत्सव’ला चांगला प्रतिसाद

0
पुणे : 
भीमाशंकर जवळील आहुपे या दुर्गम गावी वनवासी कल्याण आश्रम आयोजित ‘रानभाजी’ महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे पन्नास आदिवासी महिलांनी या रानभाजी महोत्सवात रानभाज्या बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला.
मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील सुमारे 150 जणांनी या महोत्सवात हजेरी लावली. आदिवासी महिलांनी भारंगी, तेरा, कुर्टुले, खुराळ सारख्या 27 वेगवेगळ्या भाज्या तयार केल्या होत्या. 39 महिलांनी स्पर्धेत भाग घेतला होता.  सर्वांनी आदिवासी घरांमध्ये अतिथी पाहुणे जाऊन रानभाज्या युक्त भोजनाचा आस्वाद घेतला.
वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनया घाटे, प्रा. शिंदीकर, प्रा. महेश शिंदीकर, मीनल लाड यांनी परीक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.  ‘वनवासी कल्याण आश्रम’चे जिल्हाध्यक्ष शांताराम इंदोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सीता पारधी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शासकीय आश्रमशाळा वनविभाग, आदीवासी बहुविध सेवासंस्था यांनी संयोजनात सहकार्य केले.
‘वनवासी कल्याण आश्रम’चे जिल्हाध्यक्ष शांताराम इंदोरे, मिलींद देशपांडे, अंजली घारपुरे, अल्पिता पाटणकर, यांनी यासाठी परिश्रम घेतले.

कचरा जाळणार्‍या कंत्राटी कामगाराला दंड आणि समज

0
पुणे :
सिंहगड रस्त्यावरील कचरा जाळणार्‍या पालिकेच्या कंत्रीटी कामगाराला ‘सोसायटी फॉर प्लॅस्टिक मॅनेजमेंट अ‍ॅण्ड एन्व्हामेंंट’या स्वयंसेवी संस्थेचे सचिव ललित राठी यांनी अभिरूची पोलिस चौकीच्या पोलिसांच्या मदतीने दंड केला. पालिकेचे आरोग्य अधिकारी सुहास पांढरे आणि मुकादम अमर धुमाळ यांनी या कामगाराला शंभर रूपये दंड केला आणि पुन्हा असे न करण्याची ताकिद देऊन सोडण्यात आले.
कचर्‍याचे वर्गीकरण न करता, वाहतुक करावी लागू नये म्हणून आणि डंपिंग ग्राऊंडवर जागा नसल्याने कचरा जाळण्याचे प्रकार पालिका कर्मचारी, कंत्राटी कर्मचार्‍यांकडून वारंवार होतात. त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येते. म्हणून अशा प्रकारांवर नागरिकांनी लक्ष ठेवून ते रोखावेत, त्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन ललित राठी यांनी केले आहे.
rsz_1logo-for-portal

चिरंजीवी झाला ६० वर्षांचा …

0

1 3 (1) 3 (2) 4 5 6 7 9 10 11 12 13 11917889_1027544100613112_588716142_n

चेन्नई :  आघाडीचा अभिनेता चिरंजीवी परवा 60 वर्षांचा झाला .    अभिनेता रामचरण तेजाने हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये त्याच्या  ‘बर्थ डे’ पार्टीचं आयोजन केलं होतं.  यावेळी  दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली . सलमानखान ने या पार्टीत डान्स केल्याने बरीच रंगत आल्याचे सांगण्यात येते अवघ्या काही सेकंदाचे अशा डान्सचे मोबाईल व्हिदिओ यु ट्युब वर प्रसारित झालेआहेत या शिवाय अनेक वेबसाईट ने या बर्थ डे पार्टी चे असंख्य फोटो हि प्रसारित केले आहेत कमल हसन अभिषेक बच्चन, जया बच्चन, श्रीदेवी, बोनी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, विवेक ओबेरॉय, प्रकाश राज  अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती.तर दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेता नागार्जुनने सहकुटुंब हजेरी लावली. याशिवायमोहन बाबू, डग्गुबती व्यंकटेश, राणा डग्गुबती, जयाप्रदा, खुशबू, तापसी पन्नू, तमन्ना भाटियासह अनेकांनी या पार्टीमध्येसहभाग नोंदविला चिरंजीवीचा जन्म 22 ऑक्टोबर 1955ला मोगलथुर, नारासापूरम, वेस्ट गोदावरी, आंध्रप्रदेशात झाला आहे

 

कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने डॉ दत्ता कोहिनकर यांचा गौरव

0

b1

पुणे-जीवन धकाधकीचे झाले असले तरी मनशांती मिळविणे अजिबात अवघड राहिलेले नाही जीवनातला काही वेळ मात्र त्यासाठी दिला पाहिजे असे इथे विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ दत्ता कोहिनकर  यांनी सांगितले

विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ दत्ता कोहिनकर यांना सामाजिक क्षेत्रातील फिनिक्स फाउंडेशनचा “जीवनगौरव 2015” पुरस्कार मिळाल्याबद्दल कमिन्स इंडिया कंपनीच्या वतीने  व्हि पी अश्वत्थराम यांच्या हस्ते युनियनच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात गौरवण्यात आले.
याप्रसंगी सतिश मुळे, सचिन घनपाठी, नवनाथ माने, गणेश घुगे, युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर, राजेंद्र ढमाले यांची प्रमुख उपस्थिती होती.