Home Blog Page 3313

पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक : खा. वंदना चव्हाण यांची मागणी

0
पुणे :

सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित बैठकीत निषेध करण्यात आला. ही बैठक नुकतीच पक्ष कार्यालयात झाली. 

 
या बैठकीला अशोक राठी, चेतन तुपे, निलेश निकम, रवींद्र माळवदकर, मंगेश तुपे, शंकर शिंदे, सुरेश बांदल, काका चव्हाण, शशिकांत तापकीर, पंडित कांबळे, राकेश कामठे, रुपाली चाकणकर, मनाली भिलारे उपस्थित होते. 

 
हल्ल्याबाबत बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘अमरनाथ यात्रेवरील हल्ला भ्याड आहे. या हल्ल्याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करीत आहे. धार्मिकस्थळी, पर्यटनस्थळी होणारे असे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सरकारने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांची हिम्मत होता कामा नये अशी जरब बसवणे महत्वाचे आहे.’
 
सरकारने हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने बैठकीत करण्यात आली. 
 
या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा चालक सलीम याच्या प्रसंगावधानामुळे यात्रेकरूंचे प्राण वाचले, त्यामुळे पक्षाच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आले. 

ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याहस्ते महापारेषणच्या उपकेंद्राचे लोकार्पण

0

 

पुणे, दि. 12 : आंबेगाव तालुक्यातील महापारेषणच्या पिंपळगाव 132/33 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचे लोकार्पण दि. 21 जुलैला राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे.

आंबेगाव तालुक्यातील महापारेषणचे पिंपळगाव (खडकी) 132/33 केव्ही उपकेंद्राची व पारेषण वाहिन्यांची सुमारे 27 कोटींच्या खर्चातून उभारणी पूर्ण झाली आहे. या उपकेंद्राला काठापूर 220 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार आहे. आंबेगाव तालुका व परिसराला सध्या 33/11 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी उद्‌भवत होत्या. परंतु महापारेषणच्या या नवीन 132/33 केव्ही उपकेंद्रामुळे या सर्व परिसरातील उद्योजक, कृषीपंपधारकांसह सर्व वीजग्राहकांना यापुढे सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. दि. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे यांच्याहस्ते या 132 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार श्री. दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. विश्वासराव देवकते, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

तसेच दि. 21 जुलैला ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे हे लोकप्रतिनिधींसमवेत ऊर्जाविषयक समस्यांबाबत बैठक घेणार आहेत. सकाळी 9 वाजता शिरुर तालुक्यासाठी शिरुर येथे तर दुपारी अडीच वाजता आंबेगाव तालुक्यासाठी पंचायत समिती कार्यालय, घोडेगाव येथे बैठक होणार आहे.

आता ….बागुल- मुंडे वादंग

0

पुणे -महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी गेलेले काँग्रेस नगरसेवक आबा बागूल आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात सोमवारी शाब्दिक वाद झाला ,या वेळी बागूल यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून, मुंढे यांनाही दमबाजी केल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाच्या तक्रारीवरून बागूल यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.आबा बागुल यांना १५ मिनिटे आपल्या कार्यालयाबाहेर बसवून नंतर त्यांना मुंडे यांनी आत बोलाविल्याचा प्रकार हि यामुळे उघडकीस आला आहे .या पूर्वी महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशी खटके उडाल्यानंतर वाद  वाढू नये म्हणून सत्ताधारी असलेल्या  भाजपाने त्यावर पडदा टाकला होता.तेव्हा खुद्द मुख्यमंत्री च मुंडेंच्या पाठीशी असल्याचे बोलले जात होते .  आता मुंडे यांचा कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुलांशी वाद झाला आहे . अर्थात बागुलांना पक्षांतर्गत विरोध आहेच . पण अशा घटनेने सर्वच नगरसेवक हबकून गेले आहेत . बस बाबत कोणतीही मागणी मुंडे यांच्याकडे घेवून जायला आता कोणी धजावेल असे चित्र नाही .

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बागूल हे पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयात गेले होते. पीएमपीच्या प्रवाशांना एक दिवसीय मोफत पास देण्याची योजना चर्चेत होती. त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बागूल गेले होते. त्यावेळी मुंढे आणि बागुल यांच्यातील चर्चेच रुपांरत वादात झाले. त्या वेळी बागूल यांनी मुंढे यांना कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षकामार्फत तक्रारीचे पत्र पाठविले.
या बाबत बागुल म्हणाले शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित व्हावेत आणि खासगी वाहने न वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासासाठी पालिकेच्या मुख्यसभेने मान्य केलेल्या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
विशेष म्हणजे पीएमपीला तोट्यातून वाचविण्यासाठी तसेच या योजनेचा आर्थिक भार पडू नये यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयेही महापालिका पीएमपीएमएलला अदा करणार आहे. त्यासाठीच महिन्यातून शेवटच्या सोमवारी पीएमपीतुन मोफत प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीला चालना देणारा ठरणार आहे असे असताना पीएमपी प्रशासनाची भूमिकाच नकारात्मक असल्याचे वेळोवेळी दिलेल्या निवेदनाला कोणतीही दखल न दिल्याने स्पष्ट होत आहे.
त्यामुळे करदात्या पुणेकरांच्या रकमेची लूट होऊ नये आणि पीएमपीचे तूट कमी करण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही, पुणेकरांच्या हितासाठी अगदी पीएमपीसेवा रोखून आंदोलन होईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे.

आरती चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

0

मराठी सिनेमे ओळखले जातात ते त्यांच्या वास्तवदर्शी कथेसाठी. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी स्वीकारल्यामुळे मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चितच मोठा झाला आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या आरती – अननोन लव्हस्टोरीया सिनेमातूनही प्रेमाच्या बंधाचे अनोखे पैलू उलगडणार आहेत. प्रेमकथेसोबत समर्पणाची एक अत्यंत ह्दयस्पर्शी अशी किनार या सिनेमाला लाभली आहे. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केलं आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लाँच मा. श्री. मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी मनोहर जोशी यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मते, आरती अननोन लव्हस्टोरीचा विषय हा ‘जिद्द’ आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही त्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. तरुणांनी ध्येयवादी असावं, आयुष्यात आपल्याला काय करायचंय, आपली उद्दिष्ट्य काय आहेत? यावर ठाम असणं गरजेचं आहे.

प्रेमाच्या बदलत्या संकल्पनांना छेद देत एकमेकांसाठी आयुष्य पणास लावणारी आरती अननोन लव्हस्टोरी या चित्रपटाची कथा हृदय हेलावून टाकते. वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या चित्रपटामागे उभ्या राहिल्या आहेत. कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या वहिदाजींनी चित्रपटाच्या सहकार्याकरिता हात दिला असून मानवी मूल्यं जपणारी ही गोष्ट सर्वांपुढे यायला हवी असं त्यांना मनापासून वाटतं. वहिदाजींना विश्वास आहे की आरती अन्नोन लव्हस्टोरी हा चित्रपट नात्यांची वीण अधिक घट्ट करेल.

रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या दोघांसोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे आणि अनुष्का पाटील आदिंच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी आणि बानुमती सुजित आहेत. संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत. छायांकन व संकलन जोतीरंजन दास यांचं आहे. गीते सुजित यादव, तेजस बने यांची असून संगीत प्रशांत सातोसे आणि सुजित-तेजस यांचं आहे. गीते हरिहरन, आदर्श शिंदे, दिपाली साठे आणि सारा मेणे यांनी गायली आहेत. कलादिग्दर्शक महेश मेणे आहेत. कार्यकारी निर्माते सिद्धेश शेट्ये आहेत.

‘ती आणि इतर’ साठी सचिन पिळगावकर बनले गजलकार ‘शफक’

0
मराठी चित्रपटसृष्टीतले अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर प्रथमच ‘कवी’ च्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे! अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक आणि निर्माता अशा चित्रपटसृष्टीच्या विविध कक्षा पडताळून पाहणारे सचिनजी आता ‘ती आणि इतर’ या आगामी सिनेमाचे गजलकार म्हणून लोकांसमोर येत आहे. हिंदी दिग्दर्शक गोविंद निहालाणी दिग्दर्शित या सिनेमासाठी ‘शफक’ या टोपण नावाने त्यांनी गजल लिहिली आहे. ‘बादल जो घीर के आये’ असे या गजलचे उर्दू बोल असून,  संगीतकार वसुदा शर्मा दिग्दर्शित हि गजल अदिती पौल यांनी गायले आहे. सिनेमातील ह्या गझलमुळे सचिन यांना ‘गझल कवी ‘शफक’ अशी देखील ओळख लवकरच मिळणार आहे. तसेच या सिनेमात मंदार चोळकर लिखित आणि वसुदा शर्मा संगीतदिग्दर्शित ‘आतुर मन’ हे गाणेदेखील यात असणार आहे. गायिका अंकिता जोशीचा आवाज लाभलेले हे गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरणार आहे.
सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन…’ (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा ‘ती आणि इतर‘ हा सिनेमा २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्त्री समस्येवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. हिमांशू ठाकूर प्रस्तुत या चित्रपटाची प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहालाणी आणि धनंजय सिंह या तिकडींनी निर्मिती केली असून, मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक ‘लाईटस् आऊट’ वर हा सिनेमा आधारित आहे. तसेच प्रसिद्ध स्त्रीवादी विचारधारेतील लेखिका शांता गोखले यांनी या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिली आहे. या सिनेमात अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे सुमन पटेल आणि गणेश यादव  हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

प्रबोधनाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या मंगेश तेंडुलकर यांना विसरता येणार नाही :खा . वंदना चव्हाण

0
पुणे :
‘ ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांच्या निधनाने पुणे शहराच्या सांस्कृतिक ,सामाजिक विश्वात न  भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे . आपल्या व्यंगचित्रातून परखड आणि मार्मिक भाष्य करणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार  काळाच्या पडद्याआड गेले . नागरी प्रश्नांवर भाष्य करून न थांबता रस्त्यावर उतरून त्यांनी सतत प्रबोधनाची भूमिका घेतली हे त्यांचे योगदान पुणेकरांना विसरता येणार नाही . ‘ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष खा . वंदना चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे .
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खा . एड . वंदना चव्हाण यांनी मंगेश तेंडुलकर यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

0

पुणे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर  यांचे रात्री उशिरा निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षे वयाचे होते .व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. आज (मंगळवार) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते 1996 पासून कार्यरत होते .सविता चारुदत्त गोखले यांच्या ; पुणे दर्शन नावाच्या भारतातील पहिल्या खाजगी व्हिडीओ न्यूज बुलेटीन ला त्यांची व्यंगचित्रे प्रदर्शित करण्याचे काम तत्कालीन पुणे दर्शन चे संपादक आणि मुख्य वार्ताहर लोणकर बंधू यांनी केले होते . तेव्हा पासून पुण्याच्या वाहतूक विषयावर ते वेळोवेळी रस्त्यावर उतरत आले . . ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत.  त्यांचा हा शिरस्ता सुरूच  होता

अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मंगेश तेंडुलकरांची लेखनसंपदा:
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
अतिक्रमण
कुणी पंपतो अजून काळोख
’बित्तेशां?’ ‘दांकेशां!’

त्यांना मिळालेले पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक संपन्न

0

 

पुणे – विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आज विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीस पोलीसमहानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार डी.एस.कुंभार उपस्थित होते.

या बैठकीत भ्रष्टाचाराच्या संदर्भात तीन तक्रारींवर सुनावणी झाली. महानगरपालिका, पोलीस विभागाकडील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त दळवी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना  दिले. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारासंबधी प्रलंबीत असलेल्या तक्रारींवरील कार्यवाहीचा आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला.

बैठकीला समितीचे सदस्य, पोलीस, महानगरपालिका विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

​​ देशातील ‘ यंग अचिव्हर्स’ चा आझम कॅम्पस मध्ये सन्मान !

0
पुणे :
देशभरातील टॉपर्सवर झालेली सुवर्णपदकांची लयलूट ,आझम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी दिलेली भरभरून दाद आणि टॉपर्सची प्रेरणादायक भाषणे  अशा वातावरणात सोमवारी दुपारी ‘पी ए इनामदार  यंग  अचिव्हर्स ‘ सन्मान सोहळा रंगला !
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आय सी टी अ‍ॅकॅडमी च्या वतीने डॉ. पी.ए.इनामदार यंग अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . हा पुरस्कार सोहळा सोमवार, दिनांक 10 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.ए.आर.शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे झाला , आणि तो दुपारपर्यंत रंगत गेला
 भूसुरुंग शोधून निकामी करण्याचे तंत्र असलेला ड्रोन बनविणारा  अहमदाबाद चा ‘ड्रोन बॉय ‘ हर्षवर्धन जाला आणि त्याचे सहकारी ,पालक , छोट्या आकाराचे ‘ डॉ . कलाम ‘ सॅटेलाईट बनविणारा चेन्नईचा ‘सॅटेलाइट बॉय ‘ रिफत शाहरुख ‘,त्याचे सहकारी ,पालक यांना सुवर्णपदक ,सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .’
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ‘चे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार,डॉ . एन  वाय . काझी ,मुनव्वर पीरभॉय यांच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली .
 देशातील  विविध परीक्षांमधील  टॉपर्सचा सन्मान करण्यात आला . त्यात  मुस्कान पठाण ,अश्विन राव (आय सी एस इ)  ,जुनेद शिकीलकर ,शुभंकर  आयरे (जे इ इ ),ईपली अफीफा ,राफ् मुझमैल ,मुजावर राज ,(एन इ इ टी ),सुमेर शेख (एल एल एम ) या टॉपर्स चा  समावेश होता .
  कार्यक्रमाचे संयोजक आणि ‘अ‍ॅकॅडमी’च्या संचालक प्रा. मुमताझ सय्यद, ऋषी आचार्य (पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅण्ड स्कूल ऑफ आर्ट चे प्राचार्य) आदी मान्यवर उपस्थित होते . प्रा . रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले .
‘ कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी देशातील आय टी मधील गुणवंत, विविध परीक्षांतील यशवंत तरूण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . देशातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी सर्वानी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे ’ असे प्रतिपादन डॉ. पी.ए.इनामदार यांनी केले . सत्काराला उत्तर देताना हर्षवर्धन जाला आणि रिफत शाहरुख यांनी ड्रोन आणि सॅटेलाईट निर्मितीचे अनुभव सांगितले

जोनिता गांधी, अॅश किंगचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण !! – ‘ड्राय डे’ चित्रपटासाठी गायलं ड्युएट गाणं

0
– ८ सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांततली गाणी बॉलिवूडमधील गायक गात असल्याचं सातत्यानं दिसू लागलं आहे. हा ट्रेंड आता वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. वेगळ्या नावामुळे अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या ‘ड्राय डे’ या चित्रपटासाठी जोनिता गांधी आणि अॅश किंग या मातब्बर गायकांनी ड्युएट गायलं आहे. या चित्रपटातून या दोघांनी मराठीत पदार्पण केलं आहे.
आनंद सागर प्रॉडक्शन्सच्या संजय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, ऑस्कर विजेत्या ए. आर. रेहमान यांचे सहकारी असलेल्या अश्विन श्रीनिवासन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाद्वारे अश्विन यांचाही मराठी चित्रपट संगीतातला प्रवास सुरू झाला आहे. जोनिता आणि अॅश यांनी जय अत्रे लिखित ‘गार गार कोळशात उठावी ही आग कशी’ हे ड्युएट गाणं गायलं आहे. पांडुरंग जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या ८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जोनिता गांधी हे मोठं नाव आहे. जोतिनानं ओके कन्मनी चित्रपटातलं मेंटल मनधिल, दंगल चित्रपटातलं गिलहारियाँ, हायवे चित्रपटातलं कहाँ हुँ मैं अशी गाजलेली गाणी गायली आहेत. तर अॅश किंगनं आएशा सुनो आएशा, हाफ गर्लफ्रेंड चित्रपटातलं बारिश, ऐ दिल है मुश्किल चित्रपटातलं अलीझेह अशी गाणी गायली आहेत. या पार्श्वभूमीवर, आता “ड्राय डे   चित्रपटातून हे दोघं मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठीतल्या पहिल्या ड्युएट गाण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ई -रिक्षा ‘

0
पुणे :
 
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक वाहनांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी ‘ई -रिक्षा ‘ आणण्यात आली आहे . अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विविध प्रयोग आणि संशोधन करण्यासाठी ई -रिक्षा वापरण्यात येणार आहे . बॅटरी ,सुपरकॅपॅसिटर .मोटर्स आणि मेकॅनिकल सिस्टिम्स चे संशोधन करण्यात येणार आहे . 
 
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली .
 
‘संशोधनातून इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी या ई -रिक्षाचा उपयोग होईल . प्राद्यापक आणि विद्यार्थ्यांना त्यावर अनेक प्रयोग करता येतील . विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबत जागृती निर्माण करणे यामुळे शक्य होईल ‘ असे डॉ . आनंद भालेराव यांनी सांगितले  . 
 
‘इलेक्ट्रिक वाहनांचे निर्मिती खर्च  कमी करणे आणि बॅटरी चे आयुष्य वाढविणे यावर संशोधन करण्याला प्राधान्य दिले जाईल ‘असे इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ डी एस बनकर ,प्रा . आर . एम . होलमुखे यांनी सांगितले . 

लीला पूनावाला फाऊंडेशनचा शालेय शिष्यवृत्ती कार्यक्रम उत्साहात संप्पन

0
फाऊंडेशनच्या ७ व्या  बॅचला  शिष्यवृत्ती प्रदान
पुणे:दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील लीला पुनावाला फाउंडेशनच्या ७ व्या बॅचला शालेय शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. हा शिष्यवृत्ती प्रदान समारंभ  एमएफएच हॉल  कमिन्स, बालेवाडी मध्ये नुकताच संप्पन झाला.  ह्यावेळी प्रमुख पाहुण्यांंच्या आणि पालकांच्या उपस्थितीत लीला ज्यूनियर्सच्या नवीन बॅचला हे शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले.
ह्यावेळी १० वर्षाच्या अॉटो स्कॉलरशिपसाठी निवडल्या गेलेल्या मुलींना सन्मानित करण्यात आले. ह्यामध्ये सातवीपासुन ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली गेली.  टुमारो टुगेदर  ह्या शालेय प्रकल्पाअंतर्गत २०११ मध्ये जेंव्हा ह्या उपक्रमाची सुरवात झाली तेंव्हा ह्यामध्ये फक्त ५ शाळांचा समावेश होता आता १९ शाळांना शिष्यवृत्ती दिली जाते.
ह्या कार्यक्रमामध्ये आपला आनंद व्यक्त करतना पद्मश्री लीला पुनावाला  अभिमानाने म्हणाल्या  की मुलींच्या शिक्षणात जरी फाउंडेशनचे अहम योगदान असले तरी ही मुलींच्या पालकांचा दृष्टीकोण जास्त महत्वाचा ठरतो. योग्य शिक्षणाद्वारे मुली आर्थिकरित्या स्वावलंबी बनतील आणि देश व अनुषंगाने देशाच्या समाजिक आणि आर्थिक विकासात बहुमूल्य योगदान देतील.
ह्या प्रसंगी मुख्य अतिथी शर्मिला जैन (सामाजिक कार्यकर्ता आणि  उद्यमी) अापले अनुभव व्यक्त करताना म्हणाल्या की   फांउडेशनने अापल्या विभिन्न प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांच्या माध्यमातुन मुलींसाठी बहुमुल्य योगदान दिले आहे ज्यामुळे ह्या शिष्यवृत्ती मिळवणार्या मुलींच्या जीवनास संपुर्ण नवीन रूप मिळाले आहे.
आपले मनोगत व्यक्त करत प्रसिद्ध अॅक्टर व मॉडेल विराफ फिरोज पटेल म्हणाले की  इंडस्ट्रीमध्ये  केवळ महिलांच्या सुंदरतेलाच त्यांच्या सफलतेचे प्रमाण मानले जाते अशी संकुचित विचारधारणा आज बदलली आहे आता त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना सन्मानित करण्यात येते.
समारंभाच्या अंतिम आणि प्रमुख पहुण्या (९७ वी लीला फेलो)  डॉ. नीलु नावानी  जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या की मुलींनी एलपीएफ परिवारचा हिस्सा बनून राहीले पाहीजे आणि येथे मिळणार्या संधीचे सोने केले पाहीजे.

आंबेडकरवाद्यांना एकत्र यावेच लागेल ..मल्लिका नामदेव ढसाळ (व्हिडीओ)दलित पँथर चा ४५ वा वर्धापन दिन संपन्न

पुणे-परिस्थितीचा रेटा एवढा वाढला आहे कि, आंबेडकरवादी सर्व शक्तींना संकटाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही असे  प्रतिपादन दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी येथे केले  . गंज पेठमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित दलित पँथरच्या ४५ व्या वर्धापन दिन सोहळ्यास त्या अध्यक्षस्थानीउपस्थित होत्या . यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले .आणि आंबेडकरवाद्यांना अहंकार सोडण्याचेही आवाहन केले . (पहा नेमके ढसाळ काय म्हणाल्या व्हिडीओ)

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद , पुणे शहर अध्यक्ष गणेश रेड्डी , कवी बादशहा सय्यद ,अल्पसंख्यांक अध्यक्ष इलियास शेख , नगरसेवक  सुनिल कांबळे , बाळासाहेब पडवळ , सुरेश केदारे , अनिल हातागळे ,राहुल डंबाळे शंकर तडाखे , महाराष्ट्र राज्याचे वनप्रमुख जीतसिंग आदी मान्यवर उपस्थित होते .

. दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनीसांगितले कि दलित पँथरच्या नावातच वजन आहे . पँथर म्हणल्यानंतर भले भले वचकतात पँथरच्या अनेक शाखा तयार झाल्या मात्र खोड एकच आहे . पूर्ण भारतात प्रत्येक राज्यात दलित पँथर असावी . जेणेकरून दलितांवर  अन्याय करणाऱ्याना वचक बसेल . दलित पँथरचे ध्येय दलित शोषितांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे आहे . अन्यायाच्या प्रतिकारासाठी तुमच्यातून नामदेव ढसाळ निर्माण होतील . यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळांनी आपल्या चळवळीच्या तसेच लेखणीच्या माध्यमातून दलित पँथरमुळे जनतेला  दलित शोषितांना न्याय मिळवून दिला आहे . अन्याय विरुध्द काम करण्याचा आत्मविश्वास दलित पँथरमुळे निर्माण झाला आहे . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच पँथरने चळवळीद्वारे संविधानाच्या कायद्याचे हक्क नागरिकांना मिळवून दिले . पुणे शहराच्या ऐतिहासिक भूमीतून पँथर चळवळ उभी राहिली . यावेळी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले कि , अन्याय होणाऱ्याविरुद्ध पँथरचे कार्यकर्ते जाब विचारायचे , गोरगरीब वंचित घटकासाठी दलित पँथरने कार्यरत राहिली . गायला मारायचे नाही माणसाला मारायचे या प्रवृत्तीविरुध्द लढण्याची ताकद एक पँथरच आणू शकतो . लाठयाकाठ्याची चळवळ सामाजिक माध्यमामध्येच चाललेली आहे . त्यासाठी हि चळवळ एका व्यासपीठावर आणणे गरजेचे आहे . या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत  दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले .

अहमदाबाद चा ‘ड्रोन बॉय ‘,चेन्नईचा ‘सॅटेलाइट बॉय ‘,आणि आय सी एस इ ,जे इ इ ,एन इ इ टी .एल एल एम टॉपर्स चा होणार सन्मान

पुणे :
देशातील  ‘यंग अचिव्हर्स ‘ चा सोमवारी आझम कॅम्पस मध्ये सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून ड्रोन बनविणारा  अहमदाबाद चा ‘ड्रोन बॉय ‘ हर्षवर्धन झाला ,,’कलाम ‘ सॅटेलाईट बनविणारा चेन्नईचा ‘सॅटेलाइट बॉय ‘ रिफत शाहरुख ‘,आणि देशातील आय सी एस इ ,जे इ इ ,एन इ इ टी .एल एल एम टॉपर्स चा  सन्मान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ‘चे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांनी दिली .
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आय सी टी अ‍ॅकॅडमी च्या वतीने डॉ. पी.ए.इनामदार यंग अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा सोमवार, दिनांक 10 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.ए.आर.शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे होणार आहे, आणि तो दुपारपर्यंत चालणार आहे ,अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक आणि ‘अ‍ॅकॅडमी’च्या संचालक प्रा. मुमताझ सय्यद, ऋषी आचार्य (पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अ‍ॅण्ड आर्ट अ‍ॅण्ड स्कूल ऑफ आर्ट चे प्राचार्य) यांनी दिली.
डॉ. पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या या कार्यक्रमाला डॉ. एन.वाय.काझी (महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन रिसर्च सेंटर चे अध्यक्ष), मुनव्वर पीरभॉय (हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. डॉ. पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
‘यावेळी कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी देशातील आय टी मधील गुणवंत, विविध परीक्षांतील यशवंत तरूण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे’ अशी माहिती डॉ. पी.ए.इनामदार यांनी दिली.

” पोटभर जेवण ” फक्त ३० रुपयात …

पुणे -कॅम्प भागातील युवकांनी एकत्रित येऊन सुरु केले ” पोटभर जेवण ” चा व्यवसाय महात्मा गांधी रोडवरील अरोरा टॉवर्स चौक येथे सुरु केला . यामध्ये अरविंद अशोकी तेजी , सोनू केमुसकर या युवकांनी आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या युवकांनी एकत्रित येऊन लोकांना ना नफा ना तोटा तत्वावर अवघ्या ३० रुपयांमध्ये पोटभर जेवण देण्याचा व्यवसाय केला .

हे युवक स्वतः किराणा माल व भाजी खरेदी करतात . प्युअर रिफाईंड तेलामध्ये सर्व जेवण तयार केले जाते . दुपारी लष्कर भागातील विविध ऑफिसेस तसेच व्यवसायिक या पोटभर जेवणाचा आस्वाद घेतात . जसजशी दुपार होते तशी खवय्यांची गर्दी होते . अशी माहिती सोनू केमुस्कर यांनी दिली . त्यांना मदतीसाठी या युवकांची आजी सुनीता तेजी आणि मीरा चव्हाण हे मसाला बनवून देण्याचे काम करतात . गरमागरम जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला पुणे कॅम्पातील एम जी रोडवरील अरोरा टॉवर्स चौकात यावे लागेल .